पुस्तकाचे नाव:- "जेंटली फॉल्स द बकुला."
लेखिका:- सुधा मूर्ती
लेखिका:- सुधा मूर्ती
जेंटली फॉल्स द बकुला(gently falls the bakula)
ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पेशाने अभियंत्रिकी पद्मभूषण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सुधा मूर्ती. पुस्तकाचे मुखपृष्ठ ह्यात दक्षिण पद्धतीची वेगळ्या थाटणीची रांगोळी काढलेली दिसते म्हणजे ते कथेचे स्थळ दर्शवते तसेच हातात पुस्तक असलेली स्त्री म्हणजे जिला वाचण्याची आवडत आहे हे सुद्धा निरीक्षण केल्यावर समजते. म्हणजेच हे पुस्तक स्त्रीवर आधारित असेल असा काहीसा अंदाज प्रथम दर्शनी मुखपृष्ठ पाहून येतो.
ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पेशाने अभियंत्रिकी पद्मभूषण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सुधा मूर्ती. पुस्तकाचे मुखपृष्ठ ह्यात दक्षिण पद्धतीची वेगळ्या थाटणीची रांगोळी काढलेली दिसते म्हणजे ते कथेचे स्थळ दर्शवते तसेच हातात पुस्तक असलेली स्त्री म्हणजे जिला वाचण्याची आवडत आहे हे सुद्धा निरीक्षण केल्यावर समजते. म्हणजेच हे पुस्तक स्त्रीवर आधारित असेल असा काहीसा अंदाज प्रथम दर्शनी मुखपृष्ठ पाहून येतो.
बकुळीचे फूल हे अत्यंत नाजूक आणि सुगंध देणारे असते तर त्याचा संदर्भ देण्या मागचे कारण म्हणजे स्त्रीचे जीवन हे असेच असते. श्रीमती आणि श्रीकांत ह्यांची कथा सांगणारे हे पुस्तक. हे दोघे एकाच वयाचे आणि एकाच शाळेत शिकणारे दोघांचे घरही अगदी बाजूला आणि त्या दोन घरांच्यामध्ये असलेले हे बकुळीचे झाड. पुढे त्यांचे शिक्षण होऊन लग्नही होते पण तेव्हाच श्रीमती ही हुशार असणारी तिच्या एका निर्णयाने तिचे आयुष्य कसे बदलते हे सांगण्याचा प्रयत्न करणारी स्त्री जीवनातील चढ-उतार दाखवणारी कथा.
प्रेम हे शेवटपर्यंत तसेच राहते असे नेहमी होतेच असे नाही. माणसाचा स्वभाव बदलतो आणि जास्त पैसे कमवत असताना आपण आपल्या माणसांना गृहीत तर धरत नाही ना आणि प्रत्येकाची आवड वेगळी असली तरी समोरच्याची ती समजून घेण्याची वृत्ती असणे का गरजेचे असते ह्या प्रश्नांची उत्तरे ह्यात नक्कीच वाचताना समजतात.
ज्या गोष्टींसाठी आपण सर्व आटापिटा करतो ते सुख जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्याचा आनंद घेताना आपला सहचर किंवा सहचारिणी सोबत असणे खूप महत्त्वाचे असते हा व असे अनेक संदेश देणारी ही सुंदर कथा आहे.
लेखिका सुधा मूर्ती ह्या नेहमीच आपल्या कथेतून वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून वाचकांना त्या विचार करायला भाग पाडतात.
कथेचा काळ जरी आताचा नसला तरी तेव्हा पडलेला प्रश्न आजही प्रत्येक स्त्री आपले घर आणि नोकरी सांभाळत आपल्या परीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असते हेच खरे!
ह्या पुस्तकातून दक्षिणेकडच्या संस्कृतीचे सुंदररीत्या लेखनातून चित्र रेखाटले आहे. तसेच एकत्र कुटुंब त्यात त्यांची शत्रूता बाबत असणारे विचार आणि नंतर आपल्या देशातील व बाहेरच्या देशातील संस्कृतीचा फरकही दिसून येतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असताना ती कोणत्या गोष्टींचा त्याग करते आणि त्यातून तिला काय प्राप्त होते हे सर्व खूप छान पद्धतीने आपल्या उत्तम लेखनशैलीतून सुधा मूर्ती ह्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
शेवटी हे पुस्तक प्रत्येक स्त्रीच्या मनात काही प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहत नाही की यशस्वी करिअर आणि सुखी वैवाहिक जीवन ह्यातील कोणती निवड बरोबर असेल? तसेच आपले करिअर सोडून देताना स्वतःच्या आर्थिक स्थैर्यासाठी न केलेला विचार आणि स्वतःच्या स्वाभिमान ह्याचा त्याग करणे योग्य आहे का? प्रत्येक मुलीने तर वाचावेच पण सर्वांनी वाचावे असे हे पुस्तक आहे.
© विद्या कुंभार
(हे पुस्तक इंग्रजी भाषेत वाचल्याने मी त्याचा मराठीत समीक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.)
ह्या समीक्षणाचे हक्क लेखिकेकडे आहेत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा