"उर्मी हे ऑफिस आहे आणि इथे फक्त ऑफिसची कामे होतात. पर्सनल बोलायला इथे काही गार्डन किंवा एखादा हॉल नाही. आम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्ट विषयी बोलत आहोत, तेव्हा तू आता इथून जा. मी तुला संध्याकाळी भेटायचं म्हणून मेसेज केला आहे ना. आपण संध्याकाळी भेटू. कामाच्या वेळी फक्त काम." हे अनीशचे बोलणे ऐकून तिला खूप राग आला आणि ती रागातच तिथून निघून गेली, पण जाताना अनुश्रीकडे एक तिरका कटाक्ष टाकला. ते अनीशच्या नजरेतून सुटले नाही.
उर्मी गेल्यानंतर अनुश्री अनीशला म्हणाली, "तू असं बोलायला नको होतास. अरे ती तुझी होणारी बायको आहे. तिचा तू आदर करायला हवा."
"होणारी बायको आहे ती, अजून लग्न झालेले नाही आणि तसंही मी तिच्याशी लग्न करणारच नाही, तर आदर करायचं प्रश्न येतोच कुठे? ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि मैत्रीणच राहील. मी तिच्याशी असंच बोलतो तू मला सांगायची काही गरज नाही. तुझं समोरचं काम बघ." असे म्हणून दोघेही काम करू लागले. काम करता करता वेळ कसा निघून गेला? हे त्यांना समजलेच नाही. संध्याकाळ होऊन गेली, तरी दोघेही कामच करत होते.
अनुश्रीने घड्याळ पाहिले आणि म्हणाली, "अरे बापरे! उशीर झाला. चला मी निघते." असे म्हणून ती उठून जाऊ लागली. इतक्यात अनीश उभा राहिला आणि तिला म्हणाला, "अनु, मला अशी सोडून जाऊ नकोस ना ग, तुला पाहिलं की मी सारी दुःख विसरून जातो.
भर उन्हात तू दिसताच
मी लाजेने घायाळ झालो
तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने
मी चिंब भिजून गेलो
मी लाजेने घायाळ झालो
तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने
मी चिंब भिजून गेलो
तू माझ्या समोर आलीस की, मला प्रसन्न वाटते. तुला मिठीत घ्यावे असे वाटते, तू माझ्या मिठीत येऊन माझ्यावर हृदयातील आसवं पुसशील ना, माझ्या भरकटलेल्या मनाला शांत करशील ना ग. या मनातील भाव मी फक्त तुलाच सांगितले आहेत आणि तुलाच सांगणार. तू माझी प्रेयसी, सखी सारं काही आहेस आणि तू फक्त माझीच आहेस आणि मी तुझाच." असे म्हणून त्याने दोन्ही हात पुढे केले. त्याच्या या बोलण्यावर अनुश्री पळत त्याच्या मिठीत येऊन विसावली. तिचेही मन असंख्य प्रश्नांनी, असंख्य दुःखांनी पीडित झाले होते. तिलाही थोडासा विसावा हवा होता आणि तो विसावा म्हणजे निश्चितच अनीश होता. तिच्या दुःखांना त्याने समजून घेतले होते, दोघेही एकमेकात विलीन झाले होते, ते दोघेही खूप आनंदात होते.
इतक्यात दरवाजा उघडला, तसे दोघेही बाजूला झाले. तिथे उर्मी होती ती खूप रागाने तापलेली होती. "अच्छा, तर तुमचे हे सगळे चालू आहे, म्हणून तू माझ्याकडे येत नाहीस. अरे मी तुझी बालपणाची मैत्रीण आहे ना. आपण दोघे खूप चांगलं खेळत होतो, ओळखतही आहोत, एकमेकांच्या भावना शेअर केले आहेत आणि तू असा कसा रे? मी वेड्यासारखी तुझी वाट पाहत तिथे थांबली आहे. सकाळी मेसेज केला होतास तर वेळेवर येशील असं वाटलं होतं. पण तुला माझ्यापेक्षा ही महत्त्वाची वाटत आहे. तिकडे मी आपल्या लग्नाची स्वप्न पाहत आहे, मी वेडीच आहे ना रे, माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम होतं ते कधी बोलून दाखवलं तरी तू मनावर घेतला नाहीस. आता वाटलं बाबांनी इतकं सांगितलं आहे म्हणजे तू मनावर घेशील. पण तुला माझ्या बद्दल कधीच काही वाटले नाही आणि मी वेड्यासारखी तुझ्या प्रेमात पडले.
ध्यानी मनी फक्त तू
ध्यास तुझा लागला..
वेडी होऊन ही राधा
जीव तुझ्यात गुंतला..
ध्यास तुझा लागला..
वेडी होऊन ही राधा
जीव तुझ्यात गुंतला..
अशी अवस्था झाली आहे माझी. मला तू आधीपासूनच आवडतोस रे, तुला चांगलेच माहित आहे. मग माझ्या प्रेमाची तू अशी चेष्टा का करावेस? तुझं माझ्यावर प्रेम नाही हे तू सांगितलास, पण बाबांनी सांगितल्यावर बाबांच्या समोर तू का बोलला नाहीस? मला तू गृहीत धरूनच गेला आहेस आणि आताही गृहीत धरतच आहेस. मी म्हणजे तुझ्या हातचा खास खेळणा वाटते का रे? प्रत्येक क्षणात तू मला असे गृहीत धरून चालणार आहेस. पण आता नाही, आता मी शांत बसणार नाही. मी सारं काही जाऊन तुझ्या आई बाबांना सांगणार आहे, वाटल्यास आपली मैत्री संपली तरीही चालेल, पण आता मी तुझ्या कोणत्याही बंधनात नाही आणि मला तुझ्याकडून काहीही नको." असे म्हणून उर्मी रागारागाने केबिनच्या बाहेर गेली.
उर्मी जाताना अनीश सुध्दा तिच्या पाठोपाठ तिला थांबवण्यासाठी जाऊ लागला, पण थांबेल ती उर्मी कसली! "आता हिने बाबांना सगळं सांगितले तर, बाबांना काही झाले तर, अजून बाबांची तब्बेत नाजूक आहे, त्यांनी टेन्शन घेतलं तर." अशा प्रश्नांनी त्याच्या मनात थैमान घातले होते. इतक्यात अनुश्री तेथे आली.
"अनीश, आता काय करायचं रे? उर्मी जाऊन बाबांना सगळं सांगितली तर, मला तर खूप भीती वाटत आहे." अनुश्री
"काही टेन्शन घेऊ नकोस. मी हाॅस्पिटलमध्ये जाऊन बघतो. जर ती काही सांगत असेल तर मी दुसरा विषय काढेन. ही योग्य वेळ नाही ग बाबांना सगळं सांगायची. ते बरे झाल्यावर आपण त्यांच्याशी बोलूच, पण आत्ता नको." अनीश
"बरं, मग मी पण हाॅस्पिटलमध्ये येते." अनुश्री
"तू येऊ नकोस. मी एकटाच जाऊन बघतो. तुला बघून उर्मी आणखी चिडायला नको." अनीश
"बरं ठिक आहे. तू जा." असे म्हटल्यावर अनीश लगेच हाॅस्पिटलमध्ये गेला.
हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर अनीशच्या आईने त्याला डाॅक्टरांनी बोलावल्याचे सांगितले. अनीश डॉक्टरांकडे गेला आणि "काय झालं डॉक्टर? बाबांची तब्येत बरी आहे ना. तुम्ही मला का बोलवलंत?" असे विचारले
तेव्हा डॉक्टर म्हणाले की, "सगळं काही ठीक आहे मिस्टर अनीश. आता तुम्ही तुमच्या बाबांना घेऊन जाऊ शकता. त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे. फक्त त्यांची काळजी घ्यावी लागेल, कारण अजूनही त्यांची तब्येत नाजूक आहे." असे डॉक्टर म्हणाले.
"हो डाॅक्टर. थॅन्क्यू सो मच." असे म्हणून अनीश बाहेर आला.
पण त्याच्या मनात कुठेतरी \"उर्मी इथे येऊन गेली आहे का? ती काही बोलली का?\" असे येत होते. म्हणून तो आईकडे जाऊन विचारला की, "आई, इथे उर्मी आली होती का? की फोन केली होती "
"नाही रे, ती काही आली नाही आणि फोन पण केली नाही. अरे, पण तू तिच्याबद्दल का विचारत आहेस? इतकं काही काम आहे का महत्वाचे." अनीशची आई.
"तसं नाही आई, ती मला म्हणाली होती की, मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे म्हणून विचारले ग. चल आता बाबांना डिस्चार्ज मिळाला आहे. घरी जाऊ." असे म्हणून अनीशने सगळी प्रोसेस केली आणि तो आई बाबांना घेऊन घरी आला. बाबांना त्यांच्या रूम मध्ये नेवून त्यांना बेडवर झोपवले आणि त्यांना औषध पाणी देऊन ती फ्रेश होण्यासाठी जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर बोलल्यावर अनीश पटकन घरातून निघाला.
"आई, आलोच ग." अनीश
"अरे, कुठे चाललास? आत्ताच तर आलास ना. थोडं जेवण तरी करून जा." अनीशची आई
"नको आई, थोडी इमर्जन्सी आहे. मला जावेच लागेल. तू काही काळजी करू नकोस. मी तुला फोन करेन." असे म्हणून अनीश घरातून गडबडीने गेला.
अनीश गेला ते डायरेक्ट हाॅस्पिटलमध्येच. तिथे जाऊन त्याने चौकशी केली तर रिसेप्शनने त्याला सांगितले की, पेशंट बेशुद्ध अवस्थेत आहे. रक्त खूप गेल्यामुळे थोडा वेळ लागेल. डाॅक्टरांनी ट्रिटमेंट सुरू केली आहे. तुम्ही थोडा वेळ बसून घ्या. असे रिसेप्शनने सांगितल्यावर अनीश तिथेच बसून राहिला. तो खूप टेन्शन मध्ये होता. कुणाला काही सांगू की नको असे त्याला वाटत होते, पण तो तसाच बसला.
थोड्या वेळाने डाॅक्टरांनी अनीशला बोलावून घेतले. अनीश डाॅक्टरांच्या केबिनमध्ये गेला.
"डाॅक्टर, काही प्राॅब्लेम आहे का?" अनीश
"डाॅक्टर, काही प्राॅब्लेम आहे का?" अनीश
"नाही नाही, त्या आता बऱ्या आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही त्यांना भेटू शकता. पण ही अॅक्सिडेंन्ट केस आहे. तुम्हाला पोलिस भेटतील, तेव्हा त्यांना तुम्ही भेटून तपशील द्या." डाॅक्टर
"हो डाॅक्टर. मी आता भेटायला जातो. थॅन्क्यू सो मच सर." असे म्हणून अनीश तिला भेटायला गेला. तिथे दरवाज्यातच अनीश थांबला.
"असा कसा अॅक्सिडेंन्ट झाला? गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का? किती घाबरवलंस मला? धावत पळत आलो मी. तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो." अनीश
"हे बघ, तू रागावू नकोस ना माझ्यावर. अगं बाबांना डिस्चार्ज मिळाला म्हणून त्यांना घरी घेऊन गेलो होतो. तेव्हा मला तुझ्या फोनवरून फोन आला. मी लगेच इथे आलो तर तू बेशुद्ध होतीस." अनीश तिला समजावून सांगत होता.
कोण असेल त्या हाॅस्पिटलमध्ये? अनीश कुणासाठी इतका धावत पळत तेथे गेला? कोणाची तो इतकी काळजी करत होता? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशःउर्मी आल्याबरोबर अनुश्री उठून घेऊन बाहेर जात होती. इतक्यात अनीशने तिला थांबवले. अनीशने अनुश्रीला थांबवल्याबरोबर उर्मीला राग आला. ती अनीशच्या जवळ गेली आणि म्हणाली, "अरे अनीश, आता आपलं लग्न होणार आहे. मग तू इतका का लाजत आहेस? होणारी बायको आली आहे म्हटल्यावर तिच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलायला नको का? एकांत तर हवाच ना आपल्याला. कशाला कोणाची गरज हवी आहे? इथे केबिनमध्ये आपण दोघेच बसू, तिसरं कोणीही आलेलं मला आवडणार नाही." असे म्हणताना उर्मीने अनुश्रीकडे एक कटाक्ष टाकला, तर उर्मीचे हे शब्द ऐकताच अनुश्री बाहेर जाऊ लागली. ते पाहून अनीशने परत अनुश्रीला थांबवले आणि तो म्हणाला,
क्रमशःउर्मी आल्याबरोबर अनुश्री उठून घेऊन बाहेर जात होती. इतक्यात अनीशने तिला थांबवले. अनीशने अनुश्रीला थांबवल्याबरोबर उर्मीला राग आला. ती अनीशच्या जवळ गेली आणि म्हणाली, "अरे अनीश, आता आपलं लग्न होणार आहे. मग तू इतका का लाजत आहेस? होणारी बायको आली आहे म्हटल्यावर तिच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलायला नको का? एकांत तर हवाच ना आपल्याला. कशाला कोणाची गरज हवी आहे? इथे केबिनमध्ये आपण दोघेच बसू, तिसरं कोणीही आलेलं मला आवडणार नाही." असे म्हणताना उर्मीने अनुश्रीकडे एक कटाक्ष टाकला, तर उर्मीचे हे शब्द ऐकताच अनुश्री बाहेर जाऊ लागली. ते पाहून अनीशने परत अनुश्रीला थांबवले आणि तो म्हणाला,
"उर्मी हे ऑफिस आहे आणि इथे फक्त ऑफिसची कामे होतात. पर्सनल बोलायला इथे काही गार्डन किंवा एखादा हॉल नाही. आम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्ट विषयी बोलत आहोत, तेव्हा तू आता इथून जा. मी तुला संध्याकाळी भेटायचं म्हणून मेसेज केला आहे ना. आपण संध्याकाळी भेटू. कामाच्या वेळी फक्त काम." हे अनीशचे बोलणे ऐकून तिला खूप राग आला आणि ती रागातच तिथून निघून गेली, पण जाताना अनुश्रीकडे एक तिरका कटाक्ष टाकला. ते अनीशच्या नजरेतून सुटले नाही.
उर्मी गेल्यानंतर अनुश्री अनीशला म्हणाली, "तू असं बोलायला नको होतास. अरे ती तुझी होणारी बायको आहे. तिचा तू आदर करायला हवा."
"होणारी बायको आहे ती, अजून लग्न झालेले नाही आणि तसंही मी तिच्याशी लग्न करणारच नाही, तर आदर करायचं प्रश्न येतोच कुठे? ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि मैत्रीणच राहील. मी तिच्याशी असंच बोलतो तू मला सांगायची काही गरज नाही. तुझं समोरचं काम बघ." असे म्हणून दोघेही काम करू लागले. काम करता करता वेळ कसा निघून गेला? हे त्यांना समजलेच नाही. संध्याकाळ होऊन गेली, तरी दोघेही कामच करत होते.
अनुश्रीने घड्याळ पाहिले आणि म्हणाली, "अरे बापरे! उशीर झाला. चला मी निघते." असे म्हणून ती उठून जाऊ लागली. इतक्यात अनीश उभा राहिला आणि तिला म्हणाला, "अनु, मला अशी सोडून जाऊ नकोस ना ग, तुला पाहिलं की मी सारी दुःख विसरून जातो.
भर उन्हात तू दिसताच
मी लाजेने घायाळ झालो
तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने
मी चिंब भिजून गेलो
मी लाजेने घायाळ झालो
तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने
मी चिंब भिजून गेलो
तू माझ्या समोर आलीस की, मला प्रसन्न वाटते. तुला मिठीत घ्यावे असे वाटते, तू माझ्या मिठीत येऊन माझ्यावर हृदयातील आसवं पुसशील ना, माझ्या भरकटलेल्या मनाला शांत करशील ना ग. या मनातील भाव मी फक्त तुलाच सांगितले आहेत आणि तुलाच सांगणार. तू माझी प्रेयसी, सखी सारं काही आहेस आणि तू फक्त माझीच आहेस आणि मी तुझाच." असे म्हणून त्याने दोन्ही हात पुढे केले. त्याच्या या बोलण्यावर अनुश्री पळत त्याच्या मिठीत येऊन विसावली. तिचेही मन असंख्य प्रश्नांनी, असंख्य दुःखांनी पीडित झाले होते. तिलाही थोडासा विसावा हवा होता आणि तो विसावा म्हणजे निश्चितच अनीश होता. तिच्या दुःखांना त्याने समजून घेतले होते, दोघेही एकमेकात विलीन झाले होते, ते दोघेही खूप आनंदात होते.
इतक्यात दरवाजा उघडला, तसे दोघेही बाजूला झाले. तिथे उर्मी होती ती खूप रागाने तापलेली होती. "अच्छा, तर तुमचे हे सगळे चालू आहे, म्हणून तू माझ्याकडे येत नाहीस. अरे मी तुझी बालपणाची मैत्रीण आहे ना. आपण दोघे खूप चांगलं खेळत होतो, ओळखतही आहोत, एकमेकांच्या भावना शेअर केले आहेत आणि तू असा कसा रे? मी वेड्यासारखी तुझी वाट पाहत तिथे थांबली आहे. सकाळी मेसेज केला होतास तर वेळेवर येशील असं वाटलं होतं. पण तुला माझ्यापेक्षा ही महत्त्वाची वाटत आहे. तिकडे मी आपल्या लग्नाची स्वप्न पाहत आहे, मी वेडीच आहे ना रे, माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम होतं ते कधी बोलून दाखवलं तरी तू मनावर घेतला नाहीस. आता वाटलं बाबांनी इतकं सांगितलं आहे म्हणजे तू मनावर घेशील. पण तुला माझ्या बद्दल कधीच काही वाटले नाही आणि मी वेड्यासारखी तुझ्या प्रेमात पडले.
ध्यानी मनी फक्त तू
ध्यास तुझा लागला..
वेडी होऊन ही राधा
जीव तुझ्यात गुंतला..
ध्यास तुझा लागला..
वेडी होऊन ही राधा
जीव तुझ्यात गुंतला..
अशी अवस्था झाली आहे माझी. मला तू आधीपासूनच आवडतोस रे, तुला चांगलेच माहित आहे. मग माझ्या प्रेमाची तू अशी चेष्टा का करावेस? तुझं माझ्यावर प्रेम नाही हे तू सांगितलास, पण बाबांनी सांगितल्यावर बाबांच्या समोर तू का बोलला नाहीस? मला तू गृहीत धरूनच गेला आहेस आणि आताही गृहीत धरतच आहेस. मी म्हणजे तुझ्या हातचा खास खेळणा वाटते का रे? प्रत्येक क्षणात तू मला असे गृहीत धरून चालणार आहेस. पण आता नाही, आता मी शांत बसणार नाही. मी सारं काही जाऊन तुझ्या आई बाबांना सांगणार आहे, वाटल्यास आपली मैत्री संपली तरीही चालेल, पण आता मी तुझ्या कोणत्याही बंधनात नाही आणि मला तुझ्याकडून काहीही नको." असे म्हणून उर्मी रागारागाने केबिनच्या बाहेर गेली.
उर्मी जाताना अनीश सुध्दा तिच्या पाठोपाठ तिला थांबवण्यासाठी जाऊ लागला, पण थांबेल ती उर्मी कसली! "आता हिने बाबांना सगळं सांगितले तर, बाबांना काही झाले तर, अजून बाबांची तब्बेत नाजूक आहे, त्यांनी टेन्शन घेतलं तर." अशा प्रश्नांनी त्याच्या मनात थैमान घातले होते. इतक्यात अनुश्री तेथे आली.
"अनीश, आता काय करायचं रे? उर्मी जाऊन बाबांना सगळं सांगितली तर, मला तर खूप भीती वाटत आहे." अनुश्री
"काही टेन्शन घेऊ नकोस. मी हाॅस्पिटलमध्ये जाऊन बघतो. जर ती काही सांगत असेल तर मी दुसरा विषय काढेन. ही योग्य वेळ नाही ग बाबांना सगळं सांगायची. ते बरे झाल्यावर आपण त्यांच्याशी बोलूच, पण आत्ता नको." अनीश
"बरं, मग मी पण हाॅस्पिटलमध्ये येते." अनुश्री
"तू येऊ नकोस. मी एकटाच जाऊन बघतो. तुला बघून उर्मी आणखी चिडायला नको." अनीश
"बरं ठिक आहे. तू जा." असे म्हटल्यावर अनीश लगेच हाॅस्पिटलमध्ये गेला.
हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर अनीशच्या आईने त्याला डाॅक्टरांनी बोलावल्याचे सांगितले. अनीश डॉक्टरांकडे गेला आणि "काय झालं डॉक्टर? बाबांची तब्येत बरी आहे ना. तुम्ही मला का बोलवलंत?" असे विचारले
तेव्हा डॉक्टर म्हणाले की, "सगळं काही ठीक आहे मिस्टर अनीश. आता तुम्ही तुमच्या बाबांना घेऊन जाऊ शकता. त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे. फक्त त्यांची काळजी घ्यावी लागेल, कारण अजूनही त्यांची तब्येत नाजूक आहे." असे डॉक्टर म्हणाले.
"हो डाॅक्टर. थॅन्क्यू सो मच." असे म्हणून अनीश बाहेर आला.
पण त्याच्या मनात कुठेतरी \"उर्मी इथे येऊन गेली आहे का? ती काही बोलली का?\" असे येत होते. म्हणून तो आईकडे जाऊन विचारला की, "आई, इथे उर्मी आली होती का? की फोन केली होती "
"नाही रे, ती काही आली नाही आणि फोन पण केली नाही. अरे, पण तू तिच्याबद्दल का विचारत आहेस? इतकं काही काम आहे का महत्वाचे." अनीशची आई.
"तसं नाही आई, ती मला म्हणाली होती की, मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे म्हणून विचारले ग. चल आता बाबांना डिस्चार्ज मिळाला आहे. घरी जाऊ." असे म्हणून अनीशने सगळी प्रोसेस केली आणि तो आई बाबांना घेऊन घरी आला. बाबांना त्यांच्या रूम मध्ये नेवून त्यांना बेडवर झोपवले आणि त्यांना औषध पाणी देऊन ती फ्रेश होण्यासाठी जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर बोलल्यावर अनीश पटकन घरातून निघाला.
"आई, आलोच ग." अनीश
"अरे, कुठे चाललास? आत्ताच तर आलास ना. थोडं जेवण तरी करून जा." अनीशची आई
"नको आई, थोडी इमर्जन्सी आहे. मला जावेच लागेल. तू काही काळजी करू नकोस. मी तुला फोन करेन." असे म्हणून अनीश घरातून गडबडीने गेला.
अनीश गेला ते डायरेक्ट हाॅस्पिटलमध्येच. तिथे जाऊन त्याने चौकशी केली तर रिसेप्शनने त्याला सांगितले की, पेशंट बेशुद्ध अवस्थेत आहे. रक्त खूप गेल्यामुळे थोडा वेळ लागेल. डाॅक्टरांनी ट्रिटमेंट सुरू केली आहे. तुम्ही थोडा वेळ बसून घ्या. असे रिसेप्शनने सांगितल्यावर अनीश तिथेच बसून राहिला. तो खूप टेन्शन मध्ये होता. कुणाला काही सांगू की नको असे त्याला वाटत होते, पण तो तसाच बसला.
थोड्या वेळाने डाॅक्टरांनी अनीशला बोलावून घेतले. अनीश डाॅक्टरांच्या केबिनमध्ये गेला.
"डाॅक्टर, काही प्राॅब्लेम आहे का?" अनीश
"डाॅक्टर, काही प्राॅब्लेम आहे का?" अनीश
"नाही नाही, त्या आता बऱ्या आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही त्यांना भेटू शकता. पण ही अॅक्सिडेंन्ट केस आहे. तुम्हाला पोलिस भेटतील, तेव्हा त्यांना तुम्ही भेटून तपशील द्या." डाॅक्टर
"हो डाॅक्टर. मी आता भेटायला जातो. थॅन्क्यू सो मच सर." असे म्हणून अनीश तिला भेटायला गेला. तिथे दरवाज्यातच अनीश थांबला.
"असा कसा अॅक्सिडेंन्ट झाला? गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का? किती घाबरवलंस मला? धावत पळत आलो मी. तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो." अनीश
"हे बघ, तू रागावू नकोस ना माझ्यावर. अगं बाबांना डिस्चार्ज मिळाला म्हणून त्यांना घरी घेऊन गेलो होतो. तेव्हा मला तुझ्या फोनवरून फोन आला. मी लगेच इथे आलो तर तू बेशुद्ध होतीस." अनीश तिला समजावून सांगत होता.
कोण असेल त्या हाॅस्पिटलमध्ये? अनीश कुणासाठी इतका धावत पळत तेथे गेला? कोणाची तो इतकी काळजी करत होता? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः