"कायं? पण मला समजले तसे तुझी आणि आदित्यच्या लग्नाची तारीख ठरवली गेली होती ना?"
"हो" मीराने पुन्हा संथपणे उत्तर दिले.
"अगं इतक्या शांतपणे हो कायं म्हणतेयं तू? कायं झाले ते तरी सांग मला." घनश्याम जरा वैतागून म्हणाला तशी मीरा पुन्हा मागे वळली आणि बाकावर येऊन बसली.
" तूला लग्न ठरल्याचे कळले मगं ही गोष्ट नव्हती का माहित? "
" मीरा कमॉन मला माहित असते तर असा रिएक्ट का झालो असतो मी? " घनश्यामने मीराच्या प्रश्नावर उलट प्रश्न केला.
" मला वाटले तूला कळले असेल तुझ्या खबरींकडून वगैरे." मीराने एक कटाक्ष दिला त्याच्याकडे पाहून.
" मीरा नवरा बायको होतो आपण. आपल्या दोघांच्याही काही जवळच्या नातेवाईकांत आपले छान रीतसर लग्न पार पडले होते भलेही आपले नाते तुटले काही वर्षांपूर्वी पण नातेवाईक कायं ते भेटतातचं कधीतरी एखाद्या समारंभात.
निशा ताईला मध्ये एका कार्यक्रमात सुमन काकू भेटल्या होत्या त्यांनी सांगितले ताईला आणि ताईने मला. " घनश्यामने स्पष्ट करून सांगितले.
" अच्छाss " मीराचे पुन्हा मोजकेच उत्तर.
" कायं झालं ते सांगशील का? " पुन्हा एकदा घनश्यामने तोच प्रश्न केला.
" अरे सांगण्यासारखे कायं आहे त्यात? नाही झाले वर्क आऊट. लग्न ठरले तरी मोडले कायं किंवा लग्न झाल्यावर मोडले कायं एखादे नाते का संपते त्यावर आपण दोघांनीही न बोलले बरे नाही का?" मीराच्या आत्ताच्या प्रश्नाचा रोख घनश्यामला अगदीच अचूक कळला होता.
"का नाही बोलायचे? हे बघ मीरा प्रत्येक नाते वेगळे असते आणि प्रत्येक नात्याची गोष्ट देखील वेगळी असते. उगाचचं वाटा वेगळ्या नाहीत होतं दोन व्यक्तींच्या? " घनश्यामने ही उत्तर दिले.
" ओके. मला वाटतं मी निघते आता उगीचचं इथे थांबून एकमेकांच्या जुन्या जखमा पुन्हा उखरून काढण्यात काहीच अर्थ नाही आता. असेही आपण आपल्यासाठी वाटा शोधल्या आहेत मगं कायं अर्थ आहे पुन्हा बोलण्यात? " मीरा पुन्हा बॅग घेऊन उठली आणि यावेळी मात्र घनश्यामने तिचा हात पकडला.
" थांब मीरा.. खूप झालं. किती दिवस अशीच पळणार आहेस गं..?
तूला कायं वाटतं गं प्रत्येक वेळी तू अशी लपंडाव खेळत मला भेटणारचं नाहीस.
तूला कायं वाटतं गं प्रत्येक वेळी तू अशी लपंडाव खेळत मला भेटणारचं नाहीस.
मीरा आयुष्यात नियती नावाची ही गोष्ट असतेचं बघं ना तीन वर्षे तू टाळत राहिलीस पण आज त्याच नियतीने योगायोगाने का होईना तूला माझ्यासमोर आणून उभे केलेचं. आत्ता तरी नको पळ काढूस किमान. " घनश्याम मीराच्या नजरेला नजर देऊन बोलला.
" माझा हात दुखतोयं " मीराच्या बोलण्याने घनश्यामच्या लक्षात आले की त्याने अजूनही तिचा हात घट्ट धरून ठेवला होता ते. त्याच्या लक्षात आले तसे त्याने तिचा हात सोडला.
" का पुन्हा स्वतःला आणि मला त्रास देतोय तू? कायं बोलायचं आहे तूला आता इतके वर्षांनी?" मीरा चिडूनच बोलली.
" त्रास इतक्या वर्षात कमी का झाला? सतत विचार करतोय मी तू सोडून गेली त्या दिवसापासून की तू एकही शब्द न बोलता का अशीच निघून गेलीस शांतपणे.
खरं सांग मीरा या तीन वर्षांत तूला एकदाही माझी आठवण आलीच नाही का? खरंच वाट निवडलीस का तू तुझ्यासाठी नवी??"
"हो मगं आदित्य सोबत लग्न ठरले होते माझे तूला यावरून लक्षात यायला हवं होतं " मीराने बोलताना नजर चोरली जी घनश्यामच्या नजरेतून सुटली नाही.
" मीरा लग्न ठरले होते आणि आत्ता लग्न मोडले, ते नाते वर्क आऊट नाही झाले तूच बोललीस असे काही वेळापूर्वी.
बरं मान्य मला लग्न ठरले होते पण खरंच तू मनापासून लग्न करणार होती का? की अजून काही कारण होते?" घनश्यामचा प्रश्न ऐकून मीरा गप्प झाली.
"मीरा का शांत आहेस? बोलं नाss "
" कुठल्या हक्काने तू विचारतोयं मला हे? कायं संबंध आहे तुझा माझा? आणि आत्ता का तूला जाणून घ्यावसं वाटतयं? ज्यावेळी खरी गरज होती तुझी तेव्हा कायं केलसं तू?
घनश्याम आपल्या ज्या नात्याची तू मला वारंवार आठवण करून देत आहेस त्याच नात्यातून मला जाण्यासाठी भाग तूचं पाडलं ना?
किती सहजपणे म्हणाला होतास त्या दिवशी की, 'मीरा आपण वेगळे होऊया म्हणून' आणि झालोय ना वेगळे मगं का अडवतं आहेस आज माझी वाट पुन्हा. जाऊ दे मला माझ्या वाटेने. असेही तीन वर्षांपूर्वी तूला माझाचं त्रास होता ना? " मीराच्या मनातील शब्दांचा अखेर बांध फुटला होता ती एकसारखे बोलत होती.
" मीरा मी म्हटलं आणि तू निघून गेलीस व्वा! तू फक्त मलाच दोष देतं आहेस भेटल्यापासून. खरं सांग मलाच तुझा त्रास होता फक्त, तूला काहीच त्रास नव्हता का?
आपल्यात जे काही वाद झाले ते फक्त माझ्यामुळेच झाले हो ना? सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार होतो." घनश्यामच्या मनातील गोष्टी ही आता बाहेर निघत चालल्या होत्या एक एक करून.
दुपारची ती वेळ आणि शिवाय गार्डन मध्ये ते दोघे एका बाजूला होते त्यामुळेच बोलता येत होते सहजपणे त्यांना कारण दुपारची वेळ असल्यामुळे गार्डन मध्ये गर्दी तशी कमीच होती.
" घनश्याम मी तुझ्यामुळे सगळे घडले असे म्हटले नव्हते त्यावेळी आणि आत्ताही मला तसे म्हणायचे नाही आहे पण एक नवरा म्हणून जेव्हा मला तुझी साथ हवी होती त्या प्रत्येक क्षणी तू मला एकटं पाडलं फक्त. माझ्यासाठी जराही लढला नाहीस." बोलता बोलता मीरा जरा भावूक झाली काही गोष्टी आठवून.
" मीरा अगं लढायचं होतं कोणाशी? माझ्या सख्ख्या आईशी?
कायं अपेक्षा होती तुझी की मी तिच्याशी वाद घालून तिला सोडायला हवं होतं.
कायं अपेक्षा होती तुझी की मी तिच्याशी वाद घालून तिला सोडायला हवं होतं.
मीरा मला मान्य होतं त्यावेळी देखील की माझ्या आईच्या काही गोष्टी चुकीच्या होत्या पण प्रत्येक वेळी तर ती चुकीची नव्हती ना?
काही गोष्टी तुझ्याही चुकत होत्या पण.. " घनश्याम बोलता बोलता थांबला.
क्रमशः
पण कायं? दोन मने आता बोलण्यासाठी सज्ज झाली आहेत. या संभाषणातून भूतकाळातील कुठले सत्य बाहेर येणार आहे ते पाहण्यासाठी कथा वाचत रहा.
©®ऋतुजा कुलकर्णी