दुपारची वेळ होती . सगळे गप्पा मारत सोफ्यावर बसलेले होते . इतक्यात बाहेरचा गेट वाजण्याचा आवाज आला . काहीवेळाने दारात एक जण आल्याचं जाणीव झालं . श्रावणीचे बाबा उठले आणि पाहिले .
बाबा -" जावईबापू ... तुम्ही ?"
हे ऐकताच सगळ्यांच लक्ष तिकडं गेलं . श्रावणी चकित झालेली होती . किरणही स्तब्ध झालेला होता . दारातील व्यक्ती आत आला . श्रावणीची आई पुढे आली आणि म्हणाली .
आई -" बसा ना . "
श्रावणीला आता राग येऊ लागल होत .
श्रावणी -" बाबा ... "
ती ओरडली . तिच्या ओरडण्याने सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं .तिच्या ओरडण्याने तिचा नवरा बसलेला उठून बसला .
श्रावणी -" हे इथे काय करत आहेत ?"
बाबा -" माहिती नाही बेटा . मी नाही बोलावलं ."
श्रावणी -" मग कोण बोलवलं ? श्रद्धा ?"
ती श्रद्धाकडे वळली .
श्रद्धा -" मी पण नाही बोलवले ."
तिचा वाक्य संपणारच होता तेवढ्यात आई म्हणाली .
आई -" मी बोलावले ."
श्रावणी -" आई ... तू बोलावलीस ?"
आई -" हो ."
श्रावणी -" मला यांना बघायचं सुद्धा नाहीये ."
ती रागात पाय आपटत बाहेर जाऊ लागली . किरण आणि श्रद्धा तिच्या मागे जाऊ लागले . श्रावणी बाहेर येऊन बगीचेकडे गेली आणि तिथल्या झोपाळ्यावर बसली . किरण आणि श्रद्धा तिच्याजवळ गेले .
किरण -" अग श्रावणी . काय झालं ?"
श्रावणी -" काय झालं ???? बघितलास ना काय झालाय ते ? आई का बोलावली त्यांना ?"
ती रागातच बोलत होती .
किरण - " अगं काहीतरी कारण असेल ना ? तू न विचारताच आलीस ."
श्रावणी -" कसलं कारण ? आई त्यांच्यासोबत पाठवणार . मी चांगलं जगत असलेलं बघवत नाही वाटत ."
ती रागात बडबडत होती . इतक्यात मागून आवाज आला .
आई -" असं कस बघवणार नाही ."
सगळे मागे पाहिले तर श्रावणीची आई थांबली होती .
श्रावणी -" तू माझ्याशी बोलू नकोस आई ?"
आई -" अग ऐकून तर घे माझं ."
श्रावणी -" नाही ऐकून घ्यायचं आहे मला काहीही ..."
किरण - " अगं आई काय म्हणते ऐक तरी .."
श्रावणी शांत झाली . शांत झाली असली तरी तिचा राग अजून आहे तसाच होता .
आई -" लग्न म्हणल तिथे भांडण आलंच . म्हणून काय सोडून द्यायचं नसतं . आमच्यातही भांडण व्हायचे . म्हणून मी काय रागावले नाही किंवा सोडले नाही . संसार चालवायचा असेल तर कुणालातरी माघार घ्यावंच लागेल . त्याशिवाय संसार चालणार नाही . "
श्रावणी -" का म्हणून सहन करायचं सगळं ? फक्त संसारासाठी ? म्हणजे मला मारून टाकलं तरी सहन करायचं ? "
आई -" जीवन जगताना कोणीतरी सोबत असावं म्हणून .."
आई समजूतदारपणे म्हणाली .
श्रावणी -" नवऱ्यामुळेच जीवनात सोबती मिळते असं काही नाही आई . मित्र असतात , मैत्रीण असतात , आईबाबा असतात . या सगळ्यांमुळे सोबती मिळते ."
ती अजूनही रागात म्हणाली .
आई -" पण नवरा आयुष्यभर सोबत असतो ."
किरण -" बरोबर. अगं शांतपणे विचार कर श्रावणी ."
तो तस म्हणत असला तरी त्याच मन तिच्या प्रेमासाठी तडपडत होत .
श्रावणी -" किरण ... तू पण ? तू माझी परिस्तिथी पाहिला होतास ना ? कसं झालं ते ? "
श्रद्धा फक्त बघायची भूमिका करत होती .
श्रावणी -" तुम्हाला बोलून फायदा नाही ."
असं म्हणत ती पाय आपटत घराच्या आत मध्ये आली .तिथे तिचे बाबा आणि तिचा नवरा शांतपणे बसले होते . श्रावणीला येताना पाहताच दोघांचं लक्ष तिच्याकडं गेलं .
श्रावणी -" बाबा ... यांना येण्याचं कारण विचारा ."
ती राहुलकडे ( तिचा नवरा ) लक्ष न देता म्हणाली .
बाबा -" ऐकलं ना जावईबापू ."
राहुल -" हिला घ्यायला आलोय ."
त्याच्या वाक्यात वेगळीच पुरुषवृत्तीची भावना होती .
श्रावणी -" पण मी नाही जाणार बाबा .."
तेवढ्यात किरण , आई आणि श्रद्धा घरात आले .
श्रावणी -" किरण चल आपण जाऊयात ."
बाबा -" अगं असं का म्हणतेस ?"
श्रावणी -" मी एकाच अटीवर इथे आले होते कि एकाच दिवसासाठी येणार आणि परत सांगलीला जाणार ."
बाबा -" हो बेटा . पण ,..."
वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच ती म्हणाली .
श्रावणी -" ते काही नाही . मी चालले ."
ती बॅग घेतली आणि बाहेर जाण्यास तयार झाली .
श्रावणी -" किरण चल .."
किरण -" अगं जरा समझून घे ."
श्रावणी -" तू येणार आहेस का मी जाऊ ?"
किरण -" ठीक आहे ."
हे ऐकताच ती बॅग घेतली आणि घराच्या बाहेर पडली . तिची आई थांबवण्याचा प्रयत्न केली , पण ती उपयोगाला आली नाही . किरण अजून तिथेच थांबला होता . तो सर्वांकडे पाहिला आणि म्हणाला .
किरण -" तुम्ही काळजी करू नका . मी आहे . मी समझवतो तिला . मी फोन करेन . "
एवढ्यात बाहेरून श्रावणी ' किरण ' म्हणण्याचा मोठा आवाज आला . किरण बाहेर पाहिला ."
किरण -" ठीक आहे . मी जातो बाय .."
तो गडबडीतच बाहेर आला . बाहेर पडताच दोघेही रिक्षामध्ये बसले आणि स्टेशनच्या दिशेनी निघाले .
वाटेत श्रावणी अजून रागातच होती . ती रंगात बडबडत होती . किरणला गप्प बसण्याच्या पलीकडे पर्याय नव्हताच . स्टेशनला पोहचताच त्यांना कळालं कि ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलीय . ते गडबड करत तिकीट काढले आणि त्यांच्या सीटवर बसले .
किरण -" तुला वाटत नाही का तू राग जरा जास्तच दाखवली ?"
श्रावणी -" राग येणारच ना . मी कस काय शांत बसू . जेंव्हा तो मला इतकं त्रास देऊन निर्लजासारखं बसला होता. राग तर येणारच ना ."
किरण -" हो पण बाबांचा विचार करायला हवं होत ."
श्रावणी -" त्यांना पण कळू देत कि राहुल कसा आहे ते ?"
किरण -" काही पण काय बोलतेस ?"
श्रावणी -" खरंच बोलतेय मी .. आई मला अजून सहन घे म्हणाली . "
किरण -" बरं बाबा ... तू चांगलं केलस ."
ती रागात काहीही बडबडत होती . हे पाहून किरण शांत झाला . अखेर ट्रेन सुटलं . संध्याकाळच्या वातावरण ट्रेन अगदी मोकळी होती .
रात्रीची थंड हवा पून्हा एकदा श्रावणीच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते . पण तिच्या चेहऱ्यावर आता रंगाची भावना होती . काहीवेळाने ती झोपी गेली . किरण तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचार करू लागला कि कस श्रावणीला समझून सांगावं . स्वतःच्या प्रेमाला किंमत न देता तो फक्त तिच्या सुखांबाबत विचार करत होता .
अखेर पहाटे ट्रेन सांगलीला पोहचली . श्रावणीला उठवून किरण स्टेशनच्या बाहेर पडला . पहाटेच्या वेळी अगदी वर्दळ कमी होती . दोघेही रिक्षा करून अपार्टमेंटच्या खाली आले . हळू हळू ते वर जाऊ लागले . त्यांच्या घरासमोर आले . दोघेही खूप थकले होते . किरण दार उघडून पाहू लागला तर दार आधीच उघडा असलेल आढळलं .
किरण -" दार उघडाच आहे ."
दोघांनाही नवल वाटलं . दोघेही आत गेले आणि शिवानीला शोधू लागले . शिवानी आतमध्ये कुठेच नव्हती . त्यांना काळजी वाटू लागली . शेवटी ते शिवनीच्या फोनवर फोन लावले . फोन उचलण्यात आलं .
किरण -" हॅलो शिवानी .."
ती -" हॅलो .."
आवाज वेगळाच ऐकू आल्याने किरण म्हणाला .
किरण -" कोण बोलत आहे ."
ती -" मी केर हॉस्पिटलमधून नर्स बोलत आहे . त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आण्यात आलाय आणि ते आय . सि . यु मध्ये आहेत ."
किरण -" काय ????"
किरण थक्क झाला होता .
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच . आजारी असल्याने उशिरा भाग आला आहे . कस वाटल ते नक्की सांगा . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद .