आठ ,दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आईला एका कामानिमित्त्य बाहेर गावला जावं लागलं , ती मला सांगून गेली टिवशनचे मुलं आले तर एक बँच घेऊन घेशील त्यांना घरी परत नको पाठवू . मला मुलांना शिकवायचं म्हणजे तारेवरची कसरत वाटते कारण मुलं ऐकतातही कुठं मला . सकाळी साडेसातला सातवीच्या मुलांची पहिली बँच चालू झाली . मी मुलांना मँथ्सचे काही equn समजवून सांगितले , म्हटलं आता तुम्ही साँल करून मला दाखवायला आणा . अपुर्वाचं लवकर साँल झालं आणि ती मला बुक घेऊन दाखवायला आणण्यासाठी उठली . ऐवढ्यात मुलांनी आवाज केला , मँडम अपुर्वाच्या ड्रेसमागे रेड पेंन्ट लागलाय .... मला काय घढलयं हे समजलं . तिला हाँल मध्ये जाऊन बसायला सांगितले . मुलांना equn देऊन मी तिच्याकडे गेले . तर ती रडत होती . कसंबस तिला समजवलं आणि बाथरूममध्ये जाऊन विस्पर लावायला सांगितलं . ती तिकडून आल्यानंतर म्हणे माझ्या बाँडी मधल्या वेन्स फुटल्यात , म्हणून असं होतय ना ! तिला असं काही नसतं it's normal process म्हणून सांगितलं . घरून तिला ह्याविषयी कधी माहिती मिळाली नसावी , शाळेतही 14वर्ष उलटून गेल्यानंतर syllabus मध्ये हा टॉपिक ठेवला आहे , मला वाटतं 10th च्या new syllabus मध्येही नाही disaster management सारखे टॉपिक टाकलेत पण ह्याविषयी नाही . डायरेक्ट 12 वीत Reproductive system ला 12 phase आहेत . सहावी सातवीच्या General science च्या पुस्तकात ह्याविषयी थोडीतरी information हवी होती म्हणेज मुलींना घरून आईकडून माहिती नाही मिळाली तरी वर्गात शिक्षकांकडून सजग होता आलं असतं , नंतर तिच्या आईला काँल करून माहिती दिली त्या म्हणे अर्धातासात येते . 8 चे 10 वाजले तरी त्या यायचा काही पत्ता नाही . मग दहाला परत त्या काँल करून म्हणाल्या , मँडम माझ्या घरी ब्राह्मण आलेत पुजा होती एक तास आमच्याकडे असं शिवाशीवीच विटाळाचं चालतं नाही ना , त्यात घरी पाहुने .... थोड्या वेळाने येते मी तिला तुमच्याकडे तेवढा वेळ बसू द्या . बघा त्या मुलीच्या आईला किती तिची काळजी होती , मी त्यांना म्हटलं तुमच्या मुलीच्या जीवापेक्षा देव येवढा श्रेष्ठ आहे का ? त्या म्हणाल्या तुम्हा आजकालच्या मुलींना देवाचं महत्त्व कळत नाही . जातांना दारात अपूर्वा तिच्या आईला म्हणते , आई माझं पोट खुप दुखतय तर त्या तिच्यावर ओरडूनच म्हणतात , गप्प बस्स तुला आजच व्हायचं होतं .... आता पाळी कधीही येणं हे का त्या मुलीच्या हातात असतं ?
दिवसभर हा टाँपिक माझ्या डोक्यातून गेला नाही . आता ती आईच मुलीला अशी रागवेल तर ती आपला त्रास कुणाला सांगेल ??? कधी बदलणार हे जग ठाऊक नाही ....