©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग ७
तन्वी : आपण काहीतरी करायला हवं. तुमचं लग्न थांबवायला हवं.
शिवा : लग्न थांबवायला काय? मी आत्ता जातो आणि हे लग्न होणारं नाही असं सांगतो.
शिवा : कोणती? कशी? आता ऐनवेळी काही सुचणार नाही. तुझ्या डोक्यात काही कल्पना असेल तर बोल पटकन. वेळ नाही आपल्याकडे.
तन्वी : आपण अमेयला बोलावून हे सगळं सांगूया. तुमच्या ऐवजी अमेयला नव-याच्या वेशात लग्नाला त्याला उभं करुया.
अमेय : मला ओळखतो का तो? आणि कसा ग? त्याचे असतील ना एवढे नातेवाईक, मित्र परीवार. माझ्याकडेचं अस काय काम आहे.
तन्वी : आपण सगळे शिवाला आधीपासूनचं माहित आहोत. चलं आता उगाच नको ते डायलाॅग मारत बसू.
शिवा : बर ऐकं इकडे ये. तुमचं दोघांचं एकमेकांवर खर प्रेम असेल तर मी कोण तुमच्या मध्ये येणारा.
अमेय : म्हणजे?
त्या विचारात स्टेजवर सिंधू पोहचते. हातात हार देवून मंगलष्टका सुरु करण्याकरता वर आणि वधूला पाटावर उभे करुन दोघांच्या मध्ये पडदा धरला जातो. टाळ्या, बॅंड आणि फटाकांच्या आवाजात शेवटची मंगलाष्टका पार पडते.
आता वेळ येते ती एकमेकांना हार घालण्याची. चेह-यावर कोणतेच भाव न दाखवता सिंधू वराच्या गळ्यात माळ घालणारं इतक्यात तिचं लक्ष वराकडं जाते. आणि पाहते तर काय? शिवा च्या ऐवजी अमेयचं समोर उभा होता. सारं स्वप्नवतं वाटत होते. अगदी एका चित्रपटात घडणा-या सीन सारख घडतयं असाच भास सिंधूला झाला.
आनंदाने वेडेपिसं होत चेह-यावर गोड हसू आणतं सिंधूने अमेयच्या गळ्यात हार घातला. बाकी लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. शिवा भटजींना सांगून लग्नाचे पुढिल विधी सुरु करायला सांगतो. गोरे आणि साठे कुटूंबियांनी तर एकमेकांना मिठीच मारली. देवानेच हा चमत्कार घडवून आणला. आपल्याला हव तसंच झालं.
इकडे शिवा घरच्यांची आणि जमलेल्या लोकांना त्या दोघांच एकमेकांवर प्रेम असल्याने दोघांचा विवाह झाला हे समजून सांगत होता.
अखेरीस हि गोष्ट शिवा पर्यंत पोहचली कशी याचा विचार साठे आणि गोरे कुटूंबिय करत असताना. तन्वी त्यांना जावून घडलेला प्रकार सांगते.
" शिवाने रडताना पाहिल्यामुळे अमेय आणि सिंधू बद्दल खरं सांगून बसले", सिंधू.
क्षणभर काळजीने गजबजलेलं गोरे आणि साठे कुटूंबिय एकमेकांना टाळ्या देत आपला आनंद व्यक्त करत होते. शिवाच्या घरचे मात्र नाराज होवून गाडी काढून मंडपातून निघून गेले. शिवा लग्नाच्या विधी होईपर्यंत मांडवातच थांबला.
गोरे आणि साठे कुटूंबिय : आम्ही तुला चुकीचं समजतं होतो. पण तू जे आम्हांलाही शक्य नव्हते ते करुन दाखवलसं. तू तुझ्या हट्टाला पेटून चुकीचं वागणार असचं समजतं होतो आम्ही.
गोरे आणि साठे कुटूंबिय : अगदी बरोबर आहे. या गैरसमजामुळेच तर सगळं घडले. नाहीतर आज खूप मोठा अनर्थ ओढावला असता.
चला तर मग अमेय आणि सिंधूचं लग्न झालं. पण आपली कथामालिका संपली नाहीये अजून बर का? यांचा फुलत जाणा-या संसाराच्या घडामोडी पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः