जगण्याला पंख फुटले भाग १३

लहानपणी मनात रुजलेली गोष्ट मोठं झाल्यावरही कितीही उलगडून सांगितली तर ती पटत नाही.

©®प्रज्ञा बो-हाडे

जगण्याला पंख फुटले भाग १३

मधू सगळ्यात मोठी बहिणं असल्याने दोघा भावांनी तिचं ऐकावं अशी अपेक्षा करणे साहचिकचं होते. चैतन्य स्वभावाने शांत होता. तुषार मात्र हट्टी होता. स्वत:चचं मत कसं बरोबरं आहे हे पटवून देण्यात तुषार तरबेज होता.


"चैतन्यचं आपला भाऊ असता तर., चांगले झाले असते, शांतपणे समोरच्याचे बोलणे तरी ऐकून घेतो", मधू.

चैतन्य अभ्यासात हुशार असायचा. तुषार हा चित्रकला आणि गायनात सर्वोत्तम होता. त्याचा गोड गळा सुपरस्टार सिंगरचे दर्शन घरबसल्याचं घडत असायचे.

फक्त त्याचा हट्टीपणा सोडला तर तुषार सर्वांच्याच पसंतीस पडत असायचा. घरातल्यांचा ओढा चैतन्यकडे विशेष करुन असायचा. याचा तुषारला राग यायचा. तो अमेय मामाच्या घरी जाणे टाळायचा. मधूला मात्र मामा आणि मामीचा लळा. मामी मधूला आवडणारे पदार्थ हौशेने बनवायची.

मधू करता कानातलं,गळ्यातलं, वेगवेगळ्या फॅशनची फॅन्सी कपडे, पर्स सिंधू आवडीने आणायची. आपल्याला वाटणारी मुलीची हौस मधूच्या रुपात सिंधू पूर्ण करुन घ्यायची. मधू सुट्टीच्या दिवशी कधी घरी आली की,सिंधू मधूच्या लांबसडक केसांवर वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायची. मधूचा मेकअप सिंधू करुन द्यायची. मेकअपचे लागणारे सामान सिंधू मधूला आणून द्यायची.


मामी भाचीचं प्रेम पाहून तन्वीला भरुन यायचं. असचं नातं आयुष्यभर असं मागणं तन्वी देवाजवळ करत असायची.

तुषार स्वत:च्याच विश्वात रमायचा. सिंधूला तुषार ही मधू इतकाचं लाडाचा वाटायचा. चैतन्यला घेतल्या जाणा-या ड्रेसची सेम जोडी सिंधू, तुषार करता घेवून यायची. तुषारला हे मामीचं प्रेमं कधी कळलेचं नाही.

मधूच्या आवडीचं करतात फक्त. असा गैरसमज तुषारने करुन घेतला होता. 

मामाच्या यात्रेला जायचं म्हणून मधू खूश होती. तन्वी देखील माहेरच्या यात्रेला जायला उत्सुक होती. खरतरं दोन दिवस आधी राहायला जावं असं तन्वीच्या मनात होतं. मधू मात्र एकटी मामाकडे निघून गेली. तुषारची मन भरणी करत तन्वी बसल्याने कसबसे यात्रेच्या आदल्या दिवशी मामाच्या घरी यायला राजी झाला.

मामाकडे पोहचताचं. आजीने लवकर का नाही आलात म्हणून सूर लावला. 


मधू : आजी या तुषार मुळे आईला लवकर येता आलं नाही.

आजी : इकडे तुला कोणी मारतं का? लहानपणापासून तू कधी मामाच्या घरी रमलाचं नाही. आम्ही आवडतं नाही का तुलां.

तन्वी : आई नको त्याला जास्त बोलूसं. आधीच यायला तयार नव्हता.

आजी : बर जावू दे.

तुषार : आजी तसं नाही ग. माझे गाण्याचे क्लास बुडतात. एक तर त्याची परीक्षा जवळ आली. आणि अस बाहेर आलो की रियाज देखील करता येत नाही.

आजी : गाण्याची वेगळी परीक्षा द्यायची असते का.

तुषार : हो. आणि माझा चित्रकलेच्या पण परीक्षा त्या बरोबर चालू आहेत. दोन्ही क्लास आणि अभ्यास याचा ताळमेळ बसवणे अवघड होते.

आजी : मधू तुझ्यापेक्षा मोठी आहे. ती कसं मॅनेज करते सगळे. तिची तर यंदा दहावी ची परीक्षा आहे. तिची मामी इकडे आली की अभ्यास घेते तिचा.

तुषार : आजी अग ताईला कोणते क्लास नाहीत. ती स्वत:च अभ्यास करते. तिला अभ्यासा व्यतिरीक्त दुसरं काही येतं का विचार बरं.

मधू : आला मोठा शहाणा. चार गाणी गायली आणि चित्र रेखाटतं बसणं म्हणजे जगात भारी असणे असं होत नाही.

तन्वी : आता इथपणं भांडणं नका सुरु करु तुम्ही बरं.

आजी : माझचं चुकलं. मी तुषारला उगाचं विचारतं बसले. उत्तराला प्रश्न विचारत राहिले. शेवटी भांडणात रुपांतर झाले.

मधू : जाऊ दे गं आज्जू्. तसाचं आहे तो. त्याचा हट्टीपणा कधी जाणारं काय माहितं.


तन्वी: आपणं यात्रा अनुभवायला आलो ना. छान हसून-खेळून रहा. तो चैतन्य बघा किती शांत पणे आपलं बोलणं ऐकून घेतो आहे पहा.

तुषार : त्याला काय कळतयं,बोलायचं. लहानपणापासून शांतच असतो नेहमी.

चैतन्य : तू कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलाचं नाही. तुला नक्की माझ्यातलं काय खटकते तेचं कळतं नाही.

तुषार : खटकायचं काय त्यात. आपल्या घरात तू आणि मधू ताईचेचं लाड होते. मला मात्र कोणीचं विचारतं नाही. खरतर सगळ्यातं लहान म्हणून माझं लाडं करायला हवे ना?

चैतन्य समजूत काढू शकेल का तुषारची. अमेयला तुषार लहानपणापासून घरी का येत नव्हता याचं कारणं समजल्यावर कोणतं पाऊल अमेय उचलेलं. पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all