मागील भाग वरून पुढे…
अरुणाला भेटून विश्राम घरी निघाला तेव्हा त्याच्या डोक्यात अरुणाबद्दलच विचार चालू होते,
\"केवढी समजूतदार मुलगी आहे.अरुणा फार बोलत नाही त्यामुळे तिचा स्वभाव तिचे विचार कधी कळले नाही. सतरा वर्षांची असूनही ती खूप परिपक्व आहे. मुळात ती
तशी असेल आणि आई वडिलांचा संस्कारामुळे ती आणखी परिपक्व झालेली असेल.\" विश्राम मनातच म्हणाला.
तशी असेल आणि आई वडिलांचा संस्कारामुळे ती आणखी परिपक्व झालेली असेल.\" विश्राम मनातच म्हणाला.
****
गाडी पार्क करून विश्राम आपल्या घरी गेला.
विश्राम जेवत असतानाच ऋषीचा फोन आला. फोन वर ऋषीच नाव बघताच. विश्राम स्वत : शीच बोलला
" जरा धीर नाही या मुलाला." असं म्हणत विश्राम ने फोन घेतला
" जरा धीर नाही या मुलाला." असं म्हणत विश्राम ने फोन घेतला
" हॅलो…"
" दादा अरुणा आली होती का?"
"ऋषी मी आत्ताच आलो आहे आणि जेवायला बसलोय.उद्या तुझ्याशी तलमीनंतर बोलेन.तेव्हा सविस्तर बोलू.आता शांत झोप आणि मला शांतपणे जेवू दे."
विश्रामच्या बोलण्याने ऋषी हिरमुसला पण "हो…" म्हणत त्याने फोन ठेवला
****
दुसऱ्या दिवशी सकाळी विश्रामने ऋषीला
कुठे भेटायचं याबाबतीत मेसेज केला संध्याकाळी तालमीनंतर विश्रामने ऋषीला बोलवलं. ठरलेल्या वेळी ऋषी जागेवर पोहोचला.
कुठे भेटायचं याबाबतीत मेसेज केला संध्याकाळी तालमीनंतर विश्रामने ऋषीला बोलवलं. ठरलेल्या वेळी ऋषी जागेवर पोहोचला.
" हाय विश्राम दादा …"
"हाय काय म्हणतोस?"
"मी ठीक आहे मला सांग अरुण काय म्हणाली"
"अरे हो रे बाळा किती घाई करशील ?बस."
विश्रामने चहा टपरीवर बसून दोन कटिंग चहा सांगितला आणि मग तो ऋषीशी बोलू लागला.
"ऋषी काल अरुणाशी मी बऱ्याच वेळ बोललो अरुणाच्या आणि तुझ्या लाईफ स्टाईल मध्ये बराच फरक आहे. अरुणाच्या मते आर्थिक स्थितीमध्येही खूप फरक आहे. तसंच तू तुझ्या मनासारखं जगतो म्हणजे इझी गोइंग तुझं आयुष्य आहे. कष्ट तुझ्या आयुष्यात नाहीये असं अरुणाला वाटतं. अरुणाच्या घरचे सगळेच खूप मेहनती आहेत."
" दादा पण त्यांनी काय फरक पडतो? आर्थिक स्थिती बघून का कोणी प्रेम करत असतं?"
ऋषीने विश्राम ला हा प्रश्न केला यावर विश्राम म्हणाला
"ऋषी तुझं म्हणणं बरोबर आहे प्रेम करताना कोणी आर्थिक स्थिती बघत नाही. मीपण हे अरुणाला सांगितलं पण अरुणा हुशार आहे तशी समजुतदार आहे. त्यामुळे तिला स्वतःची परिस्थिती माहिती आहे. ती तुझी परिस्थिती बघुन लगेच तुझ्या भावनेला होकार देऊ शकली नाही कारण तिला माहिती आहे की प्रेमात आर्थिक स्थितीचा विचार करत नसलो तरी कुठे ना कुठेतरी आर्थिक परिस्थितीमधील तफावत लग्नामध्ये अडथळा बनू शकते."
"मला काही प्रॉब्लेम नाही दादा तिची आर्थिक परिस्थिती बेतास बात असली तरी." ऋषी म्हणाला
"ऋषी तुला काही फरक पडत नसेल पण तुझ्या घरच्यांना पडेल." विश्राम समजवणीच्या सूरात म्हणाला.
" दादा आमच्या घरच वातावरण खूप फ्री म आहे. आम्ही सगळे एकमेकांच्या मतांचा आदर करतो." ऋषी म्हणाला.
" हे सगळं एका विशिष्ट पातळीपर्यंत बरोबर आहे. ऋषी… पण जेव्हा लग्नासारखी गोष्ट येते तेव्हा प्रत्येक जण आपल्या पातळशी जुळणाऱ्याच व्यक्तीशी सोयरीक ठरवत असतो हे विसरू नकोस."
विश्रामच्या या बोलण्याने ऋषी विचारात पडला. त्याच्या कडे विश्रामच बारीक लक्ष होतं. विश्राम काहीच बोलला नाही त्याला
ऋषीने बोललेल हवं होतं.
ऋषीने बोललेल हवं होतं.
बराच वेळ ऋषी काहीच बोलला नाही विश्रामही गप्प होता. थोड्यावेळाने विश्राम कडे बघत ऋषी म्हणाला
"दादा काहीच होणार नाही का रे? अरुणा माझं प्रेम स्वीकारणारच नाही का? निव्वळ आमची आर्थिक परिस्थिती खूप वेगळी आहे म्हणून!"
"असं अरुणाच म्हणणं नाही. ऋषी… तिचं म्हणणं असं आहे की ऋषीची आर्थिक स्थिती उत्तम आहे याचे कारण ऋषीच्या वडीलांनी घेतलेले कष्ट. त्यांचा व्यवसाय त्यामुळे एवढा मोठा झाला. या सगळ्यांत ऋषीचा किती सहभाग आहे?"
" अरे पण…हा व्यवसाय माझ्या बाबांचा आहे. त्यामुळे त्यांना तेवढे कष्ट घ्यावेच लागले."
"तू तुझ्या बाबांच्या श्रीमंतीवर जगतोस. तुझं उत्पन्न सुरू नसताना तुझी जी ऐशो आरामी लाईफ स्टाईल आहे ती अरुणाला खटकते. ती तिच्या उत्पन्नावर स्वत:चे खर्च भागवते. मला सांग अशी मुलगी तुझ्या श्रीमंतीला कशी भुलेल?" विश्रामने ऋषीला सरळ प्रश्न केला.
" मग मी काय करावं असं अरुणाच म्हणणं आहे?" ऋषीने विचारलं.
" ते मी कसं सांगणार?" विश्राम म्हणाला.
" अरुणा बोलेल माझ्याशी?" ऋषी
" फोन करून बघ." विश्राम
" दादा एवढे तटस्थपणे का बोलता? मला तुमच्या बोलण्याने निराश व्हायला झालय." ऋषी
" ऋषी जेवढं मी बोलू शकत होतो तेवढं मी अरुणाशी बोललो. आता तुझ्याशीपण बोललो. हा प्रश्न इतका नाजूक आहे की मी एका मर्यादे पलीकडे आत शिरू शकत नाही. तुम्ही दोघं एकमेकांशी बोला. एकमेकांचे लग्नाबद्दलचे विचार जाणून घ्या मग पुढे काय करायचं ते ठरवा."
"दादा मी फोन केला तर अरुणा येईल का मला भेटायला,? की तुम्ही सांगता तिला?"
" हे बघ ऋषी आता हा प्रश्न तुमच्या दोघांचा आहे. तू कर तिला बिनधास्त फोन नंतर मीही सांगेन वाटल्यास. तू तिला विचार की तू कधी भेटतेस? आणि जेव्हा भेटशील तेव्हा सगळ्या गोष्टींवर दोघंही सविस्तर चर्चा करा. एकही मुद्दा विसरू नका.." विश्राम म्हणाला.
ऋषी अरुणा ला फोन लावतो
"हॅलो…" अरुणा
"अरुणा मला तू भेटशील का ? "
"ऋषी आता काय आहे? कशासाठी भेटायचं?" अरुणा जरा नाराजीनेच विचारते.
"हे बघ मला विश्राम दादांनी सगळं सांगितलं आहे. आपण एकदा भेटून बोलू या. तुझं मत मला पूर्णपणे कळू दे. माझं मत तुला कळू दे."
" बघते मी कधी भेटायचं ते." अरुणा म्हणाली.
"अरुणा प्लीज माझं म्हणणं ऐक. असं झिडकारू नकोस आणि तुला वेळ नाही असेही सांगू नकोस. एकदा भेट. माझं म्हणणं ऐक. जर सगळं ऐकूनसुद्धा तुझा नकार असेल तर मी तुझ्या मागे येणार नाही." ऋषी
" ठीक आहे. तुला कळवते."
एवढं बोलून अरुणा ने फोन कट केला. ऋषीची यावर विचित्र प्रतिक्रिया झाली तो विश्रामला म्हणाला
"दादा मी बोलत असतानाच अरुणाने फोन का कट केला?"
विश्रामला यावर काहीच उत्तर देता आलं नाही. तरी तो म्हणाला
"ठीक आहे, तू आता अरुणाच्या फोनची वाट बघ.ती म्हणाली ना मी कळविन."
" दादा मला जरा कठीणच वाटतय."
" हे बघ ऋषी… ती पक्की आहे तिच्या विचारांवर. तुला जर ती खरच आवडत असेल तर आधी तिची लाईफस्टाईल, तिची आर्थिक स्थिती हे सगळं बघ आणि या सगळ्यांमधून तुला पुढे जाता येईल का याचा विचार कर. त्यानंतर तू तिला प्रपोज कर ठीक आहे! कळलं का मी काय म्हणतोय ते?"
"ठीक आहे दादा मी यावर विचार करेन पण आता अरुणाशी प्रत्यक्ष बोलणं झाल्या शिवाय मला करमणार नाही."
" मला कळतेय ऋषी तुझी अवस्था. खरच तुला तिच्याबद्दल मनापासून वाटतं हेही मला कळतय,पण कसंय… ती खूप साधी आणि डाऊन टू अर्थ मुलगी आहे. तिच्या हातात जे आहे त्यावर ती विश्वास ठेवते. अरुणा आपलं पांघरून पाहून हात पाय पसरणारी मुलगी आहे. म्हणून ती तुला फारसा वेळ देत नाहीये."
"दादा हे कुठवर चालेल?" ऋषींनी शंका काढली
"आता तुमची भेट झाल्यावर तुलाच कळेल की हे पुढे जाईल का नाही ? जर पुढे जाणार असेल तरच तिला भेट." विश्राम म्हणाला.
"दादा आज मी प्रॅक्टिसला येऊ का?"
"नको नको ऋषी काल परवाच तिच्याशी बोलणं झालंय आणि ती जर त्याच विचारातच असेल तर आज पुन्हा तुला प्रॅक्टिसला पाहिलं की ती तुझ्याशी बोलेल की नाही ! काही सांगू शकत नाही." विश्राम ने त्याला जाणीवपूर्वक येऊ नको सांगितलं.
"हे बघ ऋषी दोन दिवस तू नाटकाच्या प्रॅक्टिसला येऊ नकोस कारण दोन दिवसांनी तुला रंगीत तालमीला यायचंच आहे. त्यावेळेला ती कशी वागते तुझ्याशी हे जरा तू जज कर मग तुला कळेल.स्पर्धा संपेपर्यंत तुम्ही दोघे भेटू नका बाबा नाहीतर स्पर्धेत आपलं नाटक उभच नाही राहिलं तर काय उपयोग एवढ्या दिवसांच्या मेहनतीचा?"
" दादा तुझं म्हणणं पटतंय मला. ठीक आहे मी रंगीत तालमीच्या दिवशीच येईन. स्पर्धा संपल्यानंतर अरुणाला फोन करीन आणि तिला विचारेन कधी भेटायचं? त्यानंतरच तिला भेटेन. तू काळजी करू नकोस." ऋषीच्या बोलण्याने विष्रमने सुस्करा सोडला.
___________________________क्रमशः बघू पुढे काय होईल ते…
अरुणा ऋषीला भेटायला तयार होईल का?
बघू पुढच्या भागात.
___________________________क्रमशः बघू पुढे काय होईल ते…
अरुणा ऋषीला भेटायला तयार होईल का?
बघू पुढच्या भागात.
लेखिका…मीनाक्षी वैद्य.