भाग 6 वरून पुढे वाचा.
पंधराच दिवसांत एजन्सी ने सगळे पुरावे आणून दिले. ते हातात आल्यावर सुशील बाबूंची हकालपट्टी कारायला जयंत आणि किरीट ला वेळ लागला नाही. त्यांनी सुशील बाबूंना बोलावून घेतलं. त्यांच्या समोर गोळा केलेले सर्व पुरावे ठेवले. सुशील बाबूंच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला साफ दिसत होता. त्यांनी काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडलं पण त्यांना बोलू न देता जयंत साहेबच म्हणाले की
सुशील अंकल, हे असं सगळं तुम्ही का केलं ते आम्हाला माहीत नाही. पण हा सगळा प्रकार भयंकर आहे आणि आम्ही आता तुमच्या विरुद्ध फौजदारी केस करायची पूर्ण तयारी केली आहे. कदाचित ही केस बरीच वर्ष चालेल पण शेवटी तुम्हाला शिक्षा होणारच. तुमची जी माणसं आहेत ,ज्यांना तुम्ही 1000 रुपयांत आपल्याकडे वळवल त्यांना आम्ही दहा हजार देऊन आमच्याकडे वळवू मग काय होईल त्याचा विचार करा. मधल्या काळात इंडस्ट्री मध्ये जी बदनामी होईल ती वेगळीच. तुमचा स्वत:चा बिझनेस पण ठप्प होऊ शकतो. आम्ही तुम्हाला एक मार्ग सुचवतो, बघा तुम्हाला पटतो का नाही तर फौजदारी ला सामोरं जा.
काय करायचं आहे मी ?
तुमचे सगळे शेअर आम्हाला वापस विका. आम्ही त्यांची योग्य किंमत देऊ. आणि पुन्हा आमच्या आसपास पण फिरकू नका.
पण हे केल्यावर तुम्ही केस करणार नाही यांची काय गॅरंटी ?
तेवढा विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो. हे तुम्हालाही माहीत आहे. We are not crooks. And you also know that.
सुशील जवळ दूसरा ऑप्शन नव्हता. त्यांनी होकार दिला.
सर्व शेअर जयंत चे सासरे डॉक्टर अरुण मोघे यांना सुशील ने विकून टाकले. आणि तो चालता झाला. त्यांच्या जवळ दूसरा option नव्हता.
त्यांची जी जी माणसे होती त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं. कंपनीच फिनिशिंग शॉप पण सुरू झालं. ते वेळेत पूर्ण व्हायला हव होतं, त्यासाठी संगळ्यांनीच जिवापाड मेहनत घेतली.
एवढं सगळं झाल्यावर आता मधुकर ला श्वास घ्यायला पण फुरसत नव्हती. त्यानी सातपुते, फिरके, वेणुगोपाल आणि स्वामी यांना बोलावलं. मीटिंग सुरू झाली.
तुम्हा सर्वांना मी एका कारणांसाठी बोलावलं आहे. ते म्हणजे आपण रोज साडे बारा वाजता इथे जमायचं. जेवण करायचं आणि लगेच मीटिंग करायची. जे काही निर्णय कंपनी च्या भविष्यावर परिणाम करणार असतील ते आपण सर्वांनी मिळून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व मिळून कंपनी ला पूर्वीची उर्जितावस्था आणायची आहे.. त्या करता मी आपणा चौघांची कमिटी बनवतो आहे. या कामिटीतच सर्व निर्णय होतील. त्यात तुम्हा सर्वांना आपलं मत मांडायची मुभा असणार आहे. कंपनी ची प्रगती होण्यासाठी हे आवश्यक आहे असं मला वाटत. तुमचं काय वेगळं मत असेल तर सांगा.
स्वामी प्रथम बोलला.
साहेब, मला आणि फिरके साहेबांना प्रॉडक्शन मधलं काही कळत नाही. आणि ह्या दोघांना अकाऊंटस मधलं काही समजत नाही. मग आपण मीटिंग करून काय होणार ? काय साधणार ?
