नेहमीप्रमाणे ते ऑफिसला जायला निघाले. आज जरा लवकरच निघाले. त्यांची मानसिक अवस्था काल रात्रीच्या प्रसंगा पासून फार नाजुक झाली होती. ते कसेतरी ऑफिसला पोहचले. त्यांचं आज कामावर अजिबात लक्ष नव्हतं. किंबहुना त्यांचा आज मूडच नव्हता. पण घरी बसून काय करणार? म्हणून ते आले होते. त्यांच्या डोळ्यासमोरून पुष्पाचा चेहरा हालत नव्हता.......... पुष्पाचा फायदा सहज घेता आला असता. नाहीतरी ते रोहिणी गेल्यापासून बऱ्याच सुखांना पारखे झाले होते.
असाच पुन्हा एक दिवस सूर्यनारायण कामानिमित्त बाहेर गेला. तो चांगला दोन तीन तासांनी आला. त्या अवधीत काकांनी फ्रंट डोअर लॉक केलं. घोडा सरकवला. त्यावर उभं राहून त्यांनी एकदम वरच्या खणाच्या काचा सरकवल्या. एक पुस्तक उचलण्यासाठी त्यांनी आत हात घातला. एवढं मोठं पुस्तक जडच असणार, असं वाटून ते उचलायला गेले. पण ते इतकं हलकं होतं की बाहेर काढताना काचेच्या दरवाजाला लागून ते खाली आवाज करीत पडलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ते खाली उतरले. पडलेल्या पुस्तकाचा वरचा भाग झांकणासारखा उघडला गेला होता. पुस्तक नव्हतंच ते. पुस्तकाच्या आकाराचा, रंगाचा आणि डिझाईनचा एक पत्र्याचा डबा होता. त्याचं वरचं झाकण आतली स्प्रिंग दबल्याने उघडलं होतं. " म्हणजे असं आहे तर! " ते स्वतःशी मोठ्याने म्हणाले. ही पुस्तकं नाहीतच. मग त्यांनी जिथून पुस्तकं चालू होतात, त्याच्या जवळचा डबा बाहेर काढला. तो उघडायचा प्रयत्न केला. पण उघडला नाही. पण रिकामा होता. केवळ पुस्तकाच्या आकाराचे रिकामे डबे. डिझाइन एवढं बेमालूम होतं की वरच्या भागावर पानं असल्यासारख्या ओळी काढलेल्या होत्या. भरलेले असताना कोणी च हात लावला नसता. प्रत्येक डब्यावर सोनेरी अक्षरात "ऑल इंडिया रूल मॅन्युअल " वर्षासहित लिहिलेलं होतं. उघड्या डब्याचा वास त्यांनी घेऊन पाहिला, पण काहीच वास आला नाही. मग काही डबे तपासून त्यांनी ते रिकामे असल्याची खात्री करून घेतली आणि जागेवर ठेवले. ते खाली उतरले. घोडा जागेवर ठेवला. जागेवर बसून ते विचार करू लागले. आत काय माल असेल? जो किमती नक्कीच असणार. कॅमेऱ्याने त्यांची ही कृती पण टिपली असणार हे त्यांना लक्षात आलं. पण त्याची पर्वा केली नाही. माल काय होता हे शोधायलाच पाहिजे. कोणताच माग लागत नव्हता........
मध्येच कर्कशपणे फोन वाजला. पलीकडून आवाज आला. "तीनसो " आणि फोन बंद झाला. ते स्वतःशीच म्हणाले, " तीनसो " पण काय? मग त्यांना थोडासा संदर्भ लागल्यासारखा वाटला. तीनसो म्हणजे तीनशे डबे माल हवा असावा....... कदाचित पैशाचाही हिशोब असावा...... किंवा आणखीन काही...... ते केबिनमध्ये शिरले. सहज नजर फिरवून पाहिली. काही समजेना. त्यांची नजर स्क्रीन कडे गेली. बेल वाजली. दारावर सूर्यनारायण आल्याचे त्यांना दिसले. त्यांनी बाहेर येऊन दार उघडलं. का कोण जाणे पण सूर्यनारायण त्यांच्याकडे शोधक नजरेने पाहात होता. त्याला संशय आला असावा, असं त्यांना वाटलं. त्यांनी आलेला मेसेज त्याला दिला. निर्विकार चेहऱ्याने तो आत गेला. नंतर फोन सारखे येतच राहिले. दिवस तसा कामात गेला. संध्याकाळी ते घरी आले. आल्या आल्याच आज ते घरात शिरतात न शिरतात तोच रमेश त्यांच्या अंगावर ओरडला. " बाबा, हे तुम्ही काय चालवलंय? आत्ताच पाटकर येऊन धमकी देऊन गेला. खरं सांगा, जायच्या आदल्या रात्री पुष्पा आपल्याकडे आली होती की नाही? " त्यांना प्रथम पाटकरचा राग आला. मग त्यांनी विचार करून सांगितलं, "नाही!, अजिबात नाही! " खो टं बोलायचंच असं ठरवून ते ठासून म्हणाले, " अरे त्याच दिवशी पाटकरने खाली तमाशा केला. मी त्याला तेच उत्तर दिलंय. " रमेश तापून म्हणाला, " त्याला दिलेलं उत्तर नकोय मला. खरं काय ते सांगा. " मग ते खाली मान घालून म्हणाले, "सांगितलं ना एकदा, ती आली नव्हती. हेच खरं आहे. विश्वास ठेव, नाहीतर ठेवू नकोस. " रमेश आत गेला. ती चर्चा तेवढ्यावरच थांबली.
" हो, हो! येईन. निघा तुम्ही. मिस्टरांची येण्याची वेळ झाली असेल ना? " ते सहज म्हणाले. ती म्हणाली, " मिस्टर? अहो, मी एकटीच राहते. त्यांना जाऊन पाच एक वर्ष झाली. चला निघू मी? बस आली बहुतेक. असं म्हणून ती लगबगीने समोर येणारी बस पकडण्यासाठी गेली. तिने बस पकडेपर्यंत काका तिथेच उभे राहिले. तिच्या आकर्षक आकृतीकडे त्यांना पाहात राहावंस वाटलं. त्यांना ती परत रोहिणीसारख्या स्वभावाची वाटली. बस दिसेनाशी झाली तेव्हा ते निघाले........ जानेवारी महिना उजाडला. नवीन वर्षाची सुरुवात झाली. खास काही घडत नव्हतं. आयुष्य ठीक चालू होतं. मग ते एकदा एका बँकेत खातं उघडण्यासाठी गेले. सर्व अर्ज भरून झाल्यावर दुसऱ्या खातेदाराची ओळख पाहिजे असं तिथला अधिकारी म्हणाला. आता ओळख कोण देणार? काकांनी त्याला विचारलं, "समजा ओळख नसेल तर? "..... "खातं उघडता येणार नाही " तो तत्परतेने म्हणाला. ते घरी आले. रमेशला सांगण्यात अर्थच नव्हता. शेवटी त्यांनी रघुमलला विचारलं. तो त्यांच्याशी नीट बोलायचा. त्याच्या ओळखीने एकदाचं खातं उघडलं गेलं. सध्या जवळचे पैसे खर्च होऊनही त्यांच्याजवळ \"पन्नास पंचावन्न हजार होते. ते पैसे त्यांनी दहा दहाच्या हप्त्याने भरायचे ठरवले. एकदम एवढे पैसे कुठून आले असं कोणी विचारू नये असं त्यांना वाटलं.
मग एक दिवस ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांना किशा दादाचा फोन आला. "कैसा चल राहा है, काकाजी? दस मार्च ध्यानमे रखना, आ राहा हूं. सूर्याको भी बोला है...... पार्टी करेंगे. काम भी बहुत है, तयार रहना. "
त्यांनी फार वेळ न रेंगाळता टॅक्सी बोलावली. ते ऑफिसमध्ये पोचले तेव्हा दीड वाजत होता. केविनमध्ये जाऊन त्यांनी सूर्यनारायणला तपशीलवार माहिती दिली. तो खूश दिसला. मग ते लंचसाठी म्हणून बाहेर पडले. अडीच वाजता ते परत आले. आल्या आल्या सूर्यनारायणने त्यांना फोन करून सांगितलं की आज ते पाहिजे तरी लवकर जाऊ शकतात मात्र उद्या सकाळी त्यांनी लवकर यावं. काका बाहेर पडले. चार वाजत होते. दुकानं उघडी असली तरी गर्दी फार नव्हती. त्यांना श्रेयाकरिता कपडे बघायचे होते. पण त्यांनी नंतर येण्याचं ठरवलं. आता त्यांना वेळ होता आणि कुठेही जाता येत होतं. पण कोणाकडे जायचं?..... रोहिणी असती तर तिला बोलवून घेऊन ते बाहेर फिरले असते किंवा तिला आणि रमेशला घेऊन ते एखाद्या पिक्चरलाही गेले असते..... पण ही जर तर ची परिस्थिती झाली.. असं मनात येऊन ते अस्वस्थ झाले...... आता घरी जाऊन काय उपयोग? नीता बोलत नव्हतीच. मग त्यांना साधनाबेनची आठवण झाली. पण तीही कामावर असणार. तिला फोन करावा असा विचार त्यांनी केला. पण फार संबंध येत नसल्याने त्यांनी ती कल्पना बाद केली. चला! घरी जावं झालं! असा विचार करून ते घरी जायला वळले. बिल्डिंगमध्ये शिरताना त्यांना पाटकर दिसला. तो त्यांच्याकडे खोचून पाहत होता. पण काहीच बोलला नाही. ते खालच्या मानेने घरी गेले. नीताने दार उघडलं. तिच्या तोंडावरचं आश्चर्य पाहून ते म्हणाले, " आज जरा लवकर सुटलो. उद्या मात्र उशीर होईल. " त्यावर ती काहीच बोलली नाही. तिला कुठल्याही परिस्थितीत आपण घरी यायला नको आहोत, हे त्यांना नेहमीच जाणवत आलं होतं. तसंच ते आजही जाणवलं. श्रेया आत झोपली असावी. त्यांनी आत जाऊन कपडे बदलले. आणि गॅलरीतल्या आरामखुर्चीत ते बसले. त्यांनी शांतपणे डोळे मिटले. त्यांच्या मनात आलं. आपण ह्या कामात स्वतःला झोकून दिलं, हे ठीक आहे का? नाही म्हटलं तरी दादाचे व्यवहार चोरटेच होते..... पण आपल्याला तरी कोण चांगलं काम देणार आहे? सगळा इतिहास कळल्यावर लोकं फायदा घेणारच. दादाचं काम सोडायला हरकत नाही, पण आपण फार पुढे आलो आहोत. तेवढं सोपं जाणार नाही...... मग एक लांब सुस्कारा टाकून ते म्हणाले, "आता शेवटपर्यंत आपल्याला त्याच्याच बरोबर बॅटिंग करावी लागेल. पैसाही चांगला मिळेल. कोणी सांगावं, एखादी जागाही घेता येईल..... " आणि.... आणि साधनाबेनशी संबंधही ठेवता येईल..... संबंध कशाला? जमल्यास लग्न सुद्धा करता येईल. खरंतर हा विचार तिला पाहिल्यावर प्रथम आलाच होता. पण तो वर आणायला ते भीत होते. निदान कोणीतरी हक्काचं माणूस ज्याच्याकरता कमावायचं, ते तरी असेल? मग त्यांनी मनातल्या मनात तरी खोटं न बोलण्याचं ठरवलं. एकट्याने दिवस काढणं किती कठीण आहे...... ते पुन्हा अस्वस्थ झाले. मग ते बराच वेळ साधनाबेनचा विचार कुरवाळू लागले. पण त्यांनी त्या विचारांवर स्वप्नं रंगवली नाहीत. असं केल्यावर गोष्टी स्वप्नातच राहतात असा त्यांचा अनुभव होता. ते मोठ्या कष्टाने थांबले. आज तसं काही विशेष घडलं नाही. पण रात्री त्यांनी डायरी मात्र श्रद्धेने लिहिली. रोहिणी पण त्यांना डायरी लिहायला सांगून थकली होती. पण आता त्यांना ते पटलं होतं आणि आवश्यक वाटलं. निदान डायरीत तरी मन मोकळं होत होतं.
दहा मार्च उजाडला. ते आज साडेनऊलाच ऑफिसमध्ये गेले. त्यांचे कपडेही बरे होते. सूर्यनारायणने काही पुष्पगुच्छ दादाच्या स्वागतासाठी आणले होते. एवढे गुच्छ पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. मग एकेक नवीन माणूस ऑफिसमध्ये येऊ लागला. त्यातले महत्त्वाचे चार पाच जण होते. थोडक्यात ती "कोअर माणसं " होती. ते दादाचे अंतरंगिचे भक्त होते. सूर्यनारायणने त्यांना आत बोलावले. त्यांना वाटलं, बहुतेक दादाला आणायला तो बरोबर घेऊन जाणार असेल, किंवा त्यांनाच तो त्याला आणायला सांगेल. पण झालं वेगळंच. तो म्हणाला, " काकाजी, दादाको लानेको "हिरा जायेगा" हिरा, दादाच्या ड्रायव्हरचं नाव होतं. दहा वाजता दादाचा फोन आला. " साडेदस बजे बाहर आ राहा हूं. हिराको भेजना. "............
ओळख झाली, दादा म्हणाला, " अरे सुर्या, सबके लिये ड्रिंक बनाओ. " त्याने आठ दहा ग्लास बनवले. प्रत्येकाला दिले. काकांनी घेतलं नाही. दादा म्हणाला, " सूर्या, इनके लिये ठंडा लेके आना. "..... का कोण जाणे, पण सूर्यनारायणला काका फारसे आवडत नसत. असा काकांनाही संशय होता. त्याने अनिच्छेनेच त्यांच्यासाठी थंड पेय आणलं. लवकरच, एकेक करून दादाला नमस्कार करीत सगळेच निघाले. रात्री डिलाईट मध्ये येण्याची दादाने आठवण दिली. "बाकी छोटे मोटे लोग तो आ जाएंगे " दादा सूर्यनारायणला म्हणाला, ".....
म्हणजे अजून बरीच \" पिलावळ \" आहे तर, काकांना वाटलं. पण ते काही बोलले नाहीत. दुपारी मग तिघांनी जवळच्याच हॉटेल मध्ये लंच घेतला. घासाघासाला दादा समाधानाने भरून जात होता. त्याला, आता आपण काहीतरी करू शकतो, याचं कौतुक जास्त होतं. आता धंदा वधारलाच पाहिजे, असं तो मनाशी म्हणाला. काकाला मुद्दाम आणलं होतं. सूर्या हल्ली डोईजड होत चालला होता. त्याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या तक्रारी होत्या. पैशाचा हिशोबही तो नीट ठेवत नव्हता. प्रत्येक व्यवहारात त्याला स्वतःचा "क ट " हवा असायचा. दादा आत गेल्यापासून सूर्या जरा जास्तच शेफारला होता. त्याची बदली (रिप्लेसमेंट) करायलाच हवी असं दादाला वाटू लागलं. नेमके काका त्याच्या संपर्कात आले होते. आत असताना काकांचं वागणं त्याने पाहिलं होतं. शेवटी शिकलेला माणूस आहे नक्कीच काम नीट करील. लंच नंतर दादाने दोघांना घेऊन ऑफिसची पाहणी केली. काका बाहेर बसले होते. सूर्या आणि दादा आत धंद्याच्या एकूण परिस्थिती बाबत बोलत होते. तेवढ्यात सूर्यनारायणने त्याला काकांनी त्याच्या गैरहजेरीत ऑफिसची तपासणी केल्याची सीडी दाखवली. आणि म्हणाला, " मेरे ख्याल मे ये काका अपने धंदे के लायक नही है, वो जहांसे आया है वही फेक दो. " दादाच्या लक्षात आलं. तो सूर्याला म्हणाला, " फेकना तो पडेगा..... " मनात म्हणाला \" उसे नही तुझे. \"..... दादा काहीच बोलत नाही असं पाहून आपलं म्हणणं दादाला पटलं असल्याचं त्याला वाटलं........ तो संवाद मग तिथेच थांबला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा