देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंदराव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मनीषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
भाग १३
भाग १२ वरून पुढे वाचा ................
शीतोळे विकासचा फोन आला तेंव्हा पोलिस स्टेशन मध्येच होते. विकासशी बोलणं झाल्यावर, ते विचार करत होते की आता राजूला भेटायची वेळ आली आहे. त्यांनी दोघा शिपायांना बरोबर घेतलं आणि राजूच्या फ्लॅट वर निघाले. पण मग काही विचार करून त्यांनी जाणं रहित केलं आणि दोघा शिपायांना साध्या कपड्यात जाऊन त्याला लगेच घेऊन या असं सांगून पाठवलं.
थोड्या वेळात राजू आला. तो आल्यावर त्यानी विचारलं-
कशाला बोलावलं मला इथे साहेब, कसली चौकशी करायची आहे ? ही तुमची माणसं काही सांगायला तयारच नाहीत.
आधी बसा तुम्ही, घ्या पाणी घ्या.
काय करता तुम्ही राजू साहेब ?
म्हणजे ?
म्हणजे काय करता, पोटा पाण्या साठी ?
मी इंजीनियर आहे आणि एका IT कंपनीत काम करतो.
मूळचे कुठले हो तुम्ही ?
साहेब, ही चौकशी का चालवली आहे तुम्ही ? काही कळेल का ?
अहो हे पोलिस स्टेशन आहे. इथे काही लपून छपून नसतं. तुम्हाला कळेलच कशा करता चौकशी चालली आहे ते. पण आधी मी विचारतो आहे त्यांची उत्तरं द्या.
मूळचे कुठले तुम्ही ?
धारवाड.
आई वडील तिथेच असतात ?
हो. काय करतात ?
बाबा कॉर्पोरेशन मधे आहेत. आई एका शाळेत शिक्षिका आहे.
गुड. आता मला सांगा, तुमच्या घरी जर कळलं की तुम्ही एका मुलीला धमक्या देता आहात तर काय होईल ? त्यांना आनंद होईल का ?
अच्छा, असं आहे होय ! आता माझ्या लक्षात आलं की माझी complaint केलेली आहे. पण साहेब हे खोटं आहे मी कोणालाही कसल्याही धमक्या दिलेल्या नाहीत.
काही न बोलता त्याच्या समोर शीतोळयांनी, देवयानीला राजूनी पाठवलेल्या मेसेज च प्रिंट आउट ठेवलं.
हं, मेसेज वाचून झाला असेल तर बोल आता. काय म्हणतोस यावर ?
राजूचा चेहरा पडला. काहीच बोलला नाही.
बोल. मला बरीच कामं आहेत. वाया घालवायला माझ्या जवळ वेळ नाही.
चुकलं साहेब.
असं कसं ? इतकी मोठी धमकी दिलीस, तेंव्हा त्यांच्या मागे बराच विचार केलाच असणार. आणि विचारपूर्वक गोष्टी केल्यावर, चुकलं म्हणून नामा निराळा होऊ पाहातोस ? कसं शक्य आहे ? काय विचार होता याच्या मागे ते सांग.
साहेब माझं देवयानीवर खूप प्रेम आहे. पण ती माझ्याकडे लक्ष देत नाहीये. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. पण ती विकास विकास करते आहे.
विकास आणि देवयानीचं लग्न दोन महिन्यात होणार आहे आणि हे तुला पण माहीत आहे, मग तू हे चाळे का करतो आहेस ? सोडून का देत नाहीस ?
नाही साहेब, शक्य नाही.
ओके मग आता काय करायचं ठरवलं आहे तू. ? आत्महत्या करणार आहेस का ? मग तर देवयानीची आशा धरून काहीच उपयोग नाही. की तिला आधी संपवायची आणि मग आत्महत्या करून स्वर्गात भेटायचं असा प्लॅन आहे ?
नाही,नाही साहेब, अहो असा कसलाही विचार माझ्या मनात नव्हता.
खरं बोलतो आहेस तू ? माझा विश्वास नाही बसत.
नाही साहेब, देवयानीवर मी नितांत प्रेम करतो. तिच्या बद्दल वाईट विचार माझ्या स्वप्नात सुद्धा येणार नाहीत.
मग हा मेसेज का पाठवला ?
ते मी उगाच एक प्रयत्न करून पाहीला.
काय म्हणून ?
देवयानी घाबरून किंवा माझी दया येऊन जर चुकून हो म्हणाली तर, म्हणून मी हा उपाय करून पाहीला.
बायकोला अशीच काहीतरी नाटकं करून आयुष्यभर दडपणाखाली ठेवणार होतास का ? हा प्रकार कौटुंबिक हिंसाचारा मधे मोडतो. तुला शिक्षा होऊ शकते.
नाही साहेब, असं काहीही नाहीये. मी फार साधा माणूस आहे हो. माझ्यावर विश्वास ठेवा.
ते दिसतंच आहे. पण मग मला सांग की, आता आत्महत्येचा दूसरा प्रयत्न केंव्हा करणार आहेस ? नाही म्हणजे आम्ही त्या वेळा तयारीत राहू, अॅम्ब्युलन्स, फॉरेन्सिक टीम वगैरे घेऊनच येऊ.
साहेब, माफ करा मला. माझी चूक मला कळली आहे. आता पुन्हा असं होणार नाही. मी खात्री देतो. जाऊ द्या मला.
तशी खात्री तू याच्या अगोदर दोनदा दिली आहेस. एकदा देवयानीशी अति प्रसंग करायच्या अगोदर आणि दुसर्यांदा अतिप्रसंग केल्या नंतर. आता आम्ही तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा ?
मी काय सांगू साहेब. खरंच चुकलं माझं. माझ्याकडून पुन्हा असं काहीही होणार नाही. मी देवयानीला मुळीच त्रास देणार नाही.
ठीक आहे, माझ्या मते या बाबतीत तुझ्या आई, वडीलांनी जर खात्री दिली तर ते जास्त बरोबर होईल. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. केंव्हा आणतोस तुझ्या आई, वडीलांना ?
साहेब सोडा ना. आई बाबांना मधे नका आणू, त्यांना खूप मोठा शॉक बसेल. आणि मग आमचे संबंध कधीच पूर्ववत होणार नाहीत.
भल्या गृहस्था, आम्हाला सगळ्यांच्या मान सन्मानाची जाणीव असते, म्हणूनच दोन साध्या ड्रेस मधले पोलिस पाठवले होते. नाही तर आम्ही फूल ड्रेस मधे येऊ शकलो असतो. मग सोसायटी मधे आणि ऑफिस मधे तुझा बॅन्ड वाजला असता. पण तुला एका मुलीच्या सन्मानाची जाणीव झाली नाही आणि म्हणूनच तिचा विनयभंग करायला धजावलास.
आता दुसरी बाजू ऐक. ते लोक म्हणजे देवयानी आणि विकास काय म्हणाले ते तुला सांगतो. ते म्हणाले की त्यांना तुझी FIR करायची नाहीये. कारण जर विनय भंगाची तक्रार नोंदवली असती तर तुला शिक्षा झाली असती आणि तुझ्या वर जो डाग लागला असता त्यामुळे तुला आयुष्य भर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. म्हणून मला म्हणाले की त्याला फक्त समजावून सांगा. बोल आता काय ठरवलं आहेस ?
साहेब माफ करा मला पुन्हा अशी गोष्ट माझ्या हातून होणार नाही. साहेब माझं डोकं फिरलं होतं, नाही तर माझ्यावर आजवर कुठलाही डाग नाहीये. प्लीज मला क्षमा करा.
माफी माझी नाही देवयानीची आणि विकासची माग. ते ही लेखी. तुझ्याच लॅपटॉप वरून, तुझ्याच पर्सनल ई-मेल वरून देवयानी आणि विकास ला मेल कर. आणि उद्या तुझा लॅपटॉप घेऊन ये आणि आम्हाला दाखव. प्रश्न तुम्हा दोघांचा आहे तेंव्हा मेल मधे आमचा म्हणजे पोलिसांचा संदर्भ नको. आल्यास तुझी खैर नाही. आलं का लक्षात ? आणि माफी नाम्या मधे, झालेल्या प्रसंगाचा उल्लेख करून त्या बद्दल माफी माग. आणि पुन्हा असं होणार नाही यांची ग्वाही दे.
हो. साहेब. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे करतो. उद्या तुम्हाला दाखवायला केंव्हा येऊ साहेब ?
फोन करून ये.
ठीक आहे साहेब. येऊ मी आता ?
ठीक आहे. राजू गेला. साहेब विचार करत होते की विकासला फोन करावा का म्हणून पण नंतर, माफीनामा आल्यावर विकासच फोन करेल. असा विचार करून
त्यांनी तो विचार बाजूला सारला.
त्या दिवशी रात्री अकरा वाजता देवयानी आणि विकास ला राजुचा मेल मिळाला. दोघांनाही तो माफी नामा वाचून आश्चर्यच वाटलं. आणि आनंदही झाला. देवयानीने लगेच विकास ला फोन केला आणि सांगितलं. विकास पण चक्रावला होताच, त्यांनी सांगितलं की त्याला पण ह्या मेल ची कॉपी आली आहे.
विकास हे कसं काय झालं असेल ? एकदम इतकी उपरती कशी काय झाली या माणसाला ?
काही कळत नाही कदाचित शीतोळयांनी त्याला समजावलं असेल.
पण मेल मधे त्याचा काहीच उल्लेख नाहीये.
बरोबर आहे. हे माफी पत्र आहे. त्या नी तुझी माफी मागीतलेली आहे. त्यात पोलिसांचा उल्लेख कसा असेल ? हे तुझ्या आणि त्याच्या मधलं transaction आहे. देवयानी एक कर त्या मेल चा स्क्रीन शॉट घे आणि मला whatsapp वर पाठव.
कशाला ? तुलाही आला आहे मेल.
हो पण मला कॉपी मार्क केली आहे. मी शीतोळयांना पाठवायचा विचार करतो आहे. आत्ता बराच उशीर झाला आहे, आणि त्यांना या वेळी त्रास देणं बरोबर नाहीये. म्हणून.
स्क्रीन शॉट पाठवला whatsapp वर. पण हे किती छान झालं नाही का ! ही मेल आल्यामुळे आता माझ्या डोक्यांवरचं टेंशन उतरलं.
खरंच माझ्याही मनावरचं टेंशन उतरलं.
मला काय वाटतंय सांगू ?
माहीत आहे मला. खरं म्हणजे मलाही तसंच वाटतंय.
काय वाटत ?
मला वाटत की तू इथे अगदी उडत उडत यावं आणि एकमेकांच्या मिठीत हा आनंद साजरा करावा.
काय अंतर्यामी आहेस की काय ? माझच मन वाचलंस की तू.
मग ! काय म्हणतेस ? येतेस का ? मी येऊ का घ्यायला ?
नको नको आपण उद्या भेटू. बोट दिलं की मनगट पकडायला धावतोस तू. गुड नाइट. बाय.
विकासला हसू आलं. ही तिची नेहमीचीच सवय होती. त्यांनी पुन्हा देवयानीला फोन लावला.
आता काय आहे ?- देवयानी
हे बघ ही तुझी जी सवय आहे ना, फोन कापण्याची तिचं मी व्याजा संकट उट्टं काढणार आहे. म्हणजे तसा संकल्पच केला आहे. बघच तू.
हे सगळं तू केंव्हा करणार आहेस ?
केंव्हा म्हणजे ? अर्थात लग्न करून तू माझ्या घरी आल्यावर.
मग हरकत नाही.
म्हणजे ?
म्हणजे मग मी फोन कापणारच नाही. जो काही त्रास द्यायचा असेल तो समोरा समोरच देईन. तू आत्ता पासून मनाची तयारी करून ठेव की किती काटे तुला बोचणार आहेत त्याची.
अरे उसकी फिकर नही. मधाची गॅरंटी असेल ना! मग काय काळजी आहे.
तुला काय माहीत गॅरंटी आहे म्हणून ? मी कुठे दिली आहे अजून ?
हे भगवान ! देवयानी तुम्हारा कुछ नही हो सकता.
देवयानीला हसू आल. अगदी खळखळून हसली. आणि हसता हसताच गुड नाइट केलं.
देवयानीनी मग काय मेल आला आहे ते सुप्रिया आणि लक्ष्मीला सांगितलं. त्यांनी पण सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सगळ्यांनाच शांत झोप लागणार होती. राजूचं जे सावट आलं होत, ते आता निघून गेलं होत. आता लग्नाचा मार्ग मोकळा झाला होता. जे अनपेक्षित संकट आलं होतं त्याचं निवारण झालं होतं.
विकास ने मग शीतोळयांना whatsapp वर स्क्रीन शॉट पाठवून दिला. विचार केला की उद्या सकाळी त्यांना भेटू. दुसऱ्या दिवशी विकासला इतकं काम होतं की संध्याकाळी सहा वाजे पर्यन्त त्याला श्वास घ्यायला पण फुरसत नव्हती. तो पोलिस स्टेशन ला पोचला तेंव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. शीतोळे साहेब केबिन मध्येच होते पण स्टाफ बरोबर काही महत्वाचं डिसकशन चालू होतं. विकासला जवळ जवळ तास भर थांबवा लागलं. तेवढ्यात देवयानीचे दोन फोन येऊन गेले.
मीटिंग संपली आणि विकास आत गेला. शीतोळे त्यांच्या कडे बघून दिलखुलास हसले.
काय विकास साहेब, झालेलं दिसतंय सगळं ठीक.
काय जादू केली हो तुम्ही साहेब, आम्हाला सांगा न.
अरे जादू बिदू काही नाही त्याला बोलावून जरा समजावलं इतकंच, पोरगा तसा चांगला आहे हो. जरा भटकला होता इतकंच. तुम्ही म्हणाला होता ते बरोबरच होतं. त्याचं आयुष्य स्पॉईल करण्यात काहीच मतलब नव्हता. ऐकलं त्यांनी. हां पण जर तो पुन्हा वाकड्यांत शिरला तर मात्र त्याला सोडायचं नाही. आता तुमचं निवेदन, त्याचा मेसेज आणि त्यांची मेल हे सगळं आमच्या फाइल ला आहेच, माझी इच्छा आहे की त्या फाइल चा उपयोग करायची वेळच येऊ नये. बाकी येणारा भविष्य काळच ठरवेल. या साऱ्या प्रकरणात तुम्ही दोघांनी अतिशय समजूतदार पणा दाखवला त्या करता मी तुमचं अभिनंदन करतो. Let us hope for the best.
हो साहेब खरं आहे. असं म्हणून विकास बाहेर पडला.
त्या दिवशी विकास आणि देवयानी दोघंही हवेतच तरंगत होते. दोघांचेही कामात लक्ष लागत नव्हतं. त्यांनी देवयांनीला फोन केला आणि मग असं ठरलं की इतके दिवस रेंगाळलेले फ्लॅट सजवण्याचं काम आज half day घेऊन पूर्ण करू. विकास half day सुट्टी घेऊन घरी आला. देवयानी सुद्धा तशीच सुट्टी घेऊन विकासच्या फ्लॅट वर आली. आता लग्नाला केवळ दोनच महीने राहिले होते. म्हणून मग फ्लॅट वर काय काय करायचं यांची आधी केलेली यादी घेऊन बसले आणि मग शॉपिंग ला निघाले. दिवस भर मग खरेदी, जेवण करून विकासने देवयांनीला रात्री अकरा वाजता फ्लॅट वर सोडलं. दिवस आनंदात घालवल्याचं समाधान दोघांच्याही मनात होतं.
क्रमश:.......
मो :9284623729
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.
https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187
धन्यवाद.