कानमंत्र

'काय असतं न ऊषावन्स थोडं थोडं एडजस्ट सर्वांनाच करावे लागते .पण खर सांगू न" मना पासून स्विकारले कि जमत" वहिनीने दिलेला कानमंत्र घेऊन ऊषा सासरी आली.--------------------+-------------------
कानमंत्र

संध्याकाळचे फिरायला म्हणून ऊषा निघाली‌ तिला सुषमा बाजारातून येताना दिसली . स्कूटर वर दोन मोठ्या पिशव्यांमध्ये भाज्या आणि किराणा सामान दिसत होते.
ऊषा ने विचारले" बरेच सामान क्या बात है"
"यांचे आई-बाबा येत आहेत उद्याला"
सुषमा चा चेहरा ज-रा चिंतेत दिसत होता.सासू सासरे येणार याचे तिला बहुतेक टेन्शन आलेले दिसत होते .
बोलता बोलता म्हणाली" आता नेहमीसाठी च येतात आहे.
आईना मध्ये बरे नव्हते"
"मग ठीकच आहे आहे .इथे राहून काळजी करण्यापेक्षा समोर असलेले बरे."
आणि टेंशन नको घेऊ होईल सगळं ठीक हळूहळू.
उषाच्या लक्षात येत होते सुषमा ला कशाचे टेन्शन आले आहे.
कधीतरी पाहुणे म्हणून येणारे , ते आपले आई-बाबा असो की सासू सासरे आता एकत्र रहाणार . ह्या गोष्टी ची काळजी.
सकाळी फिरायला निघताना ऊषा ची नजर सुषमा च्या घराकडे गेली तिचे सासू-सासरे फिरायला निघाले होते.
सुषमा खालीच भेटली" काय म्हणते सर्व ठीक ??
" हो ग जमतंय हळूहळू.".

दोन दिवसांनी सुषमा दुपारी घरी आली .
"ताई- तु ये ना घरी एकदा, आईंना भेटायला.
त्या एकट्या खूप कंटाळतात.
\" हो येईन की ,बस तू.
मी आज चकल्या केल्यात चहाबरोबर घे "म्हणत ऊषा ने सुषमा ला बसवले.
\"तुझे ट्यूशन चे काम कसे चालले\"??
"आहे चालू आहे आता वेळ जरा बदलते आहे आई म्हणाल्या तू आपले क्लासेस घे कामाची काळजी करू नको".


सुषमा गेल्या नंतर ऊषा रोजच्या कामात लागली.
रात्री झोपताना तिला सुषमा च्या जागी ऊषा दिसत होती.
ऊषा चा अथर्व तीन वर्षाचा झाल्यावर तिनी परत शाळेत ली नौकरी सुरू केली.
अथर्व ची प्लेस्कूल होती त्यानंतर तो दोन तास पाळणाघरात रहात असे.ऊषा शाळेतून परत येताना त्याला घेऊन येतं असे.
अथर्व ची तब्येत जरा नाजूक होती .एक दोन वेळा त्याला शाळेत ताप भरला, पाळणाघरात तून बाईंचा ऊषाला शाळेत फोन,
शाळेतून सुट्टी घेऊन ऊषा ला यावे लागायचे. अरुण ना बरेच दा टूर वर जावे लागे.
उन्हाळ्यात ऊषा आई कडे गेली असताना ति आई जवळ बोलली
"नौकरी सोडून द्यावी असे वाटते"
अथर्व कडे पहायला कोणी नाही"
"अग अरुण रावांचे बाबा रिटायर्ड झाले न मग ते दोघ तिथं येऊन राहिले तर"
"ह्यांनी बरेचदा म्हणून पाहिले"
\"तू म्हंटले कां\"?
म्हणजे??
"मुलाने म्हणणं आणि तू आग्रह करण यात फरक पडतो"
"कसा"??
सुने न बोलावलं कि त्यांना जाणवेल कि तू त्यांना मनापासून स्विकारले आहे तेव्हा त्या नक्की येतिल.
"अस कां बरे"?
वाटत गं, कुणाला आपली गरज असावी, अडचण नसावी,तू म्हण
मग त्या मनापासून आपल घर समजून राहतील.
"हे अस असत"!??
वहिनी शी पण ऊषा चे हितगुज झाले .
\"काय असतं न ऊषावन्स थोडं थोडं एडजस्ट सर्वांनाच करावे लागते .पण खर सांगू न" मना पासून स्विकारले कि जमत"
वहिनीने दिलेला कानमंत्र घेऊन ऊषा सासरी आली.

काही महिन्यांनी सासू सासरे गावं सोडून शहरात ऊषा अरूण बरोबर रहायला कायमचे आले.
सुरवातीला ऊषा ला कळत नसे कि कामाचे नियोजन कसे करावे? म्हणजे सासूबाईंना काय काम झेपेल?आपण नौकरी वर गेल्यावर त्यांना अथर्व त्रास तर देणारं नाही अश्या अनेक अनेक कुशंका मनात होत्या.पण लवकरच त्याचे समाधान झाले.

एक दिवस सासूबाई स्वत म्हणाल्या "अग इतक्या सकाळी सकाळी लवकर उठून सर्व स्वैपाक नको करू तु फक्त तुझा टिफीन बनव".
"पण --बाकी सर्व तुम्हाला एकट्याला"---
"अगं भांडी,झाडलोट करायला तर आहेच आणि चार जणांना कितीस लागत"?
ऊषा च मन आनंदाने भरून आले.

सासु-सासरे आल्या ने घराला घरपण आल्या सारखे झाले, पण तरीही कामाचा बोजा एकट्या वर नको म्हणून ऊषा ने पोळी वाली लाऊन घेतली.
आई, बाबा आल्या ने अरुण ही खुश होते.

आता कामावरून घरी आल्यावर अथर्व जेवण करून आजोबांच्या बरोबर खेळताना दिसे.
संध्याकाळी मात्र ऊषा स्वैपाक करत असे, आई विचारत काही मदत लागली तर सांग.
"”कर्तव्य, आणि जबाबदारी बरोबरच प्रेम आणि आपुलकी च्या धाग्यांची सुंदर ,घट्ट वीण घातल्या ने नात्याचे उबदार वस्र विणले गेले.ते त्यांनी उसवू दिलें नाहीं." "
.हे सर्व आठवता ना ऊषा ला सासुबाईंची आठवण आली डोळे पाणावले होते ते समाधानाने पुसून ती झोपली.

ऊषा ने सुषमा ला संध्याकाळी भेटायला बोलावले.
ताई, अजून आईंना किती काम झेपेल , आणि सांगितलेले आवडेल कि नाही उगाच त्या वरून वाद न हो,ह्याची मनात भिती वाटते. कस मैनेज करावे??

अगं, माझ्या सासूबाई आणि माझ्यात ही मतभेद असायचे आणि ते असणारच ग,दोन वेगवेगळ्या घरच्या आपण, आणी बरीच वर्षे स्वतंत्र संसार केलेला , आमच्याआईंच्या नी माझ्या कामाची पद्धत ,स्वैपाकाच्या चवीत वेगळे पण होत.
आणि खर सांगू आमच्या दोघींच्या त छोटे मोठे वाद ही सुरवातीला होत असत पण ते फार वेळ ताणून धरले नाही . -- आम्ही एकमेकींना सहकार्य केले.
तुम्ही दोघं व सासु सासरे एकत्र बसून मोकळेपणाने बोला.
अर्थातच प्रत्येक व्यक्ती बरोबर परिस्थितीही वेगळी असतेच ग पण-- काही गोष्टी ठरवाव्या लागतात. जसे कामाची वाटणी ,उठण्या झोपण्याच्या वेळा, टीव्ही बघण्याचे टाईम या छोट्या छोट्या गोष्टींवरून ही बरेचदा वाद-विवाद होतात.
तसेच घर खर्चाचे नियोजन हा महत्वाचा विषय, त्याशिवाय बारीकसारीक असतातच पण ह्या सर्व सामंजस्याने सुटतात .
हो ताईआले लक्षात माझ्या. "दोघींनी मनापासून स्वीकारले की जमतं सर्व"
असे सुषमा ने म्हणताच
उषा बरोबर सुषमा ही हसायला लागली..
--------------------+-------------------