बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला ..लिला शेठानीची लेक आज चार पाच लोकांच्या साक्षीने राजूची बायको झाली..तो काळ जूना होता आणि त्यात मी किन्नर कुटूंबात वाढलेली त्यामूळे लग्नं लवकर उरकून टाकलं माझं
पण तूम्हाला काय सांगू मी आमच्या अहों बद्दल.. दिसायला देखना होता माझा नवरोबा पण मर्द काय असतो ते ह्यांच्याकडे बघून नाही कळनार कोणाला, एकदम गरीब गाय होता तो.. मला फटकळ बोलायची सवय आणि स्वभाव रागीट त्यामूळे हा माझा चोमू नवरा लय घाबरायचा बघा मला.. माझं सासर तसं कोल्हापूरचं पण राजू ईथे शेंद्रे गावात छोट्या घरात रहायचा... मी जेवढं त्याच्यावर रागवायची त्याची कसर हा रात्री पलंगावर काढायचा..
गेले सहा महीने झालेले आम्ही खूप प्रयत्न केले पण माझ्यामध्ये गरोदर होयचे काही लक्षणं दिसत नव्हती या गोष्टीवरून सतत आमच्यात वाद होयचा ...ह्याला माझ्याकडून पोर बाळ हवं होतं . मग एकदिवशी हा मला मोठ्या डाँक्टरांकडे घेऊन गेला तेव्हा माझं पितळ उघडकीस आलं , त्याला कळालं की माझं लहानपणीच ऑपरेशन झालय आणि म्हणूनच मी याला कधीच मूल नाही देऊ शकनार..
त्याच रागाच्या भरात याने मला माझ्या माहेरी हाकलून दिलं.. काही महीन्यांनी आमचा काडीमोड झाला आणि त्याने लगेच दूसरं लग्न केलं सुद्धा.. ईकडे मी लिला शेठानी सोबत एकटीच रहात होते..पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते माझ्या आयूष्याचा संघर्ष आता कूठे सूरू होणार होता..
काही महिन्यांनी शेठानी म्हणजे माझी लाडकी लिला आक्का देवा घरी गेली..माझा भाऊ कुठं असतो आणि त्याचं काय चालू आहे हेही कळायला काही मार्ग नव्हता..मी आता एकटी पडली पण आक्काचे नातेवाईक घर मागायला आले ...सखाराम आणि त्याची बायको मैना यांनी मला पूण्याला त्यांच्या घरी नेले बुधवार पेठेत.
मी केवळ 18 वर्षांची होते . तेव्हा सखाराम आणि त्याच्या बायकोसोबत रहायचे . सखारामची पेठेजवळ टपरी होती. एकावर्षानी सखारामने माझ्याशी लग्न केलं ,कारण सखारामची बायको वारली होती त्याला आधार म्हणून त्याने मला त्याची बायको बनवून घेतली. मग सखाराम सोबत संसार करताना त्यानेही मला खूप भोगलं आणि नंतर त्याच्याही लक्षात आलं की ही काही कामाची नाही हीचं आँपरेशन झालेलं आहे ..त्याच्या डोक्यात काय सुरू होतं ते कळत नव्हतं, माझ्यापासून काहितरी फायदा व्हावा म्हणून त्याने मला बुधवार पेठेत विकायचं ठरवलं..
क्रमश..