! व्यसन !
मायबाई बुढा याची येळ झाली , ह्या पोट्टीसंग गोठी { गोष्टी } करता करता कसा दिस गेला समजलच नायी व माय , चाल , जाय तुया घरी , मले झाडू मारु दे , तुया काका साटी भाकर टाका लागन ना माय , आज त बजाराचा दिस , मायबाई मसाला वाटा लागन ना , चाल वं ,
बर व काकी जातो मी , कर तुयावाले काम , म्हणत ज्योती आपल्या घरी गेली .
तशी गीताकाकी कामाला लागली , भराभर घर अंगण झाडून , हातपाय धुवून दिवा बत्ती केली मुलांना शुभंकरोती म्हणायला सांगीतले त्यांना अभ्यासाला बसवून ती स्वयंपाकाला लागली , पटापट भाकरी टाकल्या , मसाला भाजून पाट्यावर ठेवला आणि तांदूळ गंजात टाकून चुलीवर शिजण्यासाठी ठेवले , मग मसाला वाटला तेव्हढ्यात काका आले , कुट गेली वं सिंधुची माय , होव मसाला वाटतो ना , भयीनची आतापावतूर काय करत होती वं , आँ ! ठेव थे बाजूले , थैली घे , होव येतो , तिने लगेच हात धुतले आणि धावतच बाहेर गेली थैली घ्यायला तसे वेळ झाला म्हणून काका रागात आलेले , तुया मायची कावुन वं येवढा येळ , आँ ! थैली तिच्या हातात न देता त्यांनी खाली फेकली आणि गीताकाकीच्या कानशिलावर जोरदार थापड मारली , तशी आजी कळवळलीच , तरीही खाली बसून तिने पडलेला भाजीपाला पटापट पुन्हा थैलीत टाकला , आणि धावतच डोळे पुसत आत गेली , मुलगी सिंधु आणि मोठा मुलगा राम दोघेही अगदी घाबरुन पुस्तकात डोक खुपसुन बसलेले , अस वागणं त्यांच नेहमीचच होत , पण आज तर बाजारचा दिवस , तालुक्याला बाजारात गेलं की दारु पिण्याचा वार त्यांचा .
सिंधु , राम थोडे मोठे झाल्याबरोबर त्या दोघांचेही लग्न करुन दिलेत , राम शेती करायचा , आबांच्या फारच धाकात , मान वर करुन बोलायची हिम्मत नाही , सिंधुला घर चांगल मिळाल , सासू सासरे छान , नवरा छान , निर्व्यसनी , नोकरी निमीत्त धनराज जिल्ह्याच्या ठिकाणी एकटाच राहायला गेला , कारण आईवडीलांजवळ कुणीतरी हवं म्हणून सिंधुला तिथेच गावी ठेवले , पुढे सिंधुला दोन मुले एक मुलगी झाली , इकडे धनराज
इतर लोकांसोबत राहून दारु प्यायला लागला , एकदा सुट्टी काढून तो गावी आला आणि सिंधुने भाजी चांगली बनविली नाही म्हणून ताटच फेकलं तसे घरातील सगळेच दचकले , काय झाल ह्याला , त्याचे वडील त्वेषाने म्हणाले पण त्याचे असंबंद्ध बडबडणे बघून काय ते समजले , आणि त्यांनी चुप राहणेच पसंत केले , त्यांनी नंतर धनराजला सांगीतले , घर घे शहरात आणि बायको मुलांना तू सोबत ठेव , आपली इथे शेती आहे , गुरे आहेत म्हणून आम्ही इथेच राहतो , हो नाही करुन करुन ठरले , आईबाबा गावी आणि सिंधु , मुल , धनराज सोबत , धनराज ड्युटी बरोबर करायचा पण घरी येतानाच दारु पिऊन घरी यायचा , सिंधु ने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण प्रकरण शिव्या देणे आणि नंतर मारहाणी वर आले , तसे सिंधुने आपल्या माय ला एकदा सांगीतले तर माय म्हणाली , बाई वं , बाईची जातच अशी , करा लागते सहन , तुये आबा कशे करत , तुले तं सब्बन मायीत हाये , तरी म्हन्तं , बोलु नायी बाई नवर्याले पिरमान घे , तशे बुवा लय चांगला मानुस हाय , नोकरी करते , मायबाई तू शयरात रायत , मंग काय पायजे अजून , सिंधुने हसून डोळे पुसले , हो गं माय , बरोबर आहे तुझ .
सुधाला , सिंधुने लाडात वाढविले , धनराज दारु पित होता पण मुलीवर विशेष जीव , तसा मुलांनाही जीव लावायचा तो , त्याला जे शिक्षण मुलांना द्यायचं ते सर्व केल त्याने , सुधा हुशार ती ग्रॅज्युएट झाल्यावर तिच लग्न छान श्रीमंत घरी आणि सरकारी नोकरीत असलेल्या मुलासोबत केले .
सुधाला नोकरी करायची होती पण आईवडीलांनी म्हंटल तुझ लग्न झाल्यावर मग घरच्यांना विचारुन कर , सासरी आल्यावर तिचा दिवसच कामात जायला लागला , नवरा आपला कामात गर्क , त्याला तर बोलायलाही वेळ नाही मिळायचा , सुट्टीच्या दिवशी ही त्याची पार्टी चालायची मित्रांसोबत , मग परत येई तोच डोलत ! सुधाने त्याला प्रथम प्रेमाने समजावुन सांगितले ,
नंतर सासूसासर्यांना सांगून बघीतले तर काय होत थोडा पिऊन आला तर ! असे बोलुन तिला चुप करण्यात आलं , आई ला सांगितले तर आई डोळ्यांना पदर लावत म्हणाली , ताई गं एक माझ नशीब खराब , पण तुझ्याही मागे तेच ! कसेबसे सुधा ने तिला समजावले , आणि जस आहे तसे अॅडजस्ट करायचे ठरविले , पाहता पाहता सुधाला एक मुलगा , एक मुलगी झाली , सुंदर गोंडस लेकरे तिचे बघून सगळेच लहान मोठी मंडळी आनंदाने न्हालीत !
तन्वी आणि रितेश मोठे झालेत , स्वतःचे निर्णय स्वतःहा घेऊ लागले , तन्वी इंजिनीयर झाली रितेश लेक्चरर म्हणून काॅलेजवर लागला , मित्रांसोबत पार्टी करुन परतलेल्या मुलाच्या तोंडातून आलेल्या वासावरुन सुधाने ओळखले हा दारु पिउन आलाय , तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली , पण राग आवरुन तिने कशीबशी रात्र काढली , दुसर्या दिवशी पहाटेची कामे आटोपून ती रितेश च्या ऊठायची वाट बघत होती , रितेश थोडा ऊशीराच ऊठला आज रविवार असल्यामुळे सुटीच होती , का रे ! काल काय होत , तिने रागानेच त्याला विचारले तसे तो चाचरला , काही नाही गं , पण कश्याबद्दल विचारतेस , अरे रात्री दारु पिऊन आलास ना घरी ? त्याबद्दल विचारते आहे ! अगं आई ते असच गं , काय असच गं ? तुझी हिम्मतं कशी झाली दारु प्यायची ? तू कसा काय पिऊ शकतोस दारु ? का ? मी का नाही पिऊ शकत ? अरे तू लहानपणा पासन बघतोच आहेस घरात माझे आणि बाबांचे पिण्यावरुन सारखे खटके ऊडत असतात , मला अजिबात तो दारुचा वास सहन होत नाही , तुला सगळं माहीत असल्यावर तू कस काय अस करु शकतोस बाळा ! दारु अगदी वाईट पेय आहे , कितीदा तू मला रडताना बघीतलस , माझे डोळे पुसायचास तू आणि आज तुच पिऊन आलास !
सुधा रडतच म्हणाली , ते काही नाही , या नंतर खबरदार दारुला हात लावलास तर , अगं हे काय गं आई बोलन झालं , तू कोण मला सांगणारी पिऊ नकोस म्हणून , मी माझ बघेन ! मी स्वतःहा कमवतो , तुला काय प्राॅब्लेम आहे ? ह्या नंतर मी ऐकुण घेणार नाही , अस काही बोलली तर !
सुधातर डोळे विस्फारुन त्याच्याकडे बघतच राहीली , भरभर तिच्या नजरे समोरुन , आज्जी , आई आणि स्वतःहा ती तरळून गेली , सारी हयात त्यांची दारुड्या नवर्याला सहन करण्यात गेली आणि मी तर त्यांच्यापेक्षाही कमनशिबी राहीली , मला तर माझ्या पुढच्या पिढीने तर आताच फुलण्याआधीच गारद केलय !
काय आहे काय त्या दारुतं ! तुम्ही औषधा समान घ्याल तर औषध , नसता पुर्ण शरीरावर कब्जा करुन शरीर सडवते ती !
लिव्हर सोरोयसिस ने ग्रसित होण्याची संख्या वाढतेय ! घरात क्लेश वाढतो , पिणार्याची इज्जत कमी होते ते वेगळचं !
आणि सोशल ड्रिंकींग वगैरे काही प्रकार ऊरत नाही जेव्हा आपण तिचं सेवन करतो !
विचार करा , आज्जी , आई आणि सुधाने दारुचे सेवन केले असते तर !
०००००००