वडिलांचे मुलास पत्र....

Preranadai msg

लेखक - अनामिक.                            
सुलेखन -  श्रद्धा मगर.            
एका वडीलांचा तारूण्यात प्रवेश करणाऱ्या मुलास महत्वपुर्ण संदेश
माझ्या लाडक्या मुला
मी जे पत्र तुला आज लिहितोय, .....
ते तु निट वाच आणि ठरव..!!!
हवे तर, हे पत्र तु सेव्ह करून ठेव

01)बेटा, जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाहीत. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोलायलाच हव्यात. 

02) मी जनम्दाता आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते कदाचित तुला इतर कुणीही कधीच सांगणार नाही.
 
03)मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास खुपच कमी होईल.
 
04)बेटा, प्रथम हे सतत लक्षात ठेव की, कधीही कोणत्याच माणसांविषयी मनात आकस ठेवू नकोस. कुणाचा ही द्वेष करू नकोस. तुझ्याशी सर्वांनी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी सक्ती आपण कुणावरही करू शकत नाही. त्यामुळे ते असंच का वागतात ? असं म्हणून कधीही तणतणू नकोस. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त तुझ्या आईबाबांचीच आहे. तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तर चांगलं वागच. परंतु जे तुझ्याशी तुसडेपणाने वागतात त्यांच्याशी देखील तु वाईट वागु नकोस. पण हे देखील कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट, कुठल्या ना कुठल्या हेतुपोटी करीत असतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगली वागतात त्यांना तु खरंच आवडत असशीलच असे ही नव्हे, हेतुपुर्तीसाठी कदाचीत ते असे वागु शकतात.
 तेव्हा माणसं जरा तपासून बघत जा. पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची कदापी ही घाई करू नकोस विश्वासघाताचा फटका बसु शकतो. 

05) जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुम्हाला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तुम्ही जीव तोडून प्रेम केलय ते तुमच्या आयुष्यातून निघून ही जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नसते. आणि कधीच थांबतही नाही.

06)आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज तु वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाऊ शकते. त्यापेक्षा आजच मनापासून, भरभरून जग, आनंदी रहा. आनंदी जगणं उद्यावर अजीबात ढकलु नकोस.

07)प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणे बदलते. ज्यांच्यावर तु जिवापाड प्रेम करतो ते समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतात. माझी आई म्हणजे तुमची आजी गेल्यानंतर मी कित्येक दिवस अस्वस्थ होतो. परंतु कालांतराने मी देखील सेट झालोच ना ? या करीता काळ हे सर्वोत्तम औषध आहे. हे मनावर बिंबव. सदैव लक्षात ठेव. 
प्रेमात पडला म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं कधीही समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खाला जास्त कवटाळून ही बसू नकोस.
 
08) अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झालेत. अशा कहाण्या तु वाचल्या असशील, पण याचा अर्थ असा नाही की, शिक्षण सोडलं की तु यशस्वीच होशिल. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे सदैव लक्षात ठेव, ते मिळवण्याचा प्रयास सातत्याने करा. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!

09)माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तुम्ही मला सांभाळावं, मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तेव्हा तु स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी नैतिक जबाबदारी. त्यानंतर तुम्हाला बसमधून फिरायचं की रोल्स राईस किंवा लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तुच घ्यायचाय.

10) आणखी शेवटचं एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, पण ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
                       
                     - तुझे बाबा