डस्टबिन

आता मुली कमावत्या झाल्या त्यामुळे त्यांना सासरची माणसं कटकट वाटू लागते तर ही आमच्या पिढीची चूक आहे आणि त्यात भर घालायला टीव्हीच्या मालिका ही हेच दाखवतात यात. आता काळ बदलला आपल्यालाही बदलायला हवे .काय बरं म्हणाली?" डस्टबीन" म्हणजे घर स्वच्छ ठेवणारा ,सर्व कचरा एकत्र करून घरभर पसरू न देणारा , छाsन विशेषण आहे, सार्थ केलं पाहिजे. आजी मनातल्या मनात पुटपुटल्या.
* डस्टबीन*.

अश्विनी ने फोन ठेवता ठेवता म्हटलं" नको च बाई हे स्थळ".
कां ग आशू काय नको?" कोणाशी बोलत होतीस"?
"आई सुमा वन्स चा फोन होता, त्यांच्या नणंदे च्या जावे ची मुलगी लग्नाची आहे असं सुमा म्हणत होती. म्हणून तिची चौकशी केली होती आपल्या शेखर करता.
मग?
वन्स नको म्हणतात, तिचे आपल्याकडे नाही जमणार.
अग ,पाहिली नाही आणि आधीच ठरवून टाकलं?
अहो वन्स म्हणाल्या ती विचारत होती घरात किती डस्टबिन आहेत??
"म्हणजे काय ग--?
अश्विनी काही बोलणार तेवढ्यात शेखर आलेला दिसला म्हणून तिने सासूबाईंना मग सांगते असा इशारा केला. \"
आई मला एक महिन्याकरता जर्मनीला जावे लागेल आपल्या कंपनीला कॉन्ट्रक्ट मिळाला आहे\".
"अरे वा--- खुपच आनंदाची बातमी! देवासमोर साखर ठेवते म्हणत अश्विनी आत गेली.
रात्री सासूबाईंना औषध द्यायला म्हणून अश्विनी खोलीत गेली. \"सुमा काय म्हणत होती\"?
आई --"आज कालच्या मुलींना स्वातंत्र्य म्हणजे काय हेच कळत नाही. त्यांना रेडीमेड नवरा हवा पण त्याचे आईबाप , आजी आजोबा जर असले तर ती अडगळ होते. "म्हणे किती डस्टबिन आहे घरात" इतका संताप होतोय माझा" आम्ही काय डस्टबिन आणि हिचे आईबाप ते कोण "??
डस्टबिन म्हणजे कचराकुंडी ना??
\"हो ही काय पद्धत आहे बोलण्याची\" ?
नकोच आपल्याला असली सून" दिवा बंद करता करता अश्विनी चिडचिडत बाहेर गेली.
बाहेर शेखर आपले बोलणे ऐकत आहे हे तिला समजले नाही.

अश्विनी गेल्यावर आजी विचार करत होत्या, पूर्वी त्यांच्या काळात मोठा परिवार म्हणजे भरलेलं घर मुद्दाम पाहून मुलींना सासरी पाठवत, सासू सासरे, नणंदा-जावांनी भरलेलं घर असायच. होणारे रुसवे-फुगवे घरातल्या मुलींना दिसायचे त्यामुळे त्यांच्या मनात सासरच्या माणसांविषयी एक अनामिक भीती बसायची, अगदी भुलाबाईच्या गाण्यात "असं सासर द्वाड बाई, किंवा कारल्याची भाजी कर ग सुने मग जा आपल्या माहेरा असायचे ,त्यामुळे सासु नणंदा असलेलं घर नको असे जर या मुलींना वाटत असेल तर त्यात त्यांची काय चूक,?
आता मुली कमावत्या झाल्या त्यामुळे त्यांना सासरची माणसं कटकट वाटू लागते तर ही आमच्या पिढीची चूक आहे आणि त्यात भर घालायला टीव्हीच्या मालिका ही हेच दाखवतात यात. आता काळ बदलला आपल्यालाही बदलायला हवे .
काय बरं म्हणाली? डस्टबीन म्हणजे घर स्वच्छ ठेवणारा ,सर्व कचरा एकत्र करून घरभर पसरू न देणारा , छान विशेषण आहे, सार्थ केलं पाहिजे. आजी मनातल्या मनात पुटपुटल्या.

पुढच्या रविवारी बंधनगाठ मेट्रोमोनीयल वाल्यांच परिचय संमेलन आहे शेखर तू जाऊन ये तुझ नांव रजिस्टर आहे. अश्विनी म्हणाली.
\"आई तू पण येणार\"? ---"अरे नाही यांचे मित्र येणार आहेत ना जेवायला, मला नाही जमणार".

शेखर घरी आला तोच आनंदाची बातमी घेऊन .सोनाली खरे आवडली, दोघांच बोलणं झालं ,दोघे एकमेकांना पसंत आहे चट मंगनी पट ब्याह प्रमाणे लग्न ठरलं.
रात्री सुमा चा आईला फोन" "वहिनी मी नाही म्हणत होते मग कसं काय ठरवलं लग्नं ही सोनाली तीच मुलगी आहे"
आजी मनाशी म्हणाल्या येऊ दे एकीचा गैरसमज दूर झाला तरी खूप.
आजी चे फोन वरच जोरात बोलण शेखर च्या कानांवर आलंच.
सोनाली दिसायला सुंदर, शिकलेली, नोकरी करत होती. शेखरच्या घरच्यांनी लग्नाचा गिफ्ट म्हणून मुलगा व सून याकरता स्वतंत्र फ्लॅट घेऊन दिला .
लग्नाच्या 10 दिवसानंतरच ठरल्याप्रमाणे शेखरला कंपनीच्या कामाने जर्मनीला जावे लागले.

सोनालीने थोडे दिवस आई-बाबां जवळ राहावे असे असे शेखर चे म्हणणे सोनालीला टाळता आले नाही. ती मनातं हिरमुसली.
थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे
दिवसभर तर आॅफिस मधेच जाईल. असा विचार करून ती तयार झाली पण मनात धाकधूक होतीच.
रात्री झोपताना अश्विनी ने सोनालीला सांगितले" बघ सोनाली तुला लवकर उठण्याची गरज नाही तू आपली झोप पूर्ण करून मग उठ आणि जे ड्रेस तुला घालायचे असतील ते तू घालू शकते साडी नेसण्याची तुझ्यावर सक्ति नाही ,असे हसत म्हणून अश्विनी ने दिला गुड नाईट केले.

रात्री सोनाली बऱ्याच वेळ शेखर शी चॅटिंग करत होती. सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. दिवसाही फारसे काही काम नव्हते घरात पाहुणे म्हणून आत्या, मावशी होत्या त्या सगळ्यांनी तिला अगदी परकेपण जाणवू दिल नाही.
आई ने माहेरपणाला बोलावल म्हणून सोनाली आई कडे आली.
संध्याकाळी रिचा तिची मैत्रीण भेटायला आली.
काय म्हणते सासुरवाशिण??
जीजू तुला एकट सोडून गेले दोन सासवांच्या कचाट्यात??
तुझ आपल काहीतरी हं.
अग तुला नको होती न इतकी माणसं,"काय म्हणाली होती तू?डस्टबिन".
. सोनाली काही बोलणार तेवढ्यात आई आली नी विषय तिथेच संपला.
रूचा गेल्या नंतर सोनाली विचार करत होती
तिला खरोखरच नको होती माणसं मग तरी तिनेशेखर ला कां हो म्हंटले.
शेखरच्या व्यक्तिमत्वा ने जणू पहिल्या भेटीतच तिच्या वर जादू केला होता.लग्नानंतर तिला या घरात जे प्रेम आपलेपणा,व स्वातंत्र्य मिळाले त्या ने तिची सासरच्या माणसांविषयी असलेल्या कल्पनेला तडा गेला.

एक दोन दिवसात च सोनाली ला करमेनास व्हायला लागले.
आई,शेखर ला यायला आठदहा दिवसच उरले मी परत जाते, म्हणत सोनाली सासंरी परतली.

एकदिवस काॅफी करायला म्हणून सोनाली किचनमध्ये आली . फोन मध्ये पहाता पहाता गरम काॅफी हातावर सांडली.
सासुबाई नी तिची किंकाळी ऐकून तिचा हात पटकन नळा खाली धरला व नंतर फ्रीज चे गार पाणी ओतून तिच्या हातावर फूंकर मारु लागल्या.आजींनी तिला बर्नाल लावून दिले व आता हात बरा होईपर्यंत काही करू नको असे प्रेमाने सांगितले.
या महिन्याभरात तिला जाणवले मैत्रिणींकडून ऐकून जी भीती मनात भरली होती ती अनाठाई होती, तिच्यावर कुठलेच बंधन नव्हते सर्व , अगदी आजी सुद्धामदत करायला तत्पर होत्या.


महिनाभराने शेखर परत आला व ते दोघे आपल्या फ्लॅटमध्ये राहावयास आली . सर्व जरुरी वस्तूंनी फ्लॅट सजवलेला होता.
सकाळी मिळालेली बरीच शी गिफ्ट दोघांनी उघडून पाहिली. त्या सगळ्या कागदांचा बराच कचरा तयार झाला .हे सर्व कुठे टाकावे घरात डस्टबिन कुठेच दिसत नव्हते .
शेखर अरे कचऱ्यासाठी डस्टबीन??
तुला हव आहे??
म्हणजे??
एका मुलीला म्हणे डस्टबिन नको असे मी ऐकले ??
सोनाली आपली चूकसमजून चुकली.
शेखर जवळ बसून त्याचा हात हातात घेत म्हणाली" मी खूप चूक विचार करत होते रे, जे आजूबाजूला ऐकलं पाहिलं त्यावरून एक इमेज बनवली, माझं चुकलं ,तुझ्या घरचे सर्व खूप समजूतदार व प्रेमळ आहेत मला आवडेल त्यांच्यासोबत राहायला.
ते डस्टबीन नाहीत घराला घरपण देणारी" आपली माणसं" आहे...
-----------------------------------------लेखन. सौ. प्रतिभा परांजपे
----------------------------------------