( वाचक देवो भवः
सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते की कथेचा भाग मी खुप उशिररा टाकला. माझी परीक्षा होती म्हणून लिखाण सोडून अभ्यास करण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते... पण आता मी आले पुन्हा... तुमच्या राघव आणि दुर्वाला घेऊन....
मागल्या भागात आपण पाहिले राघव मनावर दगड ठेऊनच मुलीला बघायला होकार देतो. दुर्वा ख्यातीच्या वाढदिवसाला का आली नाही..? हा प्रश्न आपल्याला पडला असेल.. मिळेल या ही प्रश्नाचं उत्तर मिळेल.. आता पुढे...)
असेच काही दिवस झाले. दुर्वाला हाताला दुखापत झाल्याने तिने चार दिवस सुट्टी घेतली होती. आजपासून दुर्वाला आता आपण आपल्याच ऑफिसमध्ये जायला सुरुवात करणार, तिला खूप आनंद झाला होता; आणि त्याहूनही जास्त आता राघव तिच्या समोर येणार नाही म्हणून तिच्या मनाला बरे वाटत होते. आज सकाळी ऑफिसला लवकर जाण्यासाठी दुर्वा घरातून निघते. परंतु ट्रॅफिक जाम झाल्याने तिला तब्बल अर्धा तास उशिर झाला. ती बिचारी घाईघाईतच ऑफिसमध्ये पोचते. पाहते तर समोर सगळा स्टाफ वेळेतच पोचला होता आणि JCLC चे Managing director श्री. जगदिश चिमणकर तिथेच उभे होते. वयाने जरी पाच वर्षापूर्वी साठी उलटली तरी शरीरयष्टीने ते नुकतेच पन्नाशीकडे झुकलेल्या माणसासारखे दिसत. एरवी C.E.O येत असत. पण आज चक्क JC सरांना बघून दुर्वाचे धाबे दणाणले. सर जरी सगळ्या स्टाफला आपल्या मुलांसारखा जीव लावत परंतु उशीर झालेला ते अजिबात खपवून घेत नसत. त्यांनी एकवार दुर्वाकडे पाहिले. सरत्या ओरडतील की काय म्हणून तिनेच स्वतः बोलायला सुरुवात केली.
जगदीश सर :- मिस. दुर्वा मला तुमचा हा attitude खूप आवडला. ऑल दी बेस्ट फाॅर युअर फ्युचर... तुम्ही हा जाॅब सोडत आहात हे तुमच्या फ्रेन्डसना कधी सांगणार..?
सायंकाळी घरी आल्यावर दुर्वा नेहमीप्रमाणेच गाण्याचा रियाज करत होती, पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळेच समाधान दिसत होते. कस्तुरी पण तिला असं समाधानी बघुन सुखावली होती....
दुर्वा :- कधी आलीस गं? थांब पाणी देते तुला...
कस्तुरी :- राहूदे... मी घेईन. तू सांग की तू इतक्या लवकर घरी कशी?
दुर्वा :- फायनली तिथली नोकरी सोडली मी...
कस्तुरी :- मग पुढे काय...?
दुर्वा :-पुढचा एक प्लॅन आहे. बघू काय होते..? चल मी ही पेटी ठेवते. स्वयंपाकाला लागूया..
कस्तुरी :- अगं नेहमी ते राग आलापच गातेस.. आज एखादं गाणं होऊन जाऊ दे... एखादं हिंदी...
दुर्वा :- ओके.. आज की महफील जिंदगी के नाम,
आणि गायला सुरुवात करते......
कुछ तो लोग कहेंगे। लोगो का काम है कहना।
छोडो बेकार कीबाततो को अभी, बीत न जाए रैना।।
***********************************
मुलीकडची मंडळी वेळेनुसार चार वाजता हजर झाली. राघव अनिच्छेने का होईना मुलगी बघायला म्हणून उपस्थित होता. त्याने एकवार मुलीकडे बघितले तर ती जराशी उदासच वाटत होती. पायाच्या अंगठ्याने जमिनीवर रेघोट्या मारत होती. इकडे राघवची आई आणि मामा मामी राघवची खूप स्तुती करत होत्या.
तुला मैत्रिणीकडे जायचे ना अभ्यासाला. पळ बरं तू...
(तिला बोलण्यातला रोख पाहून सांगितले )
दीपक काकांना राघवचे बोलणे ऐकून गहिवरून आले आणि ते रडू लागले.
क्रमशः
1) राघव खरंच श्रुतिकाशी लग्न करेल का?
2) दिपक काका दुर्वाला शोधण्यात यशस्वी होतील का?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा