कामथे काका (भाग ५)

ऑफिसमध्ये काकांना वेगळाच अनुभव आला....

फोन अर्थातच लंच टाइम मध्ये लावला. पलीकडून आवाज आला, " नरेश गडा अँड कंपनी. कोण बोलताय? क्षणभर काका बावचळले, कसं बोलावं त्यांना सुचेना. तशी तिची आणि त्यांची काही फार ओळख नव्हती. ते झटकन म्हणाले, " मी कामथे बोलतोय. "...... "कामथे? कोण कामथे? " ती तटस्थपणे म्हणाली. मग ते म्हणाले, " मी आपल्याकडे कामासंदर्भात आलो होतो, आठवतं का?........ " थोडावेळ शांततेत गेला. ती म्हणाली, " अरे हो हो! मी विसरलेच होते. पण तुम्ही आला नाहीत ते? का बरं?..... आवडलं नाही का इथलं काम? " काका म्हणाले, " खरं आहे, मला एवढ्या सकाळी रोज येणं जमलं नसतं. " तिचा आवाज एवढा गोड होता, की त्यांना तिने बोलतच राहावं असं वाटलं. आणि विशेष म्हणजे, तिचा आवाज रोहिणीशी मिळता जुळता होता. अचानक ती म्हणाली, " काय करताय मग? येताय का?, तुम्हाला जर सरांशी बोलायचं असलं तर सध्या ते इथे नाहीत. ते दोन तीन महिन्यांकरता बाहेरगावी गेल्येत. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपण पाहू या काय करता येईल ते. " त्यावर काका घाईघाईने म्हणाले, " नाही मॅडम मी सध्या दुसरीकडे जातोय. " ती बरं म्हणाली आणि तिने फोन ठेवला. काकांना जरा बरं वाटलं, म्हणजे खरोखरीच नरेशभाई बाहेरगावी गेलाय तर. आपण बोललो ते खोटं नाही निघालं. पण त्याचाच फोन रमेशला आला तर? कारण आता साधनाबेन त्याला सांगितल्याशिवाय राहील का? पण मन "आपलं खरं निघालं" या नशेत असल्याने, मनाने ती शंका धुडकावून लावली.
कामावर काही वेगळं घडत नव्हतं. असेच काकांना आता तीन चार महिने होत आले. गडाकडून कोणताच फोन आला नसावा, नाहीतर रमेश त्यांना वाटेल ते बोलला असता. किंवा आला असला तरी आपण आता पैसे आणतोय ना, असा विचार करून रमेश गप्प बसला असावा, असं त्यांना वाटलं.
परंतु एक दिवस विचित्र उजाडला. तसा तोही दिवस इतर दिवसांसारखाच होता. सकाळपासूनची त्यांची दिनचर्या तीच राहिली. अचानक तीन साडेतीनच्या सुमारास एक फोन आला. काकांनी सवयीने तो उचलला. पलीकडून आवाज आला, " नीला शर्ट फट गया ". काका फोन बंद करणार होते. बोलणारा गाफील होता म्हणा किंवा मूर्ख होता म्हणा, कारण कोणीतरी दुसऱ्या फोनवरून बोलत असलेलं त्यांना ऐकू येऊ लागलं. "मैने जो बोला वो सही है, माल मिलेगा, रेड करो पूरा पता लिख लो, इस टाइम मां कसम आप निराश नही होगे, पता लिख लो साब, लॅमिंग्टन रोड, २३ए...... " पुढे बोलणं चालू होतं. पण आधीच्या बोलणाऱ्याने आता फोन खाली ठेवला होता. काकांना ही माहिती नवीन होती. या जास्तीच्या माहितीचा ते विचार करू लागले. त्यांनी आलेला मेसेज प्रथम आत मध्ये दिला, तशी तो म्हणाला, " अंदर आओ ". काका कामात असताना सीट सोडून प्रथमच केबिनमध्ये गेले. तो काही पेपर्स चेक करीत होता. तो थोडा उद्विग्न झाला असल्याचं, त्याच्या कपाळावरील आठ्या दाखवीत होत्या. वर मान करून तो म्हणाला, " अरे काकाजी मै थोडा बाहर जाके आता है..... " काका त्याला मध्येच तोडीत म्हणाले, " साब, और एक जानकारी है. त्याला असं मध्येच थांबवलेलं आवडलं नाही, तो थोडा वैतागून म्हणाला, " क्या है? "....... मग काकांनी त्याला सगळं सांगितलं. तो बसल्या जागी ताठ झाला. त्याचे लहानसे डोळे विस्फारले गेले. तो म्हणाला, " अरे काकाजी, ये तो आपने बहोतही इंपॉर्टंट इंफर्मेशन दी है. ठीक है, आप जाओ मै बोलता हूं क्या करना है. " ते बाहेर आले. खुर्चीवर त्यांना अचानक बसावसं वाटेना. फार काय, ऑफिसमध्येही राहू नये असं वाटू लागलं. का कोण जाणे, त्यांना त्या माहितीचा अर्थ लागला. म्हणजे इथे पोलिसांची रेड होणार आहे तर........ पण का?..... एका वकिलाच्या ऑफिसात हरकत घेण्यासारखं काय असणार?...... काय माहीत?..... एक नक्की इथे आपण आता पूर्णपणे अडकलो आहोत.

त्यांची नजर उंचच्या उंच काचेच्या कपाटांकडे गेली. कायद्याची निर्जीव पुस्तकं त्यांच्याकडे स्थिर नजरेने पाहतं होती. त्यांना कळेना या पुस्तकांमध्ये काय आहे? ही कायद्याचीच पुस्तकं आहेत ना?...... छतापर्यंत रचलेली पुस्तकं त्यांना काढून पाहावीशी वाटली. पुस्तकांच्या मागे तर काही नाही?.... मग त्यांना त्यांच्या घरी आलेली पोलिसांची रेड आठवली............ सकाळची दहा साडेदहाची वेळ होती. काका चक्क जांग्यावर पुजेला बसले होते. कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. निलंबन चालू होतं. त्यांना रंगेहात पकडल्यापासून ते अस्वस्थ होते. त्यांचा दिवस धाकधुकीतच उजाडायचा. आज काय होणार? ते स्वतःला विचारायचे. पण होत काहीच नव्हतं. घरी बसून सहा महिने झाले होते. बहुतेक आता कोर्टातच जावं लागेल, अशी त्यांची कल्पना होती. त्यांचा वकील पण त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहायचा. असो. रोहिणी आत काहीतरी करीत होती. ती धुणं वाळत घालीत असावी. रमेश बाहेर गेलेला होता. काकांची आई आजारी असल्याने पलंगावर झोपली होती. खरंतर काकांना दुसऱ्या दिवशीच त्यांच्या मावसभावाच्या लग्नासाठी नागपूरला जायचं होतं. लग्नाची सगळी तयारी एका बॅगमध्ये केलेली होती. दोन खोल्यांच्या जागेमध्ये सामान खच्चून भरलेलं होतं. बसायला आणि उभं राहायला सुद्धा जागा जेमतेमच उरत होती. पुढचा दरवाजा उघडाच होता. चाळच ती, सर्वांचीच पुढची दारं उघडी असायची.

अचानक दारावर थाप पडली. कोण आलंय म्हणून बघायला रोहिणी पुढे झाली. तिलाच पोलिसांनी विचारलं, " रामचंद्र कामथे इथेच राहतात? ती हो म्हणाल्यावर ते पुढे म्हणाले, " आहेत का ते घरात? " परत चाचरत ती हो म्हणाली. " मी इन्स्पे. वागळे, इथे तलाशी घ्यायला आलोय. हे पाहा सर्च वॉरंट, " असं म्हणून तिच्या परवानगीची वाट न बघता ते चार पाच पोलिसांसहित आत घुसले. काकांनी चटकन टॉवेल गुंडाळला. ते दाराशी येऊन म्हणाले, " काय झालं? " त्यांनी वागळेना ओळखलं. त्यांची चौकशी वागळेच करीत होते. त्यावर वागळे म्हणाले, " तुला काय वाटलं, आता आपली भेट कोर्टातच होईल, काय? तुझ्याकडे ऑफिसची कागदपत्रं असणार म्हणून तर तलाशी घ्यायला आलोय........ " मग त्यांच्याकडे लक्ष न देता ते म्हणाले, " चला जाधव तुम्ही ही रूम पाहा. शिंदे आतली रूम पाहतील आणि दानवे तुम्ही पंचनामा लिहायला घ्या. इथे फारसं काही सापडेल असं वाटत नाही. यानी आधीच लपवली असतील कागदपत्रं कुठे तरी. " काकांना राग आला. पण ते काही बोलले नाहीत. त्यांनी रोहिणीकडे पाहिलं. ती धुणं वाळत घालायच्या काठीवर रेळून फक्त पाहत राहिली. काय करणार बिच्चारी.........
कपाटातले सगळे कपडे, इतर वस्तू बाहेर काढल्या गेल्या. आईला उठवून गादीखालचा भागही तपासून झाला. मग तिला वागळे म्हणाले, " तुमच्या मुलाने पैसे खाल्लेत, आणि काही कागदपत्रं लपवल्येत असा आम्हाला संशय आहे. " त्यावर आई काहीच बोलली नाही. नशीब लग्नाची बॅग तपासली गेली नाही, नाही तर त्यातले दागिने (जे घरचेच होते), किमती साड्या कुठून आणल्या विचारलं असतं, किंवा जप्त करून घेऊन गेले असते. स्वयंपाकघरातले धान्याचे डबे, इतर वस्तू सगळ्या विखरून पाह्यल्या. पण काही सापडलं नाही. शेवटी वागळे कुत्सितपणे म्हणाले, " सगळे कागद आम्ही यायच्या आधीच नष्ट केले, काय कामथे? बरोबर ना?..... " काका काहीच बोलले नाही. पंचनामा झाला. पंच म्हणून सलीम टेलरही होता. त्याची नजर काकांनी चुकवली. सह्या झाल्या. त्याही परिस्थितीत रोहिणीने चहा केला. तो निर्लज्जपणे घेऊन रेडिंग पार्टी बाहेर पडली......... या प्रकारानंतर आई फार दिवस राहिली नाही. एखादा प्रसंग काय काय निर्माण करू शकतो सांगता येत नाही.
कपाळावर आलेले घर्मबिंदू पुसत काकांनी इकडे तिकडे पाहिलं. त्यांना घरावरच्या रेडचा धक्का बसलाच होता. इथेही आपण अडकतो की काय? पण तेवढ्यात त्यांना सूर्यनारायणने आत बोलावले. तो म्हणाला, "काकाजी आज आप जाइये. पुलिस यहां कभीभी आ सकती है. कल मै आपको फोन करूंगा तभी ऑफिस आना". ते हो म्हणाले. आणि थर्मास घेऊन निघाले. चार वाजून गेले होते. त्यांना सुटल्यासारखं वाटलं. पण आपण इथे काम करतो हे पोलिसांना कळलं आणि ते घरी आले तर? रमेश काय म्हणेल? आपल्याला घरात ठेवील का?. या काळजीत ते घरी पोचले. घरी नीता होती. आजकाल ती दार उघडल्यावर त्यांच्याकडे पूर्वीइतकी तुच्छतेने पाहत नसे, असं त्यांना वाटलं. ते आत गेले, कपडे बदलून ते फ्रेश होऊन आले. मग त्यांनी नीताला चहा करायला सांगितला. उत्तर मिळालं नाही तरी चहा मिळाला. काकांच्या डोक्यातून विचार जाईनात. ऑफिसमध्ये नक्की काय चालतं? वकिलीचा धंदा हा निव्वळ देखावा असावाअ. कोणीही ज्युनियर्स, किंवा असिस्टंट इथे काम करीत नसावेत. नाहीतर केव्हातरी डोकावले असते. आजपर्यंत आलेल्या मेसेजेसचा अर्थ लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना तो लागेना. मग त्यांना आठवलं आपण पहिल्याच दिवशी डायरी ठेवायचं ठरवलं होतं. आपण सुटून आल्यापासून आठवेल तशी डायरी लिहिण्याचं ठरवलं. ती आज रात्रीपासूनच लिहावी अशी त्यांना निकड वाटू लागली. पण डायरी तर हवी.......

तेवढ्यात नीता श्रेयाला घेऊन बाहेर निघाली. त्यांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. श्रेया हळूहळू दोन वर्षाची होत आली. तिचा जन्म दिवाळीतला होता. आता ती काही काही शब्द बोलू लागली होती. अधून मधून ती चालत चालत हॉल मध्ये येत असे. पण तिला तशीच उचलून नीता आत नेत असे. काकांशी संबंध तिला आणायचा नसावा. नीताच्या हातावर असलेली श्रेया नकळत त्यांच्याकडे पाहून हसली. त्यांना फार बरं वाटलं. नक्कीच तिनी आपल्याला ओळखलं असावं. अशी गोड भावना निर्माण झाली. पण एवढ्या लहान मुलांना काय कळतंय? ती सहजच गाल वाकडा करतात आणि आपण समाधान करून घेतो, ती हसतात म्हणून. नीता तिला घेऊन बाहेर पडली. आणि काकांनी प्रथम दरवाजा नीट लावून घेतला. आतून बोल्ट लागत नसल्याने त्याचा काही उपयोग नव्हता. ते थोडावेळ थांबले. त्यांचा एक सिद्धांत होता. न आवडणारा संशयी माणूस बाहेर पडल्यावर काही ना काही कारणाने लगेचच परत घरात येतो. म्हणून त्याच्याबद्दल बोलणं किंवा काही करणं लगेच करू नये, तर थोडं थांबावं. हा त्यांचा सिद्धांत बरेच ठिकाणी खरेपणा दाखवून गेला होता. ते थांबले.......... आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला. लवकरच फ्रंट डोअर मध्ये किल्ली घातल्याचा आवाज आला. ते सोफ्यावरच बसले होते. नीता श्रेयाला घेऊन परत आत आली. त्यांनी तिला खोट्या आश्चर्याने विचारलं, " काही राह्यलंय का? " तिला पाह्यजे ती वस्तू घेतल्यावर ती बाहेर येऊन म्हणाली, " आता घराची झडती घ्या, मी नाहीच आहे सध्या ". ते काहीही बोलले नाहीत. ती निघून गेली. दरवाजा बंद झाला. ती खरोखरीच खाली गेल्याची त्यांनी गॅलरीतून पाहून खात्री करून घेतली. आता ते बेडरूम मध्ये आले. आज रूम आवरलेली दिसली. त्यांनी पटकन वरची बॅग काढली. ती उघडून ते जुनी डायरी शोधू लागले. त्यांना वरच्या इतर बॅगांमध्ये कुठेही डायरी मिळाली नाही. सगळं जसच्या तसंच त्यांनी ठेवलं. ते निराश झाले. पण नवीन डायरी विकत आणण्याचं त्यांनी ठरवलं. डायरी घरीच लिहिता येईल, कारण कामावर काहीच करता येत नव्हतं.

इकडे ऑफिसमधून काका गेल्यावर सूर्यनारायणने बाहेरील दरवाजा लॉक केला. आणि सावकाश लाकडी घोडा ओढत आणला. त्यावर चढून त्याने एकदम वरच्या खणापासून ते खालच्या सहाव्या खणापर्यंतची सगळी पुस्तकं खाली काढली., ती जवळ जवळ दीडेक शे भरली. सगळीच पुस्तकं अतिशय जड होती. एका कोपऱ्यात काही रिकामे कार्टून्स ठेवले होते. त्यात त्याने ती पुस्तकं भरायला सुरुवात केली. एकूण रिकामे कार्टून्स पंधरा होते. कसेतरी भरलेले कार्टून्स त्याने ओढत ओढत केबिनमध्ये त्याच्या टेबलाजवळ आणले. हे सगळं भराभर करणं जरूर होतं. तेही एकट्याने. तो चांगलाच दमला. एसी असूनही त्याला घाम फुटला. मग त्याने बाहेरच्या हॉलमधील घोडा जागेवर ठेवला. अधून मधून तो सारखा स्क्रीन पाहत होता. पोलिस तर नाही आले? रेड केव्हाही येऊ शकत होती. सध्यातरी काकांची मदत त्याला घेता येत नव्हती. दादाचा विश्वास असला तरी त्याला फारसा वाटत नव्हता..... त्याने केबिनचं दारही लॉक केलं. जमिनीवरचं मऊशार कार्पेट त्याने सावकाश गुंडाळायला सुरुवात केली. अर्ध्याहून अधिक कार्पेट गुंडाळलं गेल्यावर खालचा खोटा कोबा बसवलेली जमीन दिसू लागली. तीत दोन बाय दोन फुटाचा कोब्यातल्या डिझाइनमध्ये बसवलेली खाच होती. तीत थोडं दाबून त्याने बोटं घातली, त्याबरोबर तो दरवाजा उघडला गेला. आतल्या काळोख्या भागात दोन तीन दगड अशा रितीने ठेवले होते की त्यांचा पायऱ्यांसारखा उपयोग करता येत होता. दरवाजा उघडल्याबरोबर एक प्रकारची कुबट आणि उबलेली हवा बाहेर आली. एखाद्या मोठ्या गटाराच्या तोंडाशी जसा घाण वास येतो तसा आला. त्याचा घसा घुसमटला. केबीन मधल्या दिव्याचा परावर्तित प्रकाश खालच्या पायऱ्यांवर झिरपत होता. मग त्याने एक प्रखर प्रकाशाचा टॉर्च चालू केला. त्याबरोबर आतला अंधार पेटून उठला. आतून उंदरांचा चुंई चुंई चिर्र चिर्र असा आवाज आला. त्यांना बहुतेक एकदम येणारा प्रकाश आवडला नसावा. पण सूर्यनारायणला त्याची पर्वा नव्हती. टॉर्च आत प्रकाश पडेल अशा रितीने त्याने वर ठेवला. प्रथम एक कार्टून कसाबसा उचलला आणि तो तोल सावरीत आत उतरला. हळू हळू एकाच माणसाच्या रुंदीची जागा आता मोठ्या बोगद्यात रूपांतरित झाली होती. त्या सबंध बोगद्याने केबीन खालचा सगळा भाग व्यापला होता. आत उतरताना त्याने सवयीने बाजूच्या भिंतींमध्ये असलेल्या कोनाडेवजा भोकशांमध्ये पाहिले. ते माल ठेवण्यासाठीच बनवले होते. पहिला कार्टून घेऊन तो बोगद्यात शिरलेल्या गटाराच्या पाण्यातून चालत बोगद्याच्या दुसऱ्या तोंडाशी आला. जे म्युन्सिपालिटीच्या मोठ्या गटारात उघडत होतं. सर्व कोनाड्यांमध्ये, योग्य तेवढा पिस्तुलांचा साठाही ठेवण्यात आला होता. त्यात शेवटच्या कोनाड्यात त्याने तो कार्टून ठेवला. असं करीत पंधराच्यापंधरा कार्टून्स त्याने शेवटून ठेवत आणले. न जाणो तेवढ्यात जर पोलीस आले तर काही माल तरी वाचेल. त्याच गणित
त्यालाच माहीत होतं.तेवढ्यात नीता श्रेयाला घेऊन बाहेर निघाली. त्यांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. श्रेया हळूहळू दोन वर्षाची होत आली. तिचा जन्म दिवाळीतला होता. आता ती काही काही शब्द बोलू लागली होती. अधून मधून ती चालत चालत हॉल मध्ये येत असे. पण तिला तशीच उचलून नीता आत नेत असे. काकांशी संबंध तिला आणायचा नसावा. नीताच्या हातावर असलेली श्रेया नकळत त्यांच्याकडे पाहून हसली. त्यांना फार बरं वाटलं. नक्कीच तिनी आपल्याला ओळखलं असावं. अशी गोड भावना निर्माण झाली. पण एवढ्या लहान मुलांना काय कळतंय? ती सहजच गाल वाकडा करतात आणि आपण समाधान करून घेतो, ती हसतात म्हणून. नीता तिला घेऊन बाहेर पडली. आणि काकांनी प्रथम दरवाजा नीट लावून घेतला. आतून बोल्ट लागत नसल्याने त्याचा काही उपयोग नव्हता. ते थोडावेळ थांबले. त्यांचा एक सिद्धांत होता. न आवडणारा संशयी माणूस बाहेर पडल्यावर काही ना काही कारणाने लगेचच परत घरात येतो. म्हणून त्याच्याबद्दल बोलणं किंवा काही करणं लगेच करू नये, तर थोडं थांबावं. हा त्यांचा सिद्धांत बरेच ठिकाणी खरेपणा दाखवून गेला होता. ते थांबले.......... आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला. लवकरच फ्रंट डोअर मध्ये किल्ली घातल्याचा आवाज आला. ते सोफ्यावरच बसले होते. नीता श्रेयाला घेऊन परत आत आली. त्यांनी तिला खोट्या आश्चर्याने विचारलं, " काही राह्यलंय का? " तिला पाह्यजे ती वस्तू घेतल्यावर ती बाहेर येऊन म्हणाली, " आता घराची झडती घ्या, मी नाहीच आहे सध्या ". ते काहीही बोलले नाहीत. ती निघून गेली. दरवाजा बंद झाला. ती खरोखरीच खाली गेल्याची त्यांनी गॅलरीतून पाहून खात्री करून घेतली. आता ते बेडरूम मध्ये आले. आज रूम आवरलेली दिसली. त्यांनी पटकन वरची बॅग काढली. ती उघडून ते जुनी डायरी शोधू लागले. त्यांना वरच्या इतर बॅगांमध्ये कुठेही डायरी मिळाली नाही. सगळं जसच्या तसंच त्यांनी ठेवलं. ते निराश झाले. पण नवीन डायरी विकत आणण्याचं त्यांनी ठरवलं. डायरी घरीच लिहिता येईल, कारण कामावर काहीच करता येत नव्हतं.
इकडे ऑफिसमधून काका गेल्यावर सूर्यनारायणने बाहेरील दरवाजा लॉक केला. आणि सावकाश लाकडी घोडा ओढत आणला. त्यावर चढून त्याने एकदम वरच्या खणापासून ते खालच्या सहाव्या खणापर्यंतची सगळी पुस्तकं खाली काढली., ती जवळ जवळ दीडेक शे भरली. सगळीच पुस्तकं अतिशय जड होती. एका कोपऱ्यात काही रिकामे कार्टून्स ठेवले होते. त्यात त्याने ती पुस्तकं भरायला सुरुवात केली. एकूण रिकामे कार्टून्स पंधरा होते. कसेतरी भरलेले कार्टून्स त्याने ओढत ओढत केबिनमध्ये त्याच्या टेबलाजवळ आणले. हे सगळं भराभर करणं जरूर होतं. तेही एकट्याने. तो चांगलाच दमला. एसी असूनही त्याला घाम फुटला. मग त्याने बाहेरच्या हॉलमधील घोडा जागेवर ठेवला. अधून मधून तो सारखा स्क्रीन पाहत होता. पोलिस तर नाही आले? रेड केव्हाही येऊ शकत होती. सध्यातरी काकांची मदत त्याला घेता येत नव्हती. दादाचा विश्वास असला तरी त्याला फारसा वाटत नव्हता..... त्याने केबिनचं दारही लॉक केलं. जमिनीवरचं मऊशार कार्पेट त्याने सावकाश गुंडाळायला सुरुवात केली. अर्ध्याहून अधिक कार्पेट गुंडाळलं गेल्यावर खालचा खोटा कोबा बसवलेली जमीन दिसू लागली. तीत दोन बाय दोन फुटाचा कोब्यातल्या डिझाइनमध्ये बसवलेली खाच होती. तीत थोडं दाबून त्याने बोटं घातली, त्याबरोबर तो दरवाजा उघडला गेला. आतल्या काळोख्या भागात दोन तीन दगड अशा रितीने ठेवले होते की त्यांचा पायऱ्यांसारखा उपयोग करता येत होता. दरवाजा उघडल्याबरोबर एक प्रकारची कुबट आणि उबलेली हवा बाहेर आली. एखाद्या मोठ्या गटाराच्या तोंडाशी जसा घाण वास येतो तसा आला. त्याचा घसा घुसमटला. केबीन मधल्या दिव्याचा परावर्तित प्रकाश खालच्या पायऱ्यांवर झिरपत होता. मग त्याने एक प्रखर प्रकाशाचा टॉर्च चालू केला. त्याबरोबर आतला अंधार पेटून उठला. आतून उंदरांचा चुंई चुंई चिर्र चिर्र असा आवाज आला. त्यांना बहुतेक एकदम येणारा प्रकाश आवडला नसावा. पण सूर्यनारायणला त्याची पर्वा नव्हती. टॉर्च आत प्रकाश पडेल अशा रितीने त्याने वर ठेवला. प्रथम एक कार्टून कसाबसा उचलला आणि तो तोल सावरीत आत उतरला. हळू हळू एकाच माणसाच्या रुंदीची जागा आता मोठ्या बोगद्यात रूपांतरित झाली होती. त्या सबंध बोगद्याने केबीन खालचा सगळा भाग व्यापला होता. आत उतरताना त्याने सवयीने बाजूच्या भिंतींमध्ये असलेल्या कोनाडेवजा भोकशांमध्ये पाहिले. ते माल ठेवण्यासाठीच बनवले होते. पहिला कार्टून घेऊन तो बोगद्यात शिरलेल्या गटाराच्या पाण्यातून चालत बोगद्याच्या दुसऱ्या तोंडाशी आला. जे म्युन्सिपालिटीच्या मोठ्या गटारात उघडत होतं. सर्व कोनाड्यांमध्ये, योग्य तेवढा पिस्तुलांचा साठाही ठेवण्यात आला होता. त्यात शेवटच्या कोनाड्यात त्याने तो कार्टून ठेवला. असं करीत पंधराच्यापंधरा कार्टून्स त्याने शेवटून ठेवत आणले. न जाणो तेवढ्यात जर पोलीस आले तर काही माल तरी वाचेल. त्याच गणित
त्यालाच माहीत होतं.कार्टून्स ठेवताना त्याच्या अंगावर लहान लहान उंदीर उड्या मारीत होते. पण त्याला त्याची सवय असावी. त्यांना घाणेरड्या शिव्या देत तो बाहेर आला.
मग त्याने बाहेरचं कार्पेट नीट नेटकं केलं. जणूकाही काही घडलंच नव्हतं. मग त्याने बाथरूम मध्ये जाऊन हात पाय स्वच्छ धुतले. कपडे, केस नीट केले. अंगावर सेंटचा फवारा मारला. केबीन मध्ये फ्रेशनरचा फवारा उडवला. तरीही त्याला गटाराचा घाण वास आला. मग त्याच्या मनात आलं, आपण इतका वेळ तो वास घेतलाय, म्हणूनच येतोय. नवीन माणसाला संशय सुद्धा येणार नाही. तो केबीन बाहेर आला. विस्कटलेल्या वस्तू साफ करून जागेवर ठेवल्या. इथेही त्याने फ्रेशनर मारला. मग केबिनचे दार उघडून त्याने तिऱ्हाईत माणसासारखी नजर फिरवली. त्याची खात्री पटली, तेव्हा तो आपल्या मऊ मऊ खुर्चीत बसला, आणि निवांतपणे रेळला. हळू हळू रात्रीचे आठ वाजत आले त्याने डाव्या हाताचा खण उघडून दुपारीच आणून ठेवलेलं चिकन सँडविच तोंडात घातलं. रोडवरची बहुतेक दुकानं बंद होत होती. सूर्यनारायणच्या ऑफिसच्या गल्लीच्या तोंडाशी एक पोलिस व्हॅन येऊन उभी राहिली. त्यातून तीन चार हवालदार, एक एसीपी, दोन सिनी. इन्स्पेक्टर उतरले. त्यांनी जाऊन काचेचा दरवाजा हातातल्या काठीने वाजवला,
मग बेल वाजवली. सूर्यनारायणला स्क्रीन वर पोलिसी वेषातली आकृती दिसली. त्यांना एक शिवी देत, तोंडातला तुकडा घाईघाईने त्याने चघळला आणि गिळला.
प्रथम त्याने स्क्रीन बंद केला. टेबलाच्या खणात ठरलेल्या जागी ठेवला. मग त्याने बाहेर येऊन फ्रंट डोअर उघडले. दार उघडल्या उघडल्या एसीपी, खंडागळे, रिव्हॉल्व्हर काढून, त्याला धक्का देत आत घुसले. रिकामं ऑफिस पाहून ते सूर्यनारायणला म्हणाले, " खबर लागल्या बरोबर स्टाफला सुटी दिलीस काय? " त्याची कॉलर धरून त्याला हालवीत ओरडले, " माल कुठे लपवलायस? "..... स्वतःचा तोल सांभाळीत त्याने त्यांना निबरटपणे तो म्हणाला, " कौनसा मा ल साब? यहां कोई माल नही. "...... चिडून ते म्हणाले, " दुसऱ्या जागी ठेवलायस का? आं? काय रे काय विचारतोय मी? मराठी कळतं ना? " कुणाला मराठी येत नाही म्हटलं की त्यांचा अर्धा पारा आधीच चढायचा. त्यावर तो नाही म्हणाला. मग ते इतरांना म्हणाले, " घ्या याला पह्यले ताब्यात घ्या".
आता मात्र तो करवादून म्हणाला, " साब लेकीन मैने क्या किया? "
..... त्याला सणसणीत शिवी देत ते ओरडले, " चूप, एकदम चूप!, आम्हाला आमचं काम करू दे. चला सुरू करा सर्च " त्यांनी सहकाऱ्यांना ऑर्डर दिली. तरीही सुर्यनारायण म्हणाला, " साब आप वॉरंट दिखाईये, आप बिगर वॉरंट कुछ नही कर सकते. पुन्हा त्याच्यावर खंडागळे ओरडले, " हे बघ वॉरंट, नीट पाहून घे. " मग स्टाफवर नजर फिरवून म्हणाले, " चला बघा लवकर शिंदे, साबळे, नेटके, देखणे, सुरुवात करा. " मग त्या सगळ्यांनी मिळून सगळं फर्निचर अस्ताव्यस्त करून टाकलं. टेबलांचे खण उघडून सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. काही न सापडल्याने एसीपींनी टेबलांना लाथ मारून उडवले. मग म्हणाले, " अरे ती सगळी पुस्तकं काढा, चक्क खाली फेका. आपल्याला आवरण्याचं काम करायचं नाही जाताना. याचा काही भरवसा नाही. पुस्तकांमध्ये सुद्धा हा माल लपवील " काही न मिळाल्याने त्यांनी सूर्यनारायणच्या एक कानफटात मारली. तो एका बाजूला भेलकांडला. स्वतःचा गाल चोळीत तो कसातरी उभा राह्यला. कोपऱ्यातला लाकडाचा घोडा आणून स्टाफने सगळी पुस्तकं ओढून खाली टाकली. ते पुस्तकं चाळून पाहू लागले. त्यात बराच वेळ जाणार हे ओळखून सिनी. इन्स्पे श्रीकांत म्हणाले, " सर केबिनमध्ये नक्कीच काहीतरी असणार. एक दोघांना पुस्तकं आंणी कपाटं तपासायला सांगून बाकीचे सगळेच सूर्यनारायणचे बकोट धरून केबीन मध्ये शिरले........
सूर्यनारायणचं बार शेप टेबल त्यांनी आडवं पाडलं. सगळे खण उघडले स्क्रीन बाहेर टाकला. पण आत काहीच सापडलं नाही. शिवाय इंपोर्टेड दारूच्या बाटल्या....... मग त्यांची नजर कार्पेटकडे गेली. ते ओरडले, " नेटके कार्पेट गुंडाळा. पाहा खाली काय लपवलंय ते. कार्पेटखाली मारलेल्या फवाऱ्याने सुगंध येऊ लागला. पण खाली काही सापडलं नाही. त्यांना जराही संशय येणार नाही अशा रितीने खालच्या कोब्यावरचं डिझाइन त्यांच्याकडे पाहू लागलं. निराशेने आता त्यांनी सूर्यनारायणच्या दोन तीन कानफटात मारल्या. त्याचा गळा धरून म्हणाले, " बोल लवकर, लवकर बोल, माल कुठे आहे? खबरदार तुमच्यातलाच आहे. नाव सांगू?... सूर्यनारायणच्या तोंडावर उत्सुकता दाटली. मग त्यांनी नाव सांगितलं. " जी व न रा म "..... सूर्यनारायणला मेसेज आठवला. " जीवनराम बाहर है " गद्दार साला! सालेको उडाना पडेगा! तो मनातल्या मनात म्हणाला. तेवढ्यात इन्स्पे. श्रीकांत म्हणाले, " सर हा असा बोलणार नाही. याला कस्टडीत घेऊन बोलता करावा लागेल. मग मात्र मार खाणारा सूर्यनारायण त्यांच्याकडे पाहून म्हणाला, " अरे साब कायकू तकलीफ देता है? आपको गलत खबर मिली है. दिवाली को दो महिना बाकी है, मंगता है तो दिवाली एडवान्समे देगा और दिवालीके टाइम फिरसे दिवाली देगा, लेकीन फालतू का परेशान मत करना. आपून कंप्लेंट करेगा. " त्यावर चिडून एसीपी म्हणाले, " आम्हाला धमकी देतोस कारे ए...... (शिवी). " तरीपण त्यांनी विचार केला. त्याला म्हणाले, " आत्ता चाललोय, पण पुन्हा येईन ना तेव्हा तुला मुद्देमालासहित बांधून घेऊन जाईन, काय समजलास? " तो म्हणाला, " समझ गया साब. " मग केबिनमधल्या कार्पेटकडे पाहून ते म्हणाले, " साले, काय लॅव्हिशली राहतात लेकाचे, असलं कार्पेट आपण आपल्या आयुष्यात पाहणार नाही. त्यांनी विनाकारण एक शिवी हासडली. त्यावर इन्स्पे श्रीकांत म्हणाले, " सर निदान आपण त्याला ताब्यात तरी घेऊन जायला हवं होतं " त्यांना समजावीत ते म्हणाले, " पुढच्या वेळेला मी तुमची इच्छा पुरी करीन. सध्या मीडियाच्या हातात आपल्याला कोलित द्यायचंय का? चला आता. " मग ते सगळेच एकेक करून इकडे तिकडे संशयाने पाहत बाहेर पडले.........

दहा वाजून गेले होते. ते गेल्याची खात्री करून प्रथम सूर्यनारायणने दरवाजा लॉक केला. कपडे ठीकठाक केले. हॉलमधलं फर्निचर नीट केलं. पुस्तकं, परत घोडा घेऊन जागेवर लावली. आतली केबीन नीट लावली. सगळं करण्यात त्याचा तास भर गेला. मग तो स्वस्थ होऊन आपल्या मऊ खुर्चीत बसला. बाजूच्या भिंतीतलं बटण दाबून बाहेर आलेल्या खणातली व्हिस्की त्याने कच्ची च घेतली. तेव्हा कुठे त्याला जरा बरं वाटलं मग त्याने दादाला फोन लावला. " दादा बर्थ डे पार्टी हो गयी (म्हणजे रेड). काकाने पह्यले बोला था.... ". त्याने सगळी कथा त्याला सांगितली. त्यावर दादा म्हणाला " मेरी बात ध्यानसे सून. कल रात ठीक तीन बजे जग्याके पास पहुचाना. वो पीछे का पैसा भी देगा. इस टाइम काकाजीको खूष करना, मै बोलूंगा, समझा. " असं म्हणून फोन बंद झाला. सूर्यनारायणने काकांना फोन लावून नेहमीप्रमाणे यायला सांगितलं. आणि मग तो एकदम मराठीत बोलला, " वा, काय मस्त काम झालं. असं व्हायला पायजे. "

काकांना रात्री झोप येईना. ते रोहिणीच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते. कोणाकरता जगायचं, त्यांना कळेना. आपण एकाकी जीवन जगत असल्याचं त्यांना जाणवू लागलं. रोहिणीच्या सहवासाला ते निकालाच्या दिवसापासून अंतरले होते. मन ती जवळ झोपल्याचं स्वप्नरंजन करू लागलं आणि काकांना रिझवू लागलं. तिच्याबरोबरच्या जवळिकीत ते चांगलेच रंगले. काही वेळ असाच गेला. मग ते भानावर आले. गॅलरीतून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्यात त्यांना पूर्ण चंद्र दिसत होता. आज पौर्णिमा असावी. पण घटना मात्र अमावास्येसारखी घडली होती. पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर उंच उंच कपाटांमधली ती पुस्तकं येत होती. याचा छडा लावलाच पाहिजे. बहुतेक उद्या आपल्याला कामावर जायची वेळ येणार नाही. सकाळी वर्तमानपत्रात रेडची बातमी असणारच. त्यांच्या रेडची बातमी पण अशीच आली होती. घरच्या रेडची आठवण त्यांना कुरतडू लागली. अधून मधून त्यांना त्या दिवशीचे संवाद आठवू लागले. सलीम टेलरचं त्यांच्याकडे संशयाने पाहणं त्यांना दिसू लागलं. त्याचा चेहरा ते बारकाईने निरखून पाहू लागले. आता तो काही हजर नव्हता. मग त्यांना निलंबन कालावधीतले त्यांच्या वाट्याला आलेले ओढगस्तीचे दिवस आठवले. रोहिणीने तर कमी पैशांची सवय करून घेतली होती. पण मुलाचं काय? आताच त्याचं वागणं म्हणूनच तर बिघडलं नव्हतं? रमेशला धड कपडे मिळणं कठिण जाऊ लागलं. तो कुढा आणि तिरसट बनला. खेळताना इतर मुलं त्याला बाजूला काढीत. मग तो इतर मुलांमध्ये भांडणं लावू लागला. तक्रारी होत. कधी कधी घरी मारहाणही व्हायची. कारण काकांचा चिडखोर झालेला स्वभाव. काका त्याही कालावधीत लहान सहान कामं करू लागले. रमेशला त्यांच्या बद्दल अढी निर्माण झाली होती. "आपली सगळी मजा या माणसाने घालवली " असं त्याला वाटू लागलं. कुठल्याही गोष्टीसाठी ते म्हणत "पैसे नाहीत. " त्याला कुठेही ट्रीपला जायला मिळत नसे की ते सगळे कधी कुठे बाहेरगावी गेले. पाहावं तेव्हा दुसरी मुलं, कुठे ना कुठे तरी जायची. रमेश मात्र घरातच असायचा. त्याच्या सगळ्याच सुट्या अशा फुकट जात. अपवाद फक्त रोहिणीचा होता. ती कोणालाच दोष देत नसे. तिने नशिबालाही दोष दिला नाही. तिने परिस्थितीचा स्वीकार केला. आनंदाने की नाईलाजाने, कुणाला माहीत. त्यामुळे तिचा स्वभाव मऊ राहिला. रमेशला ती समजावीत असे. "थोडे दिवस काढ बाळा, सगळं ठीक होईल बघ. " मोठं होता होता रमेशला त्या आश्वासनातला फोलपणा कळू लागला. पण त्याने कधी तिला दोष दिला नाही. जवळ घेणारी, समजावणारी तीच होती. पण या सगळ्याची परिणिती एवढी गंभीर होईल असं मात्र तिला कधी वाटलं नाही.
तिला वाटलं, ऑफिसात चौकश्या होतात, निलंबनही होतं, पण वर्ष सहा महिन्यांनी सगळं सुरळित होतं. तिच्या वडलांचं पण तेच झालं. पण लवकरच सुरळीत झालं. पुढे पुढे तिचीही चिकाटी संपत आली. पण तिने काकांवर कधीही अविश्वास दाखवला नाही. तिच्या लवकरच लक्षात आलं, आपण जर यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर हे कोलमडतील, आणि आपण रस्त्यावर येऊ. म्हणून तिनेही लहान सहान नोकऱ्या आणि हलकी काम केली. कुठलाही विधिनिषेध न ठेवता.... त्यातच रेडनंतर काही दिवसात काकांची आई गेली. नाही म्हटलं तरी काकांना आईजवळ चार शब्द बोलता येत होते. आई गेली तरी काका रडले नाहीत. उलट रोहिणीचं सांत्वन त्यांनी केलं. घरात मोठं माणूस नाही म्हणून रोहिणीला मात्र आयुष्यातली पोकळी जाणवू लागली. बाराव्या तेराव्याला आलेला ब्राह्मण काकांना म्हणाला होता, " आता तुमच्या डोक्यावरचं छत्रं खऱ्या अर्थानं गेलं. लोकं आता काही झालं तर थेट तुमच्याकडे बोटं दाखवतील, आई वडलांच्या हयातीत ते त्यांच्याकडे बोट दाखवतात, म्हणजे जबाबदार धरतात. " त्याचं म्हणणं काकांना पटलं. काका रडले नसले तरी, त्यांना अधून, मधून आपल्याला आई नाही हे जाणवू लागलं, आणि कधी कधी त्यांना मोठ्यांदा रडावासही वाटायचं. पण इलाज नव्हता....... आठवणींच्या गर्तेत कोसळलेल्या काकांना बऱ्याच वेळाने खिशातल्या मोबाईलची कंपनं जाणवली. त्यांनी पाह्यलं, सूर्यनारायणचा फोन होता. त्यांनी नेहमीप्रमाणे ऑफिसला यावं असं सांगणारा. ते कसेतरी झोपले......
सकाळ झाली. काकांनी कामावर जातानाच एक डायरी खरेदी केली. घडत काहीच नव्हतं. त्यांच्या घरी गणपती नसल्याने त्यांना करावं लागत नव्हतं. आता तर रोजची पूजाच बंद झाली होती. रोहिणीने केसचा निकाल लागल्यापासून देवांना शोकेस मध्ये ठेवले ते कायमचेच......... एक दिवस मात्र रमेशला विपुलभाईचा फोन आला. काका त्याच्याकडे जात नव्हते, हे रमेशला समजलं होतं. त्या दिवशी काका असेच लवकर घरी आले होते. सात सव्वासातला रमेश आला. बूट काढता काढताच तो काकांना त्रासिकपणे म्हणाला, " तुम्ही लवकर आलात वाटतं? काम कोणाकडे करता हो तुम्ही? " विचारण्यात वरकरणी सौम्यता दिसत होती. काकांची जीभ कोरडी पडली. पुढे मोठा वाद होणार असं समजून ते घाबरून म्हणाले, " मी सूर्यनारायणकडे जात असतो........ " आणि वाक्य अर्धवट सोडून ते प्रतिक्रियेसाठी थांबले.

" कोण, सूर्यनारायण? " रमेशला आश्चर्य वाटल्याचे दिसले. "त्याने तुम्हाला बरा जॉब दिला. तो फार मोठा वकील आहे. कोणाच्या ओळखीने तुम्ही गेलात? " रमेश त्यांच्या तोंडाकडे पाहता होता.... त्यांना कळेना, आता कोणाचं नाव सांगायचं? किशा दादाचं नाव सांगून उपयोग नाही. वाईट माणसानं कितीही चांगलं काम केलं तरी त्याचं नाव घ्यायला लाजच वाटते. मग ते चाचरत म्हणाले, " अरे आमचे जेलरसाहेब होते ना, त्यांनी सांगितलं होतं.......... " त्याची प्रतिक्रिया अजमावण्याची आता त्यांची पाळी होती...... पण रमेश जरा चिडूनच म्हणाला, " अस्सं? आणि एका शब्दानंही मला सांगावंसं वाटलं नाही?, चांगलीच लपवाछपवी करता हो. विनाकारण विपुलभाईला त्रास दिलात ना? मी तुम्हाला इथे राहू देतोय म्हणून ठीक आहे, खरं तर तुम्हाला बाहेर काढलं पाहिजे. तुमच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा यापुढे? "काका काहीच बोलले नाहीत. शाळकरी मुलासारखा चेहरा त्यांनी केला. तो आत गेला. त्यांच्या मनात आलं, घाबरून जाऊन त्यांनी जागा त्याच्या नावावर केली होती. कोर्टाने जर वाटेल तसा दंड ठोठावला तर त्याची वसुली ते जागा विकून करतील. आणि रोहिणी आणि रमेश बेघर होतील. त्यापेक्षा आपल्या नावावर जागा नकोच, असा विचार त्यांनी केला होता. पण त्यांना काय माहीत, रमेश असा फायदा घेईल. "स्वतःची मोरी आणि मुताची चोरी. " म्हणजे जागेची व्यवस्थाही केली पाहिजे, आणि तीही लवकरच. पण जवळ काही नसताना, हे मुंबईत तरी शक्य नव्हतं. काही न सुचल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांनी रात्री सावकाश डायरी लिहायला सुरुवात केली. तीही सुटून आल्यापासून नाही तर केस झाल्यापासून, आठवेल तशी. काही जवळ नसलं तरी स्पष्ट आठवणी ही त्यांच्या आयुष्याची मिळकत होती. खूप लहानपणापासूनचे काही ठळक प्रसंग त्यांना संवादासहित आठवत होते. डायरीत मन थोडंसं मोकळं झाल्याने, आज ते जरा समाधानाने झोपले.

सकाळ जरा बरी उजाडली. रमेश कामावर गेला होता. विशेष म्हणजे, श्रेया नीताचा डोळा चुकवून थोडी धरून धरून चालत हॉलमध्ये आली. तिच्या हातात खेळणं होतं. तिचा तोल जात होता. मग काका पुढे झाले. तिला घेऊन म्हणाले, " आले आले आले, नीट चालावं, पलायचं नाही. " तिच्या चेहऱ्यावरून आणि अंगावरून काही वेळ ते हात फिरवीत राहिले. पण मधल्या दारात नीता आलेली पाहून ते घाबरले..... तिला खाली ठेवत ते म्हणाले, " पडली असती ना, म्हणून घेतली. "........ नीता थंड नजरेने त्यांच्याकडे पाहता होती..... जणू काही त्यांनी कोणती तरी सीमा पार केली होती. नीताने पुढे होऊन काही न बोलता, तिला उचलून घेतलं., आणि आत निघून गेली. श्रेया त्यांच्याकडे पाहता दा.. द्दा..... बा... ब्बा..... करीत होती. आज प्रथमच त्यांना बरं वाटलं. वेगळ्याच उत्साहात त्यांनी कपडे घातले. थर्मास घेऊन ते निघाले. बाहेर आल्यावर त्यांच्या मनात आलं, श्रेयाच्या निमित्ताने आपणच पुढाकार घेतला तर?..... नीता बदलेल का?...... पण आपण काय करायचं?...... त्यांना कळेना.......
ते तसेच ऑफिसमध्ये गेले. आज आल्याबरोबर त्यांना सूर्यनारायणने बोलावलं. आज त्याने वकिलाचा सूट घातला होता. गळ्याभोवती वकिलाचा बंद लावला होता. तो एका काळ्या कातडी बॅगेत कामाचे कागद ठेवत होता. त्याचे केस कोणत्याही दिशेत वळवलेले नव्हते. लहानपणापासूनच ते वळत नसावेत. पण काही काही गणवेश असे असतात ते घातल्यावर माणसाचं व्यक्तिमत्त्व त्या त्या कामाप्रमाणे दिसू लागतं. उदा. पोलिसी गणवेश. माणूस आपोआपच रुबाबदार दिसू लागतो. पण काही माणसं मूळचीच रुबाबदार असतात, त्यांना तो जास्त शोभून दिसतो. असो. सूर्यनारायणला आज कुठेतरी जायचं असावं. काकांचा अंदाज खरा ठरला. मग तो त्यांना म्हणाला, " काकाजी, मै जरा एक क्लायंटके पास जाके आता हूं. आप अंदरही बैठना. शायद दादाका फोन आयेगा, मेसेज बराबर लेना. मै छोडकेकिसीको भी अंदर मत लेना. ये बटन दबाया तो फ्रंट डोअर लॉक होता है. " तो लगेचच बाहेर गेला. काकांनी दरवाजा लॉक केला. केबिनमधल्या कार्पेटचा मऊ मऊ स्पर्श नक्कीच सुखद होता. आतमध्ये मंद आणि मधाळ वास दरवळत होता. केबिनचं निरीक्षण पूर्ण झाल्यावर ते सूर्यनारायणच्या खुर्चीत बसले. बसले कसले, बुडले म्हणावं लागेल, इतकी ती मऊ होती. कामावर असताना, लाकडाच्या जुनाट खुर्च्यांमध्ये आपणच गादी विकत घेऊन ठेवावी लागत होती. इतपतच त्यांचा खुर्चीच्या मऊपणाशी संबंध होता. तुरुंगात तर ओल मारलेल्या खडबडीत जमिनीवर झोपावंही लागत होतं. त्या जमिनीची त्यांना सवय झाल्याने रमेशच्या घरातली लादी पण त्यांना चांगली वाटली होती. ही खुर्ची म्हणजे त्यांना सिंहासनच वाटलं.

बसल्या बसल्या त्यांनी एकदा इकडे तिकडे नजर फिरवली. भीतींना आणि छताला किंचित गुलाबी छटा असलेला पांढरा सनमायका लावलेला होता. मंद दिव्यांच्या प्रकाशात केबिनमधलं वातावरण एखाद्या सिनेमागृहातल्या प्रमाणे वाटत होतं. त्यांची नजर स्क्रीन वर गेली. बाहेर काहीच नव्हतं. दाराची चकचकीत केलेली चौकट तेवढी त्यांना दिसत होती. उजव्या हाताला भिंतीत असलेलं गुलाबी पुश बटण त्यांनी सहज दाबलं. त्यांना ते आधी बेलचं बटण वाटलं होतं. पण उत्तरादाखल फक्त एक खण भिंतीतून बाहेर आला. आतल्या तीन चार लहान लहान परदेशी दारूच्या बाटल्या पाहून ते चकित झाले. म्हणजे कुठेतरी ग्लास नक्कीच असला पाहिजे. पण त्यांनी तो शोधायचा प्रयत्न केला नाही. मग खण जागेवर सरकवीत त्यांनी उजव्या बाजूचं असच बटण दाबलं. त्या बरोबर एक झडप वजा झाकण उघडलं गेलं, त्यात मात्र "रिव्हॉल्व्हर " होतं. त्यांनी ते सहज म्हणून उचलून पाहिलं, ते चांगलंच जड वाटलं. त्यांनी ते जागेवर ठेवलं. झडप बंद झाली. त्यांना एकदम काल पडलेल्या रेडची आठवण झाली. रेडमध्ये नक्की काय झालं त्यांना कळलं नव्हतं. सूर्यनारायण काही बोलला नाही. आपल्याला सांगण्याचं त्याला काहीच कारण नसावं. वर्तमानपत्रात आलं का ते पाहायला हवं..... काकांना हे माहीत नव्हतं, की त्यांची ही जी सगळी शोधाशोध चालू आहे ते छतावर बसवलेल्या कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त होत होतं. त्यामुळे त्यांनी कपाटाचे दोन तीन खणही उघडून पाहिले. त्यात फारसं काही नव्हतं. काही सीडीज होत्या. पण खण बंद करणं आणि उघडण्याच्या प्रयत्नात टेबलाच्या खालच्या बाजूचं बटण दाबलं गेलं आणि त्यांना कळायच्या आतच एक चोरकप्पा उघडला गेला. ते घाबरले. त्यात फक्त रिव्हॉल्व्हर होतं. ते घाबरले. सर्व खण त्यांनी बंद केले. पण या चोरकप्प्याचं बटण न सापडल्याने तो बंद होईना नीट पाहिल्यावर त्यांना टेबलाच्याच रंगाचं बटण दिसलं. तो चोरकप्पा एकदाचा बंद झाला....... तासभर कसा गेला त्यांना कळलं नाही.

ते परत खुर्चीत बसले. कुणाचाच फोन आला नाही. अचानक त्यांना स्क्रीन वर आकृती दिसली. तो सूर्यनारायण होता. त्यांनी बटण दाबून दरवाजा उघडला. ते बाहेर आले. तोपर्यंत तो आत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. किंबहुना ते कधीच नसत. साधारणपणे, आपल्या सहाय्यकाला केव्हा ना केव्हातरी त्याचा बॉस कामाबद्दल सांगतोच. पण छे, इथे तर काहीच मागमूस लागत नसे. त्यांना रेडबद्दलही कळलं नाही. खरंतर त्यांनी खणात पडलेल्या सीडीज पैकी काही चालवून पाहिल्या असत्या तर त्यांना ते कळलं असतं. पण त्यांनी तपासणीत बराच वेळ तसाच घालवला. ते आपल्या खुर्चीत बसले. एकदोन फोन आले, त्यांनी सवयीने मेसेजेस आत कळवले. एक वाजायला आला. ते सहज खुर्चीत रेळले. आणि त्यांची नजर सहजच छताकडे गेली. त्यांना धक्काच बसला. वरचे बरेचसे खण रिकामे होते. म्हणजे पुस्तकांमध्ये माल असतो तर. त्यांना शंका आली.... पण पुस्तकात काय ठेवणार?...... त्यांचं डोकं चालेना. त्यांनी बाहेर जाऊन लंच घेतला. त्यांचं दुपारचं सत्र चालू झालं. आज फारसं काही घडत नव्हतं. संध्याकाळी ते सात वाजता घरी जाण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यावर दोन चार ठिकाणी लहान मुलांचे कपडे विकायला ठेवलेले दिसले. त्यांच्या मनात आलं, श्रेया करता एखादा फ्रॉक घ्यायला काय हरकत आहे? म्हणून त्यांनी पांढऱ्या रंगावर लाल निळे गोळे असलेला फ्रॉक विकत घेतला. निदान या निमित्ताने तरी आपल्याला बरे संबंध निर्माण करता आले तर?..... आपण अधून मधून श्रेयाला काही ना काहीतरी आणलं पाहिजे.
ते घरी पोचले. त्यांना तो फ्रॉक एकदम द्यायला अवघड वाटलं. चहा वगैरे झाला. त्यांना स्वतःहून विषय काढता आला नाही. अचानक त्यांना वर्तमानपत्र पाहण्याची आठवण झाली. त्यांनी ते नीट चाळून पाहिलं. पण त्यात कुठेही बातमी दिसली नाही. मग त्यांच्या लक्षात आलं, फसलेल्या रेडचा वृत्तात छापतीलच कसा? असं वाटून ते स्वस्थ बसले. सध्या नवरात्राचे दिवस होते. पुढच्याच आठवड्यात दसरा होता. वातावरणात बदल झाला होता. त्यांना रोहिणीची आठवण झाली. त्यांचा साखरपुडा दसऱ्यालाच झाला होता. त्या दिवशी सगळेच म्हणजे, रोहिणीची आई, वडील आणि मित्र मैत्रिणी आले होते. रोहिणी नटून थटून आली होती. तिला रीतसर अंगठी, साडी, वगैरे दिलं गेलं. मग कोणीतरी म्हणालं, " अरे या दोघांना बाहेर फिरायला तर पाठवा. हल्ली अशी पद्धतच आहे. " कोणाचीच हरकत नव्हती. दिलेली नवीन साडी नेसून रोहिणी त्यांच्या बरोबर बाहेर पडली. काकांच्या मनात आलं, कुठे जायचं?..... चौपाटी? छे!, ती दूर आहे. त्यांनी जवळच कुठलंसं मंदिर पाहिलं आणि तिला घेऊन ते तिथे गेले. रोहिणी आणि ते एकमेकांकडे चोरून पाहता होते. एकदा तर त्यांची दोघांची नजरानजर झाली, आणि दोघेही पकडले गेल्याने हसले. मग काका तिच्या गळ्यात हात टाकून चालत मंदिराच्या मागच्या बाजूला आले. बसल्यावर, एकमेकांना पाहता पाहता काहीतरी बोलायचं म्हणून काका म्हणाले, " रोहिणी ओठांना एवढी गडद लिपस्टिक लावत जाऊ नकोस, मला आवडत नाही. तुझे ओठ तसेच लाल आहेत. " तिने लाजून फक्त मान डोलवली होती........
ते भानावर आले, स्वतःशीच म्हणाले, " वाटेल त्या वेळी हे कसले विचार? त्यांनी आणलेला फ्रॉक श्रेयाला दसऱ्याच्या दिवशी देण्याचं ठरवलं.
(क्र म शः)

🎭 Series Post

View all