©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग १८
अमेय : तन्वी आपल्या लाडूबाई करता माझ्या जिवलग मित्राच्या मुलाचं स्थळ घेवूनं आलो. त्यांना आपल्या मधूचा फोटो पसंत पडला. तू आई जवळ दिलेली मधूची पत्रिका देखील पाहिली. गुण देखील उत्तम जुळतात. आता मधूला मुलगा पसंत पडला म्हणजे झाले.
तन्वी : छानचं होईल मग. हल्ली ओळखीतचं लग्न लावून द्यायला हवे.
नंतर खूप त्रास होतो काही गोष्टींचा.
तन्वी : माझी काळजी दूर केली तू.
अमेय : आपण बघण्याचा कार्यक्रम करुन घेवूया. येत्या रविवारी पाहण्याचा कार्यक्रम करुया. मी कळवतो तसे मित्राला.
घराची आवरा आवर करुन तन्वी कार्यक्रमाच्या तयारीला लागते. ठरल्या प्रमाणे मधूला पाहण्यासाठी मुलाकडचे येतात. मधूला पाहायला येणा-या श्रीकांतला मधू पहिल्याच नजरेत पसंत पडते. मधुचे समजूतीने बोलणे. नम्र वागणूक, सर्वांशी मिळून-मिसळून राहण्याचा स्वभावं श्रीकांतला आवडतो.
मधूला देखील श्रीकांत मेहनती वाटतो. जबाबदारी अंगावर घेतं वडिलांचा व्यवसाय सांभाळून नोकरी देखील करत होता.
साखरपुडा झाल्यावर लगेचचं लग्नाचा मुहर्त काढण्यात येतो. लग्नाचा मुहर्त तारखेच्या दिवशी उशीरा असल्याने आॅर्केस्टा ठेवण्यात येतो. त्यात निलांबरी गिटार वाजवताना पुन्हा तुषारला दिसते.
आपल्या बहिणीच्या लग्नाला पुन्हा एकदा निलांबरीचे दिसणे योगायोगचं म्हणावा असे तुषारला वाटू लागले.
मधूचे लग्न थाटामाटात पारं पडते. मधूच्या जाण्याने घर तन्वीला भकासं वाटू लागते. असेचं महिना देखील उलटून जातो. मधूचे लग्नानंतरचे पहिले सण सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी उत्साहात साजरे होतात.
निलांबरीच्या प्रेमात वेडा झालेला तुषार म्यूजिक बॅंडच्या निमित्ताने अनेक शो मध्ये एकत्र भाग घेवू लागले. वेगवेगळ्या जिल्हा, शहरांमध्ये जाण्याच्या अनेक संधी त्यांना मिळतं होत्या.
निलांबरीच्या आधीच्या एका मित्राने अशीचं प्रेमाची वचने देवूनं फसवलं होते. तो हाच भूतकाळं जाणूनं. पुन्हा कधी या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला परंतु तरी देखील तुषार बद्दल प्रेम भावना जागृत झाल्या होत्या.
निलांबरी तिच्या मैत्रिणींना तुषार विषयी भावना सांगते. त्या मैत्रिणी निलांबरीला तुषारशी जवळीक न साधण्याचा सल्ला देतात. यावेळी जरं निलांबरी तुटली तर कायमची स्वत:ला गमावून बसेल, याची भीती साहजिकचं मैत्रिणींना वाटतं होती.
निलांबरी देखील मैत्रिणी सांगतात ते बरोबरचं आहे. ह्या दृष्टिने तुषारला न भेटण्याचा निर्णय देखील घेते. दैवी खेळ म्हणतात तो असा, तुषार आणि तन्वीची तर आता रोजचं भेट घडून येत होती. निलांबरी चित्रपट बघायला मैत्रिणींबरोबर जायची नेमकी त्याचवेळी तुषार देखील मित्रां सोबत तिथे येत असायचा.
मधूचा संसार सुखाने चालू होता. आता चैतन्य देखील बॅंकेत नोकरी करायला लागला होता. सिंधू आणि आजीला घरात सूनेची गरज भासायला लागली. मधू नंतर आता चैतन्याचं देखील लग्न लावूनं देण्याचा त्यांनी विचार केला.
चैतन्यचं नेमकी बॅंकेतं काम करणा-या सुमी सोबतं प्रेमाचे बंध जुळले होते. योगायोग तर बघा. सुमी नेमकी होती ती तरी कोण? हे कळताचं तुम्हांला आश्चर्य वाटणे साहजिकचं आहे.
निलांबरीच्या जीवनाशी निगडीतं असा कोणता भूतकाळ पाठपुरावा करतं असेल? तसेच सुमी नेमकी कोणं आहे ते आपण पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः