मागील भागात जे तारुण्यात प्रेमात पडतात त्यापेक्षा म्हातारपणी जास्त प्रमाणात गरजेचे असते.. तसेच एक जोडपे जोशी आजी आजोबांचे.... स्वातंत्र्यानंतर च्या काळात साधारण १९५६ साली यांचा विवाह झाला. विवाह झाला त्यांचे वय लहान, वडील लहानपणी वारले घराची सर्व जबाबदारी आजोबांच्या वर ़.. त्यामुळे त्याना आजी ला फारसा वेळ देता आला नाही. बहीण भावांचे लग्न यांनी केले नंतर मुले झाली..
भाऊ लग्नानंतर वेगळे झाले तरी आई ची जबाबदारी मुलांचे शिक्षण यात दोघेही गुंतले. एकमेकांशी पुरेसा वेळ देखील दिला नाही. आता मात्र मुले मोठी झाली आपल्या आपल्या संसारात गुंतली.
आजोबा पण निवृत्त झाले आणि आता वेळ ही होता. असेच ऐक दिवस ते आजी ला म्हणाले मी तुला आयुष्यात फार काही सुख दिले नाही आता वेळ आली आहे.ती आपल्याला एकमेकांशी जोडुन ठेवेल. मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार हे ऐकताच आजी ला आनंद झाला ती खूप खुश होऊन विचारु लागली आपण कोठे जाणार काय काय पाहायचे..
आजोबा नी आधी च तिकीट काढून ठेवले होते ते ऊटी बेंगलोर चे आणि तिरुपती चे आजी साठी हे सर्व आशचय़कारक होते.
ईकडे मुलंही खुश होऊन तयारी करून आई बाबांना गाडी ते बसवून आले. गाडी निघाली तसे आजी आजोबा आपल्या जुन्या आठवणी ताज्या करत होते. आजी चे डोळे आनंदाने भरून आले होते आजोबा ही पाहून हरवले होते
आजोबा नी आजीला जवळ घेतले कधीही न दिलेल्या प्रेमाची कबुली दिली. आजी ही लाजेने लाल झाल्या. दोघांनी एकमेकांना आजपासून उव़रीत आयुष्य हे ऐकमेकां सोबत आनंदी आणि पेमाने घालवण्याचे वचन दिले..
़़खर पेमासाठी वय नाही तर भावना लागतात.