भूतांची घटना

भूतांची विनोदी कथा....
भूतांची घटना...

करोना काळात मला श्वास घ्यायला फारच त्रास होत होता.... हॉस्पिटल मध्ये... बेडवर मी तडफडत.... तडफडत... शेवटी.. मेले.... माझा नवरा.... माझी... मुलं... त्यांचे शिक्षण... माझे फिल्मी करियर.... सगळ्या इच्छा अपूर्ण राहिल्या.....

मरणानंतर....अतृप्त आत्मा म्हणून माझे भूतात रूपांतर झाले... आणि मी इतर भूतांच्या गेंग मध्ये सामील झाले...... मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही.... तसं मेल्या शिवाय भूत देखिल होता येत नाही.... याची प्रचिती मला आली....

भूत गैंग मध्ये सामील झाल्या नंतर ...पहिल्यांदा मला भूतांची अलिखित घटना सांगुन त्यां घटनेचे पालन करण्याची शपथ देण्यात आली....त्या घटनेत बरेच नियम होते.... उदा: भूतानी... मध्येरात्री बारा पासुन पहाटे तीन वाजेपर्यंत काम करावे..... दिवसा आराम केला तरी चालेल.... फारच कोणाला कंटाळा आला तर एखाद्याच्या शरीरात प्रवेश करून टाईमपास करावा.... घटनेतील त्या अनेक नियमांबरोबर.... काही मूलभूत अधिकारही घटनेने भूतांना दिले होते..... जस.. कोणाच्याही घरी दरवाजा बंद असला तरी... त्यातुन प्रवेश करता येईल ...इतर वस्तूंना स्पर्श करून त्या हातात घेता आल्या नाही... तरी ज्याला त्रास द्यायचा आहे... त्याला उचलून कुठेही भिरकावून देता येईल.... किंव्हा त्याचा गळाही दाबता येईल......ई.

त्यानंतर माझी पाहिली सर्जरी झाली... त्यांत माझे पाय उलटे जोडले गेले..... आता या उलट्या पायाने माणसांचा पाठलाग करणे म्हणजे....साडी नेसून ओलंपिक मध्ये धावण्यासारखे कठीण काम होते......सरळ पाय उलटे का जोडले... याचे अजुन उत्तर मिळालेले नाही.....

माझे सहकारी चांगल्या चांगल्या जागा सोडुन.... कोणी पुरानी हवेलीत.... कोणी खंडर...कोणी स्मशानात ...तर .कोणी जंगलातील झाडांवर ...राहत...... हे सगळं बघुन माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की, माणस भूतांना घाबरतात.... की, भूत माणसांना घाबरतात.....

आम्हांला घटने प्रमाणे दिवसा आराम आणि रात्रीच काम करण्याची परवानगी होती.... त्या कामात ...माणसांना नाहक घाबरवणं....त्यांचे रक्त पिणे... मांस खाणे अशी छोटी मोठी काम होती.....

मेल्यानंतर साधारणतः९९ % लोकांच्या तरी इच्छा अपूर्ण राहत असतील.... त्यामुळे ते सगळे भूत बनत असतील.... साहजिकच भूतांची भूतसंख्या (लोकसंख्या) प्रचंड वाढत असेल.... मात्र ती इतकी सगळी भूत कुठे राहत असतील याचा पत्ता नव्हता.....

भूतांना रोज रक्त प्यायला व मांस खायला लगे.... रक्त पील्याने आणि मांस खाल्याने भूतांना लघवी व बाथरूम लागणे साहजिकच होते..... मात्र भूतांची लघवी व शौच करण्यातसाठी काहीच सोय केलेली नव्हती....

काहीकाही भूत मांत्रिकाच्या हाती लागत... त्यांना बाटलीत बंद केले जाई.... त्या बाटल्या कुठे ठेवल्या जात याचा देखिल काहीच पत्ता नव्हता.....

देवळांत घूमणाऱ्या बाया त्यांच्या अंगात भूत शिरले अस सांगुन नेहमी भूतांना बदनाम करत.....वास्तविक भुतांना देवाची भीती वाटते.... ती कशाला मारायला जातील देवळात......

हे सगळं बघुन मला भूतांची जिंदगी अगदी -अगदी नकोशी...झालीय...... आता मुक्ती साठी अर्ज केला आहे... बघूया कधीपर्यंत मंजुर होतो ते?.....

लेखन: चंद्रकांत घाटाळ