©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग २१ अंतिम भाग
" तुझ्या शिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. तुझ्यावर स्वत:पेक्षा जास्त जीव लावला मी", तुषार.
" मला ठावूक आहे सारं. माझा भूतकाळ आपल्याला एक होवून देईल की नाही हिचं शंका सतत मनात येतं होती. अजून एक मुलगा माझ्या प्रेमात या आधी पडला होता रवी त्याचं नाव. लग्नाची स्वप्न देखील दोघांनी रंगवली होती. त्या आधी माझा भूतकाळ त्याला सांगणं मी उचित समजलं, पण तो मला सोडून निघून गेला", निलांबरी.
तुषारचं बोलणे ऐकून निलांबरी ला हायसे वाटते. तरी शंकेची पाल मनात चुकचुकतं असते. नातेवाईक, समाज काय बोलेल ही खंत तुषार जवळ निलांबरी व्यक्त करते.
" तू लग्नाला तयार आहेस ना माझ्याबरोबर इतकचं माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझा अमेय मामा माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. तो समाजाला आणि नातेवाईकांना काय सांगायचे ते पाहून घेणारं आहे. आपण फक्त आपल्या दोघांचा विचार करायचा आहे", तुषार.
" मी आहे तयार. तुझ्याशी लग्न करायला", निलांबरी.
" मग झालं तर, मी मामाला तुझा होकार सांगतो. पुढे काय करायचे ते तुला फोनवर सांगेन", तुषार.
" मामा निलांबरी तयार आहे लग्न करायला माझ्याशी", तुषार.
" आपणं उद्याचं तिच्या घरच्यांशी बोलणी करुया", अमेय.
" खूप कौतुक नको करु, हरभ-याचं झाडं तुटेल आता", अमेय.
" खरचं मामा तू, आसवांनी गच्च झालेल्या डोळ्यांच्या पापण्या मिटतं मामाला घट्ट मिठी मारतो", तुषार.
निलांबरी आईला बोलावून घेते. तुषार बद्दल सांगून लग्नाची बोलणी करायला तुषारचा मामा आणि तुषार येणारं आहे. आईला होणारा आनंद शब्दांत मांडता येत नव्हता. निलांबरीच्या आईच्या मनात सतत एक विचार रेंगाळत असायचा. माझ्या मुलीशी कोणी संसार थाटू शकेल की नाही. तुषारच्या मनाचा मोठेपणा जो आज माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला.
निलांबरीची आई तिच्या वडिलांना बरोबर येण्याचा आग्रह करते. निलांबरी चे तोंड पुन्हा कधी न पाहण्याच्या मतावर ठाम राहतं ते येतं नाही. तुषार, तन्वी आणि अमेय निलांबरीच्या घरी येतात. लग्नाची बोलणी होवून लग्नाची तारीख काढण्यात येते.
आजूबाजूच्या लोकांना निलांबरी विषयीचे सत्य समजते. नातेवाईक देखील या लग्नाला येण्याला नकार कळवतात.
" असाचं धीर तुला निलांबरीला देखील द्यायचा आहे. तुझ्यापेक्षा तिला जास्त या प्रसंगाला तोंड देणे कठिणं होणारं आहे. तिची हिंमत बनून तुला समाजाशी दोन हात करायला लागतील. हि गोष्ट तुला सतत ध्यानातं ठेवायला हवी. आत्तापर्यंत तिला अशी साथ कोणीचं कधी दिली नसेल. ती उणीवं तुला भरुन काढायची आहे", अमेय.
लग्नाचा तो सोनेरी दिवसं उगवला. साखरपुड्याची तयारी सुरु झाली. मोजक्याचं लोकांमध्ये साखरपुडा संपन्न झाला. हळदीचा रंग निलांबरीच्या गो-या रंगावर खुलून दिसत होता. अक्षता आणि मंगलाष्टकांच्या मंत्राने विवाह संपन्न झाला. आता वेळ होती ती कन्यादानाची.
निलांबरीच्या आई-वडिलांना गुरुजींनी स्टेजवर कन्यादाना करता बोलवले. निलांबरीची आई एकटीचं सकाळपासून लग्न मंडपात दिसत होती. निलांबरीचे बाबा लग्नाला आलेचं नव्हते.
" मी काहीचं केलं नाही ग, समाजाला घाबरुन आपण आपलं जीवन जगणं तर नाही ना थांबवू शकत. आयुष्य सुंदर आहे. जन्म हा एकदाच लाभतो. मग का असं समाजाला घाबरुन कुढतं बसायचे", अमेय.
" खरं आहे तू तुझं आयुष्य मोकळेपणाने जग. आता तुझे आई-बाबा देखील तुझ्या सोबत कायम आहेत", निलांबरीचे बाबा.
आयुष्याला साथ तुझी लाभता
स्वप्नांचे अंकुर रुजले
निलांबरीच्या आगमनाने
कशी वाटली कथामालिका कमेंट करुन जरुर कळवा. पुन्हा एकदा सांगेन काल्पनिक रुप कथेला देण्यात आले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू निश्चितच नाही. तसे आढळल्यास क्षमस्व.
समाप्त :