विषय_ पंखात भरले बळ.
जलद कथा मालिका स्पर्धा.
परिस्थितीने अचानक गंभीर अवस्था निर्माण केल्यासारखे झाले होते.घराबाहेर पाऊस वाढल्याचा आवाज येत होता.वेळ मध्यरात्रीची होती.कोणाला मदतीसाठी बोलावता येत नव्हते.हातात चप्पल घेऊन कोमल मात्र पुरते सावधगिरीने सापकडे बघत होती.......
........कोमल आता अकस्माक आलेल्या त्या रंगबिरंगी सापाला घाबरण्याचे विसरून गेली होती.अंगातील सर्व शक्ती एकवटून कोल्हापुरी चप्पलेचा मारता येईल तेवढा जोरदार फटका सापाच्या डोक्यावर मारला.डोक्यावर फटका बसल्याने सापाचे सळसळने कमी झाले होते.....
......आणि मग एका मागून एक अजून दोन चार फटके लगवल्या नंतर सापाची सळसळ हळूहळू मंदावत गेली.घराबाहेर पाऊस वाढल्याचा आवाज येत होता.न घाबरता , न ओरडता ,कोमलने केवढी हिम्मत दाखवली होती.आयुष्यात जिवंत सापाला पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहूनही कोमलने धैर्याने काम केले होते.....
......" असं नको ठेवायला याला घरात काही सांगता येत नाही.जाळून टाकावे का"... असं विकास ला वाटले.घराबाहेर जाण्याच्या मागच्या दाराजवळ एका पेपर वर सापाला उचलून ठेवले आणि दिले पेटवून.
दुसऱ्या दिवशी सकाळीच विकासला मॅनेजरला रिपोर्ट द्यायचा होता.सर्व आटोपून सकाळी विकास ऑफिस मध्ये गेला.काय कसे आहे,कशी झाली ट्रीप,सेमिनार कसे झाले, बाळ,बाळंतीण कसे आहेत....??? या असल्या फॉर्मल विचारपूशी पेक्षा काल रात्री घरामधे सापाचा जो प्रकार घडला ,त्याची कधी एकदा बातमी देऊ असे विकासला झाले होते.
रात्रीचा प्रकार ऐकून मॅनेजर आणि इतर सहकारी ही आश्चर्यचकित झाले होते.मग पुढे काय केले त्या सापाचे .असे विचारल्यावर ," आहे अजून जळलेल्या पेपरवर." असे विकासने सांगितले.
मॅनेजरने दोन तीन सफाई कामगारांना विकासच्या घरी पाठवले.त्यांनी त्या सापाला घेऊन ऑफिसवर दाखवण्यासाठी नेले.....
" अरे बापरे,हे तर अजगराचे पिल्लू दिसत आहे." असे मॅनेजर अवाक होऊन म्हणाले होते.
बोलणे झाल्यावर ,..." आम्हाला आता प्रवासामुळे सुट्टीची गरज आहे सांगुन ,सुट्टीचा अर्ज देऊन विकास घरी गेला.
बोलणे झाल्यावर ,..." आम्हाला आता प्रवासामुळे सुट्टीची गरज आहे सांगुन ,सुट्टीचा अर्ज देऊन विकास घरी गेला.
एका फुटभर सापाने मरता मरता कोमालला मात्र समयसूचकतेचा ,धैर्याचा धडा देऊन गेला होता.
आयुष्यामध्ये एखाद्याला त्याच्या इच्छापूर्तीच्या पंखांना बळकट करावे लागते.एखादा ध्येयप्राप्तीचे पंख बळकट करतो.एखादा कर्तव्य,जबाबदारीचे पंख बळकट करतो.पण...
पण बाळंतपण म्हणजे ,एका नवीन जन्मासोबतच ,मातृत्वाच्या दुसऱ्या एका लुप्त,अदृश्य, अस्तित्वाचा जन्म असतो.
स्त्रिच्या नाजूक,ममतेने भरलेल्या पंखांनाही कठोर ,बळकट बनवते .असे असते मातृत्व....!!!!
समाप्त.
©® Sush.
समाप्त.
©® Sush.