आपण वाचत आहात...
निरागस बिट्टूची हृदस्पर्शी कथा..!!
***************************
त्यांच्या गप्पांना पूर आला होता.
पण त्या गप्पांच्या पुरात त्या चिमण्यांना थंडीचं तेवढं काय..??
त्या चिल्लर मंडळींची आई चुलीवर गरम गरम भाकरी थापत होती.
भुर्रर्र भुर्रर्र... दुरूनच स्कुटरचा आवाज आला.
" शुss.. शांत राहा..! अण्णा आलेत. "
नलूनं हळुवार तो बॉक्स उघडला..
आणि आत पहिले...
तिनं आनंदाने तो बॉक्स पूर्ण उघडला... आत एक पांढराशुभ्र थंडीने गारठलेला मऊ गोळा होता.
तिच्या ऊबदार स्पर्शाने ते छोटुसं पिल्लू तिच्या छातीकडे सरकलं.
तशी मंजिरी घाबरून दूर झाली.
धाकटी रजनी मात्र धीट होती. जवळ जात तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तसं ते पिल्लू तिच्याकडे जीभ बाहेर काढून बघू लागलं.
त्यामुळं त्या पिल्याला तरतरी आली.
" ओ रे..! माझं बिट्टू गं ते..! "
मंजिरीने कुतूहलाने विचारले.
ती पुन्हा म्हणाली.
नको नको.. तू तिच्याकडेच थांब..! "
बाजूला पळत ती म्हणाली.
तो पळत तिच्याकडे गेला.
मंजूनं विचारलं.
ते म्हणाले.
दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी स्कुटर घेतली. मग तिनेच शाळेच्या ठिकाणी भुर्रर्र भुर्रर्र करत जाऊ लागले.
कडक असले तरी त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीने विद्यार्थ्यांचे ते लाडके सर होते. त्यामुळं मुलेही त्यांच्याशी कधी भीत - भीत तर कधी हसत - खेळत मोकळेपणाने बोलायची.
मह्या घरी कुत्रीले पाच पिल्लं झाली..! तुम्हाले देऊ का एक..?? "
त्यांनीही मग त्या छोटया जीवाला थंडी लागू नये म्हणून पुठ्ठयांच्या खोक्यामध्ये पॅक केलं.. आणि स्कुटरवर समोर ठेऊन घरी आणलं.
बुधवार रविवारी आंघोळीचा दिवस असायचा.
मंजिरी राहाटाचं पाणी काढून आणायची. मग रज्जु आणि नलू दोघी मिळून त्याची साबण लावून सांग्रसंगीत आंघोळ करून द्यायच्या...
सगळ्यांना त्याचा चांगलाच लळा लागला...
पण सर्वात जास्त आवडायची ती म्हणजे नलू...!
तो सारखा तिच्या पुढे मागे करायचा. तिच्याशी खेळायचा..
ह्या तिघींची शोधाशोध सुरु झाली नी हळूच तो त्यांच्यासामोर आपली जीभ काढून उभा राहिला ..
नलू तर बिट्टू बिट्टू करत त्याला गोंजारत होती.
अण्णा कामानिमित्त बाहेरगावी निघाले होते.
मागे न बघता ते निघाले..
पण आधीच झालेला उशीर.., त्यामुळं ते थांबूही शकत नव्हते..
.
.
... मख्ख.. !!
रक्ताच्या थारोळ्यात...!!
अण्णा दुपारी परतले तेव्हा त्या ठिकाणी संपूर्ण चिंधडया उडल्या होत्या..
बिट्टू नव्हताच घरी.
नलू, मंजू, रज्जु.. कोणालाच त्याच्याबदल काहीच माहिती नव्हते.
त्यांनीही सकाळपासून सगळीकडे शोधाशोध केली होती.. पण तो माघारी परतला नाही हे कोणाच्याच लक्षात आले नाही.
त्या मिटल्या डोळयांसमोर त्यांना त्यांच्या स्कुटरच्या मागे धावणारा बिट्टू दिसला..
... आणि मग आठवलं...
घरी येतांना त्यांना दिसलेल्या गावच्या बस स्टॉप वर वाहनां मुळे शरीराच्या उडालेल्या चिंधडया...!!
रडून रडून सुधा आणि मुलींचे डोळे सुजले होते...
किमान महिनाभर तरी ते दुःख नलिनी आणि तिच्या बहिणींना पुरलं...
... आता ह्या गोष्टीला जवळपास दोन तपं उलटली....!
तरी अजूनही अधेमध्ये येतेच त्याची आठवन...! आणि मग त्यांचे डोळे उगाच भरून येतात.
.
.
समाप्त....!!
..... आवडली का बिट्टूची ही कथा...??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा