कामथे काका (भाग १८)

शिकलेली माणसं सूर्याला आवडत नसतं.......

शिकलेली माणसं सूर्याला आवडत नसत. त्याच्या मनात येत राहिलं हा काका आला आणि आपल्या टोळीचे ग्रह फिरले. हा माणूस आपल्या लाइनमधला नाही असा इशारा त्याने किशाला कैकदा दिला होता. पण किशाने काकावर विश्वास ठेवला. आज सगळी टोळी या एकाच माणसामुळे बरबाद झाली . हा येण्यापूर्र्वी सगळं कसं ठीक होतं. त्याने एक दोन वेळा किशाला हेही सांगून पाहिलं की पेरियरवर विश्वास ठेव , पण शिकलेल्या माणसावर ठेवू नकोस. पण किशा वेगळा होता. तो माणसाला एकदम टाकून देत नसे. त्याच्यातलं जे उपयोगी आहे ते शोधून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. किशा शिकलेला नसला तरी माणसं सांभाळण्याचं त्याला ज्ञान होतं. त्याला टोळी चालवायची होती..... असो. संध्याकाळ होत आली . काका कंटाळले होते. त्यांच्या मनात आलं ,अजून पोलिस चौकशी पूर्ण का करीत नाहीत . म्हणजे त्यांना नीट सांगता येईल . डोक्यावरचं ओझं तरी उतरेल. एकदाचं प्रकरण कोर्टात गेलं की जामीन वगैरे मिळून तात्पुरती का होईना सुटका होईल. आपण पहिल्यापासूनच या टोळीच्या विरोधात होतो. पण ते पुढे वाहवत का गेले याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नव्हतं. कोणीही हे विचारलंच असतं. त्यांना उत्तर सुचेना. पोलिसांना बहुतेक, चौकशीत जास्त रस नसून सगळ्यांना मारण्यात आहे असं त्यांना वाटू लागलं. ते निराश झाले. आपला मोबाईल पाहणार एवढ्यात त्यांना राजासाबने दबक्या आवाजात सांगितले, " देख काका, पुलिस हमेशा हरामी होती है. कुछ नही बताना,.... वरना ये साले कुत्ते सब कुछ उगल लेंगे और चार्जेस भी लगायेंगे. .....अब तू हमारे साथही रहेगा. पडनेवाला मार सह लेना. अब तू बाकी जिंदगी अंदरही काटेगा.... अदालत किसीकीभी नही सुनती. " पण काकांनी लक्ष दिलं नाही. एक शक्यता मात्र दुणावली की ते साधारण ताण विरहित आयुष्य कधीही जगू शकणार नाहीत. ते निराश झाले. खरंतर कधीही या शब्दाला अर्थ नसतो. कधीही असं काही नसतंच मुळी . कोणतीच गोष्ट जगात कायम नाही, असा विचार करून काकांना निदान मानसीक आंदोलनांतून थोडं सुटल्यासारखं वाटलं. ते आता गुडघ्यात मान घालून बसले. विचार थांबायला तयार नव्हते. ..... सुटून तरी आपण जाणार आहोत कुठे ?.....उद्या हे पेपरात आलं की नीता आपल्याशी कशी वागेल ? फार कशाला घरी एवढ्या उशिरा गेलं की तिच्या तोंडाचा पट्टा आपल्याला सहन करावा लागेल किंवा तिची पूर्वीची दुर्लक्षित वागणूक ती आपल्याला देईल . का , कोण जाणे... . त्यांना नीताची धास्तीच वाटू लागली. आईपेक्षाही जास्त. त्यांची आई फार शिस्तबाज होती. पण ती आई होती. नीता आपल्याला घरात ठेवणार नाही हे नक्की. खरंतर हे प्रश्न त्यांना उगाचच भेडसावीत होते. का ते स्वतःला भेडसावून घेत होते ?म्हणजे तोंडावर एक प्रकारच्या मजबूरीचा भाव येतो . आणि पाहणारा जास्त त्रास देत नाही. अशा वागण्याने आयुष्यातल्या प्रमुख समस्या थोडावेळ तरी दुर्लक्षित करता येतात असा त्यांचा समज असावा. असो. काकांची तरी अशी पद्धत होती. सध्या तरी ते पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित होते. ही एकच जमेची बाजू होती. निदान इथे नीता, रमेश आणि आता साधनासुद्धा त्रास देऊ शकणार नव्हत्या. साधना सुद्धा आपल्याला पक्की धरून नाही. रोहिणीसारखी. उगाचच डोक्यात रोहिणी आली.... ती जगली असती तर बाहेर आल्यावर आपल्याला तिने असं वागून दिलंच नसतं. काकांनी हे सगळं विसरायला काय हरकत होती. कारण अजून तरी ते घरी गेलेले नव्हते. आणि केव्हा जातील याची त्यांना कल्पना नव्हती. ........ वेळ जात राहिला.


बाहेरून साहेब लोकही जेवून आले. पण चौकशी काही होत नव्हती. नेटकेंनी दबक्या आवाजात विचारलं " साहेब यांना आत घेऊ या का ? " डावले कंटाळले होते. नाकाजवळचा कपाळाचा भाग चिमटीत पकडून ते विचार करू लागले. निदान आज रात्री तरी घरी जायला मिळावं. सखारामचं स्टेटमेंट बेंजामिन घेणार आहे म्हणजे निदान त्याला अनुसरून गेलं तर काही रिकाम्या जागा भरता येतील. काका हा खरंच कच्चा दुवा आहे की बाकीच्यांनी त्याला पढवलेला आहे? त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. सगळ्याच लांबण लावणाऱ्या गोष्टी . एखादी केस सुटणं आणि योग्य ते पुरावे समोर येणं , हे निव्वळ नशीब आहे. नाहीतर आपण लाल तात्याच्या केसमध्ये एवढे कष्ट घेऊनही क्रेडिट सुकाळेच घेऊन गेला. त्याचं नशीब चांगलं. श्रीकांतसर असते तर त्यांनी प्रश्न कुंडली मांडून योग्य उत्तर दिलं असतं. .... हळूहळू ते वास्तवात आले. समोर बसलेल्या नेटकेंना ते म्हणाले, " साडेनऊ दहा वाजेपर्यंत घेऊ सगळ्यांना आत " मग ते केस फाइल पाहू लागले. फाइलमधली माहिती आणि सद्यपरिस्थिती यांची ते सांगड घालू लागले. अचानक त्यांना प्रसंगांची मालिका जाणवू लागली. मुख्य म्हणजे ताराबाई सरडेंचं नाहीसं होणं, त्यांचा फ्लॅट बरोबर बँकेच्यावर असणं, त्यात त्यांचं मृत शरीर सापडणं, आणि फाइलमध्ये वर्णन केलेले मागचे प्रसंग यांत त्यांना थोडंसं सूत्र दिसू लागलं. पण फार विचार केल्यावर एखाद्या भिंतीवरून ते परत यावेत असं वाटू लागलं. आरोपींना आत घेऊनच विचारावं लागेल. त्यातल्या प्रत्येकालाच माहीत असणार. आपण कोअर माणसं पकडलेली आहेत यांना पिळल्याशिवाय काही उपयोग नाही. त्यामुळे रिकाम्या जागा भरून निघतील...... आरोपींना सडवणं ही त्यांची पद्धत होती. पण वरिष्ठांचा दबाव असेल तर काळाच्या मर्यादा पडतात आणि घाईघाईत सगळं उरकावं लागतं. मग नशीब आपला भाग दाखवू लागतं. त्यांना सगळे विचार सहन होईनात. उद्या पेपरासाठी वृत्तांत बनवून पाठवणं आवश्यक होतं. त्यांनी नेटकेंना मुद्दे सांगायला सुरुवात केली.

अर्ध्या तासात त्यांचं लिखाण तयार होत आलं. ते जरा थांबले. अचानक त्यांना या केसचा कंटाळा येऊ लागला. कदाचित अतिश्रमांमुळे असेल असा विचार करून त्यांनी कपाळावर बोटं टेकवली. आज तरी घरी जायला मिळणार का ? निदान आजची रात्र तरी घरी झोपायला मिळावं. पण अजून सखारामचं स्टेटमेंट येणार होतं. बेंजामिन ते काम करणार होता. म्हणजे एकूण प्रसंगांवर वेगळा प्रकाश पडेल. का कोण जाणे ते एकदम म्हणाले, "चला नेटके घ्या सगळ्यांना आत " ...... नेटके उठणार तेवढ्यात फोन वाजला. तो डावलेंनी घेतला. त्यांना डीसीपींचा फोन वाटला. पण लाइनवर खबरी होता. दमलेल्या आवाजात ते म्हणाले, " बोलो. .... " साबजी , एक जबरदस्त खबर है . किशाकी टोली बच्चोंकी खोपडी बेचनेवाली है. आज रात तीन बजे , जुहू बीचपर , जॉनी बीच हटके सामने डिलिव्हरी होगी . डिलिव्हरी कौन करनेवाला है और कौन लेनेवाला है , वो थोडी देरमे बता दूंगा. " फोन बंद झाला. डावले सावध झाले. पण त्यांनी मुलांच्या खोपड्या कुठे आहेत त्याचा विचार केला नाही . ते ऑफिसला गेले असते तर त्यांना त्या मिळाल्या असत्याच. पण इतर बरीच कामं असल्याने त्यांना ते सुचलेच नाही. त्यांचा थकवा त्यांनी बाजूला सारला. आणि उठणाऱ्या नेटकेंना म्हणाले, " चला पथक घेऊन रात्री जुहू बीचची सफर करावी लागेल. कधी गेला होतात का बायकोला घेऊन , निदान दिवसातरी. त्यावर उत्तर नेटकेंनी उत्तर दिल नाही. तेवढ्यात बेंजामिन सखारामचं स्टेटमेंट घेऊन आला. डावले म्हणाले, " आता चार्जरूममध्ये रंग भरेल. बघू हा काका अगदी साळसूदपणाचा आव आणतोय , तो काय सांगतोय ते. जरा बसा. आपल्याला आता वृत्तांत बदलावा लागेल का ते पाहावं लागेल. मग ते दोघे परत बसले. आणि सखारामच स्टेटमेंट आणि इतर प्रसंग यांची ते सांगड घालू लागले. काका पाहत होते. पण त्यांना त्या दोघांचं बोलणं ऐकू आलं नाही.पण काहीतरी शिजतंय, हे त्यांना समजलं. म्हणजे कदाचित आज चौकशी पुरी होईल. लवकरच जेवण आलं. पुन्हा दुपारचंच कदान्न फक्त वासात फरक. म्हणजे वास आणखी वाईट होता. तरीही काका आणि इतर चौघे जेवले. सूर्याने जेवण आणणाऱ्यालाच शिव्या घातल्या. सूर्या बांधलेल्या अवस्थेत असल्याने जेवलाच नाही. अर्ध्या तासात बाकीच्यांचं जेवण झालं. मग दहा वाजता नेटके डावले देखणे आणि इतर दोन पो. कॉन्स्टेबल्स कोठडीत आले.

दहा वाजत होते. आल्या आल्या सगळ्यांना लाथेने उडवीत उठायला सांगितले. डावले भडकून म्हणाले, " उठा रे ए कुत्र्यांनो. चला , तुम्हाला मेजवानी देतो. " असं म्हंटल्याबरोबर सगळे उभे राहिले. सूर्याला नेटकेंनी सोडला. त्याबरोबर सूर्याने त्यांच्या एक थोबाडीत लगावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सूर्याचा दुखरा हात पिरगाळला. तो गुरासारखा ओरडत राहिला. त्याची कॉलर पकडीत ते म्हणाले, " याला जरा जास्तच पक्वान्न खायला घालू या. " ..... मग सगळ्यांचीच एका गॅरेजवजा अंधाऱ्या रुममध्ये रवानगी झाली. रूम नक्की किती मोठी होती. कळत नव्हतं . मध्ये मध्ये एक दोन ठिकाणी दोरखंड आणि साखळदंड लोंबत होते. ते पाहून काकांना थरथर सुटली. असल्या गोष्टी काकांनी केवळ सिनेमात पाहिलेल्या होत्या. प्रत्यक्षात इथे यावं लागेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आत आल्या आल्या एकेकाला दोरखंडाने बांधीत वेगवेगळ्या प्रकारे दम आणि शिव्या द्यायला सुरुवात झाली. जवळ जवळ तासभर सगळ्यांनाच यथेच्छ तुडवल्यावर ते थांबले.काही अर्धवट माहिती मिळाली. त्यातून काकाही सुटले नाहीत. आणि प्रत्येकाने वेगवेगळी माहिती दिली. सूर्या सोल्याची शिक्षा पचवलेला माणूस असल्याने त्याने काहीच माहिती दिली नाही. त्याचा दुखरा हात दाबूनही त्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही. उलट तो म्हणाला, " देखो साब, आप हमारी जान लेगा तो भी कुछ भी नही बताउंगा" तो त्याच्या उक्तीला जागत होता. तो लवकर मोडणाऱ्यांपैकी नव्हता. मग दुसरी काहीतरी शक्कल लढवून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याचं डावलेंनी ठरवलं. त्याची एखादी कमजोरी शोधणं आवश्यक होतं. तो अनुभवी गुन्हेगार होता. त्याची फाइल पाहावी लागणार होती. दुसरे अर्धवट का होईना माहिती देत होते. ........काकांना बाजूला काढून त्यांना मग डावले आणखी एका लहानशा रूममध्ये घेऊन गेले. तिथे फक्त एक टेबल आणि एक खुर्ची होती. डावले थोड्या नरम आवाजात म्हणाले, " हे बघ तू सगळं सांगायला तयार आहेस ना ? " काकांनी मान डोलवली.... " मग तू सांग सगळं .फक्त एकच. आम्ही आता तुला मारणार नाही पण या टेबलावर मारू आणि तू जोराने ओरड. म्हणजे बाकीच्यांना आम्ही तुला मारतो आहोत असं वाटेल. " त्यांनी एका कॉन्स्टेबलला पॅड आणि पेन घेऊन बोलावले. काका बोलत होते. अधून मधून मार खाल्ल्यावर ओरडतात तसे ओरडत होते. पण काका बोलत राहिले. लहान शिरं नक्की कुठे ठेवली होती काकांना माहीत नव्हते. त्या तिघांना काकांची स्टोरी ऐकून आश्चर्य वाटलं. हा बोलतोय हे खरं कशावरून ? काकांनी सांगण्याचे काहीही शिल्लक ठेवले नाही.अगदी अथ पासून इति पर्यंत सगळं सांगितलं. त्यातून त्यांना जास्त तपशील मिळाला. एक म्हणजे , अजून पेश्तू, दिवाणजी , मिस्चिफ, साधनाच्या घरी आलेला माणूस , (काण्या, काकांना तो कोण आणि त्याचं नाव माहीत नव्हतं) बूढा चाचा ,डॉक्टर आणि सोल्या बाहेर असल्याचं कळलं. त्यांना फोटो दाखवण्याचं ठरलं. पण दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने कोर्टात हजर करायचं होतं. म्हणून मग डावले नेटके, देखणे आणि इतर दोघे कॉन्स्टेबल्स बाहेर आले. तेव्हा बारा वाजत होते. मात्र काकांना दम दिला गेला. जर हे खरं नाही निघालं तर मात्र तुमची खैर नाही. आता त्यांनी इतरांना एकेकटे दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरवलं. तरीही सगळ्यांना एकत्रच बंद केलं. सूर्याला आता मोकळा सोडला होता. त्याची बडबड चालूच होती. पण अंगात ताकत नसल्याने काका वाचले होते. पण किती दिवस वाचणार ? अजूनही माफीचा साक्षीदार म्हणून ते घोषित झालेले नव्हते. काकांनी सांगताना त्यांची झालेली चौकशी आणि शिक्षा याबद्दलही सांगितले. अचानक त्यांना आपल्या मोबाइलची आठवण झाली. अंगात त्राण नसतानाही त्यांनी सरकत जाऊन हळूच मोबाइल बाहेर काढला. चालू झाल्या झाल्या मोबाइलवर संजीव दिनानाथ जांभळे याचे मेसेज दिसले. . ते घाबरले. त्याच्या बद्दल आणि भारताबाहेर जाण्याच्या योजनेबद्दल त्यांनी काहीच सांगितले नव्हते. तसेच साधना आणि नीताचे मेसेजही आल्याचे दिसले. त्यांनी परत बंद करून मोबाइल जागेवर लपवला.

डावलेंनी विचार करून काकांनी सांगितलेल्या माहितीचा वापर करून तपास करण्याचं ठरवलं. पण सध्या काहीही न बोलण्याचं व अहवालात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची नोंद केली नाही. परंतू एका गोपनीय अहवालातून त्यासंबंधी वरिष्ठांना कळावं म्हणून मात्र उल्लेख केला. . काका पूर्ण नावाने प्रसिद्ध नव्हते. म्हणूनच काकाजी असं नाव लिहिलं नाही. उगाचच अजून बाहेर असणाऱ्यांना कशाला कल्पना द्या. अहवाल पाठवला गेला. अहवाल थोडा अर्धवट असला तरी हरकत नाही असं डावलेंना वाटलं. आणि शेवटी नक्की काय काय वृत्तांत पाठवायचा हे वरिष्ठच ठरवणार. असो. अजून पहाटे तीन वाजता जायचंच आहे. म्हणून त्यांनी काकांनी दिलेली माहिती परत परत वाचून पाहिली. सोमवारी आरोपींना कोर्टासमोर पेश करून रिमांड घेण्याचं महत्त्वाचं कामही होतच. पुन्हा एकदा डावले साहेबांचं स्क्वाड जुहू बीचला जायला तयार झालं. म्हणजे आजची झोपही गेली , असं त्यांच्या मनात आलं. तसं सध्या काहीही करण्यासारखं नव्हतं म्हणून डावले साहेब खुर्चीत थोडे रेळले. त्यांना डुलकी येऊ लागली. आत्ता फक्त बारा वाजत होते. अजून दोन तास तरी काढायचे होते.थोडं तरी आधी जायला पाहिजेच. म्हणजे कारवाई कशी करायची ते ठरवता येईल. आता डिलिव्हरी द्यायला कोण येणार आहे ते तरी कळेल. बाहेर असलेल्यांपैकीच कोणीतरी येईल काकांना किक्ला कोण ते माहीत नव्हतं. त्यामुळे डावलेंना फक्त डॉक्टर , पेश्तू , काण्या, दिवाणजी ,मिस्चिफ आणि सोल्या हेच माहीत होते. . अर्थातच त्यांना पाहिलेले नव्हते. मग त्यांच्या मनात आले , काकाला बरोबर घेऊन जाण्यात सध्या तरी काही अर्थ नाही. ..........

इकडे किक्ला आणि काण्या सूर्याच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते. ते पोहोचले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. ऑफिसबाहेर उभ्या असलेल्या हवालदारांना पाहून आत जाण्याची काहीतरी युक्ती शोधण्याचा प्रयत्न चालू होता. किक्ला तर काण्याने त्याला थांबवलं होतं म्हणून उभा होता. त्याचा हिशोब एकच होता. एवढं हवालदारांना काय घाबरायचं , सरळ जाऊन त्यांना पकडून आत नेऊन ठेवायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. शेवटी काहीच न सुचल्याने काण्या फारसं कोणालाही दिसणार नाही अशा रितीने मुख्य दरवाज्याजवळ पोहोचला. त्याची उंची पण फार कमी होती . मागे त्याला कव्हर करण्यासाठी किक्ला होताच. काण्याने मांजराच्या पावलाने मागून जाऊन ज्या हवालदाराची पाठ त्याच्याकडे होती त्याच्या पाठीशी पिस्तूल लावून त्याला दम दिला. " ए, हालचाल करू नकोस फुकट मरशील. सांगतोय तसं वागलास , तर जिवंत ठेवीन. " दुसऱ्या हवालदाराने पटकन जवळची रायफल उचलण्याचा निष्फळ प्रयत्न केला .

  त्यासरशी किक्लाने पुढे होऊन त्याचा हात पिरगाळला. दोघांच्या हातातल्या रायफली खेचून घेत तिथे दरवाज्याजवळ ठेवून त्यांना सील तोडायला भाग पाडलं आणि ते चौघे आत घुसले. आत फोन वाजत होता. प्रथम त्या दोघा हवालदारांना बाधणं जरूर होतं. थोड्याफार प्रयत्नाने त्यांना एक प्लास्टिक वायरचे मोठे सापडले. दोघांना केबिन मधल्या दोन खुर्च्यांना बांधून त्यांनी एकूण वातावरणाचा अंदाज घेतला. सगळं सामान इतस्ततः पसरलेले होते. आतला फोन न उचलल्याने बंद पडला. मग काण्याने कॉलर आय डी पाहून आलेला नंबर पुन्हा फिरवला. त्या सरशी पलीकडून दिवाणजीचा चिडलेला आवाज आला. " अरे दादा, तुम हो किधर यार ? कभी काम करेगा? " काण्याला कोण बोलतंय आणि त्याचं काय काम आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे किक्लाने फोन घेऊन दिवाणजीला विचारले. सगळं समजल्यावर अजून बरेच पैसे येणं आहे हे त्याला कळलं. तेव्हा तो म्हणाला, " हम आपको दस मिनीटमे फोन करते है. " पण दिवाणजींचा विश्वास नव्हता. तरीही ते ठीक आहे म्हणाले, आणि फोन बंद झाला. झालं आता लहान मुलांची शिरं कुठे शोधायची ? त्यांना कळेना. पण त्यांचं नशीब जोरावर होतं . त्यांनीही मग सामानाची फेकाफेक करून पाहायला सुरुवात केली. शेवटी निराश होऊन ते बसले. अचानक किक्लाला ड्रिंक घ्यावं आणि थकवा घालवावासा वाटला. तसंही शिरं सापडली नसली तरी पैसेही सापडले नाहीत. किक्लाने मग रागाने फ्रीज उघडला. व्हिस्कीच्या बाटलीला हात घालणार तेवढ्यात एक निळ्या पिशवीतले अतिजड पार्सल त्याच्या पायावर पडले. त्याने शिवी देऊन ते लाथेने उडवायचा प्रयत्न केला.

ते फक्त थोडं सरकलं. त्याने बाटली तशीच तोंडाला लावीत काण्याला खूण करून पार्सल उघडून पाहण्यास सांगितले. काण्याने कसंतरी वरची गाठ सोडवली. पण दुसरी मारलेली गाठ सुटेना. त्याने मग नखाने पिशवी फाडली आत घट्ट बर्फ जमला होता. एवढा मोठा बर्फ दारू साठी किशा जमवून ठेवतो असे पाहून त्याला हसू आलं. तशी किक्ला ओरडला, "अबे सुवर , हसता क्या है, खोल जलदी." पण घट्ट बर्फ फोडणं खायचं काम नव्हतं. काण्याने आजूबाजूला पाहिलं. लाकडाच्या फळ्यांशिवाय तिथे काहीही नव्हतं. त्यातलीच एक फळी घेऊन त्याने ती तोडली. त्यातून निघालेल्या अणकुचीदार तुकड्याने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. फोडायला जवळ जवळ अर्धा तास गेला मग अचानक खोलीतल्या उष्णतेमुळं आणि प्रयत्नांमुळे म्हणा त्या, बर्फाच्या कवचाला तडा गेला आणि त्यातून ओघळत एका मुलाचं शीर काण्याच्या पायाकडे आलं. त्याचे डोळे पूर्णपणे उघडे आणि थिजलेले होते. ते पाहून काण्याला भीती वाटली. किक्लाची थोडी उतरली. पण अजून त्याला आलेला फोन आणि मुलांची शिर यांचा संबंध समजेना. आपण कुठे फसलो असच वाटत राहिलं. पैसा आणि पंधरा नंबर लॉकरमधला माल त्याला मिळत नव्हता. तो अपसेट झाला. त्या शांततेत फोनची बेल परत सैरटा सारखी वाजली. किक्लाने फोन घेतला. दिवाणजी म्हणाले, " अरे कब भेजेंगे खोपडिया ? किसीभी हालतमे आज रात तीन बजे लेकर आ जाओ. हम जुहू बीचपर आने वाले है. तुम जॉनी बीच हटके बाजूमे खडे रहना. " फोन बंद झाला. आता उरलेली शिरं बाहेर येऊ लागली. किक्लाच्या मनात आलं साला ये बंबईमे कुछ भी बेचा जाता है. पैसे मिळण्याची शक्यता किक्लाला जरा समाधान देऊन गेली. त्याने परत एकदा दिवाणजींना फोन केला. पण त्यांनी तो घेतला नाही. आता त्यांना माल हवा होता. किक्लाचा फोन आला तेव्हा ते त्यांच्या सहकाऱ्यासहित लाँचची पाहणी करीत होते. आता फक्त दोन तीन घंटेच राहिले होते. अचानक केबिनच्या दरवाज्याशी हालचाल दिसल्याने किक्लाने आपलं पिस्तूल दरवाज्याकडे वळवलं . बाहेरून दरवाज्या उघडला जाऊ लागला. आत येत मिस्चिफ हातातलं पिस्तूल रोखून उभा राहिला. त्याला पाहून किक्ला म्हणाला, " क्यूं बे तू कौन है ? " काण्या त्याला ओळखत असल्याने किक्लाला त्याने दादाचा शूटर असल्याचे सांगितले. मग किक्ला म्हणाला, " देख अब ये टोली मै चला राहा हूं. अगर मेरा साथ देगा तो तुझे मालामाल कर देगा. मेरेको फालतूका खून खराबा पसंद नही .जलदी बोल वरना मरनेके लिये तयार हो जा. " मिस्चिफने काही वेळच विचार केला. मग पुढे होऊन त्याने आपलं पिस्तूल डाव्या हातात घेऊन उजवा हात मिळवण्यासाठी पुढे केला. किक्लालाही आत्ता कोणताही पंगा नको होतात्यासरशी किक्लाने पुढे होऊन त्याचा हात पिरगाळला. दोघांच्या हातातल्या रायफली खेचून घेत तिथे दरवाज्याजवळ ठेवून त्यांना सील तोडायला भाग पाडलं आणि ते चौघे आत घुसले. आत फोन वाजत होता. प्रथम त्या दोघा हवालदारांना बाधणं जरूर होतं. थोड्याफार प्रयत्नाने त्यांना एक प्लास्टिक वायरचे मोठे सापडले. दोघांना केबिन मधल्या दोन खुर्च्यांना बांधून त्यांनी एकूण वातावरणाचा अंदाज घेतला. सगळं सामान इतस्ततः पसरलेले होते. आतला फोन न उचलल्याने बंद पडला. मग काण्याने कॉलर आय डी पाहून आलेला नंबर पुन्हा फिरवला. त्या सरशी पलीकडून दिवाणजीचा चिडलेला आवाज आला. " अरे दादा, तुम हो किधर यार ? कभी काम करेगा? " काण्याला कोण बोलतंय आणि त्याचं काय काम आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे किक्लाने फोन घेऊन दिवाणजीला विचारले. सगळं समजल्यावर अजून बरेच पैसे येणं आहे हे त्याला कळलं. तेव्हा तो म्हणाला, " हम आपको दस मिनीटमे फोन करते है. " पण दिवाणजींचा विश्वास नव्हता. तरीही ते ठीक आहे म्हणाले, आणि फोन बंद झाला. झालं आता लहान मुलांची शिरं कुठे शोधायची ? त्यांना कळेना. पण त्यांचं नशीब जोरावर होतं . त्यांनीही मग सामानाची फेकाफेक करून पाहायला सुरुवात केली. शेवटी निराश होऊन ते बसले. अचानक किक्लाला ड्रिंक घ्यावं आणि थकवा घालवावासा वाटला. तसंही शिरं सापडली नसली तरी पैसेही सापडले नाहीत. किक्लाने मग रागाने फ्रीज उघडला. व्हिस्कीच्या बाटलीला हात घालणार तेवढ्यात एक निळ्या पिशवीतले अतिजड पार्सल त्याच्या पायावर पडले. त्याने शिवी देऊन ते लाथेने उडवायचा प्रयत्न केला.
ते फक्त थोडं सरकलं. त्याने बाटली तशीच तोंडाला लावीत काण्याला खूण करून पार्सल उघडून पाहण्यास सांगितले. काण्याने कसंतरी वरची गाठ सोडवली. पण दुसरी मारलेली गाठ सुटेना. त्याने मग नखाने पिशवी फाडली आत घट्ट बर्फ जमला होता. एवढा मोठा बर्फ दारू साठी किशा जमवून ठेवतो असे पाहून त्याला हसू आलं. तशी किक्ला ओरडला, "अबे सुवर , हसता क्या है, खोल जलदी." पण घट्ट बर्फ फोडणं खायचं काम नव्हतं. काण्याने आजूबाजूला पाहिलं. लाकडाच्या फळ्यांशिवाय तिथे काहीही नव्हतं. त्यातलीच एक फळी घेऊन त्याने ती तोडली. त्यातून निघालेल्या अणकुचीदार तुकड्याने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. फोडायला जवळ जवळ अर्धा तास गेला मग अचानक खोलीतल्या उष्णतेमुळं आणि प्रयत्नांमुळे म्हणा त्या, बर्फाच्या कवचाला तडा गेला आणि त्यातून ओघळत एका मुलाचं शीर काण्याच्या पायाकडे आलं. त्याचे डोळे पूर्णपणे उघडे आणि थिजलेले होते. ते पाहून काण्याला भीती वाटली. किक्लाची थोडी उतरली. पण अजून त्याला आलेला फोन आणि मुलांची शिर यांचा संबंध समजेना. आपण कुठे फसलो असच वाटत राहिलं. पैसा आणि पंधरा नंबर लॉकरमधला माल त्याला मिळत नव्हता. तो अपसेट झाला. त्या शांततेत फोनची बेल परत सैरटा सारखी वाजली. किक्लाने फोन घेतला. दिवाणजी म्हणाले, " अरे कब भेजेंगे खोपडिया ? किसीभी हालतमे आज रात तीन बजे लेकर आ जाओ. हम जुहू बीचपर आने वाले है. तुम जॉनी बीच हटके बाजूमे खडे रहना. " फोन बंद झाला. आता उरलेली शिरं बाहेर येऊ लागली. किक्लाच्या मनात आलं साला ये बंबईमे कुछ भी बेचा जाता है. पैसे मिळण्याची शक्यता किक्लाला जरा समाधान देऊन गेली. त्याने परत एकदा दिवाणजींना फोन केला. पण त्यांनी तो घेतला नाही. आता त्यांना माल हवा होता. किक्लाचा फोन आला तेव्हा ते त्यांच्या सहकाऱ्यासहित लाँचची पाहणी करीत होते. आता फक्त दोन तीन घंटेच राहिले होते. अचानक केबिनच्या दरवाज्याशी हालचाल दिसल्याने किक्लाने आपलं पिस्तूल दरवाज्याकडे वळवलं . बाहेरून दरवाज्या उघडला जाऊ लागला. आत येत मिस्चिफ हातातलं पिस्तूल रोखून उभा राहिला. त्याला पाहून किक्ला म्हणाला, " क्यूं बे तू कौन है ? " काण्या त्याला ओळखत असल्याने किक्लाला त्याने दादाचा शूटर असल्याचे सांगितले. मग किक्ला म्हणाला, " देख अब ये टोली मै चला राहा हूं. अगर मेरा साथ देगा तो तुझे मालामाल कर देगा. मेरेको फालतूका खून खराबा पसंद नही .जलदी बोल वरना मरनेके लिये तयार हो जा. " मिस्चिफने काही वेळच विचार केला. मग पुढे होऊन त्याने आपलं पिस्तूल डाव्या हातात घेऊन उजवा हात मिळवण्यासाठी पुढे केला. किक्लालाही आत्ता कोणताही पंगा नको होता.. तो, पैसे आणि किशाने मिळवलेल्या कागदपत्रांच्या मागे होता. समोरच पडलेली मुलांची शिरं पाहून मिस्चिफला हा व्यवहार आठवला. किक्लाने ते ताडलं असावं. त्याने त्याला खुणेनेच विचारले , ये क्या है ?. मग मिस्चिफने पैशाची खोटा हिशेब पेश केला. एकूण तीन कोटीचा व्यवहार ठरला होता. दादाला दीड कोट घ्यायचा होता. किक्लालाही तो खोटं बोलत असल्याचं जाणवत होतं. पण तो काही बोलला नाही. सध्या त्याने त्याच्या कलाने घेण्याचे ठरवले. परत एकदा दिवाणजींना फोन लावला. त्यांनी किक्लाचे बोलणे ऐकून घेतलेच नाही. माल वेळेवर न मिळाल्याने ते खफा होते. आता वेळ घालवणं त्यांना परवडणारं नव्हतं. निदान एखाद
तास आधी तरी त्यांना सांगितलेल्या जागेवर जाणं भाग होतं. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते आवश्यक होतं. किक्ला ने मग मिस्चिफ आणि काण्याला गुड्डीला बोलावून घेण्यास सांगितलं. गुड्डीला फोन केला. तो मस्त झोपेत होता. मध्येच आलेल्या फोनला असंख्य शिव्या घालीत त्याने फोन उचलला. त्याला अजूनही किशाचं काय झालंय हे माहीत नव्हतं. फोन किशाचा पाहून तो म्हणाला, " हुकूम करो, दादा. "
मात्र आवाज किक्लाचा होता. " ए, जनाने ऑफिस आ जा. फोरन. " गुड्डी किक्लाला ओळखत नसल्याने म्हणाला, " फोन रख दे कुत्ते. " असं बोलून गुड्डीनेच फोन ठेवला. त्यांना ड्रायव्हिंग कोण करणार असा प्रश्न होता. तसं ड्रायव्हिंग सगळ्यांना येत होतं. पण फालतू जबाबदारी कोण घेणार ? प्रत्येकाला महत्त्वाचा रोल हवा होता. किक्ला गुड्डीला ओळखत होता. परत परत फोन केला तरी तो फोन उचलेना. मग मात्र किक्ला मिस्चिफला म्हणाला, " तु गाडी चलाएगा . देख पहले होटल डिलाइट चलते है. वहां से गुड्डीको लेते है . फिर कान्या और ये गुड्डी जगाका मुआयना करेंगे. जैसे अपने को खबर है वैसी पुलिसको भी जानकारी हो सकती है. हमे कही भी फसना अब खतरेसे खाली नही होगा. " किक्लाचा अंदाज बरोबर होता. जो दुसऱ्याला आधी बघेल तो यशस्वी होणार याची किक्लाला कल्पना होती.

एक वाजायच्या आसपास ते तिघे निघाले. नखरे करणाऱ्या गुड्डीला मिस्चिफ आणि काण्याने बरोबर घेतले. त्याने किक्लाला पाहिलं आणि आपलं काही खरं नाही असं त्याला जाणवलं. गाडी चालवणं तसं त्याला बोअरिंग होत असे. आता फक्त या किक्लाला गुल्टी देऊन कसं सटकायचं ते तो मनात ठरवू लागला. आणि या कामात उरलेल्या दोघांची मदत होणार नाही याची त्याला खात्री होती. काहीतरी मोठं नुकसान झालेलं असावं असा गुड्डीला आता संशय येऊ लागला. दादा कुठेच दिसत नव्हता.... आणि सूर्याही. त्याचा संशय बरोबर होता. पण त्याला सांगणार कोण ? आता ते जुहूच्या रस्त्याला लागले. तशी किक्ला म्हणाला, " जरा धीरे चलना और सतर्क रहना कही पुलिसकी गाडी दिख रही है क्या देख . " त्यांचा होरा बरोबर होता. पण अजून पोलिस गाडी दिसत नव्हती. साल्यांनी दूर कुठेतरी पार्क केली असणार हे किक्लाच्या लक्षात आलं. गाडीत ठेवलेली पाच मुलांची बर्फातली मुंडकी बर्फाच्या विरधळलेल्या पाण्यात डुंबत होती. गाडीतल्या सिटांच्या पायाशी पाण्याचं तळं जमू लागलं होतं. गुड्डीला अजून गाडीत काय आहे याची कल्पना नव्हती आणि कशासाठी ते जातायत ते त्याला जाणून घ्यायची इच्छा पण नव्हती. नवीन आलेल्या फातिमा नावाच्या डान्सरबरोबर त्याचा रोमान्स चालू होता. त्यातून त्याला जबरदस्तीने उठवून इथे आणलेलं होतं. आता समुद्राचा थंड गार वारा आणि तुरळक पावसाच्या सरी यांमुळे वातावरण थंड आणि मादक झालेलं होतं. आकाशात चंद्र दिसत नव्हता. कदाचित तो ढगांनी झाकला गेला असेल. असो . डावले , नेटके, देखणे , आणि इतर शस्त्रधारी पोलिस किनाऱ्यावरच्या अंधारातून एकेक करीत वाट कापीत होते. लांबून डावलेंना एकमेव बीच हट दिसली. म्हणजे जमिनीवरचा एकत्र झालेला अंधाराचा पुंजका . ती अजून तरी बरीच लांब होती. मग त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांच्यात दोन वेगवेगळे तट पडले. एक तट सरळ बीच हटकडे सरकत होता. दुसरा पलीकडच्या बाजूला जाऊन त्यांना कव्हर करणार होता. त्यांना अगदी लांबून एक कार बीच वर वळलेली दिसली. त्यांनी नेटकेंना दाखवलं. देखणे ज्या गटाबरोबर विरुद्ध दिशेला गेले होते, त्यांना फोन करून कळवलं आणि सावध राहण्यास सांगितलं. किनाऱ्यावरची नारळाची झाडं वाऱ्याबरोबर चांगलीच मस्ती करीत होती. पाऊसही सगळ्यांचीच परीक्षा पाहत होता. वळलेली कार तिथेच थांबली. डावलेंचा गट आता बीचहट जवळ पोहोचला. तशी दहा पंधरा फुटाचं अंतर ठेवून ते चौघे पाच जण नारळांच्या दाट वाढलेल्या झाडांमागे मोर्चे बांधून बसले. ते आणि दुसऱ्या गटाचे सर्वच बीच हटवर नेम धरून बसले. फक्त दुसऱ्या गटाच्या लोकांना लपायला जागा नव्हती. त्यांनी तिथेच असलेल्या एका खडकाच्या आधाराने दबा धरला. दूरवरून किक्ला मिस्चिफ आणि काण्या खाली उतरले. किक्लाने आपली सावध नजर सबंध बीचभर फिरवली. तो पोलिसांचा वास घेत होता. काण्याला त्याने मुंडक्यांचं पार्सल घेण्यास सांगितलं. मग किक्ला पुढे, मध्ये काण्या आणि शेवटी मिस्चिफ अशी रचना करून ते निघाले . संरक्षणासाठी काण्याकडे फक्त धारदार लांबलचक सुरा होता. ते तिघे पावसात भिजत सावकाश चालत निघाले. ते एक दोन पावलं पुढे गेल्यावर किक्लाने गुड्डी जवळ जाऊन त्याला धमकावले, " देख , भागनेका नाटक करेगा ना , तो खडे खडे चीरके तेरे डान्सरके पास भेजूंगा. हम तुम्हे काम पटनेके बाद सिग्नल देंगे समझे ? तबतक सामनेवाले नारियलके पेडके नीचे गाडी खडी रखना. " मग ते निघाले.


अधून मधून ते तिघे दोन्ही पोलिस पार्टीला दिसत होते. चालता चालता ते तिघे समुद्राकडे बघत होते. पण अजून सिग्नल दिसत नव्हता. आत्ता कुठे सव्वा दोन वाजत होते. अजून तीन वाजेपर्यंत वेळ काढणं भाग होतं. बीच हटजवळ न जाण्याचे किक्लाच्या मनात आलं. तिथेच जवळपास पोलिस दबा धरून बसले असण्याची शक्यता होती त्याने मिस्चिफला आहे तिथेच थाबायला सांगितलं. "हम और थोडे आगे जानेके बाद तुम्हे आना है. अब तुम पीछे जाकर दूसरे बाजूसे आगे आना. ताकी पुलिस चकमा खाएगी. " मिस्चिफने तसे केले. लांबून या तिघांना पाहणारे आश्चर्यचकित झाले. काही चाल तर नाही, म्हणून ते स्थिर नजरेने पाहत राहिले. सगळ्यांचंच लक्ष त्याच्यावर केंद्रित झाल्याने समुद्रावर दूरवर असलेल्या लाँचचा कमी जास्ती होणारा लाइट त्यांच्या नजरेतून सुटला. किक्लाचा फोन वाजला . अतिशय बारीक आवाजात असलेल्या रिंगटोन मुळे तो वाजल्याचं त्यालाच कळायचं. तो दिवाणजींचा फोन होता. " माल तय्यार है ? " त्याने होकार दिला. "तो लाइट जलाके इशारा क्यूं नही करते.? पुलिस है क्या ? " ...... किक्लाने कंटाळून उत्तर दिले, " तुम मालसे मतलब रखो. तुम हटके बाजूमे किसीकोभी मत भेजना. हम किनारेपे खडे है. तुम सौ गज दूरीपर आनेके बाद तुम्हे मोबाइलका फोकस लाइट दिखेगा. फिर लाइट मत जलाना हम मालका पार्सल फेकेंगे तुम पैसेकी बैग फेकना. ज्यादा होशियारी करनेकी जरुरत नही है. फोकटमे मर जायेगा. "
लाँचचा आवाज येतो हे किक्लाला माहीत होतं. पण दुसरा कोणताही मार्ग नव्हता. पोलिसांकडून गोळीबार होणार हे त्याला माहीत होतं. त्यांच्या गोळीबाराला आपल्यापैकी कोणी बळी पडू नये आणि बीचहटमध्ये घेरले जाऊ नये म्हणूनच त्याने बीचहटजवळ जाण्याचे टाळले. मेली तर दिवाणजींची माणसं मरतील. त्याने हळूच मागे पाहिले. मिस्चिफचं हालणारं डोकं तेवढं त्याला दिसलं. शंभर एक फुटांवर वाळूचा लहानसा डोंगर उभा केला होता. त्याच्या आडून मिस्चिफ कव्हर करून बसला होता. पावसाला आता जोर चढला होता. पावसाचा आणि वाऱ्याचा फायदा नक्की कोणाला होणार होता कोण जाणे. बीचवर असलेले सगळेच पावसाच्या माऱ्याला कंटाळले होते.

डावलेंनी त्यांच्या दुसऱ्या गटाला फोन करून लाँचवर लक्ष ठेवण्यास आणि जवळ आल्यावर फायर करण्यास सांगितले होते. कारण लाँचमधले लोक पार्सल घेऊन ताबडतोब निघून जातील. मग त्यांनी किक्ला आणि काण्या यांच्यावर लक्ष केंदित केले. या भडव्यांची काळजी आपण घेऊ. तसंच नेटकेंना लाँचवर लक्ष ठेवून दुसऱ्या गटाला फायरचा हुकूम देण्याचं सांगितलं होतं. हा हरामखोर
पाऊस थांबत का नाही , त्यांच्या मनात आलं. सगळी कडे लक्ष ठेवून कारवाई करणं तितकसं सोपं नव्हतं. आता दूरवर त्यांना लाँच दिसली. अंधुक असा तिच्या इंजिनाचा आवाज ऐकू येऊ लागला. किनाऱ्यावर उभ्या असलेल्यांना आत्ताच उडवावं असं त्यांना वाटू लागलं. पण जेवढी जिवंत माणसं सापडतील , तेवढा तपास कार्यात पुरावा मिळेल असं ते समजत असत. असो. आता लाँच सगळ्यांच्याच दृष्टिपथात येऊ लागली.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all