स्पर्धा - जलद कथा मालिका लेखन
शीर्षक - आजकाल लग्न.... अंतिम भाग 3
शीर्षक - आजकाल लग्न.... अंतिम भाग 3
कथा आणि पात्र काल्पनिक आहे.
सुरेखा -"शेवटी लग्न संस्था मध्ये खूप बिघाड झाला आहे. सुधारायचं कसं? कोण पुढाकार घेईल? "
दिलीप -"प्रत्यकाने आपलं आपलं सुधारलं की समाज सुधारतो."
सुरेखा - "नेमक करायचं काय? "
दिलीप - " लिव्ह इन रिलेशनशीप हे हिंदी सिनेमा, पश्चिमात्य संस्कृती आंधनुकारण बंद कराव लागेल."
सुरेखा -" आजकाल लग्न बाह्य संबंध, घटस्फोट यांच प्रमाण वाढलं, "
दिलीप - "लग्ना मध्ये प्रेम, विश्वास, आदर, एकनिष्ठता, तडजोड या गोष्टी नसतील तर लग्न टिकतं नाही."
सुरेखा - "आपली पिढी चाळीस चाळीस वर्ष जोडपी संसार टिकवून लग्नाचा चाळीसावा वाढदिवस साजरा करणारे आहे.. छोटयाशा घरात संसार थाटणारे, चाळीस जणांच्या खटल्याच्या घरात नणंद, जावा, दिर, सासू, सासरे, पोर, बाळ एकत्र नांदणारे, कष्ट, शेती, घरची कामं करणाऱ्या बायका कशा संसार करत असतील. किंवा नोकरी, घर, एकत्र कुटुंब कस करत असतील बायका सन्मान करण्यासाठी पात्र आहे."
दिलीप --”मामाची मुलगी आत्या कडे देणारे सुखी."
सुरेखा -" आत्याच्या हाताखाली नांदताना नाकी नऊ येत असतील तर. "
दिलीप -" लग्न खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यात महत्वाचा टप्पा आहे. आयुष्य बदलत तर विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे."
सुरेखा -"स्थळा विषयी माहिती काढणं गरजेचं आहे. मुलाची जन्म पत्रिका तपासा, हेल्थ चेक अप पण करायला हवं. आपल्याला माहिती आहे आपला मुलगा चांगला तरी मुली कडच्या नी खात्री साठी केल. मुला कडची सहज तयार पाहिजे "
दिलीप -"आजकाल लग्न इंटरनेट वर साईट असतात तिथे ही जमतात. तिथे काय कसं स्थळ आहे हे कसं कळतं असेल? "
सुरेखा -"लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या गेलेल्या असतात. आपल्या कडे तर सात जन्म हाच पती मिळावा म्हणून व्रत करतात. प्रत्यक्ष यमा कडून सावित्री ने सत्यवानला परत आणलं. इतकी ताकत आहे. इतकं पवित्र्य आहे, लग्न बंधनात. "
दिलीप -"आजकाल लग्न पार बदलून गेले आहे."
सुरेखा -"लग्नात कितीदा म्हणतात सावधान.. तसे सावधान होणे गरजेचे आहे. "
दिलीप -" शेवटी काय लग्न विचार पूर्वक करा. लग्नात उगाच पैसा उडवू नका. मोजक्या प्रेमाच्या लोकांना बोलवा. तो पैसा बचत करा. त्या पैशात त्या नवं जोडीने वर्ल्ड टूर करा. किंवा दान धर्म करा त्यात एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण करा, वृद्धाश्रमात द्या दान."
सुरेखा -"अहो लग्न विषयावर खूपच गप्पा रंगल्या आपल्या दोघांच्या कुठे वेळ गेला कळलंच नाही."
समाप्त
- सौ भाग्यश्री चाटी सांबरे.
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा