बावरे मन..भाग 68
(माझ तिच्यावर प्रेमच नाहीये तर कस करु लग्न........तुला माहिती आहे ना वहिनी माझ रेवावर प्रेम आहे....मी नाही राहु शकत तिच्याशिवाय.......सुजय डोळयात पाणी आणुन हे सगळ बोलत होता.....
अरे हो पण.........स्नेहा पुढे काही बोलणार इतक्यात तिच लक्ष दाराकडे जात......आणि तिला काय बोलाव कळेनाच......
वहिनी......तुच सांग आता मी काय करु......मला काहीच कळत नाहीये.......सुयज
सुजय ते..........म्हणजे ते........स्नेहाला काय बोलाव कळेना.....ती ततपप करु लागली.....)
आता पुढे.....
वहिनी काय झाल बोल ना..........सुयज स्नेहाकडे पाहत बोलतो........तर स्नेहा दाराकडे पाहत होती.....ही अशी काय बघतेय म्हणुन सुजय मागे वळुन पाहतो.......
तु........सुजय एकदम ओरडतो....आणि तो स्नेहाकडे पाहतो...
स्नेहा थोडी नॉर्मल होत......राधिका ये ना........काही काम होत का..........स्नेहा
स्नेहा बोलल्यावर राधिका आत येते.......पण काहीच बोलत नाही......
राधिका तु इथे कशी काही काम होत का.....सुजय थोड अडखळतच बोलत असतो....
दोघेही चेहऱ्यावर काहीच घडल नाही असा आव आणि चेहऱ्यावर स्माईल आणतात राधिकाशी बोलत होते....
पण राधिका काहीच बोलत नव्हती.....त्यांना आता टेन्शन येवु लागल...हिने सगळ ऐकल आहे की काय सुजय मनातल्या मनात बोलत होता.....दोघांनाही काही कळेना राधिका काहीच बोलत नव्हती.......
राधिका अग काय.......अशी का शांत बसलेयस...बोल ना.......स्नेहा
राधिका तुला बर वाटत नाहीये का आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया का.......सुजय
मला काही झाल नाहीये मी ठिक आहे.......राधिका
अग मग अशी शांत का बसलेयस तु बोल ना काही तरी.......स्नेहा
काय बोलु वहिनी.......हयाला मी माझा जवळचा मित्र समजत होते तर हा माझ्याशीच खोट बोलला...माझ्यापासुन सगळया गोष्टी लपवल्या हयाने.......मी इतकी वाईट आहे का ग.......राधिका डोळयात पाणी आणत बोललत होती.....
राधिका अस बोलल्यावर स्नेहा व सुजय एकमेकांकडे पहायला लागले......अरे यार हिने तर ऐकलय सगळ आता काय........आता पुढे ही कशी रिॲक्ट होईल हयाची सुजयला काळजी वाटु लागली........पण आता सुजयला काय बोलाव कळेना.....
राधिका ऐक ना......मला तुला सगळ सांगायच होत पण.........सुजय
पण काय सुजय.......मी इतकी वाईट आहे का रे......तुला अस दु:ख देवुन मी सुखी राहिले असते का......एकदा माझ्याशी बोलला असतास तर.......का आता माझ्यावर विश्वास पण राहिला नाहीये.......राधिका
अग अस खरच काही नाही.....मी घाबरलो होतो ग......तुला सांगितलो आणि तु पहिल्यासारखी वागायला लागलीस तर..........सुजय
तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना पण स्वत:वर तर होता ना रे.....तु मला तेव्हा कसा त्यातुन बाहेर काढलायस तुलाही माहितेय आणि मलाही........मग मी परत तशीच वागेन अस कस वाटल तुला....एकदा विश्वासात घेवुन सांगितला असतास तर मी समजुन घेतले नसते का.......की एवढी पण समजुतदार नाहीये का मी......
मला मान्य आहे मी थोडी हट्टी आहे.....मला जे हव ते हवच असत पण कोणाच तरी प्रेम हिरावुन घेण्याइतकी तर हट्टी नाहीये ना रे........राधिका हे सगळ रडत बोलत होती......
ये राधिका सॉरी ना यार......मला तुझी काळजी वाटत होती......म्हणुन नाही ग सांगितलो....प्लीज यार समजुन तर घे ना.........सुजय
मला काही ऐकायच नाहीये.....तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती मला.......राधिका सुजयवर चिडुन बोलत होती.....
ये वहिनी तु तर सांग ना ग........तुला तर माहितेय ना मी अस का केल ते.......सुजय
हो ग राधिका........सुजय हे सगळ तुझ्यासाठीच करत होता ग........स्नेहा
हो ग वहिनी मान्य आहे माझ्यासाठी करत होता.......पण मला एकदा विश्वासात घेवुन सांगायला हव होत ना हयाने.....राधिका
हो ग......पण तु पण त्याला समजुन घे ना.......त्याने तुझी आधीची अवस्था पाहिली आहे ग म्हणुन तो तुझ्या काळजीपोटी हे सगळ करत होता........प्लीज त्याला माफ कर........स्नेहा
ये राधिका........मी कान पकडु का......हे बग पकडल कान........सॉरी ना यार..........हया मित्राला माफ नाही का करणार......सुजय
ओके करेन पण एका अटीवर.......राधिका
कोणती अट........सुजय
आता कान पकडला आहेस ना मग आता उठाबश्या काढ........राधिका
ये हे काय आता.......अजिबात नाही हा.......सुजय
मग मी नाही माफ करणार....राधिका
बर बाई काढतो उठाबश्या......सुजय
हो काढ.........सुजय उठाबश्या काढु लागला......राधिका एक.....दोन......तीन.......असे आकडे मोजु लागली.....ओय बास आता........नौटंकी कुठला...राधिका थोडी हसत बोलते.......
सुजय उठतो व राधिकाला मिठी मारतो........थॅक्स राधिका........थॅक्यु सो मच........सुजय
ओय बास आता.......हे थॅक्स वगेरे ना तुमच्या रेवा मॅडमांना म्हणायच मला नाही.......कळल.......राधिका
बर बाई नाही बोलत.........मग तर झाल.......सुजय
हा.....राधिका
बर आता आई बाबांना काय सांगायच.....ते तर तुमच्या साखरपुडयाची तयारी करत आहेत.....स्नेहा
वहिनी ते तु माझ्यावर सोड मी सांगेन आत्तुला.....राधिका
अग पण काय सांगणार.......स्नेहा
सांगेन की मला आता सुजयशी लग्न नाही करायच......आणि तिला शॉक पण नाही बसणार.....तिला हया सगळयाची सवय आहे.......राधिका
अग पण........स्नेहा
नको काळजी करु वहिनी.....होईल सगळ ठिक..........ओके चल मी आलेच...माझा एक कॉल येणार आहे.....राधिका
ओके.....स्नेहा
बापरे कसली घाबरले होते मी......आता काय होतय अस वाटत होत...........स्नेहा
अग वहिनी तुझ्यापेक्षा जास्त मी घाबरले होतो....आता हिला कस समजवायच हयाच टेन्शन मला आल होत.....आता काय रिॲक्ट करेल हयाची भिती वाटत होती.......पण खुप बदली आहे ग राधिका इतकी समजुतदार कधीच नव्हती ती.....सुजय
हो खुप समजुतदार झाली आहे राधिका..........स्नेहा
हो ग.....सुजय
पण तिच्या डोळयात काही तरी वेगळ वाटल मला......जाऊन एकदा पहायला हव......स्नेहा मनातल्या मनात बोलत होती.....
बर सुजय मी आलेच हा......स्नेहा
हो चालेल.......सुजय
राधिका तिच्यारुममध्ये येते.......आणि मगाच पासुन लपवुन ठेवलेल्या आश्रुंना वाट मोकळी झाली.....ती मोठयाने रडु लागली......
आय लव्ह यु सुजय.....नाही राहु शकणार रे तुझ्याशिवाय........खुप प्रेम करते रे तुझ्यावर......पण तुला अस दु:खात ठेवुन मी सुखी नाही राहु शकत.....अस बोलत राधिका रडत होती.........इतक्यात स्नेहा तिथे येते........
राधिका.........स्नेहाचा आवाज ऐकताच राधिका पटकण आपले डोळे पुसते.......अग वहिनी तु इथे काही काम होत का...........राधिका चेहऱ्यावर हसु आणत बोलत होती......
राधिका माझ्यापासुन तु डोळयातील पाणी लपवु शकत नाहीस......मला मघाशीच लक्षात आल होत.....म्हणुन तुझ्यामागे आले.....स्नेहा
अस काही नाही ग वहिनी........राधिका
अस काही नाहीये ना मग हेच माझ्याडोळयात पाहुन बोल पाहु.........स्नेहा राधिकाच्या समोर जात बोलते......
स्नेहाला अस समोर आलेल पाहुन राधिकाला रडु आवरत नाही ती स्नेहाला मिठी मारुन रडु लागली....
तुला जेवढ रडायच आहे तितक रडुन घे....मनात जे काही असेल ते बोल त्याशिवाय तुझ मन मोकळ नाही होणार.....स्नेहा राधिकाला सावरत बोलत होती......
वहिनी खुप प्रेम करते ग मी सुजयवर......त्याच्याशिवाय कशी राहणार आहे नाही माहीत......अस म्हणुन राधिका परत रडु लागली.....
राधिका शांत हो पाहु ये इकडे बस ये............स्नेहा राधिकाला बेडवर बसते.....तिला प्यायला पणी देते......राधिका मला कळतय ग तुला किती त्रास होत असेल.....पण सावर स्वत:ला......स्नेहा
हो ग वहिनी आता तेच तर करायच आहे......सुजय माझा नाही होवु शकत कधीच........राधिका परत डोळयात पाणी आणुन बोलु लागली.
राधिका मला मान्य आहे तुला त्रास होतोय......कदाचीत मी ते समजु पण शकणार नाही....पण हे पण तितकच खर आहे की.....सुजय तुझ्यावर प्रेम नाही ग करत......अस असताना तो तुझ्याशी लग्न केला तर कोणीच सुखी नाही होवु शकणार.......स्नेहा
हो ग वहिनी सगळ कळतय......पण त्रास तर होणारच ना.....राधिका
हो ग त्रास तर होणारच आहे पण तुला हयातुन बाहेर तर पडाव लागणारच ना......स्नेहा
हो ते तर करावच लागणार.....वहिनी माझा बाबा मला नेहमी म्हणायचा......आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करण्याऐवजी......जो आपल्यावर प्रेम करतो ना...त्याच्याशी लग्न कराव....संसार खुप सुखाचा होतो.......
हो ग तसच असत........राधिका मला महितेय तुला हे सगळ स्विकारण् थोड कठीण जाणार आहे.....पण वेळ होण्यापेक्षा आत्ताच सावरलेल बर......स्नेहा
वहिनी तु म्हणेतेयस ते सगळ बरोबर आहे मी नक्की प्रयत्न करेन........राधिका
स्नेहा राधिकाचे डोळे पुसत तिला एक स्माईल देते.......
बर चला आत्तुला सांगाव लागेल ना.....ती उगाच पुढची तयारी करत बसायची.........राधिका
राधिका पण काय सांगणार आहेस तु......स्नेहा
वहिनी अग तु नको काळजी करु.......तु एक काम कर.......तु सुजयला अध्याला व दादुला घेवुन हॉलमध्ये ये.......मी जाते पुढे........ओके........राधिका
बर..........स्नेहा राधिका गेल्यावर सगळयांना हॉलमध्ये बोलावुन आणते......
अग राधिका काय बोलायच आहे तुला ते तर सांग ना........माधवीताई राधिकाला विचारत किचनमधुन बाहेर येतात.....आणि समोर पाहतात तर सगळेच हॉलमध्ये एकत्र जमले होते....
अरे तुम्ही पण सगळे इथे अहात..........माधवीताई
अग आत्तु त्यांना मीच बोलावल आहे.......राधिका
अग पण एवढ काय बोलायच आहे तुला......सगळयांना बोलावल आहेस......माधवीताई
सांगते तु बस ना इथे.........राधिका माधवीताईना खाली बसवत बोलते......
आत्तु मामा मला सगळयांनाच खुप महत्वाच सांगायच आहे त्यासाठी तुम्हा सगळयांना हॉलमध्ये बोलावल आहे........राधिका
बाळ......काही काळजीच नाहीये ना.........आनंदराव......
नाही मामा कळजीच काही नाही......मला तुम्हाला हे सांगाच होत की........मला सुजयसोबत लग्न नाही करायच..........राधिका
काय...........माधवीताई एकदम ओरडत उभ्या राहतात.....अग काय बोलतेयस राधिका तु......माधवीताई
आत्तु मी खर तेच बोलतेय......मला सुजयशी लग्न नाही करायच.......राधिका
अग थोडयादिवसापूर्वी तर लग्न करणार आहेस म्हणुन सांगितलीस ना........माधवीताई
राधिका.......तुमच काही भांडण वगेरे झाल आहे का.....त्यामुळे तु चिडुन अस बोलत आहेस का....आनंदराव
नाही मामा अस काही झाल नाहीये......मी खुप विचार करुन हे सगळ बोलतेय.....राधिका
अग पण अस काय झाल एवढ की लग्नाला नाही म्हणत आहेस......सुयज बोल ना तु का शांत आहेस......काय झालय.....ही लग्नाला नाही का म्हणतेय......माधवीताई
आई ते.....आता सुजय काही तरी बोलेल म्हणुन राधिका मध्ये बोलते.........अग आत्तु तु त्याला काय विचारतेयस.....त्यालाही आत्ताच कळल मी त्याला काहीच बोलले नाहीये.....राधिका माधवीताईच्या जवळ जाते....आत्तु मी खुप विचार केले ग.....ते फक्त काहीवेळासाठी वाटुन गेल मी सुजयवर प्रेम करते...त्याने जे माझ्यासाठी केल...आणि अजुनही करत आहे....त्यामुळे मला वाटल की मी त्याच्यासोबत सुखी राहीन.......पण नंतर विचार केल्यावर कळल की......मी तर सुजयवर प्रेमच करत नाही.....मग मी त्याच्याशी कस लग्न करु शकते....आणि समज केले लग्न आणि नंतर नाही जुळल आमच तर दोघांची पण लाईफ खराब होईल.........मग कस लग्न करु सांग......राधिका
अग पण.......माधवीताई पुढे काही बोलणार इतक्यात आनंदराव....माधवी ती बरोबर बोलतेय....जर लग्न केल आणि त्यांच नाही जुळल तर दोघांचही आयुष्य खराब होईल मला राधिकाच बोलण पटतय..तिने वेळेवर हे सगळ आपल्याला सांगितल हे बर केल.......आनंदराव
अहो पण........माधवीताई
अग दोघे सुखी रहावेत एवढच वाटत ना आपल्याला...मग त्यांना त्यांची लाईफ कशी जगाची आहे कोणासोबत जगायची आहे ते त्यांना ठरवु देवुया ना....आपली मुले तेवढी सज्ञान आहेत....हो ना.......आनंदराव
तुम्ही म्हणत अहात तर बर मी काही बोलत नाही....माधवीताई
ये आत्तु तुला वाईट वाटतय माहितेय ग मला......पण तुच विचार कर ना...पुढे जाऊन आमची भांडण होवु लागली.....आम्ही एकमेकांसोबत जुळवुन नाही घेतलो तर......सगळयांनाच त्रास होणार ना.....राधिका
हो ग.......तुझ सगळ पटतय मला पण वाईट पण वाटणारच ना....माधवीताई
सॉरी ग आत्तु.......प्लीज समजुन घे मला........राधिका
हो ग बाळा तुला समजुन नाही घेणार तर कोणाला घेवु.........माधवीताई
हो ना मग थोड हास बघु..........राधिका
आनंदराव व माधवीताईना थोड वाईट वाटल होत पण सुजय स्नेहा आध्या सगळे खुश होते......आता रेवा सुजयच व्यवस्थित हाईल अस त्यांना वाटत होत.....त्यामुळे ते सगळेच खुश होते.....
****
दुसऱ्या दिवशी सुजयला कधी एकदा बॅकेत जाईन आणि रेवाशी बोलेन अस झाल होत......तो पटकण आवरुन बॅकेत जातो.....रेवा तिच्या डेस्कवर बसली होती...पण नेहमीप्रमाणे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते....सुजयला वाईट वाटत पण ती चिडली आहे त्यामुळे अस करत असेल अस वाटल.......तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला केबिनमध्ये बोलवत होता........पण रेवा मात्र त्याच्याशी खुप रुड वागत होती.....बघता बघता चार दिवस असेच जातात......पण रेवाच्या वागण्यात काहीच बदल नाही......ती तशीच वागत होती....आता मात्र सुजयला तिच्या वागण्याचा त्रास होवु लागला.......त्याला हे सहन करण अशक्य झाल....आणि त्याने काही तरी ठरवल.........व तो घरी गेला............
क्रमश:
आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....