हाराकिरी भाग ५
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, समीर, शेखर, रोहित आणि राहुल या चौघांभोवती संशयाची सुई वळवळत आहे. राहुलने जी माहिती सांगितली त्याआधारे इन्स्पेक्टर राघव तपासाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आता पुढे....
इन्स्पेक्टर राघव सूर्यवंशीसाठी तपासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला होता. मेघनाच्या मृत्यूमागील गूढ जसजसे उलगडत गेले, तसतसे एका मोठ्या कटाची आणि नातेसंबंधांच्या गुंतागुंतीची त्याला जाणीव झाली. समीर सावंत, शेखर नाईक, रोहित वर्मा, आणि राहुल देशमुख—प्रत्येकाच्या भूमिकेने प्रकरणाला नव्या दिशेने नेले होते. आता शेवटी सत्य शोधून काढण्यासाठी राघवने सर्व पुरावे आणि साक्षींना एकत्रित करून सर्व साखळ्या एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला.
समीर सावंतच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या लॅपटॉपवर सापडलेल्या ई-मेल्स आणि फायलींनी मेघनाला मिळालेल्या धमक्यांवर प्रकाश टाकला. त्याच्या फाईल्समध्ये मेघनाने गोळा केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची माहिती होती. एका ई-मेलमध्ये समीरने स्पष्टपणे लिहिले होते,
“तुझे आयुष्य माझ्या हातात आहे. तोंड उघडलेस तर परिणाम गंभीर होतील.”
“समीर, तुझा खेळ संपलाय,” राघवने ठामपणे सांगितले.
“मी तिला फक्त घाबरवायचे ठरवले होते, पण तिचा खून करायचा माझा अजिबात हेतू नव्हता,” समीर म्हणाला.
“तू तिला संपवण्याची धमकी दिली होतीस. त्यामुळे तिच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस.” राघवने उत्तर दिले.
“मी तिला फक्त घाबरवायचे ठरवले होते, पण तिचा खून करायचा माझा अजिबात हेतू नव्हता,” समीर म्हणाला.
“तू तिला संपवण्याची धमकी दिली होतीस. त्यामुळे तिच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस.” राघवने उत्तर दिले.
इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेर्याने तपासाला नवीन दिशा दिली. या कॅमेर्यात, रात्रीच्या वेळेस शेखर नाईक मेघनाच्या फ्लॅटच्या जवळ जाताना दिसत होता. त्याचा चेहरा स्पष्ट होता आणि त्याने हातात एक पिशवी धरली होती.
“शेखर, तुझी साक्ष खोटी आहे. आता खरं काय आहे, ते सांग,” राघवने त्याला विचारले.
“साहेब, मी तिथे गेलो होतो. पण मी तिला फक्त शांत करण्याचा प्रयत्न केला. तिचा खून करायचा माझा हेतू नव्हता,” शेखरने घाबरत उत्तर दिले. शेखरच्या घराची झडती घेण्यात आली.
“साहेब, मी तिथे गेलो होतो. पण मी तिला फक्त शांत करण्याचा प्रयत्न केला. तिचा खून करायचा माझा हेतू नव्हता,” शेखरने घाबरत उत्तर दिले. शेखरच्या घराची झडती घेण्यात आली.
तपासात मेघनाच्या गळ्याभोवती व कपड्यांवर सापडलेले सूक्ष्म रेशमी धागे शेखरच्या त्यावेळी परिधान केलेल्या कपड्यांशी जुळल्यामुळे त्याच्या या वक्तव्याला कुठलाही आधार उरला नाही.
मेघनाच्या मोबाईल मधील आणखी एक महत्त्वाचा पुरावा उघड झाला. खरं तर हा पुरावा शोधणे इन्स्पेक्टर राघव विसरुन गेला होता. तिच्या फोनमधील रेकॉर्डिंग.... हे रेकॉर्डिंग तिच्या मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वीचे होते. त्यात तिच्यात आणि समीर सावंत यांच्यात झालेला संवाद होता.
