एक प्रेम विवाह तू तिथे मी भाग ३ शेवट

TRue love alwyas win

तासाभरातच राज आला..नेत्रा रडत बसली होती ..राजने आल्या आल्या तिला मिठी मारली पण तिने झिडकी दिली..राजला वाईट वाटलं.. नेत्राचे आई बाबा सुद्धा संशयाच्या नजरेने पाहत होते त्याला....राजला अंदाजा आला ..नक्की काय सर्वांच्या डोक्यात चालले आहे...राज बोलू लागला...


"नेत्रा,सर्वात आधी sorry.. मी कधीच तुझ्यापासून कोणातीही गोष्ट लपवली नाही,पण ही गोष्ट मी काळजावर दगड ठेवून मी लपवली..ज्या मुलीला मी भेटत होतो ती माझी मैत्रीण आहे,तिच्या मदतीने मी काम शोधतो आहे,तिच्या भरपूर ओळखी आहेत.. तिच्यात माझ्यात फक्त आणि फक्त मैत्री आहे ,बाकी जे तू समजते आहे तसे अजिबात काही नाही आणि गेल्या महिन्यात माझा जॉब गेला...मला समजतच न्हवतं मी तुला हे कसं सांगू??मला तुझे सर्व डोहाळे पुरवायचे होते पण कंपनीने कामावरून काढल्यामुळे साधं तीन वेळेचं जेवण देण्यासाठी माझ्याकडे पैसे न्हवते.तू आधीच प्रेग्नेंट हे तुला सांगितले असते तर तू टेंशन मध्ये आली असती म्हणून मी लपवलं.मला खरंच लाचार झाल्यासारखं वाटत होतं...ह्या काळात डिप्रेशनमध्ये गेलो होतो ..तुझा फोन आला की भीती वाटायची ,माझ्या तोंडातून खरं काय ते निघेल म्हणून मी फोनवर बोलायच  टाळायचो,कामाचा बहाणा करायचो.. माझ्यामुळे तुझे हाल हाल नको म्हणून मी तुला माहेरी सोडलं...पण कालच मला एका चांगल्या कंपनीत जॉब भेटला आहे ...हे मी तुला संगणारच होतो,आणि नेत्रा  ...नेत्रा ,तुझ्यावरच मी खरं प्रेम केलं आहे.. तुझी जागा कोणीही नाही घेऊ शकत....


हे ऐकून नेत्राला स्वतःच्या विचारांची लाज वाटली..तिने राजची माफी मागितली..त्याला बोलली राज
आम्ही बायका इतक्याही कमजोर नसतो ,आणि नवरा सोबतीला असला की कितीही वादळ येऊ देत, आम्ही भक्कम उभं राहतो... उलट तू मला सांगायचं होतं, अश्या वेळी तुला माझी सर्वात जास्त गरज होती ....तुझी बायको प्रेग्नेंट जरी असली तरी ती कमजोर नाही झाली..उलट माझ्यातल्या आईने खूप सक्षम केले आहे....मी आई बाबांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न केलं ते असा तुझा साथ सोडण्यासाठी नाही ...चल मी बॅग पॅक करते ,आपल्या घरी जाऊया.

नेत्राने आई बाबांना निरोप दिला...आज नेत्राच्या  आई बाबांना पूर्ण खात्री पटली की ,नेत्रा तिच्या संसारात खूष राहील.. सुरवातीला विरोध होता दोघांच्या लग्नाला पण आज नेत्राच्या आई बाबांना अभिमान वाटला की तिने जोडीदार निवडताना  त्याचा पैसा, प्रॉपर्टी नाही तर तो माणूस कसा आहे हे पाहिलं....

जो व्यक्ती श्रीमंत असेल तो सुखी ठेवेलच असे नाही,पण जर व्यक्ती मनाने श्रीमंत असेल, तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर  नक्कीच
ती आपल्याला खुश ठेवते...

अश्विनी पाखरे ओगले.
लेख आवडल्यास नक्की फॉलो करा

🎭 Series Post

View all