असेच दोन तीन दिवस गेले. माईंचा अबोला संपत नव्हता. सरला पण शिवणाच्या क्लास मध्ये गर्क झाली. शशांकच्या म्हणण्याप्रमाणे जास्त लक्ष न देण्याचं ठरवलं. अर्थात, दुर्लक्ष करणं तिला कठीण जात होतं. पण करणार तरी काय? आता स्वैपाकाची जबाबदारी तिने स्वतःकडे घेतली. एकदोन वेळा पूर्ण दूध उतू गेलं तरी माईचं लक्ष गेल नाही. अशा अवस्थेत तिच्यावर कोणतीच जबाबदारी न देणं बरं असं तिला आणि शशांकलाही वाटलं. जास्त खोलात शिरूनही माईंच्या या अवस्थेचं कारण त्यांना सापडत नव्हतं. सीताराम सारख्या लोकांना सांगण्यात अर्थच नव्हता. त्यानी लगेचच मांत्रिक आणला असता. स्वतः बाबासाहेब तर असल्या उपायांची भंबेरी उडवीत. कोणाला सांगायचं?..... तिला समजेना. तात्याला सांगाव का? तो नुकताच नाराज होऊन गेला होता. त्यानी लक्ष नाही दिल तर आपलीच पंचाईत व्हायची. मग तिला एकदम दरेकर डॉक्टरांची आठवण झाली. ती दुसऱ्याच दिवशी क्लासहून येताना म्हणजे साडेबारा एक चा सुमार असेल तेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यात शिरली. दवाखान्यात कोणीच नव्हतं. कंपाउंडर पण नव्हता. डॉक्टर आतल्या खोलीतल्या खिडक्या बंद करीत होते. बहुतेक दवाखाना बंद होण्याच्या वेळेला आपण आलो. असं वाटून ती थोडी शरमली. डॉक्टरांना मागे वळून पाहताच ती दिसली. ते म्हणाले " अरे सरला, ये. ये. काय ग इकडे कशी? आणि आजारी कोण आहे? बरं नाही का? " ती त्यांच्या समोरच्या खुर्चित बसली. प्रथम ती काहीच बोलली नाही. नक्की सांगावं तरी कसं? तिला उमजेना. मग ती म्हणाली, " डॉ. मी ठीक आहे, पण माई.... " असं म्हणून ती थांबली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. डॉ. घाबरून म्हणाले, " काय झालं माईना? बी. पी. वगैरे वाढलं का?.... " मग तिने माईच्या वागण्यातला बदल सांगितला. तिला आलेली शंकाही तिनी बोलून दाखवली. त्यावर गंभीर विचार करून डॉ. म्हणाले, " हे बघ सरला, खर तर ही माझ्या विषयातली केस नाही. पण अनुभवावरून एवढच सांगतो की माईंना अगदी मायनर पण वेडाचा झटका आला असावा. मी चुकतही असेन. पाहिल्याशिवाय मला काही सांगता येणार नाही. पण त्यांना कसलतरी दडपण आलेलं असावं. मी उद्या येऊन बघून जाईन. मग बोलेन काय ते. " मग त्यांनी इतरही औपचारिक चौकश्या केल्या. ती घरी गेली.
गोळीचा परिणाम होऊ लागला.................................
समोरच्या माठातलं पाणी त्यांच्या तोंडात ओतलं. त्यांचं शरीर आस्ते आस्ते ढिलं पडलं. आणि त्यांना एक प्रकारची सुस्ती आली. मग तिनी त्यांना कसतरी ओढत दिवाणखान्यात आणलं आणि सतरंजीवर झोपवलं....... आता तिनी सुटकेचा निश्वास टाकला. कपाळावर आलेला घाम पुसत ती थोडावेळ तिथेच बसली. मग तिला सांडलेलया गोळ्यांची आठवण झाली. स्वैपाकघरात जाऊन तिनी त्या गोळा केल्या. शशांक आल्यावर प्रथम तो तात्याला फोन करायला गेला. खरंतर सरलाला आवडल नाही, पण दुसरं कोणाला सांगण्यापेक्षा तात्याला सांगणं बरं असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी तिनी माईला समजावलं आणि स्वतःच्या हातानी जेवायला घालून गोळी दिली. माईनी झोपण्यापेक्षा भिंतीला टेकून बसणं पसंत केलं. त्या दिवशी माई अचानक शहाण्यासारखी वागली. म्हणजे ही सुधारू शकते अशी आशा सरलाला वाटू लागली. एक दोन दिवसानी ती डॉ. दरेकराकडे गेली. ते म्हणाले, " माझ्या ओळखीचे एक मनोवैज्ञानिक आहेत त्यांना मी एकदा बधून जायला सांगतो. म्हणजे आपल्याला हे किती गंभिर दुखणं आहे ते कळेल. ते उपायही सांगतील. त्यांचा विशेष म्हणजे ते विनाकारण औषधं देत नाहीत तर रोग्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचाही ते अभ्यास करून उपचार करतात. "..... त्यावर चार पाच दिवस गेले.
हे सगळं फार हाताबाहेर गेलय असं समजण्याचं कारण नाही. या गोळ्या दे आणि मला एक आठवड्यानंतर कळव. तसच काही खास घडलं, तर आधी कळवलस तरी चालेल. असं म्हणून दरेकर आणि सोबती गेले.
मे महिना चालू झाल. उन्हाचे चटके चांगलेच वाढले. सरलानी तिचा क्लास संध्याकाळचा करून घेतला. त्यामुळे ती पाच वाजता जाऊन साडेसहा पर्यंत परत येऊ लागली. माई जवळ जवळ महिना दीड महिना घराबाहेर पडल्याच नव्हत्या. सरलाच्या मनात आलं तिला घेऊन बाहेर जावं. म्हणजे जरा बरं वाटेल. पण माई अजूनही तेवढी ठीक नव्हती जेवढी बाहेर जायला ठीक असायला हवी. शशांक एक दिवस तिला म्हणाला, " जून मध्ये कोर्टाची तारीख आहे. माई कशी काय जाणार? " त्यावर ती म्हणाली, " एवढं काय त्यात, जातील की वाडेकर, नाही तर आपण जाऊ. " सध्या शशांकचं बरं चाललं होतं. मनापासून काम करीत असल्याने तो आता त्याच्या मालकाचा आवडता झाला होता. हळू हळू त्याच्यावर ऑडिटची जबाबदारी टाकली गेली. ज्यानी त्याला लावला होता, त्याच्याकडून समजलं, की त्यानी जर असच काम केलं तर त्याला एक दोन महिन्यात पूर्ण वेळ कामावर ठेवलं जाईल, आणि अर्थातच त्याचा पगारही वाढेल.............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा