ज्वलंत......3

ज्वलंत









" बाबा असं का करत आहेस तू.....? घे ना खाऊन काहीतरी ...अश्याने तुझी तबीयत खलावेल ....एक - फक्त एक घास खा हवं तर ....ऐक ना रे ...तिकडे आईची अवस्था पण बघ ना कशी झाली आहे ....एकदम पाषाण मूर्ती होऊन बसली आहे ती....तिला कसा सावरू मी एकटा ......निदान तू तरी साथ दे माझी ...बाबा बघ ना इकडे ......." एक मुलगा आपल्या बाबा ला जेवणासाठी मानवत होता .जे गेले कित्येक महिने फक्त सलाईन वर होते जिवंत असूनही माणसात नव्हते .एकदम दगड होऊन बसले होते ,हातात एक फोटो फ्रेम घेऊन एकटक तिच्याकडे पाहत शून्यात नजर हरवून बसले होते .

" आई ...आई तू तरी सांग ना ग बाबाला ....का वागतोय असा तो... बघ ना काय अवस्था झाली आहे त्याची...गेले सहा महिने एक शब्द बोलला नाही तो आमच्याशी....की पोटात अन्नाचा एक कण गेला नाही त्याच्या ...नुसती सलाईन वर आहे तो ....अश्याने तो आणखी जास्त आजारी पडेल ना ग....तू तरी समजावं ना ग...." तो आपल्या आईला त्याच्या बाबाला सामजवण्यासाठी सांगत होता, जी एक निर्जीव मूर्ती बनून फक्त तिच्या कामात व्यस्त होती. जणू तिला त्या मुलाच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता.

" आई तू अशी पाषाणी कशी बनू शकते ग..तिथे बाबा स्वतःची तबीयत खराब करून घेत आहेत ...आणि तुला त्याचा काहीच फरक पडत नाही ....इतकी निर्दयी कशी होऊ शकते तू ...बोल काहीतरी ...." त्या बिचाऱ्याला त्याच्या आईबाबाची शांतता सहनच होत न्हवती.कारण गेली सहा महिन्यांपासून त्याची आई त्याच्या बाबांशी एका शब्दाने बोलली न्हवती.


त्या मुलाचं रडणं त्याच्या आईच काळीज चिरून टाकत होत ,तिला पण सहन होत नव्हत ते .....पण होती तर ती पण एक स्त्रीचं ना ...कुणाचीतरी पत्नी , आणि आई बनन्याआधी ती एक स्त्री म्हणूनच जन्माला आली होती ना...! 

हेच कारण होत तिच्या शांत राहण्याच कारण आता तिच्या  स्त्रित्वाने तिच्या मतृत्वावर मात केली होती ,म्हणून ती पाषाण बनली होती .

" ठीक आहे तुम्हा दोघांना जर असच राहायचं असेल ना..! तर ठीक आहे मीच काहीतरी करून घेतो ...माझ्या जिवाचं म्हणजे तुम्ही दोघं रहा असेच ...." त्याचाही संताप होत होता अस किती दिवस कुढत बसायचं 

" सहा महिने झाले त्या गोष्टीला नाही आहे ती आपल्यात ....आणि कधी परत येईल की नाही हे ही माहित नाही ....." तो मुलगा 

सटाकsssssssss

त्या मुलाच्या बाबांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली ,त्याच्या आईच्या कानावर तो आवाज गेला पण तिला काहीच फरक पडला नाही,जणू तिला माहिती होत की हे असच काहीतरी होणार होत.

" एक ..शब्द.. ज..जर .. अ ...अजून एक शब्द.. ज..जरी तुझ्या तोंडातून निघाला तर ..मी जी...जीव ..घे.. घेईन...तुझा..." त्यांना बोलायला त्रास होत होता ते धडपडत त्याच्याजवळ आले .त्याने त्याच्या बाबांना पडण्यापासून सावरलं .

" मग काय बोलू..? सांगा ना ..? मग काय बोलू..? गेले सहा महिने मी पोलिस स्टेशन च्या चक्कर मारतोय .. पण अजूनही तिची काहीच खबर नाही ....काहीच हाती लागलं नाही...ती कशी आहे...!कुठे आहे...! काहीच कल्पना नाही ......रोज निराशा पडते हाती .....तिच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट केलाय पण कुणाकडून च रिप्लाय नाही....." आता तो ही हरला होता काय नाही केलं होतं त्याने सगळे प्रयत्न करून झाले होते त्याचे , पण  रिझल्ट शून्य मिळत होता .

त्याला त्याच्या आई बाबांची अशी अवस्था बघवत नव्हती ,त्यांचा अबोलाही सहन होत नव्हता.फक्त एका घटनेने त्यांच्या घराची स्मशानभूमी झाली होती .त्यालाही कुठेतरी वाटत होत की ती आहे अजून अस्तित्वात पण मेंदू मान्य करायला देत न्हवता , त्यालाही तिची काळजी होती शेवटी तिच्याशी रक्ताच नात जे होत त्याचं. त्याच्याही डोळे पाण्याने डबडबले होते.

" बाबा तुम्हाला काय वाटतं ...! मला नाही आठवण येत का तिची ...? मला होत नसेल का त्रास ..? मलाही वाटतं की ती अजूनही जिवंत आहे... पण मेंदू मानायला तयारच नाही ....तुम्हाला काय वाटतं की तुमचाच फक्त जीव आहे तिच्यावर ...! माझा नाही...! माझा जीव आहे ती ....माझी परी आहे ती....माझंही रक्ताच नात आहे तिच्याशी.....माझाही जीव तीळ तीळ तुटतो ....मग मी ही असाच बसू का..? मी भाऊ आहे तिचा .. बेस्ट buddy आहे तिचा मी ...." शेवटी त्याचा हुंदका बाहेर आलाच तो तरी किती समजावणार स्वतःला आपली बहीण आपल्या आसपास ही नाही याची कल्पना करणे किती अवघड जात होत हे फक्त त्यालाच माहिती.

" बाबा माझी लाडू माझ्यासाठी काय होती तुम्हाला माहिती आहे ना...! ती जर इथे असती आणि तिने तुम्हाला अश्या अवस्थेत पाहिलं तर ती स्वतः खचून जाईल ..आणि माझ्यावर ओरडेल ते वेगळचं ...नका ना करू असं खाऊन घ्या काहीतरी प्लीज..." तो कळवळून सांगत होता .

"पण..माझा विश्वास आहे माझ्या लाडू वर ..ती जिवंत आहे ...माझी लाडू पळपुटी नाही ...कारण माझं रक्त आहे ते ...आजपर्यंत चुकीच्या वेळी कधी माझ्यासमोर झुकली नाही ती...आणि आता या नियती समोर कशी झुकेल..... जोपर्यंत ते नीच नराधम जिवंत आहेत ती स्वतःला नक्कीच जिवंत ठेवेल ...कारण जखमी वाघीण प्रमाणापेक्षा जास्त खतरनाक असते ....त्या नीच माणसांचा अंत करायचा बाकी आहे अजून ध्रुव .......त्याआधी ती स्वतः चा अंत करणार नाही..... पण त्याने दिलेल्या प्रत्येक घावाचा हिशोब नक्की करेल ती ........" बाबा धापा टाकत बोलत होते 

"हो बाबा आपली लाडू नक्की परत येईल .. पण ती परत आल्यावर आपण सगळे तिला स्ट्रोंग दिसायला हवं ना .....जर तिने आपल्याला अस खाचलेल पाहिलं तर तीही खचून जाईल ना .......आपली वाघीण जेंव्हा परतेल ना तेंव्हा सगळ्यांचा बरोबर हिशोब करेल ....." तो बाबांना धीर देत म्हणाला पण तो स्वतः च इतका खचला होता की जमत नव्हत सगळ त्याला . 

बाबांनी एक नजर त्याच्यावर टाकली आणि भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या हातातील घास खाल्ला ,खूप बरं वाटलं त्याला पण इतका उशीर किचन रूम मधून त्यांचा संवाद ऐकणारी त्याची आई तिने समाधानाने उसासा सोडला कितीही झालं तरी एक आई आणि पत्नी होती ती,हुंदका आवरला नाही तिला किचन रूम मध्ये जावून मन भरून रडली ती माऊली .


****------****-----*****------******------******----***

काय न्हवत आज त्याच्याकडे सगळचं तर होत ,धनदौलत, मानसन्मान,सगळ काही....

पण होत ते खालीपण अस्तित्वाचं रितेपण .... पण आज तिच्यामुळे त्याच रिकामी आयुष्य जणू मोहरुन गेलं की काय असं वाटतं होत..असा कितीसा ओळखत होता तो तिला ? कसलंच नात न्हवत तिच्याशी ...तरीही इतकी ओढ..? पूर्ण अनोळखी होती ती त्याच्यासाठी...तिच्या जगात कुठेच नव्हता तो ...अगदी कुठेच ......पण त्याच जणू जग बनली होती ती.....हातात बेड्या आणि पायात साखळदंड बांधलेली ती एकटक खिडकीतून बाहेर त्या डागाळलेल्या  चंद्राकडे पाहत होती.....

जसं तीच आयुष्य डागाळल होत अगदी तसे.......एका क्षणात गलिच्छ दलदलीत जाऊन पडली होती ती......अस न्हवत की ती हरली होती..... बस फक्त शांत झाली होती......डोळ्यात न समावणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र आकाशाला .......तिच्या बदनाम चारित्र्याची झालर लागली होती ........

तो तिला पाहण्यासाठी म्हणून सहज तिच्या रूम जवळ आला होता ......कित्येक रात्री तिच्या अश्याच गेल्या होत्या फक्त जागून......जेंव्हा शुद्धीत असायची तेंव्हा कुणाशी बोलणं तर सोड ......पाहत ही नसायची .....

त्याला खूप वाईट वाटत होत ....काळीज पिळवटून निघत होत तिला अश्या अवस्थेत पाहून .... पण मजबुरी होती त्याची तिला कैद नाही केलं तर ....ती स्वतःला पुन्हा पुन्हा जखमी करत राहील याची भीती वाटत होती त्याला...म्हणून बंदिस्त केलं होतं त्याने तिला .....

हातातल्या बेड्यांमुळे रक्त साखळल होत मनगटात....पाय निळे पडले होते ...आज पहिल्यांदा निरखून पाहत होता तो....जेमतेम 5 फूट हाईट, दुधासारखी नितळ कातडी, समुद्रसारखे खोल गहिरे ब्राऊन डोळे,कमरेपर्यंत रुळणारे केस,गुलाबाच्या पाकळी सारखे गुलाबी ओठ ,सौंदर्याची खाण होती जणू ..... पण चेहऱ्यावर कोणतेच भाव न्हवते भावनाशून्य चेहरा ......दुरून का होईना पण डोळे भरून पाहत होता तो तिला ......डोळ्यासमोर ती रात्र एका पिक्चर सारखी सरून गेली आणि त्याचे डोळे रागाने घट्ट मिटले ......त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि मनाशी काहीतरी पक्क करून तिथून निघून गेला.....

कुणालाच सोडणार नव्हता तो आता अगदी कुणालाच नाही........

         मछली जल की राणी हैं..!
          जीवन उसका पाणी हैं...!
           हात लगावोगे तो डर जाएगी...! 
             ओर बाहर निकालो गे तो ..............

मर....जाएगी.......... 

हाहाहा........

असच काहीतरी पुटपुटली ती...........आणि मोठ्याने हसली.....


********************************************

आता काय होईल ..? तो काय करेल...? ती कोण आहे ..? तिच्यासोबत अस का झाल ..? सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील ....

कमेंट करा,स्टिकर द्या, सॉरी नेहमीसारखा .......

क्रमशः......


🎭 Series Post

View all