आय मिस्ड यु ! (भाग २)
नमिताचा आज फ्री क्लास होता आणि एकटीच विचारात बसली त्यावेळी लक्षात आलं, दहावीची परीक्षा दोन महिन्यांवर आली होती आणि तिच्या वर्गातला तो. . हो तिचा एक क्लासमेट, अंकुश जो परिस्थितीने खूप जास्त गरीब होता. . त्याने लिहिलेला तो मेसेज.
त्यावेळी सुरवातीला त्याच्या राहण्यावरती, वागण्यावरती तिला खूप दया यायची, परंतु अभ्यासात तो प्रचंड हुशार होता. दहावीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा घटक चाचणीत तो पहिला आला. नेमके योगायोगाने तिचे बाबा शाळेत भेटायला आले होते. इतक्या होतकरू मुलांला आर्थिक अडचण आहे वगैरे शिक्षकांकडून बाबांना कळाले होते. त्याची फी भरण्याची तयारी सुद्धा बाबांनी दाखवली होती.
त्यानंतर एकदा तो बरेच दिवस अबसेंट राहिला होता आणि म्हणून भीत भीत नमिताच्या घरी आला होता. वडिलांनी नमिताला आवाज दिला आणि त्याला बसवलं. कशामुळे काय पण वडील त्याच्याशी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांना कळालं त्या मुलाला वडील नाहीत आणि तो मामा मामीकडे शिक्षण घेतो. मामीचा स्वभाव प्रचंड कडक होता. ती खूप काम करून घ्यायची आणि जेवायला देखील धड द्यायची नाही त्यामुळे ट्युशन लावण्याची सुद्धा सोय नव्हती.
तो इंग्रजीचे नोटबुक मागण्यासाठी नमिताच्या घरी आला होता. त्याने तसं वडीलांना सांगितलं. त्याचा तो बुजरा स्वभाव आणि निरागस चेहरा पाहून वडिलांनी मानसीला सांगितलं होतं की या मुलाला अभ्यासात वगैरे हवी तेवढी मदत कर ,आर्थिक मदत लागली तर मी करेन .
त्यानंतर आठ दहा दिवसांनी एकदा तो यायचा अभ्यासाचा काहीतरी विचारायचं आणि मानसी समजावून सांगत असायची, त्यावेळी तो तिला एकटक पाहत राहायचा.
काही दिवसांनंतर त्याचं पाहणं किंवा त्याची दृष्टी मानसीला जास्तच बोचायला लागली. काही महिन्यांची गोष्ट आहे, एकदा दहावी झाली की कोण कुणाला भेटतो, अशा विचाराने तिने दुर्लक्ष केलं होतं .
काही दिवसांनंतर त्याचं पाहणं किंवा त्याची दृष्टी मानसीला जास्तच बोचायला लागली. काही महिन्यांची गोष्ट आहे, एकदा दहावी झाली की कोण कुणाला भेटतो, अशा विचाराने तिने दुर्लक्ष केलं होतं .
परीक्षा अवघे दोन महिन्यांवर आली होती आणि त्याने एकदा तिची वर्ग पाठाची वही मागितली. इंग्रजीची वही घेऊन गेला पण लवकर आणून दिली नाही, जेव्हा परत दिली तेव्हा ती नमिताने आपल्या दप्तरात ठेवून घेतली .
त्यानंतर आठवडाभर तो सतत तिच्याकडे पाहत असायचा. एक दिवस त्याने तिला विचारलं "वर्ग पाठाची वही पाहिलीस का?"
ती म्हणाली "नाही पाहिली. माझी पूर्ण आहे पण मी अजून इंग्रजीचा अभ्यास सुरू केला नाही"
तो दबकतच म्हणाला "जेव्हा अभ्यास सुरू करशील तेव्हा मला नक्की सांग."
आठवड्याभरा नंतर जेव्हा नमिताने अभ्यास सुरू केला तेव्हा सहजच वाचता वाचता वहीचे मागचे पान उलटवून पाहिले आणि तिच्या हृदयाची धडधड एकदमच वाढली.
शेवटच्या पानावर लिहिलेले होते ,"नमिता,हाऊ डियरली आय लव्ह यू!"
त्यानंतर ते वहीचं पान कुठे दडवावं की फाडून फेकावं? की त्याला दाखवून विचारावं? तिला काहीच कळालं नाही. दोन दिवस तर ती प्रचंड तणावात होती की कुणाला हा कागद मिळाला तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील? त्या गोष्टीचा इतका मनावर ताण आला की तिला दोन दिवस ताप भरला होता. सारखा तो वहीतला फाडलेला कागद तिच्या युनिफॉर्मच्या खिशात ठेवून असायची, रोज आठवणीने काढून पुन्हा दुसऱ्या युनिफॉर्म मध्ये ठेवायची. अंकुश मात्र सतत तिच्याकडे अशाने पाहत होता आणि तिला मात्र त्याच्यावरती राग यायला लागला.
त्याचं असं वागणं म्हणजे कृतघ्नतेच लक्षण आहे असं तिला वाटलं ,तिला त्याच्याशी बोलण्याची देखील गरज वाटली नाहीअगदी त्याच्याकडे पाहण्याची देखील. वर्गात कुजबूज सुरू होती की पूर्वी ती त्याला मदत करायची, वह्या द्यायची तो तिच्या घरी जायचा आणि हल्ली तो सतत तिच्याकडे पाहत असतो पण नमिता त्याच्याकडे दुर्लक्ष करते. म्हणजे यांचं काहीतरी होतं आणि ते बिनसलं या अर्थाने मुली तोंडावरती हात ठेवून हसायच्या आणि डोळ्यांनी इशारा करायच्या. हे सगळं नमित्ताला कळत होतं पण तिच्याकडे सांगण्यासाठी काहीच नव्हतं.
त्याचं असं वागणं म्हणजे कृतघ्नतेच लक्षण आहे असं तिला वाटलं ,तिला त्याच्याशी बोलण्याची देखील गरज वाटली नाहीअगदी त्याच्याकडे पाहण्याची देखील. वर्गात कुजबूज सुरू होती की पूर्वी ती त्याला मदत करायची, वह्या द्यायची तो तिच्या घरी जायचा आणि हल्ली तो सतत तिच्याकडे पाहत असतो पण नमिता त्याच्याकडे दुर्लक्ष करते. म्हणजे यांचं काहीतरी होतं आणि ते बिनसलं या अर्थाने मुली तोंडावरती हात ठेवून हसायच्या आणि डोळ्यांनी इशारा करायच्या. हे सगळं नमित्ताला कळत होतं पण तिच्याकडे सांगण्यासाठी काहीच नव्हतं.
बरेच दिवस ती अंकुशला टाळत राहिली.
तो दहावी संपेपर्यंत तिच्याकडे आशेने पाहत राहिला.
ती पण त्या दिवशी खूप रडली होती. बाबांना कळालं तर शिक्षण बंद होईल, त्याच्या घरी कळालं तर मामी त्याला घरात ठेवणार नाही या काळजीपोटी तिने त्या सगळ्या गोष्टी मनात दाबून घेतल्या.
तो काळच तसा होता हे सगळं विचार करण्याची मुलींची देखील कुवत नव्हती.
माझं काय चुकलं म्हणून हा असा वागला , ही अढी तिच्या मनात ठेवूनच ती मोठी झाली.
मुलांपासून अंतर ठेवून वागू लागली.
मुलांपासून अंतर ठेवून वागू लागली.
बारावीनंतर त्याचा पुन्हा संपर्क झाला नाही त्यावेळी तो दोन-तीन वेळा घरी येऊन गेला, पण नमिताने त्याला प्रत्यक्ष न भेटता काहीतरी निमित्त सांगून त्याला बाहेरच्या बाहेर पाठवून दिलं.
अंकुशला तिला काहीतरी सांगायचं होतं, विचारायचं होतं पण तो योग आला नाही. स्वतः च्या गरिबीची त्याला लाज वाटायला लागली आणि मग त्याने पुन्हा कधीच संपर्क केला नाही.
पुढे तिचं लग्न झालं आणि हा विषय मोडीत निघाला. लग्न घाईत झाल्याने जुन्या मित्र मैत्रिणींना बोलावणे जमले नाही.
आता पण जेव्हा गेट-टुगेदर चा विषय निघतो आहे तेव्हा तिला तीच धडधड होती की कॉमन रियुनियन ठरलं आणि तो जर पुन्हा समोर आला तर? जर आता तो सगळ स्पष्ट बोलला तर ती काय उत्तर देईल?
केवळ त्याला टाळण्यासाठी ती हे गेट-टुगेदर टाळत होती.
म्हणजे तिच्या नवऱ्याला पण जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचा तिटकारा होता. नमिताने पण जुन्या ओळखी पुन्हा काढू नयेत या विचाराचा होता. नवीन ताण नको म्हणून ती चैत्रालीला काही बाही सांगत होती. या वयात नमिताला हे कळत होतं की त्याचं तिच्यावर प्रेम होतं. हिने टाळलं म्हणून काय त्याच्या मनातून ते गेलं नसेल.
म्हणजे तिच्या नवऱ्याला पण जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचा तिटकारा होता. नमिताने पण जुन्या ओळखी पुन्हा काढू नयेत या विचाराचा होता. नवीन ताण नको म्हणून ती चैत्रालीला काही बाही सांगत होती. या वयात नमिताला हे कळत होतं की त्याचं तिच्यावर प्रेम होतं. हिने टाळलं म्हणून काय त्याच्या मनातून ते गेलं नसेल.
********************
क्रमशः
क्रमशः
©®स्वाती बालूरकर सखी
दिनांक १५.०२.२५
दिनांक १५.०२.२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा