मागील भागात पाहीले की दूस-या दिवशी डॉक्टरांनी नीरजची तपासणी करून त्याला मानसोपचारतज्ञाकडे पाठवल. त्यांना बघून नीरज आणि त्याची आई चांगल्याच रागाला आल्या.
आता पूढे.
“बसा मि. नीरज.” रमाकांत सौम्य आवाजात बोलले.
तसा नीरज अनिच्छेने तिथे बसला.
तसा नीरज अनिच्छेने तिथे बसला.
“मला माहिती आहे की अस अचानक माझ तुमच्यासमोर येण तुम्हाला आवडलं नाहीये.” रमाकांत हलकेच हसत बोलू लागले. “पण काय आहे ना? की आपल्याकडे मानसिक आजार किंवा मानसोपचारतज्ञ म्हटलं की पहिले आपण वेडे झालो का अस मनात येत. बरोबर ना?” रमाकांत त्या सगळ्यांचे चेहरे वाचत बोलले.
त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उभ होत. जे त्यांना अपेक्षितच होत. कारण ते मनातलं ओळखायला एक्स्पर्ट जे होते.
“तर पहिले हे मनातून काढून टाका की तुम्ही वेडे आहात.” रमाकांत “कारण वेडे असल्याची प्रोपर व्याख्या आजवर कोणीही सांगू शकल नाहीये. आता माझ बोलणही तुम्हाला वेड्यासारखाचं वाटेल.”
आता तर बाकीच्यांचे चेहरे अजूनच धक्यात गेल्यासारखे झाले. तसे रमाकांत मनमुराद हसले. मग त्यांनी बाकीच्यांना तिथेच बसायला लावलं आणि नीरजला घेऊन आतल्या केबिनमध्ये गेले. तिथे त्यांनी नीरजसोबत बोलायला सुरवात केली.
"तू झोपतोस का रात्री?" रमाकांत नीरजचा चेहरा वाचत बोलले.
"माहित नाही. झोपायला वेळच मिळत नाही." नीरज गोंधळून बोलला.
"बरं मग त्या वेळेस तुझ्या मनात काय काय येत राहत?" रमाकांत
नीरज काही क्षण शांत राहीला. नंतर मग त्याने सगळं मन मोकळ केल. “सतत अपयशाची भीती वाटते. माझ काम नीट झाल नाही तर कोणीतरी येऊन माझी जागा घेईल. मग मी काय करू? घरच्यांची माझ्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण होईल का? आणि हे सगळ कुठे बोलू म्हणून सतत एकटेपण वाटत.”
“हे तू कधी तुझ्या घरच्यांसोबत बोललास?” रमाकांत
तशी नीरजने नकारार्थी मान हलवली.
तशी नीरजने नकारार्थी मान हलवली.
“मग तुझ्या मित्रांसोबत?” रमाकांत
तशी त्याने परत नकारार्थी मान हलवली.
तशी त्याने परत नकारार्थी मान हलवली.
“मग तू एकटा हे कशावरून ठरवलसं?” रमाकांत
तसा नीरज त्यांच्याकडे बघत राहीला.
तसा नीरज त्यांच्याकडे बघत राहीला.
“मनाचे आजार घालवण्यासाठीचे हा उत्तम उपाय आहे की कोणाजवळ तरी मन मोकळ करणे.” रमाकांत “आम्ही काय काही गोळ्या देऊ आणि काही थेरेपी सांगू. पण त्याचा परिणाम मनावर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच मन मोकळ कराल.”
नीरज फक्त त्यांच बोलण ऐकत राहीला.
"आत्महत्येच्या बऱ्याच कारणांपैकी हे देखील एक कारण आहे. " रमाकांत "स्वतःसाठी जगा, महिन्यातून एकदा. नाहीच जमल तर सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी बाहेर फिरायला जायचं. नाहीच जमल तर प्रवासात इतर माणसांशी ओळख करा. नाहीच कोणी तर स्वतः जिथे रहाता तिथे रात्रिच्या वेळेस, सूट्टीच्या दिवशी कोणीना कोणी भेटेलचं की. जितक मनाला ताजे ठेवाल तितक मन तुम्हाला तुमच्या कामात तुम्हाला मदत करेल."
यानंतर रमाकांत यांनी नीरजला अजून काही प्रश्न विचारले.
"नीरज, तू इन्सोम्नियाच्या म्हणजेच निद्रानाशाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेस आणि याचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो." सरते शेवटी रमाकांत ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले.
नीरज आता चांगलाच गंभीर झाला. मला काही झाल तर माझ्या आई वडिलांकडे कोण बघेल? हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर खेळू लागला.
“मि. नीरज मी म्हटलं सुरवातीच्या टप्प्यावर आहात.” रमाकांत हलकेच हसत बोलले. “त्यामुळे तुमच्यावर वेळेवर उपचार होतील आणि तुम्ही पूर्ण बरे व्हाल. फक्त मी जे काही पथ्य देईल तेवढी पाळावी लागतील.”
“खूप खूप धन्यवाद डॉक्टर.” नीरजला आता भरून आल.
मग ते दोघेही त्या केबिनमधून बाहेर आले. तर त्याचे आई वडील आणि नीरज केबिनमध्ये गेल्यानंतर आलेली त्याची बहिण या तिघांचेही डोळे भरलेले होते. आत जे काही चालल होत. ते सगळच बाहेर ऐकू येत होत. आपल्या मुलाच्या मनात इतक काही साठलेलं होत ते ऐकून त्यांच मन भरून आलेलं होत. अमेय आणि सौम्याची परिस्थिती देखील तशीच होती.
मग ते दोघेही त्या केबिनमधून बाहेर आले. तर त्याचे आई वडील आणि नीरज केबिनमध्ये गेल्यानंतर आलेली त्याची बहिण या तिघांचेही डोळे भरलेले होते. आत जे काही चालल होत. ते सगळच बाहेर ऐकू येत होत. आपल्या मुलाच्या मनात इतक काही साठलेलं होत ते ऐकून त्यांच मन भरून आलेलं होत. अमेय आणि सौम्याची परिस्थिती देखील तशीच होती.
पण ही गोष्ट नीरजला माहिती नसल्याने तो ह्या सगळ्यांनाच गोंधळून बघत राहीला. तेवढ्यातच पहिले डॉक्टर आले. नीरजने त्यांचेही आभार मानले.
“तुम्हाला जर खरचं आभार मानायचे असतील ना तर तुमच्या चॅनल हेडचे माना.” डॉक्टर मंद स्मित करत बोलले. “कारण त्यांनीच तुम्हाला रमाकांत यांच्याकडे पाठवण्यासाठी सुचवले होते.”
नीरजसाठी हा अजून एक धक्काच होता. त्यांच्यासारख्या क्षेत्रात कोणी कोणाचा इतका विचार करत नाही. त्यांच्या चॅनल हेडने तो केला होता. मग त्यालाच काय बाकीच्यांसाठीही तो धक्काच होता. त्यांनी तस का केल? हे मात्र डॉक्टरांनी त्यांना सांगायला स्पष्ट शब्दात नकार दिला.
“मी फक्त एवढचं बोलेल की त्यांनी जे गमावलं होत ते पुन्हा कोणी गमावू नये. इतकीच त्यांची इच्छा होती.” डॉक्टर “म्हणून रमाकांत डॉक्टर जे बोलतील ते सगळ काही नीट ऐक आणि दिलेले पथ्य पाळ. तुझा आजार नक्की बरा होईल.”
यानंतर रमाकांत यांनी नीरजला काही पथ्य सांगायला सुरवात केली.
झोपण्याची ठराविक वेळ ठरवून दिली. मोबाईल काही कालावधीसाठी दूर ठेवायला लावला. रात्री हलकं वाचन, नियमित व्यायाम, वेळोवेळी समुपदेशन आणि काही गोळ्या त्याला दिल्या गेल्या.
झोपण्याची ठराविक वेळ ठरवून दिली. मोबाईल काही कालावधीसाठी दूर ठेवायला लावला. रात्री हलकं वाचन, नियमित व्यायाम, वेळोवेळी समुपदेशन आणि काही गोळ्या त्याला दिल्या गेल्या.
तिथून बाहेर पडल्यावर नीरजला त्याच्या चॅनेल हेडने जवळपास पंधरा दिवसांची सुट्टी मंजूर केल्याचा मेसेज त्याच्या मोबाईलवर आलेला दिसला. जो अमेयने त्याला दाखवला होता.
हॉस्पिटलमधले हे दोन दिवस त्याला आयुष्य काय आहे? आणि ते कस जगाव? हे सांगून गेले होते. कारण त्याच्या सोबत त्या हॉस्पिटलला इतर पेशंट देखील होते. जे वेगवेगळ्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यापुढे त्याच आयुष्य तर खूपच सोप होत. हे दोन दिवस नीरजला आयुष्याची नवी दिशा गेऊन गेले होते.
त्यानंतर त्याची झोप तर काही लगेच सुधारली नाही. पण घरच्यांच्या मदतीने, सौम्या आणि अमेयच्या सोबतीने नीरजच बिथरलेलं मन हळू हळू शांत व्हायला लागलं.
एका रात्री त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहिलं. आकाश काळं होतं, पण त्यातली नक्षत्रं स्पष्ट दिसत होती.
एका रात्री त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहिलं. आकाश काळं होतं, पण त्यातली नक्षत्रं स्पष्ट दिसत होती.
त्यांच्याकडे बघून तो स्वतःशीच म्हणाला, "रात्री झोप यावी यासाठी मनाला दिवसभर समजून घ्यावं लागतं."
तर दुसरीकडे आपल्यामुळे एक आयुष्य वाचल याच समाधान त्या चॅनेल हेडच्या चेहऱ्यावर झळकत होत.
नीरज अजूनही कामात व्यग्र राहायचा, पण रात्री झोपण्यापूर्वी तो स्वतःशी संवाद साधायला विसरत नव्हता. "आज काय केलं?" आणि "आज काय सोडून द्यायचं?"
त्यानंतर तो सुखाने झोपायला लागला. अगदी डोळसपणे.
समाप्त.
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कशी वाटली कथा? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
कशी वाटली कथा? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा