नणंद सखी भाग १
विषय - संसारात नणंदेची भूमिका
©® सौ.हेमा पाटील.
" अगं सिद्धी, माझी ठुशी तू घेतली होतीस का? मी ड्रेसिंग टेबलच्या कप्प्यात ठेवली होती. आज मला वास्तुशांतीला जायचे आहे. आता तेवढ्यासाठी लाॅकरमध्ये कशाला जाऊ?" शलाकाने विचारले.
" मी नाही घेतली तुझी ठुशी. मला कशाला लागतेय? एवढ्यात मी साडी नेसली नाही. वहिनीने घेतली असेल. तिला विचार."
सिद्धीने दिलेले हे उत्तर ऐकून शलाका स्वतःशीच हसली. या वाक्यामुळे तिच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नवीन लग्न झाले तेव्हा ती पहिले काही दिवस सासुसासऱ्यांसोबत गावी राहिली होती.
मनोजराव पोलिसात नोकरीला होते. पर्मनंट झाले नसल्याने त्यांना पोलिस लाईन मधील रुम अजून मिळाली नव्हती. मुंबईत ते बैठकीच्या खोलीत रहात होते. बैठकीची खोली म्हणजे जिथे फक्त रात्री झोपायची सोय असते. सात आठ जण पुरुष मिळून एका खोलीत रहात होते. सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने लगेच भाड्याने रुम घेणे त्यांना परवडणारे नव्हते.
रुम मिळेपर्यंत काही दिवस मुलीला गावी सासुसासऱ्यांसोबत रहावे लागेल याची कल्पना लग्न करण्यापूर्वी मुलाच्या वडिलांनी तिच्या आईवडिलांना दिली होती. अर्थातच शाखांच्या आईवडीलांचा याला नकार नव्हताच. स्थळ बाकी सर्व दृष्टीने चांगले होते. त्यात चार मुलींची लग्ने करायची होती.
लग्न झाले, देवदेव, सत्यनारायणाची पूजा, कुलस्वामीचे दर्शन सगळे पार पडले. गावातील घरात माडीवर नवपरिणीत जोडप्याची मधुचंद्राची रात्र पार पडली. घरात भरपूर पाहुणे असल्याने सगळ्यांची ओळख होईपर्यंत आठवडा गेला.
लग्न झाले, देवदेव, सत्यनारायणाची पूजा, कुलस्वामीचे दर्शन सगळे पार पडले. गावातील घरात माडीवर नवपरिणीत जोडप्याची मधुचंद्राची रात्र पार पडली. घरात भरपूर पाहुणे असल्याने सगळ्यांची ओळख होईपर्यंत आठवडा गेला.
आपल्या दोन नणंदा नलिनी व मनिषा आणि सासुबाईंच्या तीन नणंदा अशा एकूण पाच माहेरवाशिणी तिथे लग्नानिमित्त एकत्र जमल्या होत्या. तिघी आत्यांची मुले, नातवंडेही हजर होती. आपल्या सासुबाई आजही या वयात आपल्या नणंदांशी ज्या आपुलकीने आणि आदराने वागतात ते पाहून आपणही आपल्या नणंदांशी तसेच वागले पाहिजे असे शलाकाला वाटले. आपोआपच तीही नणंदांना, त्यांच्या लहान मुलांना अहो जाहो बोलावू लागली.
आईने लग्नाआधीच ताकीद दिली होती की,
" सासरी व्यवस्थित वागायचे. ज्याचा मान त्याला द्यायचा. त्यामुळे आपण लहान होत नाही.
आपण व्यवस्थित वागलो तर समोरचा माणूस कितीही नाठाळ असला तरी त्याला आपली खोडी काढायची संधी मिळत नाही. म्हणून आपणच आपल्या वागण्याबोलण्याकडे लक्ष द्यायचे."
" सासरी व्यवस्थित वागायचे. ज्याचा मान त्याला द्यायचा. त्यामुळे आपण लहान होत नाही.
आपण व्यवस्थित वागलो तर समोरचा माणूस कितीही नाठाळ असला तरी त्याला आपली खोडी काढायची संधी मिळत नाही. म्हणून आपणच आपल्या वागण्याबोलण्याकडे लक्ष द्यायचे."
आईचे सांगणे धुडकावून लावत स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा शलाकाचा स्वभाव नव्हता. त्यामुळे ती आईच्या सल्ल्याप्रमाणे सर्वांशी मिळून मिसळून वागत होती. कुणी काही बोलले तर ते बोलणे पाठीवर टाकत ती हसतमुखाने वावरत होती. तिच्या दोन्ही नणंदा तिच्याभोवती असायच्या. त्यांची मुले तर मामी मामी करत तिचा पिच्छा सोडत नव्हती.
अल्पावधीतच शलाकाला आपल्या घरात रुळलेले पाहून मनोजरावांना समाधान वाटले. आपण एकदा मुंबईला गेलो की दोन महिने तरी परत येणार नाही. आपली नवपरिणीत बायको इथे कशी राहील याची त्यांना असलेली काळजी मिटली.
लग्नानंतर पहिला सण आषाढ पाट्यांचा आला. ती आषाढात माहेरी गेली ते नागपंचमी साजरी करुनच परतली. विविध उपवास, व्रतवैकल्ये यांत श्रावण कधी सरला ते समजले नाही. सर्वांना गणपतीचे वेध लागले. घरात स्वच्छता, चुलीला पोतेरा देणे, घर आतून उभ्याकुडी पांढऱ्या मातीने सारवून घेणे, जमीन शेणाने सारवणे सगळे करुन झाले. मनोजराव गणपतीत तरी येतील अशी आशा तिला लागली होती, परंतु गणपतीत मुंबईत बंदोबस्त असतो, त्यामुळे त्यादरम्यान पोलिसांना सुट्टी मिळत नाही हे तिला अजून माहीत नव्हते.
गणपती आले, पाठोपाठ गौराईंचे आगमन झाले. छोट्या नणंदेचे एकत्र कुटुंब होते. त्यामुळे तिच्याघरी इतर जावा असल्याने ती सासुसासऱ्यांची परवानगी घेऊन माहेरी आली होती. वहिनी एकटीच आहे. दादा इथे नाही. आईबाबांशी ती काय बोलणार? याचा विचार करून ती माहेरी आली होती. ती आल्यामुळे शलाकाची कळी खुलली. दोघींनी मिळून गौराईंना छान सजवले. वेगवेगळे पदार्थ बनवले. आकर्षक पद्धतीने ते गौराईंसमोर मांडले.
रात्री सगळे आटोपल्यावर सासुबाई त्या दोघींना घेऊन नवलाई देवीसमोर असलेल्या प्रांगणात घेऊन गेल्या. तिथे सगळ्या महिला जमल्या होत्या व गौराईची गाणी गात झिम्मा फुगडी खेळणे सुरु होते. त्या दोघी नणंद भावजया आत शिरल्या. मनसोक्त झिम्मा, फुगड्या घालून झाल्यावर त्यांनी फेर धरला. खेळल्यामुळे शलाकाच्या मनात जे नकारात्मक विचार होते, अगर पतीदेव न आल्याचे शल्य होते ते पळून गेले.
" नणंद भावजय दोघीजणी, घरात नव्हते तिसरे कोणी |
शिक्यावरचे लोणी खाल्ले कोणी, मी नाही खाल्ले वहिनींनी खाल्ले ||"
या गाण्यावर फेर धरताना आपण वहिनी आहोत, आपल्याला ब्लेम केले जात आहे असा विचार तिच्या मनात आला नाही. हा खेळ आहे आणि ते खेळापुरतेच आहे एवढे समजण्याइतकी परिपक्व ती नक्कीच होती.
शिक्यावरचे लोणी खाल्ले कोणी, मी नाही खाल्ले वहिनींनी खाल्ले ||"
या गाण्यावर फेर धरताना आपण वहिनी आहोत, आपल्याला ब्लेम केले जात आहे असा विचार तिच्या मनात आला नाही. हा खेळ आहे आणि ते खेळापुरतेच आहे एवढे समजण्याइतकी परिपक्व ती नक्कीच होती.
रात्री उशिरा त्या घरी परतल्या. त्याचा हॅ़ंगओव्हर दुसऱ्या दिवशीही टिकून होता. ती मधूनच या ओळी गुणगुणत होती,
" नणंद भावजय दोघीजणी....मी नाही खाल्ले वहिनींनी खाल्ले..."
ते ऐकून मनिषा म्हणाली,
" बघा हं वहिनी, खरंच मी तुमचे नाव सांगेन बरं का आईला."
" तुम्हांला खायचेय का लोणी? खा मग, आणि बेशक माझे नाव सांगा."
असे शलाका म्हणाली.
" चला, आपण दोघी मिळून खाऊया." असे मनिषा म्हणाली. यावर दोघीही खळखळून हसल्या. त्या दोघींमध्ये त्या रात्री जे निरागस नाते फुलले ते पुढे आयुष्यभर टिकून राहिले.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
" नणंद भावजय दोघीजणी....मी नाही खाल्ले वहिनींनी खाल्ले..."
ते ऐकून मनिषा म्हणाली,
" बघा हं वहिनी, खरंच मी तुमचे नाव सांगेन बरं का आईला."
" तुम्हांला खायचेय का लोणी? खा मग, आणि बेशक माझे नाव सांगा."
असे शलाका म्हणाली.
" चला, आपण दोघी मिळून खाऊया." असे मनिषा म्हणाली. यावर दोघीही खळखळून हसल्या. त्या दोघींमध्ये त्या रात्री जे निरागस नाते फुलले ते पुढे आयुष्यभर टिकून राहिले.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा