Login

होते कुरूप वेडे भाग-2

सामान्य मुलीची कथा
होते कुरूप वेडे
भाग- 2

उज्वलाचे शिक्षण पूर्ण झाले होते. ती एम. ए.बी. एड. झाली होती इंग्रजी विषय घेऊन.
तिला पाहायला मुलं येत आणि तिचा खडबडीत चेहरा पाहून नकार देत. आजवर असे आठ दहा वेळा झाले असेल. हे ती सारखं पचवत होती. शेवटी तिने मनाशी ठरवले होते आता हे प्रदर्शन बंद.
पाहुणे येणार म्हटले की आई म्हणायची, "उजु, तयार हो बेटा. आदल्या दिवशी पासून मागे लागायची फेशियल करून ये मेकअप कर."
चेहऱ्यावर फेशियलचे थर मेकअपचे मुखवटे चढवून लग्नाच्या बाजारात उभे रहा तर मागणी.

उज्वलाला हे अजिबात पटत नव्हते. जे जसं आहे तसं आहे ते बदलणार नाही.
तिला दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे वाटायचे. आणि ते बरोबरही होते पण आजकाल रूप पाहूनच लग्न ठरतात.
तिला ते मान्य नव्हते तिने आई बाबांना सरळच सांगून टाकले होते,
" मी जशी आहे तशीच राहील तसे जर कोणी स्वीकारणार असेल तरच मी लग्न करणार नाहीतर मी तशी राहायला तयार आहे. "

यापुढे हे 'प्रदर्शन' बंद.

आई-वडिलांनी खूप समजावून बघितले पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती.
आता तिच्या पाठोपाठ लहान बहिण अंकिता ही लग्नाला आलेली.
आता आई-वडिलांना अधिकच काळजी वाटू लागली.

पण उज्वला तिच्या निर्णयावर ठाम होती.आणि तिने आई-वडिलांना आग्रह करून तिचा पिच्छा सोडून देऊन अंकिता साठी स्थळ बघायला सांगितले.
योग्य स्थळ बघून अंकिताचाही विवाह संपन्न झाला.
आता उज्वला निश्चिंत झाली होती. तिला एका शाळेत परमनंट नोकरी सुद्धा लागली होती.
तिने लग्नाचा विषय डोक्यातूनच काढून टाकला होता.तिने तिचं एक वेगळं विश्व निर्माण केलं होतं आणि त्यात ती रममान सुद्धा झाली होती.

पण एका घटनेने कलाटणी दिली उज्ज्वलच्या जीवनाला.
तिच्या जीवनात एक पाय थोडा आखूड असलेला अर्थात एका पायाने अधु म्हणूयात आपण असा एक तरुण शिक्षक आला.

उज्वलाच्या शाळेची ट्रिप एकदा एका धबधब्याला भेट द्यायला गेली असता उज्वला तिथल्या निसरड्या दगडावरून पाय घसरून पडली. तेव्हा ह्याच एक पाय आखूड असलेल्या शिक्षकाने तिला हात देऊन उभे केले. ती लंगडत चालत असता ह्याच शिक्षकाने तिला आपल्या एका पायाच्या आधारावर काठावर आणले.
त्याच दिवशी उज्वलाचे मन त्याच्यावर जडले होते.
पण आपल्यासारखी कुरूप तरुणी कुणाला आवडणार?
हा न्यूनगंड तिच्या मनात होता.

तिने त्याच्या प्रति धन्यवाद व्यक्त केले त्यावेळी प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,
"मॅडम धन्यवाद कशाबद्दल मी तर माझं कर्तव्य बजावलं. तुम्हाला कधी मदत लागली तर नक्की सांगा मला कोणताही संकोच बाळगू नका "
ते रोजच शाळेत भेटायचे पण या घटनेनंतर त्यांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
उज्वला त्याच्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकायची तर तिला जाणवायचं की तोही आपल्याकडेच बघतोय.
क्रमश:भाग -3 मधे.
त्या दोघांचं लग्न होतं का की काय अडसर येतो उज्वलाच्या जीवनात काय घडामोडी घडतात बघूया पुढच्या भागात
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all