#लघुकथा स्पर्धा
मोठ्या हॉलमध्ये चहुबाजूंनी पंडितजींचा मंत्र घुमत होता " शुभमंगल... सावधान.. "
शेवटी सात फेरे आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने दोघांचा विवाह संपन्न झाला.
मुंबई येथे डेल्टा बिल्डिंग, फ्लॅट नंबर १३४, साळवी कुटुंबात गृहप्रवेश करण्यात आला.
" मृण्मयी... माप ओलांडून आत ये आता. "
" मृण्मयी... माप ओलांडून आत ये आता. "
मृण्मयी मानेने होकार देत साडी सावरत माप ओलांडून आत येते. तिच्या सोबत तिचा आताच झालेला नवरा आत येतो. दोघांच्या मागोमाग बाकीचे पण आत येतात.
एक वृद्ध महिला " शिखा.. तुझ्या वहिनीला तुझ्यासोबत तुझ्या खोलीत घेऊन जा. आजच्या दिवस मृण्मयी तुझ्या सोबत झोपेल. मग उद्या सत्यनारायण पूजा झाली की ती देवच्या खोलीत राहील.."
त्या वृद्ध महिलेचे ऐकून शिखा वैतागून हळू आवाजात " आई.."
तस वृद्ध महिला शिखाकडे रोखून बघत दात ओठ खात " आजच्या दिवस फक्त. "
त्यांच्या अश्या बघण्याने शिखा गप्प बसते आणि हसरा चेहरा करत मृण्मयीला खोलीत घेऊन जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून साळवी कुटूंबाच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालू होती. त्यात मृण्मयीला पण छोटी मोठी कामं करायला दिलेली. नवी नवरी म्हणून पहिल्या दिवशी तिला आराम असतो पण इथलं चित्र वेगळच होतं. देवच्या आईने पहिल्याच दिवशी मृण्मयीला कामाला लावलेलं. त्यामुळे तिला साज शृंगार करायला उशीर झाला. तरीही तिने पटकन स्वतःला तयार केलं.
दुपारी तीनलाच सत्यनारायण पूजा आटोपली त्यानंतर जे पाहुणे लग्नाला येऊ शकले नाहीत ते पाहुणे हळूहळू यायला सुरुवात झाली. त्यांचा मानपान करण्यात रात्रीचे दहा वाजले. नंतर देव आणि मृण्मयी दोघांची मधुचंद्राची रात्र बहरून खऱ्या अर्थाने मृण्मयीचा संसार सुरु झाला. तिच्या जीवनाची एक सुरुवात झालेली.
सकाळी सातलाच उठून मृण्मयीने सकाळचा नाष्टा आणि बाकीची कामे उरकून टाकली. तोपर्यंत बाकीचे पण हळू हळू उठले आणि नाष्टा करून आपापल्या कामावर निघून गेले. घरी फक्त मृण्मयी आणि तिची सासू होती.. नाष्टा झाल्यावर सासू सरळ आपल्या खोलीत निघून गेली ती रात्रीच्या जेवणाच्यावेळी बाहेर आली. दुपारचं जेवण त्यांनी खोलीतच केलेलं.
मृण्मयीला सासूचं असं वागण आवडलं नाही. सासरी तिचा पहिलाच दिवस होता म्हणून ती काही बोलली नाही. परत उद्या तिला एक दिवसासाठी माहेरी पण जायचं होतं त्या तयारीमध्ये तिने जास्त लक्ष नाही दिलं.
मृण्मयी माहेरून आल्यावर तिला सासूचं वागणं वेगळं वाटल. कारण तिची सासू आता तिच्यासोबत प्रेमाने वागू लागलेली. मृण्मयीला हे पचवण अवघड जात होतं. नंतर तिने जास्त विचार न करता सोडून दिलं. असेच दिवस जात होते. एक दिवस मृण्मयीने तिला जॉब करायचं म्हणून सगळ्यांना सांगितलं. तिचं असं बोलण कोणाला आवडलं नाही तरी सगळ्यांनी कसबस तिला होकार दिला. होकार मिळाला म्हणून ती खूप खुश होती. असेच दिवस जातं मृण्मयीच्या संसाराला एक वर्ष झालं.
एक दिवस ऑफिसमध्ये असताना तिला अचानक एक कॉल आला म्हणून तिने अर्धी सुट्टी टाकली आणि कुठेतरी निघून गेली.
राजपूत हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मृण्मयी रागाने आपल्या आईशी बोलत होती " आई. मी महिन्याला तुम्हाला पैसे पाठवत होती तुम्हाला. मग बाबांच चेकअप का नाही केल. "
तिची आई " हे तुला कसं?"
आईच बोलण तोडत मृण्मयी " डॉक्टरांकडून समजलं मला. ते बोलले की अकरा महिने ते चेकअप करायला नाही आले."
मृण्मयीचं ऐकूण तिच्या आईला काय बोलाव काही समजत नव्हत. त्यांना असं बघून मृण्मयी " आई.. खरं सांग काय झालं? तुझा चेहरा सांगतोय काहीतरी झालंय. तुला माझी शपथ आहे. बोल."
आता काही पर्याय नाही बघून तिची आई " तू पाठवलेले पैसे तुझ्या सासरी जायचे. "
मृण्मयी न समजून " म्हणजे? "
आई " जेव्हा तू पैसे पाठवायची त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझ्या सासूचा फोन यायचा आणि त्यांना पैश्याची खूप गरज आहे म्हणून आम्हाला ते पैसे द्यावे लागायचे. मला हे नाही आवडायचं. पण तुझ्या संसारात विघ्न नको म्हणून आम्ही ते पैसे त्यांना पाठवायचो."
आईच ऐकून मृण्मयी स्वतः शीच " आता समजल सासूबाई इतक्या गोड गोड का वागत आहेत? "
त्याच दिवशी रात्री साळवी कुटुंबात जोरात भांडण चालू होतं.
मृण्मयी मोठ्या आवाजात आपल्या सासूला " का मम्मी? का असं केल? तुम्हाला पैसेच पाहिजे होते तर मला सांगायचं ना मी दिले असते. "
मृण्मयीचं असं मोठ्याने बोलण कोणालाच आवडल नाही. घरातल्या सगळ्यांनाच तिचा राग आलेला.
तिची सासू रागाने तिला " हे पोरी आम्ही तुझ्यासोबत इतकं प्रेमाने वागतोय म्हणून जास्त चिवचिव नको करू.. हो पैश्याची गरज होती. मला नाही तुझ्या दिराला म्हणजेच माझा मोठ्या मुलाला श्रीकांतला गरज होती. त्याला एक नवीन हॉटेल खोलायचं होतं आणि हे तुझी ताई श्वेताचं स्वप्न होतं. तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण ती अशी आजाराने त्याच्या आयुष्यातून निघून गेली. "
तिची सासू रागाने तिला " हे पोरी आम्ही तुझ्यासोबत इतकं प्रेमाने वागतोय म्हणून जास्त चिवचिव नको करू.. हो पैश्याची गरज होती. मला नाही तुझ्या दिराला म्हणजेच माझा मोठ्या मुलाला श्रीकांतला गरज होती. त्याला एक नवीन हॉटेल खोलायचं होतं आणि हे तुझी ताई श्वेताचं स्वप्न होतं. तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण ती अशी आजाराने त्याच्या आयुष्यातून निघून गेली. "
तिच्या सासूचं बोलून झाल्यावर श्रीकांत मृण्मयीच्या समोर येत " मृण्मयी काळजी नको करू. मी तुझे पैसे तुला परत करेन. माझ्याकडे खरंच पैसे नव्हते म्हणून तुझ्या आईवडिलांकडून मागितले. आम्हाला कुठे माहिती होतं ते तू पाठवलेले पैसे आम्हाला देत आहेत. मला फक्त तुझ्या ताईच स्वप्न पूर्ण करायचं आहे. तिचं स्वप्न होतं की आपल एक हॉटेल असावं. बस. " एवढं बोलून तो आपल्या खोलीत निघून जातो.
श्रीकांतला गेलेलं बघून देव तिचा हात हातात घेत " मृण्मयी तुझी काळजी समजू शकतो आम्ही. पण आम्हाला चुकीचं समजू नको. "
मृण्मयी कोणाला काही न बोलता तशीच खोलीमध्ये निघून जाते.ती गेल्यावर तिची सासू देव, शिखा आणि तिच्या सासऱ्याकडे बघत " ही मुलगी तरबेज दिसत आहे. सांभाळून राहावं लागेल. "
असेच तीन महिने तणावात निघून गेले. एके दिवशी अचानक साळवी कुटुंबाच्या दारासमोर एक पोलीस टीम उभी राहिली. शिखा पोलिसांना समोर बघून ओरडत आत येते.
शिखाच्या आवाजाने सगळेच बाहेर आले आणि पोलिसांना समोर बघून मृण्मयी सोडून बाकीच्यांच्या मनात भीती निर्माण झाली पण चेहऱ्यावर तस न दाखवता सगळे तसेच उभे होते.
एक पोलीस बाकीच्या पोलिसांना ऑर्डर देतो " पकडा या सगळ्यांना. "
त्या पोलिसाच ऐकून सासू " आम्ही काय केल साहेब? जे आम्हाला असं पकडत आहात. "
पोलीस " एका सुनेचा खून करून आणि दुसऱ्या सुनेवर अन्याय करून त्यांच्याकडून हुंडा मागत होता म्हणून तुम्हा सर्वांना अटक करण्यात येत आहे. "
त्यांच ऐकून सासू जोरात " काय? नाही हे अशक्य आहे. आम्ही असं नाही करत. "
मृण्मयी पुढे येत " हे शक्य आहे. जेव्हा माझ्या आईने तुमच्याबद्दल जे सांगितलं होतं तेव्हाच मला तुम्हा सर्वांवर शंका आलेली. म्हणून एके दिवशी घरी कोणी नसताना मी श्रीकांतच्या खोलीत काही पुरावे भेटतात का बघत होती. तर त्यांच्या खोलीत एका गुप्त ठिकाणी मला माझ्या ताईची डायरी भेटली आणि एक चिप भेटली ज्यात स्पष्टपणे दिसत होतं की तुम्ही कसा तिच्यासोबत हुंड्यासाठी कसा छळ करत होता. जेव्हा तुम्हाला समजलं की तिने छळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे आणि ती सगळे पुरावे पोलिसांना दाखवण्यासाठी जाणार तेव्हाच तुम्ही तिचा खून केला आणि वरून आम्हाला काय सांगितलं ती आजाराने तडफडत होती, तुम्हाला त्रास नको म्हणून तिने आम्हाला न सांगण्याची शपथ दिलेली. इथेचं तुमचं मन नाही भरलं आम्हाला गोड गोड बोलून माझं लग्न देवशी करवून दिलं म्हणजे एकीकडून बंद झालं म्हणून माझ्याकडून हुंडा घेता येईल. शी.. लाज वाटते तुमच्यासारख्या लोकांची जे पैश्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर गेले. ( दुसरीकडे तोंड करत ) घेऊन जा यांना. "
देव, श्रीकांत, शिखा, मृण्मयीचे सासू सासरे यांनी श्वेता आणि मृण्मयीला हुंड्यासाठी दिलेला त्रास म्हणून यांना जन्मपेठेची शिक्षा देण्यात आली. मृण्मयीने देवला घटस्फोट देऊन नवीन जीवनाची सुरुवात केली सोबत तिने श्वेताला न्यायही मिळवून दिला.
_समाप्त_
©भाग्यश्री परब
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा