लग्न करून प्रीती प्रसादची बायको म्हणून सासरी आली; पण तिच्या मनात सासू व नणंद यांच्याबद्दल प्रेम व आपुलकी नव्हतीच.
लग्नात नवरदेवाची बहीण म्हणून प्रसादची बहीण अंकिता सर्व व्यवस्थित पाहत होती. हसरा चेहरा गोड बोलणे यामुळे ती सर्वांना आपलेसे करत होती. लग्न जमल्यापासून प्रसादची आई व अंकिता यांचे प्रीतीशी जेव्हाही बोलणे झाले तेव्हा त्या तिच्याशी प्रेमाने व आपुलकीने बोलत होत्या. छानपणे वागत होत्या; पण प्रीती त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हती.
मी खूप आनंदी आहे असे दाखवीत होती पण मनातून त्यांच्याविषयी राग होताच.
मी खूप आनंदी आहे असे दाखवीत होती पण मनातून त्यांच्याविषयी राग होताच.
लग्नानंतर देवदर्शन, सत्यनारायण सर्व व्यवस्थित पार पडले. अंकिताची घरात खूप मदत झाली. ती आपल्या नव्या वहिनीचे खूप कौतुक करत होती. ती भावाला व वहिनीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत होती. हनिमूनसाठी प्रसाद व प्रीती मनालीला गेले. अंकिता गावातच राहत होती. त्यामुळे ती आई वडिलांना भेटायला व काही काम असेल तर माहेरी येत होती.
आतापर्यंत तरी प्रसादच्या आईकडून व बहिणीकडून प्रीतीला काही चुकीचे बोलणे झाले नव्हते. पण प्रीतीला त्यांचे सर्व वागणे वरवरचे वाटत होते.
'नव्याचे नऊ दिवस' याप्रमाणे या दोघी आता चांगल्या वागत आहे; पण नंतर मायलेकींचे खरे रंग दिसतील. असे प्रीतीचे मन तिला म्हणत होते. ती त्यांच्या बोलण्याकडे, हालचालींकडे बारीक लक्ष देऊन असायची. आपल्याबद्दल, आपल्या माहेरच्यांबद्दल काही चुकीचे बोलत आहेत का? प्रसादचे कान भरत आहेत का? असे प्रीतीला वाटत होते.
'नव्याचे नऊ दिवस' याप्रमाणे या दोघी आता चांगल्या वागत आहे; पण नंतर मायलेकींचे खरे रंग दिसतील. असे प्रीतीचे मन तिला म्हणत होते. ती त्यांच्या बोलण्याकडे, हालचालींकडे बारीक लक्ष देऊन असायची. आपल्याबद्दल, आपल्या माहेरच्यांबद्दल काही चुकीचे बोलत आहेत का? प्रसादचे कान भरत आहेत का? असे प्रीतीला वाटत होते.
आपल्या गावातच अंकिता राहते. हे तिला खटकत होते. वरकरणी जरी प्रीती सासूबाई व नणंदशी व्यवस्थित बोलत होती; पण ती मनातून साशंकच होती. सासू व नणंद यांच्या नात्याविषयीची तिच्या मनात जी प्रतिमा निर्माण झाली होती, ती तिने बदलली नव्हती.
प्रीती दिसायला सुंदर आहे, नोकरी करणारी आहे. कामातही हुशार आहे. गुणी आहे. घरातील जबाबदारी ही छान सांभाळते. हे सर्व पाहून तिच्या घरातील सर्व आनंदी व समाधानी होते. अंकितालाही खूप आनंद होता. असे सर्व असूनही प्रीतीच्या सासूबाईंना व अंकिताला जाणवायला लागले होते की, प्रीती मनातून खुश नाही आहे. तिच्या मनात काहीतरी आहे; पण ती ते बोलत नाही. थोडे दिवस वाट बघू व नंतर तिला विचारू. असा विचार करून त्या दोघी प्रीतीशी चांगल्या वागत होत्या.
क्रमश :
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा