आई अशी हाक ऐकताच काकुला ही खूप रडू कोसळले.. तिने ही रमाला मिठीत घेतले आणि दोघी ही रडू लागल्या...
काकू म्हणत होती ,"रमू मी तुला खूप त्रास दिला ग ,मी खूप दुष्ट आहे ग ,मी चांगली आई नाही होऊ शकले ग तुझी ,देव मला कधीच माफ नाही करणार ग..."
रमा, "नाही ग काकू ,तू जे करत होतीस ते दैव योग होते ,दुष्ट चक्र होते ,त्यात तुझी काही चूक नाही ,इतके सहन करून ,नवऱ्याचे प्रेम ही न मिळून कोणी असे सांभाळू शकले नसते ,उलट घरातून बाहेर काढून दिले असते ,तू तर मला मोठे केलेस ,शिकवलेस तरी, मग तू वाईट कशी "
काकू, "रमा तुला जर तो मुलगा आवडत नसेल तर तू नकार दे ,आपण ह्यापेक्षा ही चांगला मुलगा पाहू तुझ्यासाठी "
रमा, "नको काकू ,जे जिथे ठरले तिथे होणारच, तू मला मायेने जवळ घेतले आणि तुझा हात माझ्या डोक्यावर फिरवला हेच खूप बळ देत राहील ,आणि आता मला आई आहे ना ,मग मी हक्काने माझ्या ह्या आईकडे येत राहील. "
काकू तिच्या समजदार शब्दाने अजूनच जखमी होत होती ,ती अजूनच रडत होती ,मी केले ते पाप कुठेच फेडण्यासारखे नाही, मी मेले तरी मला शांती लाभणार नाही...
-------–--------------------लग्न---------------
लग्न करून रमा सासरी गेली ...
तिला पहिल्या दिवशी घर दाखवले ते ही सासूने.. कारण अपंग नवरा चालू शकत नव्हता..
मग थोडा वेळ कुठे बसली न बसली ,सासू ने तिला अपंग नवऱ्याचे रोजचे कामे सांगितली..
आणि संध्याकाळी त्याला धरून बाहेर आणायला सांगितले... त्याचे कपडे बदलायला सांगितले..
त्याला कुठे ही जायचे की तो तिला हाक मारू लागला...त्याने तर आता तिला जरा ही शांत बसू न द्यायचे ठरवले... झोपली तरी कधी ही उठवणार आणि इकडे तिकडे घेऊन जा अश्या जोर जोरात हाका मारणार... नाहीतर हातात असलेला तांब्या फेकून तिला उठवणार..
नवीन नवरी तिला हे सगळे भोग नशिबी आले, नवेपण उतरले नव्हते...जरा ही काही नवीन घातले की नवरा घालून पडून बोलू लागला... कोणासाठी हे नटने.. कोणाला दाखवायचे असे बोलू लागला... मी अपंग आहे म्हणून दुसरा पटवला का ही त्याची भाषा बोलत...
किती तरी दिवस ती काकूंकडे ही गेली नाही ,ना तिची काही खबर बात ,ना मोबाईल तिचा तिच्याकडे असत...हुंडा घेतला म्हणून सासू खूप ऐकवत...तुला विकत घेतले आम्ही आता तुझे माहेर ,आणि काकू काका काही नाही ,तू इथेच रहायचे...ना तू कुठे जाणार नाही तुला कोणी भेटायला येणार...
हळूहळू वादाचे रूपंतर आता मारहाणीत होऊ लागले होते, तिचा आवाज सुरुवातीला येत नसे पण आता येत आणि बाहेरपर्यंत जात...
कधी एकदा नंदेचा नवरा घरी आला ,आणि त्याची घाण नजर तिच्या वर पडली आणि त्याचे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, आणि सगळी परिस्थिती जाणून ही नणंद आणि सासू ,त्यात नवरा आणि नंदेचा नवरा सगळे तिच्यावर तुटून पडले... तिला घालून पडून बोलले.. तिला वाड्याच्या खोलीत बंद केले... रडून रडून ती बेशुद्ध झाली ,आणि मग कामाला येणाऱ्या बाईने तिला शुद्धीवर आणले...
ही काकू आता चिंता करू लागली ,तिला रमाची काळजी वाटून ती रमाच्या सासरी काही नात्यातील लोक घेऊन गेली...आणि पाहिले की रमा दयनीय अवस्थेत होती ,मार दिल्याचे निशाण ,ओरबडल्याचे व्रन.... हे तर उपस्थित सगळ्या लोकांनी पाहिले आणि त्या बाईला ताकीत दिली...पुन्हा असे झाल्यास पोलीस कारवाई होईल...
रमा अगदी जीवाला कंटाळली होतीच...
इकडे ऋचा ही तिला ह्यातून सोडवण्याचा प्रयत्नात होतीच...
तिकडे काकू गप्प बसणार नव्हती
ऋचाने रमाला कधी तरी एकदा पाहिले होते ,किती गोड मुलगी होती ती ,तिला अश्या घरात यायला नको होते, पण आता तिची ह्यातून सुटका होने खूप गरजेचे होते...
काकूने आज पुन्हा रमाकडे जायचे ठरवले होते
काकू रमाच्या वाड्या बाहेर उभी होती ,आणि अचानक वाड्यातून रमाच्या किंचाळीचा आवाज ऐकू आला ,ती काही करू शकत नव्हती पण ,त्या दाराच्या फटीतून तिने होत असलेले सगळे प्रकरण mobile मध्ये रेकॉर्ड केले...बरेच दृश्य स्पष्ट दिसत होते....त्यामुळे पुरावा म्हणून कामी येईल...आणि त्या दिवशी रेकॉर्ड केलेला रमाच्या सासूबाईचा आवाज ही होताच...
ऋचाने ही हे आवाज ऐकले होते ,आज ती ह्या घरी आली होती, आज ह्या प्रकरणाचा छडा लावायचा हे ठरवून आली होती....
ऋचा बाहेर आली तशी तिला ,तिच्या जुन्या मित्राचा फोन आला ,जो जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये incharge होता ,त्याला तिने ह्या आधी ही कळवले होते ,पण पुरावे नव्हते....त्याने एक प्लॅन केला होताच
एक खोटी तक्रार ,घरगुती अत्याचार आणि हिंसा होत असल्याबत तक्रार , ती ही निनावी...कोणी तरी येणाऱ्या जाणाऱ्या पैकी केली असल्याबाबत दाखल करून , त्यानुसार त्या ठराविक जागेवर जाऊन संबंधितांना ताब्यात घेण्याचे ठरवले होते पण ,केस अजून भक्कम करायला पुरावे हवे होते .
तितक्या पोलीस स्टेशन मध्ये काकू पोहचते, ती घाबरलेली असते आणि तिला दम लागलेला असतो ,ती तिच्या लेकीच्या बाबत होणाऱ्या छळाची तक्रार घेऊन जाते...आणि सोबत रेकॉर्ड केलेले पुरावे दाखवते....
पोलीस incharge.." अरे ही तर तीच तक्रार आहे ,हे तर भारी झाले ,पुरावे ही आहेत " म्हंटल्यावर ते लगोलग त्या वाड्यावर जातात, आणि दार उघडत नाहीत म्हणून दार तोडतात..
समोर रमा बेशुद्ध पडलेली असते ,तोंडातून रक्त येत असते...सासूच्या हातात चाबूक असतो...तर नवरा धडधाकट उभा असतो आईच्या खांद्याचा आधार घेऊन...
पोलीस त्याला ताब्यात घेत असतात तर तो त्यांच्यावर ही वार करतो ,त्यांना घरात आणि त्यांच्या भानगडीत पडायचे नाही अशी धमकी देतो...
हे सगळे काकू रेकॉर्ड करत असते... तर तो तिच्यावर ही हल्ला करतो..
इकडे पोलीस रमाला ताब्यात घेतात आणि तिला दवाखान्यात घेऊन जातात...आणि नवऱ्याने केलेल्या हल्ल्या बाबत केस करण्याची ,पोलिसांवर हात उचल्या ही केस आणि गुन्हा नोंद करतात ,तर सासुवर आणि नवऱ्यावर विवाहितेचा छळ केल्यावरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतात...
सासू आणि नवरा अजून ही जेल मध्ये केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होते... तर रमा आपले ह्या आघातातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती...काकू तिचा आधार बनली होती...
काकूने आता रमाच्या पुढील आयुष्याची जबाबदारी घेतली होती ,तिला स्वतःच्या पायावर उभे करण्याची हिंमत दाखवली होती...
ऋचासाठी ही एक नेहमी हिम्मत देणारी शिकवण ठरली होती ,तिने तर अश्या निराधार आणि हिंसेच्या शिकार झालेल्या बायकांसाठी एक संस्था उभारली होती...त्याला आता कायद्याचा भक्कम आधार ही मिळत होता..
कथा कशी वाटली ते नक्की कळवा...?