चांगुलपणाच ओझं

रात्री सौरभ च्या खोलीतुन नीताचा व सौरभचा व्हिडिओ कॉल वरील संवाद त्यांच्या कानावर येत होता."नीता रागारागात म्हणत होती " तुझे काय अडले रे मी नसले तर?? आई आहेस ना सर्व करायला? " असं का म्हणते? सौरभ तिला समजवायचा प्रयत्न करत होता. "मग काय म्हणूं?? माझं असं काय आहे त्या घरात? त्या म्हणतील ते करायचे, मला मनाने असे कुठे काय कराल देतात?? छकुलीला ही फार लाडावून ठेवले आहे, सगळ त्याच करणार".पुढच बोलण सुषमा ताईंच्याने ऐकवेना, त्या खोलीत घेऊन पलंगावर पडल्या. .
चांगुलपणाच ओझं

सुषमाताई ना झोप येत नव्हती. रात्रभर त्या या कुशीवरून त्या कुशीवर होत होत्या .डोळ्याला डोळा लागत नव्हता.

नीताला, त्यांच्या सुनेला माहेरी जाऊन पंधरा दिवस व्हायला आले पण-- पण इतक्या दिवसात तिने स्वतःहून एकदाही फोन केला नव्हता.
सुषमा ताईंना नीता आणि नात छकुली शिवाय घर सुन सुन वाटत होत. त्यांनी सौरभला आपल्या मुलाला विचारलं "अरे नीता चा काही फोन आला कां, केव्हा येते..?
सौरभ कामावर निघायच्या गडबडीत होता.
\" आई माहित नाही ,राहू दे तिला निवांत, जरा डोकं शांत होईल.
मी संध्याकाळी विचारतो, म्हणत सौरभ कामावर निघून गेला.

सुषमा ताईंना बरेच दिवसापासून निता चे काहीतरी बिनसले आहे अशी शंका येत होती, जेव्हा तिने माहेरी जायचे रिझर्वेशन केले तेव्हा त्यांनी विचार केला आईची आठवण येत असावी ,पण-- तरीही आपल्या जवळ काहीही न बोलता अचानक जायच ठरवले हे त्यांना जाणवले.

रात्री सौरभ च्या खोलीतुन नीताचा व सौरभचा व्हिडिओ कॉल वरील संवाद त्यांच्या कानावर येत होता.
"नीता रागारागात म्हणत होती
" तुझे काय अडले रे मी नसले तर?? आई आहेस ना सर्व करायला?
" असं का म्हणते? सौरभ तिला समजवायचा प्रयत्न करत होता. "मग काय म्हणूं?? माझं असं काय आहे त्या घरात?
त्या म्हणतील ते करायचे, मला मनाने असे कुठे काय कराल देतात??
छकुलीला ही फार लाडावून ठेवले आहे, सगळ त्याच करणार".
पुढच बोलण सुषमा ताईंच्याने ऐकवेना, त्या खोलीत घेऊन पलंगावर पडल्या.
" काय ऐकलं हे मी? मी नेहमीच तिच्या सुखासाठी झटत होते, रात्र विचार करण्यात सरली.

सकाळी रोजची कामे आटोपून त्यांनी नीताला फोन केला, रिंग बरेच वेळा गेली,
आत्ता कामात असेल असे समजून त्यांनी मग थोड्या वेळाने परतफोन लावला .
हैलोनीता,
"अहो मी आशा बोलते ,नीता ची आई".
" अग बाई नमस्कार ,कशा आहात??
.मी ठीक आहे .नीता आंघोळीला गेली आहे, आणि छकुली खेळती आहे.
काय म्हणते नीता? बरेच दिवस झाले फोन नाही म्हणून विचार केला आपणच बोलावं, करमत नाही हो. हया दोघिंशिवाय.
हं बरोबरच आहे,
" काय झाले आहे नीताला? काही बोलली का तुमच्याजवळ? जरा अपसेट असते आजकाल, सुषमा ताईंनी विषयाला हात घातला.

अहो चालायचंच आज कालच्या मुलींना न सगळ्याच गोष्टींची घाई. म्हणजे --माझं काही चुकलं का हो? काही बोलली का ती?
तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात सुषमाताई ,पण काय आहे ना ,मी जरा स्पष्टच बोलते, नीता लाआमच्या संसाराची, घर कामाची भारी हौस.
तिला वाटतं हा तिचा संसार तिने स्वतः मनाने सर्व करावं.
पण काय तुम्ही तिला काही च सांगत नाही आणि मनाने करायचा धीर होत नाही .त्यामुळे तिला ते घर आपलेसे वाटत नाही करु द्या तिला,अहो चुकत चुकत शिकेल आणि मी समजवेन तिला, तुम्ही नका फार काळजी करू, असे म्हणत आशाताईंनी फोन ठेवला.

आता सुषमा ताईंना घटनांची सुसंगती लागायला लागली. आपलं काहीतरी चुकतंय या जाणिवेने त्या मनातून आणखीनच खट्टू झाल्या.

संध्याकाळी देवदर्शन व भाजी घेऊन यावे म्हणजे मन शांत होईल या विचाराने त्या बाहेर पडल्या, समोरून त्यांची दुरची भावजय कम मैत्रीण शोभा येताना दिसली.
अगं "मी तुलाच फोन करणार होते, आम्ही महाबळेश्वर-पाचगणी ला जात आहोत आठ दिवस.
तुला जमेल की नाही? तू काय बाई सून,नाती मधेच गुंग असते. पण तरीही म्हटलं एकदा विचारून घ्यावे.
सुषमाने विचार केला जावे फिरायला , मन तेवढच शांत राहिल.
ठरलं तर मग परवाला निघतोय आपण.
घरी सौरभ व त्याच्या बाबांनी म्हणजे पती देवांनी आनंदाने संमती दिली जणू त्यांनाही "अकेले है तो क्या गम है "असे हवे असावे.
आठ दिवस खूपच धमाल-मस्ती मध्ये गेले सुषमा चे, दिवसभर खूप फिरणे, गप्पा, खाणे. रात्री हॉटेलमध्ये स्टे, रात्री दोघीदोघी एका खोलीत अशी झोपायची सोय .
सुषमा एक विचारू? "आल्यापासून पाहतोय एकफोन नाही आला नीता चा शोभा ने विचारले??
इकडे यायचं कळवले आहे तिला.
"मग काही बिनसलं आहे का तुमच्या त" ?
सुषमा ने मग झाले ते सांगितले. माझं नेमकं काय चुकतंय हेच मला समजत नाही ग,
मी तिला अगदी मुलीसारखं वागवते.
तेच तर चुकतंय तुझं ,म्हणजे अगं तू जशी नाही तसं दिसायचा प्रयत्न करणं सोड.
म्हणजे असं "आदर्श सासू व्हायचा विचार सोड.
जशी आहेस तशी वाग".
\" अग पण \".
"वाईट वागअसे म्हणत नाही मी" पण ,-- तुझ्याअती चांगलेपणाच ओझं होतंय, तुलाही आणि तिलाही.
त्याने सगळी गडबड होतीआहे.
नीताला करुदे जबाबदारीने ,
सांगते ग मी तिला.
असं करू नको तिला तिचं कळून सवरुन करू दे ,
तूथोडं थोडं कामातुन निवृत्त हो. जसा पतंग आकाशात मोकळेपणाने विहरतो जरी त्याची दोरी हातात असते, पण जर दोर सारखी ओढली तर पतंग उंच कसा जाईल? धाग्याला थोडी ढील द्यायला हवी ना ?"
सुषमा ला शोभा चे बोलणे लक्षात येत होते.
खरंच ग माझ्या लक्षातच नाही आले मी आपले तिला त्रास नको म्हणून---
हो पण आता थोडं दुर्लक्ष कर .
इतर ठिकाणी आपण ऐकतो, पाहतो सुनांना काम करायला नको असतं पण तुझ्या नीताला कामाची हौस आहे तिला प्रोत्साहन दे.
आणि झोप आता शांत.
उद्या आपल्याला निघायचे ना?? नाही ,माझ्या मैत्रिणीचा वाई मध्ये एक वाडा आहे आपण दोघी तिथे दोन दिवस राहणार आहोत. तेव्हा घरी जाण्याची घाई करू नको. निघायच्या दिवशी सुषमा ला नीता चा फोन" आई मी परत आले आहे, तुम्ही केव्हा पोहोचता?
"अगं आम्हाला अजून दोन-तीन दिवस लागतील. आम्ही मजेत आहो "
तू आहे त्यामुळे मला घराची ही चिंता नाही. छकुलीसाठी गंमत घेऊन येईन म्हणत सुषमाने फोन बंद केला.
------------------------------------------लेखिका. सौ. प्रतिभा परांजपे





.