म्हणून जग फसतं!-10
©®राधिका कुलकर्णी.
“ मी 1970 बॅच का? विचारल्यावर शऱ्याचे डोळे लगेच विस्फारले. मी सहज म्हणालो *पाप्याचं पितरं!??*
आणि ह्याने लगेच तेवढ्या वेदनेत पण हो हो म्हणत मुंडी हलवली. मग ह्यानेही चाचरतच मला विचारले
मला वाटलं मस्करी करतोय पण खरंच भेटवेन म्हणल्यावर मी टरकलो. आता ह्या वयात कोण मुस्काड फोडून घेईल बे नकोच ते .. म्हणून मी नको बोललो तर मग ह्याने सगळा तुमच्या भेटीचा किस्सा ऐकवला. आता काही तू तेव्हासारखी जमदग्नी अवतारात अंगावर धावून येत नाही हे कळल्यावर धीर एकवटून इकडे आलो. आणि बरं का आत्ता जो नाष्टा तुम्ही केलात ना तो आमच्याच *यमूज कॅची फूडकॉर्नर* चा आहे. कशी वाटली चव आणि प्रिपरेशन, आवडली का? ”
पण काय रे रंग्या म्हणजे राग येणार नसेल तर एक विचारू का? ”
स्वतःच स्वतःवर हसणे आणि विनोद करणे हे फार कमी लोकांना जमते आणि ज्यांना ही कला अवगत असते ते मनाने फार दिलदार असतात. दुसऱ्यांतील कमतरतेवर हसण्याऐवजी हे लोक आपल्याच कमतरतेवर हसून टीका करतात. आत्ता रंग्याने नेमके तेच केले. इथेच मालाला रंग्याच्या स्वभावाची खरी ओळख पटली.
आता तीही खुलून मोकळी होत त्याला म्हणाली,
पण काय रे रंग्या तुझं सूत तुझ्या टाईपची नसलेल्या ह्या बहेनजीशी कसं काय जुळलं ?
आणि तुझे इतके प्रताप माहित असूनही तिने तुझ्याशी लग्न बरं केलं?
नाही म्हणजे त्यावेळी तू जसा होतास ते बघता सभ्य घरातील कोणतीच मुलगी तुला होकार दिली नसती मग हा चमत्कार घडला कसा? ”
खरंतर माझ्या आयुष्यातील चढउतार बघून मागे वळून पाहताना माझे मलाच आश्चर्य वाटते की मी खरंच असा आहे का?
पण कधी कधी एक प्रसंग, एक ती ठिणगी तुमचं आयुष्य उजळायला पुरेशी असते. तसंच माझं झालं.
मी पण कोणत्या धूनमध्ये त्यांचे ऐकून तुला प्रपोज मारला. त्यानंतर तू जे केले ना,आजवर त्या हाताची बोटं मला माझ्या गालावर अद्रूष्य स्वरूपात दिसतात. तेव्हा मी खूप म्हणजे खूप पेटलो. तुला चांगली अद्दल घडवायची हे पण ठरवलं पण जेव्हा जेव्हा काही प्लॅन करायचो तो फसायचा. त्यात ह्या शऱ्यानं पण माझ्या दुखती रग वर हात ठेवून मला डिवचले मग मी ठरवले ह्याला पण तसाच थोबडवायचा. पण आमचा तोही प्लॅन फसला.
म्हणता म्हणता कॉलेज संपले आणि सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. मी मात्र गटांगळ्या खात तिथेच पडून होतो. नंतर नंतर माझे सगळे पंटर मित्र पण कॉलेज सोडून, मला सोडून काहीना काही धंदा पाण्याला निघून गेले. मग मी कसंबसं ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि गावी आलो. आता पुढे काय करायचं ? हा विचार डोक्यात असताना बीपीएड ची जाहिरात बघितली. मला तो विचार पटला कारण स्पोर्ट्समधे मला पुर्वीपासून इंटरेस्ट होता. मग लगेच फॉर्म भरून ॲडमिशन घेतली. मनापासून कॉलेज अटेंड करू लागलो आणि विशेष म्हणजे त्या कॉलेजला मी दरवर्षी पहिल्या क्रमांकावर पास झालो. मग मात्र मी जास्त सिरीयसली लक्ष दिले माझ्या भविष्याकडे. मी कॉलेजात पहीला आलो म्हणून गावाने माझा सत्कार केला. यशाची चव चाखायला मिळाल्यावर कळले की ह्याची नशा किती भारीय. मग मी बीएड कोर्सला पण प्रवेश मिळवला. आयुष्यात कधी केला नाही तितका अभ्यास तिकडे केला आणि तिकडेही डिस्टिंक्शन मधे पास झालो. मग शाळेच्या जाहीराती वाचून अर्ज, इंटरव्ह्यू सोपस्कार सुरू झाले आणि एका शाळेत स्पोर्ट्स टीचर म्हणून नोकरीला सलेक्ट झालो. आणि बीएड झाले होते म्हणून मेथड सब्जेक्ट पण शिकवायला मिळाला. मी माझ्या कामात इतकी मेहनत घेतली की काही वर्षांत मला तिथल्या हेड स्पोर्ट्स सुप्रीटेंडंटची पोस्ट मिळाली. दरम्यान आता नोकरीत स्थीर झालो.माझ्या सगळ्या वाईट गोष्टी बंद झाल्या बघून बाबांनी स्थळं आणायला सुरुवात केली. तोपर्यंत माझं वय जवळपास तिशीला पोहोचले होते.
त्यांच्या एका जिगरी दोस्ताला त्यांनी शब्द दिला होता की जर मला मुलगा झाला आणि तुला मुलगी तर आपण आपल्या मुलांची एकमेकांशी लग्न लावून देवू पण माझा वाह्यातपणा ओळखून त्यांनी त्यांच्या मित्राला कधीच ही आठवण दिली नाही. तो शब्द खरा करायला ते मला मुलगी दाखवायला त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन गेले. मला अगोदरच बजावले असल्याने मी तर नकार द्यायचा प्रश्नच नव्हता पण त्या मुलीला उगीच माझ्याशी पसंत नसताना बळजबरीने लग्न करायला लागेल ह्याचं दुःख वाटत होतं.
आम्ही रीतसर त्यांच्या घरी गेलो. बाबांच्या मित्राने हसून स्वागत केले. चहापाणी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि नंतर मुलीला बोलावण्यात आले.
मुलीला मी बघितले आणि मी तिथेच गर्भगळीत झालो. अंगाला घाम फुटू लागला. घशाला कोरड पडली. काही सुचेना… …….
हे काय घडतेय माझ्यासोबत? नशिब बरोबर तुम्हाला तिथेच आणून सोडते जिथं असण्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते. आज माझ्या आयुष्यात तो टप्पा येवून ठेपला होता. …… …..
क्रमशः -10
कथा आवडत असेल तर अभिप्राय नक्की कळवा.धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा