मंजिरीचा संघर्ष

एका तुळशीच्या मंजिरीचा संघर्ष

गोष्ट छोटी डोंगराएवढी



मंजिरीचा संघर्ष

एक मंजिरी सुकलेली होती .एका दिवशी जोराची हवा आली आणि तिला हवे बरोबर उडवत नेऊन जमीनीवर पाडल होत .

पावसाच्या पाण्याने पाण्याबरोबर पुन्हा तिला तिच्या जागेजवळ आणून सोडल .

पावसाच पाणी आल त्याबरोबर मंजुरी सोबत वरून पालापाचोळा आला होता .

मंजिरी : " किती कठीण हे आयुष्य "

बापरे !
पाऊस पाणी आणि वरून माझ्यावर हे पालापाचोळ्याच ओझ . मी पुर्णपणे दाबून गेली आहे .
आता माझ काय होणार !


आई ( मोठी तुळस ) : अग ,पाऊस आला . हे पाणी आपल्यासाठी अमृतासारख असत . या पालापाचोळ्यातून तुला नवीन जन्म मिळेल .

पावसाळा सुरु झाला होता .ऊन पावसाचा खेळ सुरु होता .

मंजिरीच्या बियांपासून छोटी छोटी रोप निघत होती .

आता सुरु झाला होता पावसाळ्यात जगण्याचा संघर्ष .

छोटी छोटी रोप निघाली होती .

कधी जोराचा वारा येई ,वारा त्या रोपांना हलवून निघून जाई . रोप पहिले घाबरून जात . नंतर त्याच जोराच्या वाऱ्याबरोबर खेळायला लागली .

सुंदर वाटणाऱ्या पावसाच्या सरी त्यांचही तसच वाऱ्यासारख . पहिले घाबरायच आणि नंतर त्यांच्यासोबत रोप खेळायला लागली होती .

छोट्या रोपांना आता छान हिरवी - हिरवी पान आली होती .रोप मोठी होत होती .

एका दिवशी बागेतला माळी गवत साफ करत होता . गवत साफ करता करता जास्त गर्दी असलेल्या ठिकाणची काही रोप काढून टाकत होता .
त्यादिवशी संध्याकाळ होत आल्याने अंधार पडायला आला होता .माळ्याने त्यादिवसाच काम संपवल .

रोप रडायला लागली होती . आई….

आई : " आपल्यातील सगळ्यांना मोठ होता येत नाही . सर्व जर राहिलो तर मोठ होण्यास जागा इतर गोष्टी मिळू शकत नाही . "
दुसऱ्या दिवशी माळी आला . तुळशीच्या रोपांमधली चांगली मोठ्या पानांची काही काही रोप ठेवली , बाकी गवत जास्तीची रोप काढून टाकली .

पहिले रोपांची गर्दी ,गवत होत म्हणून जोरात हवा ,पाऊस ,ऊन असलतरी एकमेकांची सोबत असल्याने त्यांचा जोर कमी जाणवत होता . आता थोडी रोप , बाकी मोकळ केल होत . त्यामुळे स्वतःच्या हिम्मतीने उभ राहून जगण्याचा संघर्ष सुरू झाला होता .

रोप आता छान मोठी झाली होती . रोपांना असलेल्या हिरव्या पानासोबत आई वाट पहात होती ती पुन्हा
" फुलण्याची , मंजिरीची ,फुलांची , पुर्णत्वाची "

एके दिवशी रोपावर चाहूल लागली " कळ्या येण्याची ...  "

( बदल हा कोणताही असो , लगेच स्वीकारला जात नाही ,येत नाही .)

रोप : " आता हे मला काय होत आहे ? हे नेहमी सारख पान तर येत नाही .
आता नवीन काय ?

आई : " आता तुला सुंदर कळ्या येणार ,कळ्यांमधून फुल , नंतर फळ . असा निसर्गाचा नियम . हा बदल असतो नवीन काही होण्यासाठी , तीथ थांबायच नसून तो स्वीकारून पुढे जाण्यासाठी ."

रोप आता आंनदी होत .
" मला आता छान कळ्या ,फुलं येणार ,मग फळ येणार . "

काही दिवसांनी तुळशीला मंजिऱ्या आल्या .


बागेत येणारे कधी कधी पान तोडत , कधी फुलं, मंजिऱ्या तोडत .

 ' अस कस हे आयुष्य कधीही कोणीही याव पान ,फुलं तोडून न्यावी . '

आई : " आपल आयुष्य हे असच असत , एकदा तोडल्यानंतर कुणी औषधासारख खात , तर कुणी देवाला वाहत ."
" आणि पुर्ण मोठ व्हायला मिळाल तर पुन्हा नवीन रोप येणार आपण लहानपणी होतो तशीच . "

तर असा हा जगण्याचा संघर्ष चालू रहात असतो .

" हे जीवन ….एक संघर्ष है ।"

Veena


******
संघर्ष विषयावर वेगळ लिहण्याचा प्रयत्न केला आहे . कसा वाटला कमेंट करून सांगा .