करेक्ट आहे. सातपुते बोलले. त्या पेक्षा अस करू. तुम्हाला संगळ्या विषया मध्ये गती आहे. तेंव्हा अकाऊंटस ची मीटिंग असेल तेंव्हा तुम्ही आणि हे दोघ करा. आणि प्रॉडक्शन शी संबंधित मीटिंग असेल तेंव्हा मी आणि वेणुगोपाल तुमच्या बरोबर बसू. नाही तर पन्नास टक्के वेळ वाया जाईल.
काय सातपुते ! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो तुम्ही सगळे उच्च विद्या विभूषित आहा. कुठलाही विषय तुमच्यासाठी कठीण असण्याचा प्रश्नच येत नाही.
थोडंसं लक्ष घातलं की सगळं समजायला लागेल. आणि मला एक गोष्ट साधायची आहे. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल साधक बाधक विचार सगळ्यांना करता यायला पाहिजे. म्हणजे लूप होल कुठेच राहणार नाहीत. आपली कंपनी फार छोटी आहे. कोणाच्या Ego मुळे कंपनी च नुकसान होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. एकटयांनीच निर्णय घ्यायची सवय लागली तर हा इगो निर्माण होऊ शकतो. आणि याचा सर्वात जास्त धोका मलाच संभवतो. तोच मला नको आहे. माझ्यामुळे मला आता कंपनी च कोणतंही नुकसान व्हायला नको आहे. I hope I have made myself clear.
साहेब, पुन्हा स्वामीच बोलला फिरके साहेबांना costing मुळे बरीच माहिती झाली आहे. मला आता करून घ्यावी लागेल. पण तुम्ही जे बोललात ते पटलं मला. मग
बाकीच्या दोघांनी पण सांमतिदर्शक माना डोलावल्या.
ठीक आहे मग. अर्थात आपल्या विभागाच्या अडचणी ज्यांनी त्यांनीच सोडवायच्या आहेत. आता माझ्या मनात काय आहे ते सांगतो.
फिरके आणि स्वामी या दोघांनी पूर्ण स्टडी करून कंपनी ची सध्याची खरी आर्थिक स्थिति काय आहे याच स्पष्ट चित्र जर समोर ठेवलं तर खर्चाच प्लॅनिंग
करता येईल. कंपनी ची स्थिति सुधारायची असेल तर बरेच बदल करावे लागणार आहेत. पण कोणते लगेच आणि कोणते टप्प्यां टप्प्याने हे ठरवता येईल. तुम्हाला काय वाटत ?
म्हणजे नेमक काय करायचं तुमच्या मनात आहे सर ?- स्वामी
माझा त्यावरच विचार चालू आहे आणि काही आरखडे पण बनवले आहेत. पण माझ्या कल्पने नुसार ते पूर्ण झाल्यावरच तुम्हाला सांगेन कारण मग तुम्हाला नीट समजावता येईल. आता सांगितलं तर थोडा तुमच्या मनाचा गोंधळ उडेल. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी म्हणाले होते की रिजेक्शन मुळे दोन तीन पारट्यांनी आपला माल घेणं बंद केलं आहे. त्या सर्व लोकांना आपल्याला वापस आणाव लागेल. आणि हे जरा कठीण काम आहे. वेणु तुमचा यात कस लागणार आहे.
अजून एक गोष्ट मला कळली नाही. ती म्हणजे आपल्या कंपनी मध्ये प्रॉडक्शन मॅनेजर कसा नाही ? आपल्याला एक मटेरियल मॅनेजर पण पाहिजे. जो परचेस आणि स्टोअर बघेल. तो पण नाहीये. हे कसं ? गोष्टी जर स्ट्रीम लाइन करायच्या असतील तर हे दोघं जण आवश्यक आहेत. पण ते नाही आहेत. कोणाला काही माहीत आहे का ?
साहेब, सातपुते म्हणाले की
एक तरुण सरदार होते प्रॉडक्शन मॅनेजर, दर्शनसिंग नाव होतं त्यांचं. हुशार आणि तडफदार व्यक्तिमत्व होतं. मोठ्या देसाई साहेबांनीच त्यांना आणलं होतं. पात्रीकर साहेब आणि त्यांचं चांगलं जुळायचं. सॉलिड वचक होता त्यांचा. चक्रवर्ती सकट सगळे त्यांना टरकून असायचे. त्या वेळेस चक्रवर्ती खरंच चांगला माणूस होता. कुठलंही मशीन हा हा म्हणता दुरुस्त करायचा. त्या वेळेला करकरे नावाचे मटेरियल मॅनेजर होते. सगळी चांगली माणसं होती साहेब त्या वेळेला.
मग अचानक काय झालं ?
साहेब दोन्ही मोठ्या साहेबांचा अपघातात मृत्यू झाला, त्या वेळेला किरीट आणि जयंत दोघेही फायनल इयर ला होते. त्या वेळी सुशील बाबूंनी सर्व कारभार आपल्या हातात घेतला. करकरे साहेबांचा ते फार अपमान करायचे. काय वाट्टेल ते बोलायचे. तो स्वाभिमानी माणूस दुसरी नोकरी मिळाल्यावर लगेच सोडून गेला. पात्रीकरांनी त्यांना थांबवण्याचा बराच प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मग त्यांनी बरडेला आणलं. तो त्यांचा खास माणूस होता.
अच्छा, पण मग दर्शनसिंग ? ते का गेलेत ?
त्यांचा पण ते फार अपमान करायचे. त्यांना वाटलं की करकरे गेले तसे दर्शनसिंग पण जातील. पण झालं उलटच.
काय झालं ?
ते तर खूप रामायणच झालं साहेब, तो माणूस सुशील बाबुंच मुळीच ऐकायचा नाही. जशी ऑर्डर असेल त्या प्रमाणेच माल बनेल असं म्हणाला, सुशील बाबूंनी त्यांना थोडी अॅडजस्टमेंट करायला सांगितली. पण त्यांनी ऐकलं नाही. मग सुशील बाबू त्यांना चिडून गधा म्हणाले. दर्शन सिंग सरदार माणूस, तो कशाला ऐकून घेतो ? त्यांनी बाबूंच्या कानशीलात भडकावली. बरीच बोलाचाली झाली आणि त्यांनी पुन्हा सर्वांसमोर मारलं. सुशील बाबूंनी ताबडतोब पोलिसांत तक्रार केली. पण दर्शनसिंगच्या विरोधात कोणीच बोललं नाही. बर्डे बोलणार होता पण बाकी लोकांनी त्याला धमकावलं. मग तो पण चूप बसला. पण हा सगळा प्रकार दर्शनसिंग साहेबांना मानवला नाही आणि त्यांनी तिथल्या तिथे पात्रीकरांच्या जवळ राजीनामा दिला आणि निघून गेलेत. पण ते गेल्या वर सुशील बाबूंना जे अपेक्षित होतं तेच झालं. त्यांना रानच मोकळं मिळालं, ते थेट तुम्ही येई पर्यन्त. तुम्ही मात्र त्यांना पुरून उरलात साहेब. म्हणूनच आज सर्वांना तुमच्या बद्दल आदर आणि विश्वास वाटतो.
हूं. म्हणजे आता किरीट साहेबांशी बोलावं लागणार. दोन्ही पोस्ट भराव्या लागतील. पण प्रश्न हा आहे की आपण त्यांचा पगार देऊ शकू का ? स्वामी साहेब तुम्ही चार्टर्ड अकाऊंटंट आहात, कंपनी चे financial कंट्रोलर आहात, बघा जरा आणि सांगा. मला कोणालाही पैसे मागण्याची इच्छा नाहीये. आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे.
साहेब, स्वामी म्हणाला की उद्या दुपार पर्यन्त वेळ द्या. सर्व डिटेल्स तुमच्या समोर ठेवतो. काय फिरके ?
यस.
ठीक तर मग. अजून एक गोष्ट आपण विक्रमसिंग ला काढून टाकलं आहे त्यांची पण जागा भरणं आवश्यक झालं आहे. मी आधीच इंटरव्ह्यु घेऊन दोन नाव फिक्स केलीच आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्या पगाराचं पण बघाव लागणार आहे.
हो साहेब, आपण उद्याच मीटिंग मध्ये सर्व फायनल करून टाकू. मीटिंग संपली.
नंतर संध्याकाळ पर्यन्त मधुकर जे काही बदल त्याला अपेक्षित होते त्या बद्दल टिपणं काढत बसला होता. डोक्यात खूप विचार होते. खूप काही सुधारणा करायच्या मनात होतं. पण उद्या स्वामी फिरके काय सांगतात त्यावर सगळं अवलंबून होतं.
शेवटी त्यांनी सगळं बंद करून घरी जायला निघाला.
जेवण झाल्यावर बाल्कनीत बसून नेहमी प्रमाणे कॉफी पीत पीत दिवास भरातल्या घडामोडींवर विचार करत असतांना मोबाइल वाजला. जिजाजी होते फोन वर.
हां बोला जिजाजी,
अरे थोडा मोकळा आहेस ना ? का बिझी आहेस ?
जेवण करून कॉफी पीत आरामात बसलो आहे. तुम्ही बोला.
अरे एक बिल्डर आहे तो आपला वाडा redeveloping ला घ्यायचं म्हणतो आहे. तोच सर्व भाडेकरूंबरोबर बोलणी करायला तयार आहे. आपल्याला काहीच करायचं नाहीये. मी त्यांना एवढंच सांगितलं की सर्वांना समाधान होईल असाच तोडगा काढा. या बद्दल तुला काय वाटत ?
माझं इंदूरला येणं बहुधा निवृत्ती नंतरच होईल असं दिसतंय. त्यामुळे तुम्ही जो काही विचार केला असेल तो रास्तच असेल. एखादा फ्लॅट आपल्याला मिळतो का ते बघा म्हणजे जर निवृत्ती नंतर तिथे येण्याचा मी विचार केलाच तर तो हातात असावा एवढंच. बाकी तुम्हीच बघा.
ठीक तर मग, सगळं फायनल झाल्यावर तुला इथे agreement वर सही करायला यावा लागेल तेंव्हा त्या वेळेला यावं लागेल.
येईन. जरा दोन तीन दिवस आंगोदार सांगाल.
सांगीन पण एक गोष्ट विचारू का ?
काय ?
निवृत्ती नंतर एकटाच येणार आहेस की बायको, मुलांना घेऊन, ते सांग.
काय जिजाजी, नेहमी ताई त्रास देते हा प्रश्न विचारून आता तुम्ही पण ?
चल ठीक आहे. ठेवतो.
दुसऱ्या दिवशी स्वामी ने मीटिंग मध्ये सांगितलं की कंपनी चा प्रॉफिट कमी झालेला आहे, पण अजूनही चिंता करण्यासारखी स्थिति नाहीये. हां प्रॉफिट कसा वाढेल आणि कंपनी पूर्वीपेक्षा प्रगती कशी करेल ह्याचा विचार आणि कृती करणं जरूरी आहे. जर जास्तीची माणसं घेऊन परिस्थिति सुधारणार असेल तर we are ready for it. We can go ahead with new employments.
वा वा स्वामी, तुम्ही आमच्या डोक्यांवरचं ओझं उतरवलं. आता बघाच तुम्ही. नंतर बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी discuss होऊन मीटिंग संपली. वेणुगोपाल नी उद्याच मुंबईला जाऊन जुन्या क्लायंट ना भेटायच हे पण ठरलं. सगळ्यांनी वेणु ला बेस्ट लक दिलं. त्यांच्या भेटीवर पुढचे प्लॅन्स अवलंबून होते.
साहेब, मीटिंग संपल्यावर जेंव्हा सगळे पांगले तेंव्हा वेणुगोपाल मधुकरला म्हणाला की मागे जेंव्हा मटेरियल खराब जात होतं, तेंव्हा दोन्ही कंपन्यांच्या GM साहेबांनी आपल्याला पूर्वीच्या संबंधांमुळे बराच वेळ दिला सुधारणा करायला. पण आपण जास्तीत जास्त घोटाळे केलेत. शेवटी ते दोघंही खूप संतापले, शेवटी त्यांच्याही कंपनीच्या reputation चा सवाल होता. पुन्हा आयुष्यात कधी भेटायला सुद्धा येऊ नका अस म्हणालेत. I don’t know, whether I will be welcomed or not.
वेणु, अरे संबंध असे तुटत नसतात. तुला भेटतील ते लोक. काळजी करू नको. हां पहिल्याच भेटीत ते काही ऑर्डर देणार नाहीत. पण आपणच पुढाकार घेतला नाही तर पुढे ऑर्डर मिळणार कशी. तू जा मला खात्री आहे की काही तरी outcome निघेलच.
गोष्टी सरळ व्हायला लागल्या की एकामागून एक चांगल्या घटना घडत जातात.
त्याच रात्री मधुकरला त्यांच्या एका मित्राचा फोन आला.
अरे तुला प्रॉडक्शन मध्ये माणूस हवा होता ना ?
हो.
कोणच्या लेवल ला हवाय. ? प्रॉडक्शन मानेजरची पोस्ट असेल तर माझ्याकडे एक
छान माणूस आहे. बोल ?
मला दोन जण हवी आहेत. मेल्टर आणि मॅनेजर.
तुला कशी टीम लागते ते मला माहीत आहे. ही दोन माणसे एकदम फिट बसतील.
ठीक आहे इंटरव्ह्यु साठी पाठवून दे. जाण्याचा आणि येण्याचा खर्च देऊ.
ओके. मी त्यांना विचारून कॉल करतो. बाकी सर्व ठीक ?
हो ठीकच आहे.
हळू हळू कंपनीची गाडी पूर्वपदावर येत होती. नवीन प्रॉडक्शन मॅनेजर ज्या तडफेने काम सांभाळत होता, ते बघून मधुकर एकदम समाधानी होता. आता रिजेक्शन जवळ जवळ नव्हतच. सातपुते साहेबांच्या काटेकोर तपासणी नंतर ते सुद्धा आनंद व्यक्त करत होते. नवीन मेल्टर अनुभवी होता आणि चांगलं काम करत होता. स्टोअर मध्ये चव्हाण नावाचे गृहस्थ मॅनेजर म्हणून आले होते. त्यांना 20 वर्षांचा अनुभव होता त्यामुळे परचेस आणि स्टोर सुरळीत चाललं होतं.
जवळ जवळ वर्ष संपत आलं होतं आणि जूने क्लायन्ट पण मालाची क्वालिटी बघून वापस आले होते. किरीट आणि जयंत साहेब खुश होते.
वर्षभर मधुकरने अथक काम केलं होतं. ना दिवस पाहिला ना रात्र, याचा प्रकृतीवर परिणाम झाला नसता तरच नवल. तसा तो झालाच. तरी माधुकरने तापातच आठ दिवस खेचलेच.
त्या दिवशी मधुकरला जरा अधिकच बर वाटत नव्हतं. पण तरी तो फॅक्टरीत
आला होता. साडे बारा वाजता नेहमी प्रमाणे सर्व मिटिंगला जमले तेंव्हा सर्वांच्याच
लक्षात आलं की मधुकर ला ताप आला आहे. अंग चांगलच तापलं होतं. सर्वांनी मधुकरला तो नको नको म्हणत असतांना जबरदस्तीने घरी पाठवलं.
दुसऱ्या दिवशी सातपुते साहेबांनी मधुकरला फोन लावला. फोन स्विच ऑफ येत होता. त्यांना काळजी वाटली. त्यांनी बाकीच्या तिघांना ही गोष्ट सांगितली. सगळ्यांनी एकेकदा प्रयत्न करून पाहिला. मग सर्वच गंभीर झालेत. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार सातपुते माधुकरच्या घरी जायला निघाले.
खूप वेळा बेल वाजवूनही दार उघडत नाही हे बघून सातपूत्यांनी फॅक्टरीत फोन
लावला. .आणि लगेच दूसरा फोन जयंत साहेबांना लावला. त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. पंधराच मिनिटांत किरीट आणि जयंत येऊन पोचले. त्यांनी पण बेल वाजाऊन पाहिली. मग मात्र किरीट साहेबांनी फायर ऑफिस ला फोन लावला.
ती मंडळी आली आणि त्यांनी दार तोडलं. आतमध्ये बेडवर मधुकर जवळ जवळ बेशुद्ध होता. शरीर तप्त लोखंडा सारखं तापलं होतं. जयंतचे सासरे डॉक्टर होते आणि त्यांच हॉस्पिटल होतं. जयंतनी त्यांना फोन लावला आणि अॅम्ब्युलेन्स बोलावली.
मधुकरला तातडीने अॅडमिट करून घेतल्या गेलं आणि आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार चालू झालेत. सर्वच लोकांचे चेहरे गंभीर होते. इतका दणकट माणूस असा आजारी पडेल यांची कोणी कल्पनाच केली नव्हती.