“तू जर हा गैरव्यवहार उघड केलास, तर तुझे भविष्य नष्ट होईल,” समीरने धमकी दिली होती.
“तू कितीही धमक्या दिल्यास तरी मी थांबणार नाही,” मेघनाने ठामपणे उत्तर दिले होते.
“तू जर हा गैरव्यवहार उघड केलास, तर तुझे भविष्य नष्ट होईल,” समीरने धमकी दिली होती.
“तू कितीही धमक्या दिल्यास तरी मी थांबणार नाही,” मेघनाने ठामपणे उत्तर दिले होते.
हे रेकॉर्डिंग समीरच्या गुन्ह्याला अधिक बळकटी देणारे ठरले.
राघवने शेखरला थेट विचारले,
“तू तिथे गेल्यावर काय घडले?”
शेखर घामाघूम झाला. शेवटी, त्याने सगळे सांगितले.
“साहेब, मी तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती ऐकतच नव्हती. म्हणून मी तिला घाबरवण्यासाठी फास तयार करून तिच्या गळ्याभोवती टाकला. मला तिला फक्त घाबरवायचे होते. ती माझ्याशी वाद घालताना माझे लक्ष तिच्या बडबडीकडे होते. ती तो फास गळ्यातून काढून टाकण्यासाठी झटापट करु लागली. त्यावेळी तो फास चुकून अचानक जोरात ओढला गेला आणि त्या गडबडीत फास तिच्या गळ्याभोवती आवळला गेला. जे काही घडले ते इतके अचानक घडले की मी खूप घाबरलो. मग तिला तसेच सोडून मी घाबरून पळून आलो.”
“तू तिथे गेल्यावर काय घडले?”
शेखर घामाघूम झाला. शेवटी, त्याने सगळे सांगितले.
“साहेब, मी तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती ऐकतच नव्हती. म्हणून मी तिला घाबरवण्यासाठी फास तयार करून तिच्या गळ्याभोवती टाकला. मला तिला फक्त घाबरवायचे होते. ती माझ्याशी वाद घालताना माझे लक्ष तिच्या बडबडीकडे होते. ती तो फास गळ्यातून काढून टाकण्यासाठी झटापट करु लागली. त्यावेळी तो फास चुकून अचानक जोरात ओढला गेला आणि त्या गडबडीत फास तिच्या गळ्याभोवती आवळला गेला. जे काही घडले ते इतके अचानक घडले की मी खूप घाबरलो. मग तिला तसेच सोडून मी घाबरून पळून आलो.”
शेखरने कबूल केले की, तो समीरच्या आदेशावरून तिथे गेला होता. मात्र, मेघनाचा मृत्यू अपघाताने झाला होता.
तपासात समोर आले की, मेघनाच्या ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा सुरू होता. समीर सावंत आणि त्याचे काही सहकारी कंपनीच्या निधीतून मोठ्या रकमा वळवून वैयक्तिक फायद्यासाठी वापरत होते. मेघनाच्या हे लक्षात आले, म्हणून तिने यावर कारवाई करण्यासाठी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
तिच्या या जिद्दीमुळेच तिला आपला जीव गमवावा लागला.
तिच्या या जिद्दीमुळेच तिला आपला जीव गमवावा लागला.
खून झाला आहे हे स्पष्ट झाले होते. खुनीही सापडला होता, तरीही एक प्रश्न अनुत्तरित होता. झटापटीत अचानक फास आवळला गेला याची शेखरने कबुली दिली होती. मग सकाळी जेव्हा मावशींनी दार उघडले तेव्हा मेघना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत कशी होती?
राघवने हा प्रश्न शेखरला विचारला.
सुरवातीला शेखर गडबडला, पण आता सत्य लपवण्यात अर्थ नाही हे त्याला समजले. त्याने सांगितले की,
" समीरला त्याने तिथूनच फोन केला व घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून समीरने त्याला खूप बडबड केली. नंतर तो म्हणाला, तू तिथेच थांब, मी दहा मिनिटांत पोहोचतो. मी कसातरी तिथे थोडावेळ थांबलो. समीर साहेब आल्यावर आम्ही दोघांनी मिळून मेघनाला पंख्याला लटकवले, जेणेकरून तिने आत्महत्या केली आहे असा भास व्हावा. त्यानंतर आधी समीर साहेब बाहेर पडले व पाच मिनिटांच्या अंतराने मी बाहेर पडलो."
राघवने हा प्रश्न शेखरला विचारला.
सुरवातीला शेखर गडबडला, पण आता सत्य लपवण्यात अर्थ नाही हे त्याला समजले. त्याने सांगितले की,
" समीरला त्याने तिथूनच फोन केला व घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून समीरने त्याला खूप बडबड केली. नंतर तो म्हणाला, तू तिथेच थांब, मी दहा मिनिटांत पोहोचतो. मी कसातरी तिथे थोडावेळ थांबलो. समीर साहेब आल्यावर आम्ही दोघांनी मिळून मेघनाला पंख्याला लटकवले, जेणेकरून तिने आत्महत्या केली आहे असा भास व्हावा. त्यानंतर आधी समीर साहेब बाहेर पडले व पाच मिनिटांच्या अंतराने मी बाहेर पडलो."
शेखर नाईकला खुनासाठी दोषी ठरवण्यात आले. त्याच्या कबुलीनंतर न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. शेखर नाईकचा जबाब समीरसाठी त्रासदायक ठरला. हत्या झालेली माहीत असून आत्महत्या आहे असे भासवण्याचा त्याने प्रयत्न केला होता. समीर सावंतला मेघनाच्या खुनाचा कट रचल्याबद्दल आणि कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारासाठी अटक करण्यात आली. त्याच्या विरोधातील पुराव्यांमुळे त्याला दीर्घकालीन कारावासाची शिक्षा झाली.
प्रकरण संपले होते. दोषींना शिक्षा झाली होती. राघवच्या मनात एकच विचार घर करून बसला होता.
“जर कोणी वेळीच मेघनाला साथ दिली असती, तिच्या सुरक्षिततेसाठी पुढे पावलं उचलली असती, तर कदाचित तिचे आयुष्य वाचवले गेले असते. किमान रोहितने तिला मदत करायला हवी होती. ”
राघवने आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत सांगितले,
“सत्य उघड होण्यास वेळ लागतो, पण न्याय मिळाला की अनेक आयुष्यं बदलतात. मात्र, तोपर्यंत किती आयुष्य उद्ध्वस्त होतात, ही देखील विचार करायला लावणारी गोष्ट आहे.”
“सत्य उघड होण्यास वेळ लागतो, पण न्याय मिळाला की अनेक आयुष्यं बदलतात. मात्र, तोपर्यंत किती आयुष्य उद्ध्वस्त होतात, ही देखील विचार करायला लावणारी गोष्ट आहे.”
मेघनाचे जीवन संपले, पण तिच्या धैर्यामुळे सत्य बाहेर आले. तिच्या प्रयत्नांमुळे एक मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला आणि सर्व दोषींना शिक्षा झाली.
अखेर सत्य जिंकले होते, पण एका निर्दोष आयुष्याचा बळी गेला होता. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे साहस फक्त काहीजणांमध्येच असते. सत्यासाठी जीवाची बाजी लावणारे अमर होतात. कंपनीने मेघनाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला पन्नास लाखांची मदत केली व कंपनीतील दहा टक्के शेअर्स तिच्या कुटुंबाच्या नावे केले. मेघनाच्या कृतीसाठी कंपनीने दिलेले शौर्यपदक तिच्या कुटुंबियांनी घराच्या दिवाणखान्यात सन्मानाने लावले होते.
समाप्त.©® सौ. हेमा पाटील.
समाप्त.©® सौ. हेमा पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा