होते कुरूप वेडे
भाग -3 अंतिम
भाग -3 अंतिम
उज्वला बघत होती ज्या मुलांनी तिला नाकारले त्यांनी खूबसूरत देखण्या मुलींशी विवाह केले. पण काही दिवसातच मुखवटे गळून पडले खरा चेहरा समोर आला.
' अब पछताये होत क्या चिडिया चुग गई खेत'
अशी त्यांची अवस्था झालेली.
' अब पछताये होत क्या चिडिया चुग गई खेत'
अशी त्यांची अवस्था झालेली.
याच्याकडूनही तिला अपेक्षा नव्हतीच. पण एक दिवस त्याने आपण होऊन तिला विचारले,
" जीवनाचा साथीदार म्हणून मी आवडेल तुला? "
तिच्यासाठी ते अनपेक्षित होते. ते वाक्य तिच्या मनाला सुखावून गेले. ती लाजली.
तेव्हा काहीच बोलली नाही या विषयावर नंतर बोलू म्हणून तिने वेळ निभावून नेली.
तिच्यासाठी ते अनपेक्षित होते. ते वाक्य तिच्या मनाला सुखावून गेले. ती लाजली.
तेव्हा काहीच बोलली नाही या विषयावर नंतर बोलू म्हणून तिने वेळ निभावून नेली.
पण मनातून तिलाही तो आवडतच होता.
नंतर दोघांनीही आपापल्या घरची परिस्थिती आणि भूतकाळ एकमेकांसमोर उघड केला.
नंतर दोघांनीही आपापल्या घरची परिस्थिती आणि भूतकाळ एकमेकांसमोर उघड केला.
दोघेही सहमत झाले लग्न करण्यासाठी.
त्याने त्याच्या घरी आणि उज्वलाने आपल्या आई-वडिलांनाही सांगितले. दोघांचीही निवड योग्य पाहून दोघांच्याही घरून कोणताच विरोध झाला नाही.
त्याने त्याच्या घरी आणि उज्वलाने आपल्या आई-वडिलांनाही सांगितले. दोघांचीही निवड योग्य पाहून दोघांच्याही घरून कोणताच विरोध झाला नाही.
लग्नाची तारीख ठरली लग्न अगदी साधेपणाने करायचे होते. आवश्यक ती खरेदी झाली.
पण....
'दैव देते आणि कर्म नेते' अशी म्हण आहे आपल्याकडे.
स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी म्हणून तो गाडीवर बाहेर गेला आणि त्याला एका फोर व्हीलर ने ठोकले डोक्याला जबर मार लागला. सगळे उपाय
नाकाम ठरले. शेवटी तो हे जग सोडून गेला.
उज्वला पुन्हा एकाकी झाली.
आता तर लोकांनी शिक्कामोर्तबच केले की ही मुलगी फक्त कुरुपच नाही तर अवलक्षणी आहे.
आई वडील काळजीने खंगून गेले होते. उज्वला त्यांचा आधार बनली. उज्वलाने लग्नाचा विचार डोक्यातून अगदी दूर केला होता. आणि तिने आई-बाबांनाही समजावले होते.
पण काही जणांच्या जीवनात भाग्ययोग उशिरा असतात.
तिचा सदतीसावा वाढदिवस. शाळेतील मुलींनी साजरा केला. ती विद्यार्थिनींची खूप लाडकी होती.
शाळेच्या मुख्याध्यापकांना खूप कौतुक वाटले.उज्वला त्यांना खूप आवडायची ते तिच्या आंतरिक गुणांवर फिदा होते.
ती खूप सालस आणि कामसू होती. मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेमध्ये त्यांच्या शाळेला उज्वलाच्या उत्तम कामगिरीमुळेच खरे तर प्रथम क्रमांक मिळाला होता. शालेय शिक्षणाबरोबरच तिने विद्यार्थीनीना खेळ व क्रीडा, वक्तृत्व, वादविवाद गायन या सर्वच क्षेत्रात त्यांच्यातील गुण ओळखून प्रोत्साहन देत घडविले होते.
पण....
'दैव देते आणि कर्म नेते' अशी म्हण आहे आपल्याकडे.
स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी म्हणून तो गाडीवर बाहेर गेला आणि त्याला एका फोर व्हीलर ने ठोकले डोक्याला जबर मार लागला. सगळे उपाय
नाकाम ठरले. शेवटी तो हे जग सोडून गेला.
उज्वला पुन्हा एकाकी झाली.
आता तर लोकांनी शिक्कामोर्तबच केले की ही मुलगी फक्त कुरुपच नाही तर अवलक्षणी आहे.
आई वडील काळजीने खंगून गेले होते. उज्वला त्यांचा आधार बनली. उज्वलाने लग्नाचा विचार डोक्यातून अगदी दूर केला होता. आणि तिने आई-बाबांनाही समजावले होते.
पण काही जणांच्या जीवनात भाग्ययोग उशिरा असतात.
तिचा सदतीसावा वाढदिवस. शाळेतील मुलींनी साजरा केला. ती विद्यार्थिनींची खूप लाडकी होती.
शाळेच्या मुख्याध्यापकांना खूप कौतुक वाटले.उज्वला त्यांना खूप आवडायची ते तिच्या आंतरिक गुणांवर फिदा होते.
ती खूप सालस आणि कामसू होती. मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेमध्ये त्यांच्या शाळेला उज्वलाच्या उत्तम कामगिरीमुळेच खरे तर प्रथम क्रमांक मिळाला होता. शालेय शिक्षणाबरोबरच तिने विद्यार्थीनीना खेळ व क्रीडा, वक्तृत्व, वादविवाद गायन या सर्वच क्षेत्रात त्यांच्यातील गुण ओळखून प्रोत्साहन देत घडविले होते.
ही गोष्ट मुख्याध्यापकांच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यामुळे एक दिवस त्यांनी तिला सरळ विचारले, " माझ्याशी लग्न करशील? "
आता ती लाजली नाही तिने त्यांना सरळ म्हटले, " माझ्या हो किंवा नाही या उत्तराआधी मी जे काय सांगते ते ऐकून घ्या. मग निर्णय ठरवा. "
उज्वलाने त्यांना आपला इतिहास सांगितला दहा मुलांचा नकार पचवलेली मी आता दुधाने तोंड पोळल्याने ताकही फुंकून पिते.
पण तो केवळ उच्चशिक्षित नव्हता तर त्याला उच्च विचाराची जोड होती.
आता ती लाजली नाही तिने त्यांना सरळ म्हटले, " माझ्या हो किंवा नाही या उत्तराआधी मी जे काय सांगते ते ऐकून घ्या. मग निर्णय ठरवा. "
उज्वलाने त्यांना आपला इतिहास सांगितला दहा मुलांचा नकार पचवलेली मी आता दुधाने तोंड पोळल्याने ताकही फुंकून पिते.
पण तो केवळ उच्चशिक्षित नव्हता तर त्याला उच्च विचाराची जोड होती.
तो म्हणाला, " उज्वला गाढवाला गुळाची चव काय ? "
आणि लवकरच ते दोघे एका साध्या समारंभात विवाहबद्ध झाले.
उज्वलाने जेव्हा आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात बघितले तेव्हा तिच्या लक्षात आले इतरांच्या नजरेत जरी मी एक कुरूप वेडे पिल्लू असेल पण नवऱ्याच्या नजरेत ती एक राजहंस ठरली होती.
समाप्त
©®शरयू महाजन
आणि लवकरच ते दोघे एका साध्या समारंभात विवाहबद्ध झाले.
उज्वलाने जेव्हा आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात बघितले तेव्हा तिच्या लक्षात आले इतरांच्या नजरेत जरी मी एक कुरूप वेडे पिल्लू असेल पण नवऱ्याच्या नजरेत ती एक राजहंस ठरली होती.
समाप्त
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा