क्षितिजा खूप वेळ तशीच दारात उभी असते. देवयानी तिच्याकडे लक्ष जात. क्षितिजा..क्षितिजा...देवयानी आता थोड्या मोठ्याने आवाज देते. तशी क्षितिजा भानावर येते.
देवयानी - अग काय? कुठे लक्ष आहे? घरात येणार आहेस की बाहेरूनच जायचं आहे?
क्षितिजा - आता नको बसायला. चल आपल्याला उशीर होईल. आईला सांगितलं आहेस का तर चल आता.
देवयानी - ठीक आहे. मला माहित होत. तू आलीस की घाई करणार ते. कुठे जायचं आहे आपण. तू असे अा करून का बघतेय माझ्याकडे? नाष्टा वैगरे करून आलीस ना की मलाच खाणार आहेस आज?
क्षितिजा - हसत...नाही अग...तू आज खरचं खूप गोड दिसतेय...
देवयानी - बरं thank you.. मला वाटत होत तू फक्त बघतच राहणार आहेस..काहीच बोलणार नाहीय..
क्षितिजा - बोलायला शब्दच सुचत नव्हते..तू एवढी छान दिसतेय की शब्दात सांगताच येणार नाहीय..
देवयानी - कुठे जायचं आहे आपल्याला..
क्षितिजा - चल सांगते..
( क्षितिजा तिच्या स्कूटी वरून देवयानीला घेऊन निघते. काही वेळाने ती स्वामी समर्थांच्या मठात पोहचते )
क्षितिजा - मला कल्पना आहे. वाढदिवस तुझा आहे तर मी तुला विचारायला हवे होत आपण कुठे जायचं आणि कुठे नाही ते. पण ही जागा माझ्यासाठी खूप खास आहे आणि हो मी इथे फक्त एकाच व्यक्तीसोबत आले आहे आणि त्या नंतर तू आहेस जिच्या सोबत मी इथे आलेय..
देवयानी - तू इथे मला घेऊन आलीस त्या बद्दल काहीच वाद नाहीय..पण तुझे हे कोड्यात बोलण ना मला अजिबात आवडत नाही..चल आत मध्ये जायचं का की बाहेरून दर्शन घ्यायचं आहे...
( देवयानी आणि क्षितिजा दोघी मठात दर्शनाला जातात..छान दर्शन घेऊन तिथे थोडा वेळ बसतात )
देवयानी - क्षितिजा खरचं खुप छान आणि प्रसन्न वाटत आहे आज मला इथे येऊन..मी फार काही देव मानत नाही..पण आज एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे इथे..
क्षितिजा - हो मला माहित आहे..मी तर देवाच्या पाया पडत नाही..हात जोडत नाही..पण वर्षातून एकदा ह्या दिवशी नेहमी मी इथे येते आणि आज तुझा वाढदिवस आहे..तू माझ्यासाठी खास आहेस म्हणून तुला सोबत घेऊन आले आहे..
( थोडा वेळ दोघी एकमेकींशी काहीच बोलत नाहीत..काही वेळा नंतर क्षितिजा तिथून निघण्यासाठी देवयानीला विचारते..देवयानी ही हो म्हणते..दोघी तिथून बाहेर येतात )
क्षितिजा स्कूटी चालू करते आणि दोघीही पुढच्या प्रवासासाठी निघतात.काही वेळानंतर दोघी एका इमारती जवळ येऊन पोचतात.क्षितिजा तिथे स्कूटी थांबवते. देवयानी आज काहीच न बोलता फक्त तिच्या सोबत चालत असते. दोघी त्या इमारती मधल्या एका ऑफिस जवळ येतात. क्षितिजा देवयानीला बाहेर उभ राहायला सांगून ऑफीसमध्ये जाते. क्षितिजा तिथल्या मुख्यांसोबत बोलत असते. बोलण झाल्यावर ती देवयानीला आतमध्ये बोलवते. ती एका तृतीयपंथींची सेवाभावी संस्था असते. तृतीयपंथींना हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना काम मिळवून देण्यासाठी तिथे झटत असतात..
पन्ना तेथील मुख्या देवयानीला बघून क्षितिजाला विचारतात..ये है क्या birthday girl.. त्या तेथील एका व्यक्तीला आवाज देऊन बोलवतात..
पन्ना - आज ये अपनी मेहमान हैं। इनका आज जन्मदिन हैं। आप इनके लिए केक और कुछ खाने के लिए लेके आओ। कुछ कसर नहीं रेहनी चाहिए। आज इनके जन्मदिन पर। सुन रेशमा को बोलना तीन कॉफी लाने।
( पन्ना देवयानी ला विचारतात ) बाळा तुझ्यासाठी अजुन काही? ( देवयानी फक्त मान हलवून नकार देते ) तश्या पन्ना त्या व्यक्तीला जायला सांगतात आणि लवकर यायची कल्पना देतात. पन्ना पुढे देवयानी आणि क्षितिजा सोबत बोलायला लागतात.
पन्ना - अरे मैं तो तुम्हें जन्मदिन की शुभकामनाएं देना ही भूल गई। जन्मदिन मुबारक बेटी। ज़िंदगी में एैसे ही हमेशा मुस्कुराते रहो। वैसे मैंने सुना तुम्हारी ख्वाहिश थी। तुला तुझ्या एकातरी वाढदिवसाला आमच्या सारख्या एखाद्या संस्थेला भेट द्यायची होती. पण मला ही तुझी अजब - गजब ख्वाहिश काही समजल नाही हा. म्हणजे बहुतेक लोक एखाद्या अनाथ आश्रम फार तर फार एखादी अपंग मुलांची संस्था ह्या सगळ्या संस्थांना भेट देतात. तुझ्या वयातल्या मुली तर मस्त फिरतात आणि मज्जा करतात. तुझे क्यों इधर आना था।
( तेवढ्यात कॉफीचा ट्रे घेऊन एक सुंदर स्त्री येते. ती कॉफी कप तिथे ठेवते आणि मी तयारी करते असे सांगून ट्रे घेऊन निघून जाते )
पन्ना..देवयानी आणि क्षितिजाला कॉफी घ्यायला सांगतात आणि देवयानीला म्हणतात. हा बेटा बोल आता.
देवयानी - अनाथ आश्रम, अपंग संस्था, वयोवृध्द व्यक्तीनं साठीचं आश्रम ह्या ठिकाणी सगळेच भेट देतात. पण तुम्हाला कधी कोणी आपुलकीने बोलत नाही. तुम्ही सुद्धा माणूस आहात ना. तुम्हालाही भावना आहेत. माझे वडील अपघातात वारले. ते शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये होते. तेव्हा मला एक अनुभव आला होता. मी तेव्हा सातवीत शिकत होते पण मला अजूनही तो प्रसंग पूर्ण आठवतो. अपघात झाला म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये आणायला कोणी तयार नव्हत. पोलिस केस होते ह्या कारणाने कोणी पुढे आले नव्हते. नंतर जिथे त्यांचा अपघात झाला त्याचं चौकात एक तृतीयपंथी होत्या. त्या तिथे सिग्नल वर पैसे मागायच्या. त्यांनी माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये आणल. त्यांच्यावर उपचार सुरू केलं. मग आमचा नंबर मिळवून आम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलं. पण नंतर उपचरादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. त्या नंतरही आमचे कोणीच नातेवाईक येत नव्हते. आमच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्या तृतिप्पांथिनीच त्यांच्या काही ओळखीच्या तृतीयपंथी व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलं. त्यांनी हॉस्पिटल चे बिल भरले आणि हॉस्पिटलची सगळी लीगल प्रोसेस पूर्ण केली. नंतर त्या व्यक्तींनी माझ्या वडिलांवर अंतीमसंस्कार केले. माझ्या आईने त्यांना पैसे ही देऊ केले पण त्यांनी घेतले नाही. तुम्ही माझ्या बहिण्यासारख्या आहात आणि ताई काही लागलं तर हा माझा नंबर आहे. मला कधीही फोन करा असे सांगून आम्हाला घरी सोडून निघून गेले. त्या वेळेस मला माणूस आणि देव ह्यातला फरक समजला. त्या नंतर त्या वरचे वर आमच्या घरी यायच्या. आम्हाला दोन मिनिट भेटून निघून जायच्या. वडिलांना जाऊन एक महिना झाला असेल. एकदा माझे मोठे काका घरी असताना ते घरी आले असता. काकांनी खूप वाद घातले. माझ्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यांचं तिथे येणं बंद केलं. त्या नंतर त्या आमच्या घरी कधीच आल्या नाही. काही दिवसांनी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे अशी बातमी आली. खर तर हे आम्ही कोणालाच सांगायचं नाही असे ठरवलं होत. पण आज तुम्हाला बघून पुन्हा जुन्या जखमा ओल्या झाल्या. माझ्या तोंडून आपसूक सगळे सांगितलं गेलं. वडील गेल्या नंतर कोणीच आमचं जवळच नाहीय. आता क्षितिजाच्या येण्यानं मला जवळची व्यक्ती भेटली आणि मी तिला ही अजब - गजब इच्छा बोलून दाखवली.
पन्ना आणि क्षितिजा हे सगळे डोळ्यात पाणी आणून ऐकत होते. क्षितिजाला ह्या कथेची काहीच कल्पना नव्हती. देवयानी च बोलण संपले आहे हे लक्षात येताच. पन्नाने आपल्या डोळ्यातील अश्रू लपवले. क्षितिजा अजुनही स्तब्ध होती. पन्ना पुढे काही बोलणार तितक्यात ती व्यक्ती केक आणि खायला घेऊन आली होती....
( कथा काल्पनिक आहे. ह्याचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती सोबत संबंध असल्यास तो योगायोग समजावा.
कथा जरी काल्पनिक असली तरी तृतीयपंथी व्यक्तीनं बद्दल आपल्या मनात असलेले गैरसमज आणि त्यांना दिली जाणारी तुच्छ वागणूक बदलावी. म्हणून ह्या भागातून प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काही चुकल्यास माफ करा. हा भाग कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद. )