पो. स्टेशनचा माझा अनुभव पहिलाच असल्याने मी थोडा नर्व्हस होतो. गेलो तेव्हा इन्स्पे. कानविंदे मोहंती साहेबांशी बोलत होते. मला मोहंती साहेबांचं आश्चर्य वाटलं एवढा मोठा धक्का बसूनही ते थंडपणे घेत होते. फक्त उठताना मात्र ते धमकीवजा म्हणाले, " ऑफिसर ध्यानमे रखना अगर मेरी बेटी नही मिली या उसके साथ कुछ हुवा तो तुम तुम्हारे कुर्सीकी फिकर करना चालू करो, समझे " हे बोलणं अर्थातच कानविंदेंना आवडलं नाही. " सर हम पूरी कोशिश करेंगे, आप फिकर नही करना " मग मोहंती म्हणाले, " फिकर मुझे नही आपको करनी है. " असं म्हणून मोहंती गेले. कानविंदेंची चर्या उतरली. त्यावर त्यांनी राग माझ्यावर काढायला सुरुवात केली. मला दरडावून म्हणाले, " बोला सबनीस लवकर बोला, तुम्ही मुलीला कशी गायब केलीत, का तुमचा कुणावर संशय आहे ? " मी शांतपणे म्हणालो, " हे पाहा साहेब , सगळे लोक पार्टीला होते. त्यामुळे कोणाचाच संशय घेता येत नाही. मग मात्र ते उसळून म्हणाले, " याचाच अर्थ असा, की तुम्ही मुलीच्या अपहरण कर्त्याला सामिल आहात. असा कसा तुम्हाला संशय येत नाही ? " आता मात्र मी गप्प बसणं पसंत केलं. मला माहित होतं की त्यांच्या जवळ कोणताच पुरावा नसल्याने ते भडकले होते. मी काहीच बोलत नाही असे पाहून ते म्हणाले, " चला , आपण परत तुमच्या वाड्यावर जाऊ. मला आत्ता दिवसाउजेडी वाडा पाह्यला पाहिजे. " ; त्यावर मी त्यांना म्हंटले, " अहो मला ऑफिसला जाणं भाग आहे. आज मिटिंग आहे. " त्यावर त्यांनी उत्तरादाखल उठून दोन कॉन्स्टेबल बरोबर घेत ते गाडीकडे निघाले. गाडीत बसता बसता मला म्हणाले, " तुम्हाला काय वाटलं तुमच्या मदतीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही ? " असं म्हणून गाडी चालू केली. तितक्यात मला तिथे हरिदास येताना दिसला. मी पटकन त्यांना म्हंटलं, " साहेब तो पाहा हरिदास एजंट. " त्याबरोबर ते खाली उतरले. आणि मला जायला सांगून ते त्याला घेऊन आत गेले. माझं काम झालं होतं. लीना घाबरली होती. मला आज तरी पोलिस माझ्या घरी यायला नको होते. एकूण प्रकरणावर नीट विचार करून मी काही सापडतंय का ते पाहणार होतो. त्यासाठी मला वेळ हवा होता. शिवाय मला रसिकाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं. मी तसाच बँकेत गेलो. जुडेकर आला होता . पण गोळे आला नव्हता. बाकी स्टाफ होता. त्यांना याची थोडी कुणकुण लागली होती. पण मी कालचा विषय काढला नाही. तरी संध्याकाळी पै त्याबद्दल बोललेच. " सर , मला वाटतं, कालच्या विधींमुळे तर असं झालं नाही. ? " मी त्यावर त्यांना म्हणालो, " पै साहेब माझा असल्या विधींवर काडीमात्र विश्वास नाही, केवळ माझ्या बायकोच्या समाधानासाठी मी हे सगळं केलं. नक्कीच याच्या मागे कोणितरी आहे. ते शोधावं लागेल. मलाही आणि पोलिसांनाही. " असं म्हणून मी गाडी काढून घरी निघालो. मी चांगलाच उत्तेजित झालो होतो.
मिटिंग ठीक अकरा वाजता चालू झाली. मॅनेजर पिंटो यांनी बँकेची पॉलिसी आणि प्रत्येक ब्रांचला लोन देण्यासाठी सुपूर्त केलेली रक्कम याबद्दल बोलू लागले. फेब्रुवारी महिना असल्याने प्रत्येकाच्या जवळ जवळ फायनल फिगर तयार होत्या.
एक फक्त मी सोडून . तशी माझीही फिगर तयार होती. पण ती अगदीच नगण्य वाटत होती . अर्थात त्याला कारणं होती. मि. मोहंती यांच्या हाताखाली एकूण पाच ब्रांचेस होत्या. त्या सगळ्यांमध्ये माझी फिगर सर्वात कमी होती. माझ्या ब्रांचचे नाव पुकारण्यात आल्यावर मी माझी फिगरसांगितली , त्याबरोबर पिंटो साहेब मोहंतीना म्हणाले, " मि. मोहंती हे काय चाललय ? तुम्ही सबनिसांवर कारवाई का केली नाही. निदान इन्स्पेक्शन घेऊन त्यांना ताकीद तरी द्यायला हवी होतीत. " त्यावर मोहंती काहीच बोलले नाहीत. मग मला मी " प्रत्येकाची सिक्युरिटी आणि
स्टॉक पडताळून मगच लोन्स दिलेली नाहीत . बँकेला त्यामुळे भविष्यात वसुलीची गंभीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला. " असे सांगितले. मग मात्र पिंटी भडकले, " अहो , पण सध्या पाच लाखाच्या आतल्या कर्जांना सिक्युरिटीवर जास्त जोर देऊ नये असा सरकारचा आदेश आहे. मग तो आपण धाब्यावर बसवायचा का ? तुम्हाला दिलेल्या परिपत्रकात सगळं विस्तृत दिलेलं आहे. तुम्ही अभ्यास करीत नाही का ? "मग मोहंतींकडे वळून ते म्हणाले, " काय हे , काय चाललंय काय तुमच्या राज्यात ? हे असं . " मोहंती पुन्हा काही बोलले नाहीत. ते पाहून पिंटो साहेबांनी बरोबर आणलेल्या स्टाफला ताबडतोब सूचना देऊन मोहंतींनाच मेमो दिला आणि " मला याचं स्पष्टिकरण एका आठवड्याच्यात पाहिजे " अशी तंबीही दिली. मग मिटिंग संपली. मला मोहंतींची दया आली. आपणच आता काहितरी केलं पाहिजे हे मला जाणवलं. एकीकडे मुलगी नाहीशी होणं हा ताण त्यांच्या डोक्यावर होता. आमच्या नंतर पिंटो साहेबांसमवेत उद्योजकांची मिटिंग होती. आम्ही कॉंफरन्स हॉलच्या बाहेर आलो. नेमका शितोडीकर भेटला. त्याच्या नजरेत कृद्धपणा भरलेला होता. आता तर त्याला संधी मिळाली. हेच खरं. मी बाहेर आल्या आल्या मोहंतींची माफी मागितली. आणि अजून एक महिना बाकी आहे त्यात मी जेवढा बॅकलॉग भरून काढता येईल तेवढा भरून काढीन असे आश्वासन त्यांना दिले. ते फार काही बोलले नाहीत. पण निघून गेले. माझ्याबद्दलचं इंप्रेशन बिघडलेलं दिसलं. जुडेकरला मी शोधू लागलो. तेव्हा तो श्रिवास्तव बरोबर बोलत असलेला आढळला. श्रीवास्तवला बरे वाटल्याचे दिसत होते. मी जुडेकरला खडसावून विचारले, तेव्हा त्याने श्रीवास्तवलाही वैयक्तिक स्वरूपाचे लोन हवे असल्याबद्दल तो बोलत होता असे म्हणाला. माझा विश्वास बसला नाही. मी नंतर बोलण्याचे ठरवले. आम्ही दोघेही माझ्या घरी आलो. आजच्या दिवस राहून रामनूरला दुसऱ्यादिवशी जाण्याचे ठरवले. त्यावर लीना म्हणाली, " मी दोन दिवस इथेच राहणार आहें, नंतर येईन. " मी मान्य केले. आम्ही मात्र दुसऱ्यादिवशीच निघालो. तो शनिवार होता. थेट बँकेत गेलो. तालुक्याची ब्रांच असल्याने एक प्रकारचा मंदपणा होता शहरामध्ये ब्रांच कशी भरलेली असते. इथेही स्टाफ कामात गर्क होता. पण का कोण जाणे मिटिंग ठीक अकरा वाजता चालू झाली. मॅनेजर पिंटो यांनी बँकेची पॉलिसी आणि प्रत्येक ब्रांचला लोन देण्यासाठी सुपूर्त केलेली रक्कम याबद्दल बोलू लागले. फेब्रुवारी महिना असल्याने प्रत्येकाच्या जवळ जवळ फायनल फिगर तयार होत्या.
एक फक्त मी सोडून . तशी माझीही फिगर तयार होती. पण ती अगदीच नगण्य वाटत होती . अर्थात त्याला कारणं होती. मि. मोहंती यांच्या हाताखाली एकूण पाच ब्रांचेस होत्या. त्या सगळ्यांमध्ये माझी फिगर सर्वात कमी होती. माझ्या ब्रांचचे नाव पुकारण्यात आल्यावर मी माझी फिगर
सांगितली , त्याबरोबर पिंटो साहेब मोहंतीना म्हणाले, " मि. मोहंती हे काय चाललय ? तुम्ही सबनिसांवर कारवाई का केली नाही. निदान इन्स्पेक्शन घेऊन त्यांना ताकीद तरी द्यायला हवी होतीत. " त्यावर मोहंती काहीच बोलले नाहीत. मग मला मी " प्रत्येकाची सिक्युरिटी आणि
स्टॉक पडताळून मगच लोन्स दिलेली नाहीत . बँकेला त्यामुळे भविष्यात वसुलीची गंभीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला. " असे सांगितले. मग मात्र पिंटी भडकले, " अहो , पण सध्या पाच लाखाच्या आतल्या कर्जांना सिक्युरिटीवर जास्त जोर देऊ नये असा सरकारचा आदेश आहे. मग तो आपण धाब्यावर बसवायचा का ? तुम्हाला दिलेल्या परिपत्रकात सगळं विस्तृत दिलेलं आहे. तुम्ही अभ्यास करीत नाही का ? "मग मोहंतींकडे वळून ते म्हणाले, " काय हे , काय चाललंय काय तुमच्या राज्यात ? हे असं . " मोहंती पुन्हा काही बोलले नाहीत. ते पाहून पिंटो साहेबांनी बरोबर आणलेल्या स्टाफला ताबडतोब सूचना देऊन मोहंतींनाच मेमो दिला आणि " मला याचं स्पष्टिकरण एका आठवड्याच्यात पाहिजे " अशी तंबीही दिली. मग मिटिंग संपली. मला मोहंतींची दया आली. आपणच आता काहितरी केलं पाहिजे हे मला जाणवलं. एकीकडे मुलगी नाहीशी होणं हा ताण त्यांच्या डोक्यावर होता. आमच्या नंतर पिंटो साहेबांसमवेत उद्योजकांची मिटिंग होती. आम्ही कॉंफरन्स हॉलच्या बाहेर आलो. नेमका शितोडीकर भेटला. त्याच्या नजरेत कृद्धपणा भरलेला होता. आता तर त्याला संधी मिळाली. हेच खरं. मी बाहेर आल्या आल्या मोहंतींची माफी मागितली. आणि अजून एक महिना बाकी आहे त्यात मी जेवढा बॅकलॉग भरून काढता येईल तेवढा भरून काढीन असे आश्वासन त्यांना दिले. ते फार काही बोलले नाहीत. पण निघून गेले. माझ्याबद्दलचं इंप्रेशन बिघडलेलं दिसलं. जुडेकरला मी शोधू लागलो. तेव्हा तो श्रिवास्तव बरोबर बोलत असलेला आढळला. श्रीवास्तवला बरे वाटल्याचे दिसत होते. मी जुडेकरला खडसावून विचारले, तेव्हा त्याने श्रीवास्तवलाही वैयक्तिक स्वरूपाचे लोन हवे असल्याबद्दल तो बोलत होता असे म्हणाला. माझा विश्वास बसला नाही. मी नंतर बोलण्याचे ठरवले. आम्ही दोघेही माझ्या घरी आलो. आजच्या दिवस राहून रामनूरला दुसऱ्यादिवशी जाण्याचे ठरवले. त्यावर लीना म्हणाली, " मी दोन दिवस इथेच राहणार आहें, नंतर येईन. " मी मान्य केले. आम्ही मात्र दुसऱ्यादिवशीच निघालो. तो शनिवार होता. थेट बँकेत गेलो. तालुक्याची ब्रांच असल्याने एक प्रकारचा मंदपणा होता शहरामध्ये ब्रांच कशी भरलेली असते. इथेही स्टाफ कामात गर्क होता. पण का कोण जाणे, कामाला वेग नसल्याचे मला जाणवले. मी मग पैं ना आत बोलावले , त्यांना थोडीफार कल्पना दिली. कामाचं गांभिर्य जाणवून तेही विचार करून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी घरी गेलो. आता आजपासून लीना आणि मुलं नव्हती. मी ती संधी घेण्याचं ठरवलं. मी जेवढा कामावर असायचो तेवढं वाडा त्यातल्या सगळ्या गोष्टी विसरायचो , पण घरी आलो की पुन्हा तेच विचार येत. आज घरी आल्या आल्या, समोरच्या मोकळ्या जागेत लावलेली झाडं पाहिली. ती बरीचशी मलूल आणि सुकत चालल्या सारखी दिसली. तिथे आता हळूहळू कोरडे गवत तयार होत होते. वाडा परत पूर्वीच्याच स्थितीवर येणार का , असे मला वाटले. पोलिसांचा भरवसा नव्हता. ते केव्हाही येऊन उभे राहत असत. मी चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसलो. अजून थंडी चागलीच जाणवत होती. निदान वाड्याच्या परिसरात तरी. .
अचानक वारा सुटल्याचं मला जाणवलं. ................. वारा इतका सुटला होता की जड दरवाज्यासुद्धा थोडा हलल्यासारख मला भासला.
वाडा माणसात आला असला तरी अचानक तो मला आकुंचित वाटू लागला. हे काय होतंय मला कळेना हॉल जास्तच लांबलचक वाटू लागला. हॉलची रुंदी कमी झाली आणि मी एका मोठ्या लांब बोळातील सोफ्यावर बसलो असल्याचं जाणवल. मी घाबरून दरवाज्या गाठला. बाहेर उभा राहून आत पाहू लागलो. तेवढ्यात फकीरबाबांचा आवाज आला. " बेटा तू कहां जायेगा, यहां रहना तेरे लिये ठीक नही है. औरत को लेकर निकल जा. डरना नही. ये उदी लेकर अंदर की तरफ फेक दे. आजके लिये छुटकारा पायेगा." त्यांनी माझ्या हातात तीच उदी दिली. मी त्यांना
उदी नाहीशी झाल्याबद्दल विचारणार होतो , तेवढ्यात ते धावत गेट कडे गेले आणि नदीच्या दिशेने पळत गेले. मी तसाच उदी खिशात टाकून
त्यांच्यामागोमाग धावलो. तेव्हा ते धावता धावता म्हणाले, " मेरा पीछा मत कर. तू पछाताएगा. ...... " असं म्हणून ते पडक्या चर्चच्या मागे दिसेनासे झाले. मला हे नवीन होतं मी स्वतःला चिमटा काढून पाहिले . मी शुद्धिवर होतो. मग मी घरात आलो. मगाचचाच नजारा होता. मी त्यांनी दिलेली उदी फेकली. त्याबरोबर हॉल पूर्ववत झाला. माझा विश्वासच बसेना. हे सगळं फकीरबाबा करीत नव्हते ना ? अशी शंका मला चाटून गेली. आत जावं की नाही मी विचार करीत होतो . परत असं झालं तर माझ्याजवळ आता उदीही नव्हती आणि फकीरबाबा पण आता येणार नव्हते. सात वाजून गेले होते. बाहेरचा वारा थांबण्याची चिन्हे दिसेनात. मी दरवाज्या लावून घेतला. आता मी एकटाच होतो. कधीही देव वगैरे न मानणारा मी आज देवांसमोर दिवा लावीत होतो. मला स्वतःचं आश्चर्य वाटलं. काहीही असो. माणसाबरोबर अनाकलनीय घटना घडू लागल्या की माणूस अशा गोष्टी करतो. कारण लहानपणी झालेले संस्कार त्याला आठवू लागतात. तेव्हाही अशीच भीती वाटलेली असावी .
(क्रमशः)