©®प्रज्ञा बो-हाडे
जगण्याला पंख फुटले भाग १४
लहानपणी एखादी गोष्ट मनातं घर करुन बसली आणि त्याचं वेळी समजूत न निघल्याने त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोण निराळाचं होतो. कोणी कितीही समजूत काढू द्या. त्यांचे विचार न पटणारे असतात.
" त्याला वाटतं आपण त्याचे लाड करतं नाही. मधू आणि चैतन्यवर जास्त प्रेम आहे सगळ्यांच", सिंधू.
" मी बघतो कसे करायचे ते", अमेय.
" हो गं. तेवढं मला कळतं, तू नको करु काळजी", सिंधू.
यावेळी यात्रेला देवाच्या दर्शनानंतर मोठ्या पाळण्यात बसायला अमेयनं चैतन्य ऐवजी तुषारचा हात हातात घेवून पाळण्यात बसवले. आज तुषारवर विशेष लक्ष देण्याचं अमेयनं ठरवले. तुषारच्या मनात नक्की काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न अमेयचा सुरु होता.
अमेय : तन्वी तू सगळ्यांना घेवून पुढे जा. मी आणि तुषार येतो बरोबर घरी.
तन्वी : तुषार येशीलं ना मामा बरोबरं.
आलोचं तुषारचं खावूनं झालं की. तुम्ही खरेदी करा पुढे जावून. मधू करता कानातले,गळ्यातले, बांगड्या घे गं सिंधू.
सिंधू : जातो आम्ही तुम्ही या तसेच. घरी. आम्हांला खरेदी करायची म्हणजे कदचित उशीर देखील होईल.
अमेय : चालेलं भेटूया घरी.
तन्वीला आजं निराळेचं वाटतं होते. एरव्ही मामाशी कधी न बोलणारा. आज मामासोबतं इतका लळा लागलेला पाहून आश्चर्यच वाटले.
तन्वी : राहू दे. श्रीगणेशा केला म्हणायचा. मंदिरात त्याने तुषारशी बोलण्याचा.
सिंधू : तन्वी पण एक सांगू का. आम्ही कधीच त्याला फरक पडावा असं वागलो नाही. जसं चैतन्य तसाच तुषारही आम्हांला. आता एक गोष्ट खरी आहे, मुलींना आपण आवडीने वस्तू घेवू शकतो. त्यात प्रकार देखील असतात खूप सारे. चप्पल, पर्स, दागिने, कपडे. तसं मुलांना आवर्जून तेचं नाही घेता येतं.
तन्वी : राहू दे. श्रीगणेशा केला म्हणायचा. मंदिरात त्याने तुषारशी बोलण्याचा.
सिंधू : तन्वी पण एक सांगू का. आम्ही कधीच त्याला फरक पडावा असं वागलो नाही. जसं चैतन्य तसाच तुषारही आम्हांला. आता एक गोष्ट खरी आहे, मुलींना आपण आवडीने वस्तू घेवू शकतो. त्यात प्रकार देखील असतात खूप सारे. चप्पल, पर्स, दागिने, कपडे. तसं मुलांना आवर्जून तेचं सारखं नाही घेता येतं. त्यामुळे मधूकरता जे घ्यावं वाटलं ते मी घेतं गेले. पण याचा तुषारवरं असा परीणाम होईल वाटत नव्हते.
तुषारच्या मनातला गैरसमज दूर करु शकेल का? अमेय. तुषारचं मत परीवर्तन होवू शकते का? पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः