मीरा गूढ हसली आणि तिचे हसणे पाहून घनश्याम कोड्यात पडला.
"तूला खरंच वाटतं का जे आई बाबा माझ्या मागे लग्नासाठी तगादा लावून होते ते इतक्या सहजपणे ऐकतील माझं?" मीराने घनश्यामला उलट प्रश्न केला.
"तूला खरंच वाटतं का जे आई बाबा माझ्या मागे लग्नासाठी तगादा लावून होते ते इतक्या सहजपणे ऐकतील माझं?" मीराने घनश्यामला उलट प्रश्न केला.
"तेच विचारतोयं कायं झालं पुढे?" घनश्यामने विचारले.
"काही नाही खूप वाद झाले, मी कशी चुकतेयं, आपल्या नात्याच्या वेळीही चूक माझीच होती, आत्ताही मी पुन्हा चूक करतेय म्हणून मला खूप ऐकवले गेले पण मी तटस्थ राहिले निर्णयाच्या बाबतीत. आई बाबांनी अबोलाचं धरला मगं. 'हवे ते करं आम्ही बोलणार नाही.' असे म्हणतं.
थोडे दिवस घरात हेच वातावरण राहिले, पुन्हा लोकांची बोलणी, वहिनीचे सारखे स्थळ पाठवणे सुरूचं. खरंतर हल्ली ऑफिसमधून घरी जावसं वाटतंच नाही मला.
आयुष्याचा अगदी उबग येतो हल्ली. तीन वर्षांत इतके काही घडले की खूप बदलले मी अगदी. कधीकधी वाटतं मी मीरा चं आहे की अजून कोणी? " मीरा दूर कुठेतरी नजर ठेवून बोलली.
" मीराss " घनश्यामचा स्वर कातर झाला बोलताना अचानक जे मीराला ही जाणवलं.
"ह्म्म " मीराने फक्त हुंकार भरला तसे घनश्यामने तिच्या जवळ सरकत तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे डोके आपलय छातीवर ठेवून तिच्या डोक्यावर थोपटतं राहिला मायेने.
घनश्यामच्या त्या स्पर्शाने मीराने इतके वर्ष आत दाबून ठेवलेला तो बांध फुटला अखेर ती हमसून हमसून रडायला लागली. घनश्यामने ही तिला रडू दिलं अगदी मनसोक्तपणे.
"मीरा एक साधा फोन करायला कितीसा वेळ लागतो गं? सगळे एकटीने सहन करत राहिलीस. त्याचवेळी माझी वाट पाहत बसण्यापेक्षा का नाही भांडलीस माझ्याशी तू?
का मला हक्काने ओरडली नाहीस की, 'हे माझं घर आहे मी जाणार नाही म्हणून' जितक्या सहजतेने तू निघून गेली मलाही वाटलं की तुला सुटका हवी होती माझ्यापासून. मलाही वाटलेलं तू रागात गेली असशील दादाकडे येशील परतून पण नाही तू आली नाहीस.
मला रोज वाटायचं त्यावेळी की फोन करावा का, तुझ्या दादाच्या घरी यावं का पण पुन्हा वाटायचं,' मीचं का?' तू जर माझ्याशिवाय राहू शकते तर मी ही तुझ्याशिवाय राहूच शकतो नक्की. "
" म्हणजे? तूला ही त्यावेळी तितकाच त्रास झाला जितका मला झालेला? " मीराने मुसमुसतं विचारले.
" हो मलाही खूप त्रास झाला. मी वाट पाहत होतो मीरा तुझी. तू गेल्यापासून मी बेडवर टॉवेल टाकणं बंद केलं, तुला न आवडणार्या सगळ्या गोष्टी बदलल्या वाटायचं कधी तू अचानक घरी आली तर तुला हा बदल दिसेल पण तुझ्याऐवजी घरी आले ते घटस्फोटाचे तू पाठवलेले कागद. खूप खचलो. त्या दिवशी खूप रडून घेतले आपल्या दोघांच्याही फोटोला कवटाळून.
अगोदर ठरवले होते तुला जाब विचारायचा याचा पण परत विचार केला, 'तुला जर सुटका हवी आहे तर मी का बांधून ठेऊ तुला? ', म्हणून मगं ते कागद सही करून पाठवले आणि कोर्टात निर्विकार राहिलो कारण तुला समोर पाहून माझा संयम संपला असता, मला सावरायला जमले नसते तर अवघड झाले असते म्हणून खूप अगोदर पासून स्वतःला त्या दिवसासाठी तयार करत राहिलो.
तू तरी शहर बदलले गं मीरा, माझं कायं?
रोज रूममध्ये आलं की तुझ्या आठवणी मला अशी मिठी मारायच्या की बस्स!
आईने आपल्या वेगळं होण्याचा खूपच धसका घेतला. माझं दुःख पाहून तिला वाटलं की आपल्या वेगळे होण्याला तीच जबाबदार आहे. ती शांत झाली खूपच आणि अशातच एक दिवस विचार करता करता बाथरूममध्ये घसरून पडली आणि तेव्हापासून तिच्या पायात एक रॉड घातला आहे.
फार बाहेर नाही जातं ती. घरातही कामे करता येत नाहीत तिला. तीचं तीचं कसंबसं करत राहते फक्त काठीच्या सह्हायाने. " घनश्याम बोलताना गहिवरला जरासा.
रोज रूममध्ये आलं की तुझ्या आठवणी मला अशी मिठी मारायच्या की बस्स!
आईने आपल्या वेगळं होण्याचा खूपच धसका घेतला. माझं दुःख पाहून तिला वाटलं की आपल्या वेगळे होण्याला तीच जबाबदार आहे. ती शांत झाली खूपच आणि अशातच एक दिवस विचार करता करता बाथरूममध्ये घसरून पडली आणि तेव्हापासून तिच्या पायात एक रॉड घातला आहे.
फार बाहेर नाही जातं ती. घरातही कामे करता येत नाहीत तिला. तीचं तीचं कसंबसं करत राहते फक्त काठीच्या सह्हायाने. " घनश्याम बोलताना गहिवरला जरासा.
" कायं? इतकं सगळं घडलं पण मला आईबद्दल नव्हतं माहित. कशा आहेत त्या आता? " मीरा चांगलीच आश्चर्यचकित झाली हे सगळे ऐकून. घनश्यामच्या कुशीतून बाहेर येऊन तिने विचारले.
" कसं माहित असणार मीरा तू खूप लांब गेलेली त्यात माझी आई तुला कधी पटलीच नाही."
"हो.. खरं आहे श्याम तुझं. मी खूप चुकले त्यावेळी खरंतर मला वाटायचं मीच बरोबर आहे पण आई बाबांसोबत राहताना आई आणि वहिनीचे नाते पाहून लक्षात आले की तुझ्या आईला मी कधी आई म्हणून बघितले नाही कायम सासूच्या नजरेने पाहंत गेले. त्यांचे प्रेम, काळजी नंतर लक्षात आली ज्यावेळी खूप उशीर झाला आणि तू मगाशी म्हटला ही साडी आदित्य मुळे नेसायला लागले का तर नाही.
मी आदित्य सोबत तयार नव्हते लग्नाला कारण माझ्या या मनाने तूला कधीही माझ्यापासून दूर जाऊ नाहीच दिलं. तुझ्या आठवणी मला खूप त्रास द्यायच्या मगं तूला आवडतं म्हणून साडी नेसायला लागले. साडी नेसली की तू जवळपास कुठेतरी आहेस असचं वाटायचं मला.
अगदी आदित्य सोबत लग्न मोडले तेव्हाही वाटले तूला एक फोन करावा पणss " मीराला हुंदका अनावर झाला.
" पणsss " घनश्याम त्या शब्दांवर जोर देऊन बोलला.
" मीरा या 'पणss' नेच आपल्या दोघांना ही इतके वर्ष दूर ठेवले. कसं असतं ना गं, आपल्याला नातं आणि माणूस हवं असतं तेव्हा हा
'पणss 'मध्ये येतो. तीन वर्षांपूर्वी ही तुला वाटतं राहिलं की मी तुला थांबवायला हवं आणि मला वाटतं राहिलं की तू मला जाब विचारायला हवा असं. आपण दोघेही आपापला सो कॉल्ड इगो जपत राहिलो आणि त्या इगोने आपल्याला किती त्रास दिला बघं.
'पणss 'मध्ये येतो. तीन वर्षांपूर्वी ही तुला वाटतं राहिलं की मी तुला थांबवायला हवं आणि मला वाटतं राहिलं की तू मला जाब विचारायला हवा असं. आपण दोघेही आपापला सो कॉल्ड इगो जपत राहिलो आणि त्या इगोने आपल्याला किती त्रास दिला बघं.
आपण छोट्या छोट्या गोष्टीत हा इगो का जपत बसतो कळतचं नाही. अगदी मगाशीही तू कॅफेतून निघताना हा इगो मध्ये आलाच होता पण कदाचित् आज इतक्या दिवसांचा एकटेपणा आणि तुझ्याबद्दल असलेलं प्रेम दाटून आलं म्हणून मी इगोला दूर करून तुला थांबवलं.
मीरा जे झालं ते झालं. हे बघं आत्ता या क्षणी मला इतकंच लक्षात येत आहे की जितकी मला तुझी गरज आहे तितकीच तुला माझी गरज आहे. आपण वेगळे झालो ते शरीराने पण आपलं मन अजूनही एकमेकांपासून वेगळे झालेले नाही आहे .
खूप झालं आता हे बास करूयात एकत्र सुरूवात करूयात गं खरचं नको विचार करू पुन्हा त्रास होईल, तेच घडेल असे. आपल्या भूतकाळातील चुकांची पाटी खोडून टाकूयात ना आपण आणि आपल्या हाताने एक नवा वर्तमान लिहूया पुन्हा.
मीरा हा श्याम अपूर्ण आहे तुझ्याशिवाय तू पुन्हा तुझ्या प्रेमाचा रंग मरशील का माझ्या आयुष्यात येऊन? " घनश्यामने मीराला विचारले आणि तो आता मीराकडे पाहू लागला उत्तराच्या अपेक्षेने.
मीरा मागे सरकली तिने तिची पर्स उघडली तोपर्यंत घनश्याम मात्र अवाक् होऊन तिच्या या कृतीकडे पाहंत होता. त्याचं हदय वेगाने धडधडतं होतं.
मीराने पर्समधून एक गुंडाळलेला कागद बाहेर काढला आणि घनश्याम समोर धरला त्याने तो कागद उघडला आणि आश्चर्याचा धक्का बसला त्याला पुन्हा.
"गजरा??"
"हो श्याम. तूला मोगर्याचा गजरा खूप आवडतो ना? तू कायम माझ्यासाठी गजरा घेऊन यायचा रोज अगदी न चुकता आणि केसांत माळायचा अगदी प्रेमाने. तुझ्यापासून दूर गेल्यावर लक्षात आलं की आयुष्यातून हा दरवळ ही निघून गेला आहे.
खरं सांगू पुण्यात असताना आणि बँगलोरमध्ये ही रोज गजरा घ्यायचे तुझ्या आठवणीत अगदी आदित्य सोबत साखरपुडा झाल्यावर ही गजरा घ्यायचे पण तो केसांत माळायची इच्छा झालीच नाही कारण केसांत माळायची वेळ आली की हा मोगरा कायमचं कोमेजलेला वाटायचा मला कदाचित् तू सोबत नसल्यामुळे असेल तसे कारण आज बघं हा मोगरा किती फुललेला वाटतोयं. " मीराच्या चेहर्यावर बोलताना कळी खुलली.
घनश्यामने तो गजरा हातांच्या ओंजळीत घेतला आणि त्याने मीराला जवळ घेतले. दोघांनीही एकत्रच त्याचा दरवळ मनांत साठवून घेतला.
" मीरा आता हा दरवळ आपण कायमचं जपायचा. कितीही काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. "
" मीरा आता हा दरवळ आपण कायमचं जपायचा. कितीही काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. "
" ह्म्म" असे म्हणून मीरा त्याच्या कुशीत शिरली तसे घनश्यामने तिला स्वतःपासून दूर केले.
"मगाशी कोणीतरी म्हणतं होतं की इथे आजूबाजूला लोकं आहेत म्हणून?" घनश्याम घास खाकरतं बोलला.
" असू दे.. मगाशी राग होता ना आता कोणी विचारले तर सांगेन माझा नवरा आहे म्हणून. " मीराने ठसक्यात उत्तर दिले.
"हो का बरं?" घनश्याम लाडांत हसला. त्याने मीराच्या केसांत तो गजरा माळला आणि तिला जवळ घेऊ लागला तसे मीराने त्याला थांबवले.
"अजून एक काम राहिले" असे म्हणतं तिने पर्समधून तिचे मंगळसुत्र काढले आणि त्याच्या हातात दिले.
" कायमचं सोबत होते हे माझ्या आता तुझ्या हातांनी पुन्हा माझ्या गळ्यात गुंफून मला कायमस्वरूपी तुझ्यावर हक्क दे."
" कायमचं सोबत होते हे माझ्या आता तुझ्या हातांनी पुन्हा माझ्या गळ्यात गुंफून मला कायमस्वरूपी तुझ्यावर हक्क दे."
घनश्यामने मीराच्या गळ्यात ते मंगळसुत्र घातले पुन्हा आणि प्रेमाने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले तशी मीरा त्याच्या कुशीत शिरली आणि घनश्यामने ही तिला घट्ट मिठी मारली. आज मनातला इगो विसरून ते कायमसाठी एकत्र आले होते आणि त्यांचे प्रेम जिंकलेले पाहून तो केसांवर डौलात उभा असलेला मोगर्याचा गजरा कसा फुलला होता.
*समाप्त *
आयुष्यात नवरा बायकोचे नाते म्हणजे अगदी नाजूक. त्या नात्याला विश्वास आणि प्रेमाच्या अलवार स्पर्शाने जपायचं असतं. वाद, मतभेद हे। होणारचं दोन व्यक्ती एकत्र आल्यावर, मात्र नात्यात कधीही, 'पणss' या शब्दाला जागा देऊ नये आणि इगोला उगाचचं कुरवाळत बसू नये. कारण इगो नात्यांच्या प्रेमावर हावी झाला की नात्याचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही . मीच का? हा विचार करत बसण्यापेक्षा प्रेमाला कायमचं महत्त्व द्यायला हवं आणि नात्याला जपायला हवं कायमचं.
©ऋतुजा कुलकर्णी