कुरघोडी
अंग हे फळं असे का ठेवलेत ? ते आईंना खायला दिलेत ,
मग कापून द्यायचे ना ! कळतं नाही का ?
अरे मी दुसर काम करत आहे त्या कापून घेऊ शकतात ना फळं , राहू दे तू तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही म्हणत सारंग ने चाकू ऊचलून फळे कापून प्लेट मधे ठेवुन प्लेट आईकडे सरकवली , खा गं आई , हो म्हणत आईने फळे खाल्लीत .
स्वातीची आंघोळ सकाळीच ऊरकली होती ,
सारंग तयारी करुन दूध आणि काही सामान आणायला बाहेर गेला , एका तासाने परतला अरे आई तू आंघोळ नाही केली , का गं स्वाती आईला गरम पाणी नाही दिलस टाकून !
अरे ते मोठ पातेल ऊचलायला जड जात त्यातही गरम पाण्याची भीती वाटते , अच्छा मनात नसल की कारण तर देशीलच ना म्हणत सारंग ने गरम पाण्याच पातेल बाथरुम मधल्या बादलीत रिकाम केलं ,
ऊद्यापासून त्या छोट्या पातेल्यात पाणी तापव म्हणजे तुला ऊचलता येईल , बरं ठिक आहे .
थोड्या वेळाने स्वयंपाक झाल्यावर स्वातीने सारंग ला आवाज दिला , या जेवायला ताट वाढते , हो येतो !
तोपर्यंत स्वातीने ताटं वाढलीत सारंग हात धुवुन आला , आईला दिला का आवाज ?
नाही दिला बोलवा तुम्ही तसेही त्यांनी ऐकलच असेल ना !
पण तू द्यायला पाहीजे आवाज तिला जेवायसाठी ,
दे आवाज !
बरं बोलावते ,
आई ताटं वाढलेत या जेवायला , हो आलीच म्हणत शारदा आई जेवायला आल्यात तसे बघीतले तर त्या तिथल्याच किचन च्या लगतच असणार्या बेडरुम मधल्या खिडकी जवळ ऊभ्या राहून बाहेर बघत होत्या कान मात्र मुलगा सुनेच्या बोलण्याकडेच होते .
जेवणात साध वरण सोबत वरुन घ्यायला तुप , भात , कोशिंबीर , शेंगदाण्याची चटणी , लोणच , चपाती , वांगे बटाट्याची भाजी .
जेवता जेवता शारदा आई म्हणतात आमच्या कडे अस वरण नाही बनवत आम्ही ,
वांगे बटाट्यात तेल टाकल की नाही !
तुमच्याकडे अशीच बनवतात का ?
ती रात्री भाजी ऊरली होती ना ! आई म्हणाल्या
हो आहे एक वाटी , मग काय तशीच ठेवायची का ?
आण गरम करुन , हो म्हणत स्वातीने भाजी गरम केली ,
घ्या आई , अरे आईला का देते शिळी भाजी ,
तिला डाॅक्टरांनी शिळ खायला नाही सांगीतले ,
तू खा ती भाजी ! बरं म्हणत
स्वातीने मान डोलावुन सारंग कडे बघीतले तो ताटाकडे बघत शांतपणे जेवत होता .
दुसर्या दिवशी सारंग ने आपल्या बहीणीला मावस बहीणीला परिवारा सकट जेवायला बोलावले होते म्हणुन आदल्या रात्री स्वातीने मसाला बनवुन ठेवला ,
घर थोड रात्रीच आवरुन ठेवले ,
सकाळी लवकर ऊठून साफसफाई केली आंघोळ केली ,
पीठ मळुन घेतले भात शिजायला ठेवला बस आता मटण आणले की मग भाजी करुया ,
होईल लवकरच मनातल्या मनात तिने कामाचे आराखडे बांधलेत .
दुपारी बहीणी परिवारा सकट आल्यात काही मदत हवी का ? नाही नको ताई बसा तुम्ही बस शेवटच्या सात आठ चपात्या बाकी आहेत स्वातीने हसुन म्हंटले ,
थोड्या वेळाने स्वाती म्हणाली ताई भाजी वाढा ना तुम्ही बाकी मी वाढते ताटात ,
नाही तुच वाढ तुलापण आलं पाहीजे ना !
म्हणत बहीणींनी हसतच अंग काढून घेतलं ,
जेवणामधे दोन किलो मटणाची भाजी , चपात्या , भात कोशिंबीर आणि श्रीखंड सोबतच पनीरची भाजी आणि जेवणारे स्वाती सकट बारा लोकं जेवता जेवता मधुनच ऊठुन स्वाती हवं नको ते बघत होती कुणीही भाजी कशी झाली सांगीतले नाही ,
तुमच्या कडे अशी बनवतात का भाजी म्हणुन स्वातीला विचारण्यात आले !
संध्याकाळी चहाची वेळ झाल्यावर चला आता निघतो आम्ही तसे आई म्हणाली अरे चहा पिऊन जा ,
मावस बहीणीची मुलगी म्हणाली मामी थकल्या असतील चला मी करते चहा !
लगेच बहीण म्हणाली नको बेटा आपण मामी कडे आलो ना , म्हणुन मामीलाच करु देत चहा तू बस इकडे ,
स्वातीने चहा करुन पाजला सगळ्यांना ,
तुमच्याकडे फिक्काच पितात वाटतं चहा !
स्वातीने मान डोलावली .
स्वाती सारंग चे लग्न होऊन जेमतेम एकच महीना होत आला ,
स्वाती सगळ्यांच्या मनात बसायचा विचार करत होती पण तिच्या प्रत्येक वागण्या बोलण्यावर प्रश्नच असायचे .
ननंदेकडे त्यांना जेवायला बोलावले आदल्या दिवशी तसा निरोपच दिला होता ननंदेने ,
आई म्हणाली ऊद्या ताई कडे जेवायला बोलावले आहे बेटा सारंग मग आजच मी ताईकडे जाते नोकरी करते रे ती ,
त्रास होईल तिला कामाचा ,
बरं ठिक आहे आई जा तू ताई कडे ,
ऊद्या लवकर ये ताई कडे हो येतो तू काळजी करु नकोस .
सकाळी ऊठल्यावर सारंगला आठवले आपल्याला बँकेत जायच होतं लाॅकर घ्यायसाठी अगं मी जाऊन येतो तोपर्यंत तू तयार रहा , हो ठिक आहे मग स्वातीने कालचा पडलेला पसारा आवरला नाश्ता केला तिला प्रचंड थकवा जाणवत होता काल जास्तच तिची धावपळ झाली होती ,
सारंगचे दोन मित्र आपल्या बायकांसहीत जेवायला आले होते ,
थोडा आराम करते म्हणत अंग टाकल्या बरोबर तिला झोप लागली , बेलच्या कर्कश आवाजानेच तिला जाग आली ,
अरे तू अजुन तयारीच केली नाहीस ,
हो रे हातपाय दुखत होते माझे डोळाच लागला ,
होते लगेच तयार तोपर्यंत सारंग ही फ्रेश झाला ,
पंधरा मिनीटात स्वाती ही तयार झाली साडी घालुन कारण तिला नातेवाईकांकडे जाताना किंवा घरी नातेवाईक आलेत तर साडी घालावी लागेल हे इंजीनियर नवर्याने आधीच सांगीतले होते म्हणुन .
ताई कडे पोहोचल्यावर आई ताई गालं फुगवून ,
मावस बहीण यायची होती ,
लवकरच आली आईने टोमणा मारला ,
आई , सारंग ऊशीरा आले म्हणुन इकडे यायला वेळ लागला ,
अगं आई अर्धा तास आधी आलो असतो पण ही तयारी न करता मस्त झोपली होती !
अस्स ,,,, आई ने स्वाती कडे बघीतले .
काय मदत करु ताई , ते काय विचाराव लागत का ?
जा भाजी कर , किती कामं असतात ताईला ,
मुलं सांभाळा नोकरी करा , घरचे कामं करा ,
जरा लवकर आली असती तर तिला मदत झाली असती ना !
मग मुकाट्याने स्वातीने चिकन बनविले तेव्हढ्यात मावस बहीण आली मग मिळुन चपात्या बनवल्या आणि सगळ्यांनी जेवण केले ,
स्वाती ते मोठ्या पातेल्यातले ऊरलेले चिकन छोट्या पातेल्यात काढ आणि घासून घे पातेलं ,
ताईला ऊद्या ड्युटीवर जावं लागेल थकेल बिचारी कामं करुन , बाई पण दोन दिवस सुट्टीवर आहे आई म्हणाली ,
हो करते म्हणत ननंदेचे किचन आवरले तिने ,
खरकटे पाणी फेकायला बाहेर आली असता शेजारीन दिसली , अरे तुम्ही वहीणी का ? हो ,,, व्वा जसे सांगीतले होते करुणाने अगदी तश्याच छान सुंदर आहात ,
तुम्हालाही कामाला लावले का तिने ?
तिला वेळच मिळत नाही घरचे कामं करायला ,
आईंची फार दमछाक होते , सगळे कामं करुणाचे आईच करते ती घरी असली तरी आईच सगळं करते ही मोबाईल मधे व्यस्त असते मुलंही आईच सांभाळते ,
एवढ्यात तुमच लग्न झालं म्हणुन आई आली नाही इकडे ,
बस करुणा बिमार पडायचीच राहीली होती ,
किती घाण करुन ठेवल होत घर तिने ,
काल आई आली आणि सगळ घर तिच स्वच्छ केल बघा !
शेजारणीने तिला माहीती दिली .
लहान दिराचे लग्न सगळी तयारी मोठी सुन म्हणुन स्वातीलाच करायची होती अगदी हळद बनवण्या पासून ,
छोटी मोठी सगळी कामे तिच्याच खांद्यावर टाकलेली ,
जसे जमतील तसे सगळं करण्याचा तिचा प्रयत्न सुरु होता , तरीही घरात सासू ननंदेकडून धुसपुस सुरुच वरुन कमी की काय येणार्या पाहुण्यांनाही तिच्यात काही ना काही ऊणीव दिसतच होती ,
सारंग कडून तर तिला अपेक्षाच नव्हती कारण कुणाची तक्रार केल्यास तिच्या समोरच तो त्यांना विचारायचा मग स्वातीलाच तोंड कुठे लपवू वाटायचं !
लग्न छान धुमधडाक्यात साजरे झाले ,
सगळ्या हौसी दिराने , ननंदेने पुर्ण केल्या ,
आई पण खुप आनंदात होत्या घरातील शेवटच लग्न होतं सारंगचे वडील जाऊन सहा वर्षे झाले होते ,
त्या आधी एक वर्षे करुणाताईचे लग्न झाले होते .
नवीन सुनेचं खुप आनंदाने स्वागत करण्यात आले ,
दोन तीन दिवसाने मावसबहीणीने त्यांना जेवायला बोलावले निघताना नवीन वहीणीच्या हातात साडी दिली ,
करुणाताईने काही दिवसाने जेवायला बोलावले ,
दिर म्हणाला हिच्या मैत्रिणीकडे भेटायला बोलावले आहे
आधी आम्ही दोघे तिकडे जातो मग येऊ जेवायला
मग सारंग ने आईला म्हंटले तुला आधी पोचवुन देऊ का ताईकडे ?
का बरं ? नको , आपण तिघेही जरा लवकरच सोबत जाऊ तेवढीच ताईला मदत होईल सगळे ताईकडे गेलेत
पुन्हा स्वातीलाच भाजी बनवायला सांगीतली ,
चपात्या ताईने लाटायला घेतल्या तसे आई म्हणाली
तू हो बाजूला स्वातीला करु दे वाटल्यास तू शेक ,
चपात्या करत असता दिर दिरानी आलेत ,
या या हसून ननंदेने स्वागत केले पाणी प्यायला दिले ,
बसायला सांगीतले , मग हाॅलमधे बसुन सारंग दिर दिरानी सासुबाई जावई मिळून गप्पा करु लागले ,
हसत खेळत जेवणं झालीत घरी निघताना लहान वहीणीच्या हातात सलवार कुर्ती देऊन रवानगी करण्यात आली .
स्वातीला तर कळेचना हे असं का ते !
माझ्यासाठी वेगळे नियम आणि लहानी साठी वेगळे नियम का ?
ही पण इंजीनियर पण लग्नानंतर घर सांभाळावे लागेल ही अट तिने मान्य केली होती कारण पॅकेज त्याच चांगल होतं शिवाय ऊंच स्मार्ट होता सारंग म्हणुन पाहताच तिला आवडलेला ,
दिर सुद्धा चांगली नोकरी करत होता तो ही इंजीनीयर सोबत शिकलेल्या आपल्या मैत्रिणी सोबतच त्याने लग्न केले होते तिही इंजीनीयर ,
ताई शिक्षीका एकंदरीत सुशिक्षीत छोटा परिवार !
तरी ही मग स्वाती सोबत असे का ?
मोठी सून म्हणुन अवास्तव अपेक्षा !
आता दाबुन ठेवले तर हातात राहील
नाहीतर काही खरे नाही हा विचार !
मोठीला घरातील सगळ्या रितीभाती
सांगायचा प्रयत्न करणे किंवा
तिच्या कडून त्या करवुन घेणे !
सुनेने साडीच घालावी हा हट्ट !
घरातील , ननंदेची सासूची सगळी कामे
तिनेच करावे हा घोषा !
पण असे का ?
अहो 25वर्षाची मुलगी तुम्ही सून म्हणुन घरी आणता 55वर्षांच्या सासूबाई , ननंद 32वर्षाची दिर 27वर्षाचा दिर !
आता डिग्री घेऊन बाहेर पडलेली मुलगी नुकतीच नोकरी करत असता लग्न झालेली नोकरी सोडून घरसंसाराला लागलेली मुलगी !
काय अपेक्षा ठेवता तिच्या कडून !
तीचं लग्न झाल म्हणजे ती तुमच्या सर्वांपेक्षा मोठी झाली का ?
का तिच्यावर सगळ्या गोष्टी लादता !
तिला तिच लग्न तिच्या नवर्या सोबत थोड तरी एन्जाॅय करु द्या !
घ्याना थोडं सांभाळुन ! आज तुम्ही सांभाळाल ऊद्या ती तुम्हाला सांभाळेल !
मग दुसर्या सुने साठी एवढी मोकळीक का ? स्वाती समोरच !
कारण कोणती ही गोष्ट सहन करण्याची मर्यादा असते !
तुम्ही मर्यादा पार केलीत स्वातीने पण आता तिची मर्यादा ओलांडली , आता ती पण आपलं अंग सांभाळुन कामं करते ,
मग आता एकमेकींवर कुरघोडी करण्यात आयुष्य खर्ची घालत आहेत सासुबाई ननंद आणि सुना सोबतच भक्कम कोणाचीच बाजू न लढणारा नवरा सारंग !
असे प्रकार बघीतले की लेखिकेलाच खंत वाटते अश्या मानसीकतेची !
संगीता अनंत थोरात
24/06/2021
०००००००