Login

मला तुम्हाला बंधनात नाही ठेवायचं

Sometimes we are considering our elders ,think about them also

मला तुम्हाला बंधनात नाही ठेवायचं

प्रांजल- अहो आई ,तुम्ही मला बोलताय ते पटतंय पण मला तुम्हाला बंधनात ठेवायचं नाही ,म्हणून मी अबोलीला सांभाळायला मावशींना ठेवलं आहे आणि मला माहित आहे तुम्ही तिला चांगल्या पध्दतीने सांभाळू शकता.

आई-अगं पण,आताशी ती पोर पाचच महिन्याची आहे ,मी सांभाळेन तिला ,तिचं सगळं व्यवस्थित करेल ,आता पर्यंत नाही का आपण दोघींनी केलं सगळं 

प्रांजल- अहो आई केलं आणि इथून पुढे ही करा, नाही कोण म्हणतय ,तुमच्या मदतीला मावशींना ठेवतेय असं समजा हवं तर

आई- अगं पण मला ही गोष्ट बंधन नाही वाटत ,त्यातून मला आनंद मिळेल माझ्या नातीचं करताना

प्रांजल-मला या गोष्टीची कल्पना आहे आई की तुम्हाला वाईट वाटतं आहे ,पण खरचं माझ्यावर विश्वास ठेवा मी जे काही करत आहे ,ते केवळ तुमच्या प्रेमाखातर ,आम्हाला तुम्ही हवे आहात

आई- आता हे कसं काय, कळेल का मला

प्रांजल- बसा इथे मी सांगते तुम्हाला काय ते

आई बसतात ,चंचल तिथेच त्यांच्या पायाजवळ बसते आणि हात हातात घेते ,त्या तिच्याकडे पाहतात.

प्रांजल- आई मला अक्षयने सांगितल आहे की ,लग्न झाल्यावर घरातल्या जबाबदा-यांमुळे तुम्हाला तुमचे छंद जोपासता नाही आले ,बाबा असेपर्यंत तुम्ही एकत्र कुटुंबात सगळ्यांच केलं, बाबा गेले ,तश्या तुम्ही खूपच एकट्या पडल्या ,तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी शिवणकाम करून घरातली सगळी काम करत होत्या,कारण घरातल्यांना तुमच्या मुलांच ओझं नको वाटायला.

तरी अक्षयच्या काकी लोकांचे तुम्हाला टोमणे ऐकायला लागायचे ते वेगळेच ,सगळं तुम्ही हसत सहन केलं आणि आता आयुष्याच्या या वळणावर सगळं व्यवस्थित असताना परत तुम्ही या सगळ्यात अडकून नको पडायला असं मला वाटतं.

तुम्हाला भजनाला जायला आवडतं,तेवढच बाहेर गेल्यावर तुम्हालाही बरं वाटेल,इतके दिवस मी घरात होते ,आता मी ऑफिसला जायला लागल्यावर ,मला कधी उशीर होईल,मावशी असल्या म्हणजे तुम्हाला पण टेन्शन राहणार नाही ,शिवाय तुम्हाला बिपीचा त्रास आहे ,कुणी तरी तुमच्या बरोबर घरात असेल तर आम्हांला टेन्शन राहणार नाही.तुम्हाला ना मला देव दर्शनाला पाठवायची इच्छा आहे ,जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला ताईंकडे किंवा दुस-या कुणा नातेवाईकांकडे जायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच बंधन राहणार नाही.

आई-अगं मला हे सगळं बंधन नाही वाटत 

प्रांजल- आईच्या शेजारी आजी राहायच्या ,त्या काकूही जॉब करायच्या , काकूंना मूलं झाल्यावर तर त्या पूर्ण पणे अडकून पडल्या,त्यांना कधी कुठं जायचं असेल तर जाता नाही यायचं , आतापर्यंत मुलांमध्ये आणि नंतर नातवंडामध्ये अडकल्या गेल्या. नेहमी आजीला सांगायच्या ,सून आली की बरंच काही करायचं असं ठरवलं होतं पण परत नातवंडामध्ये कसे दिवस चालले आहे ते समजत नाही,त्यांच सगळं करताना आनंद मिळतो पण विचार केला की,असं वाटत स्वत: साठी जगायचं राहूनच गेलं,त्याचवेळी मी ठरवलं होतं की मी माझ्या सासूला असं बंधनात नाही अडकवणार , तुम्ही तुमचं आयुष्य थोडसं आपल्या मनाप्रमाणे जगलात ना ,तर माझ्या निर्णयाचं सार्थक होईल,जगाल ना आई स्वत:साठी,काढाल ना वेळ स्वत:साठी, मागे त्या काकी देवदर्शनाला जाऊन आल्या ,तेव्हा तुम्ही बोललेल्या ,माझीही इच्छा आहे ,बघू देव कधी बोलावतो ते ,मग आता तुम्हाला देवही बोलावत आहे ,मग जाणार ना

असं म्हणत तिने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवले,तसं आईंच्या डोळयातून पाणी आलं आणि ते पाणी प्रांजलच्या हातावर पडलं ,तसं तिने वर बघितलं तर आईंनी दोन्ही हात पुढे केले आणि नि:शब्द होऊन एकमेकींना मिठी मारली.

अशी सून प्रत्येकाला मिळाली पाहिजे ,असं म्हणत त्यांनी तिच्या डोक्याचं चुंबन घेतले.

जर ही कथा सगळ्यांना आवडली असेल तर वाचत रहा,हसत रहा,आनंदी रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.