गोष्ट छोटी डोंगराएवढी.... विषय:- हरवत चाललेला संवाद.... शिर्षक :- संवाद संवाद साधायला काय लागत ? भाषा ? शब्द ? विषय ? निकड ?? नाही नाही.... या कशाचीच गरज नसते. आंतरिक जिव्हाळा असेल तर कोणाशी पण "संवाद" साधला जातो. कधी तो देहबोलीतून तर कधी नजरेने "संवाद" केला जातो. संवाद असा एक शब्द जो माणसाना व मनाला जोडतो ,त्यांना जवळ आणतो. पण हा "आपल्या मधला संवाद हरवला आहे का ?" आम्ही एकमेकांपासून दुरवलो आहेत का ? तुम्हाला हे वाचल्यानंतर असा प्रश्न पडला असेल आपण दररोज कित्येक लोकाशी संवाद साधतो. दररोज नवनवीन लोकांना भेटतो. मग मी म्हणते तो संवाद कुठला तर ? आधीच्या काळात म्हणजेच ज्या काळात आपल्याकडे बोलण्याचे व एखाद्या दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधण्याकरीता कोणतेही साधन नव्हते,इंटरनेट नव्हते ,तरी सुद्धा त्या काळात त्या जनरेशनच्या लोकांमध्ये घडणारा संवाद त्यांची मने जोडणारा होता व तो खरा संवाद होता.आधी लोकांशी संवाद साधण्याचे एकच साधन होते ते म्हणजे "पत्र लिहणे ". त्यातूनच सगळे जण आपले सुख दुःख वाटून घ्यायचे. तेव्हा जो काही संवाद व्हायचा तो संवाद म्हणजे "मुक संवाद" होता. आजच्या धक्काधकीच्या जीवनात संवादाची जागा सोशल मीडिया, मोबाईल इत्यादींनी घेतली आहे. आई-वडील मुलाला बागेत खेळायला घेऊन येतात. तो चेंडूशी खेळत, झोक्यावर बसत आपले मन रमवत असतो. आई-वडील मात्र आपापल्या मोबाईलमध्ये व्यग्र असतात. ना एकमेकांशी बोलणं होते ना आनंदी आठवणी तयार होतात. यातून कुटुंबातले मानसिक स्वास्थ्य हरवते एवढं नक्की. मोबाईलवरचा संवाद आणि प्रत्यक्षात साधलेला संवाद यांमध्ये असलेला जमीन-आसमानाचा फरक वेळीच लक्षात आल्यास अनेक समस्या दूर होतील. लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी, चोरून लाडू घेताना आईने मुलाकडे बघून केलेला केलेला रागीट चेहरा, मुलाला वडिलांनी सुनावलेले दोन शब्द, बाबांची बोलणी आणि आजोबांचे समजुतीचे बोल या संवादांमधील मजा सोशल मीडियावरील इमोजीमध्ये कधीच येऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. संवाद आणि सोशल मीडिया ही दोन्ही माणसाला मिळालेली वरदाने आहेत, पण त्याचा नेमका वापर कसा करायचा हे ज्याला कळेल, तो जगी सर्वसुखी होईल. "आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला "संवाद" फक्त आणि फक्त स्वतःशी होतो." जिवनात "वेळे" अभावी संगत सुटली तर सुटू द्या. पण "संवाद" सुटता कामा नये. कारण संवाद ही प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे. सध्या संवाद हरवत चाललाय...खंत एकच .... हरवलेला संवाद आणि नंतरची चुटपूट...काहीतरी सुटल्याची जाणीव, जी अधून मधून छळत राहते....राहून राहून ती गेलेली वेळ आठवत राहते.डोळ्यासमोर ती व्यक्ती ते प्रसंग येत राहतात. शेवटपर्यंत ! जीवन हे असच असत. काळ चक्र मागे फिरावेसे वाटते. पण ते शक्य नसते. वेळेचे महत्त्व वेळेवरच कळायला हवे ना .... आगे भी ना जा तू, पीछे भी ना जा तू. जो भी एक पल तु.. असे कितीतरी क्षण असतील की जेव्हा तुम्हाला वाटते की मला बोलायचे आहे पण आड येतो तो अहंकार... वेळेची चालढकल... छोट्या छोट्या गोष्टीचा राग...मनात बसलेली गैरसमजुत अशी एक ना अनेक कारणे असतात त्यामागे.. आणि एकदा का गैसमज निर्माण झाले की ते कोणी दूर सुध्दा करत नाही .... लहान असो वा मोठा प्रत्येकाला आपला इगो महत्त्वाचा ...आणि जेव्हा गैरसमज दूर होतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. रडा, पाण्यासारखा पैसा ओता पण गेलेला वेळ , तुटलेले नाते आणि गेलेली माणसे परत कधी येत नाही.. आहे तो क्षण आपला समजायचा ..पुढे काय होणार काय माहित...तसा मृत्यु पण कधी येणार नाही सांगत येत??? नंतर रुखरुख करण्यापेक्षा आताच बोलून घ्या.वेळ काढून संवाद साधा.क्या पता कल होना हो.. वक्त का क्या भरोसा बन के पानी बन जाये कल अगर मिल ना जाये रह न जाये बात बाकी.... हरवलेला संवाद पुन्हा शोधुया....जीवनाच्या प्रत्येक दालनात संवाद हा हवाच .... रोज बोलूया म्हणतो पण राहून जात..उद्या नक्की बोलूया पण वेळ नसतो...जेव्हा वेळ असतो तेव्हा शब्द नसतात..जेव्हा शब्द असतात तेव्हा ते ओठावर येत नाही ..मनात साठलेले असतात हे कळून हि न कळल्यासारखे चाचप डतो मी विसरून जातो मी काय बोलायचे ते असच चालू आहे सध्या बोलूया म्हणतो पण राहून जात.... सध्या आपली स्थिती ही ' दिल चाहता है ' मधील अमीर खान सारखी झाली आहे. आजूबाजूला गर्दी आहे पण आपण त्याचा भाग नाही. शरीराने एकीकडे आणि मनाने दुसरीकडे .... वाढलेली स्पर्धा आणि त्यामध्ये स्वतःला टिकवण्याची धडपड...यामुळे संवाद हा हरवत चालला आहे ....सगळ्यांना फक्त मी कसा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ हे दाखवायचे आहे..आपले रोजचे रूटीन चालू आहे पण त्यात आपले लक्ष नाही...आपल्यापासून दूर काहीतरी जातय ...तूटतय ह्याची जाणीव होत असली तरी त्या गोष्टी पासुन आपण दुरावा राखातोय...वरुन सगळ आलबेल दिसत असले तरी नाते तुटत चालले आहे जवळच्या माणसाचे चेहरे अनोळखी होत आहे ..... संपर्काची साधने माञ वाढत चालली आहे पण संवाद हरवत चालला मैत्रीचा असो नात्याचा... खरचं संवाद हा हरवत चालला..... ॲड श्रद्धा मगर.