प्रकाशरावांच्या सामाजिक कार्याच्या आवडीमुळे डाॅक्टर, वकील,शिक्षक,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक लोकांशी त्यांची ओळख झाली होती. त्यामुळे या सर्वांच्या मदतीने ते वेगवेगळे उपक्रम राबवित होते. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वेगवेगळे आरोग्य शिबिरांचे आयोजन करायचे.गरीब , गरजू मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करायचे. अनाथाश्रमातील मुलांच्या गरजा पूर्ण करत होते. पर्यावरण संवर्धनासाठी 'झाडे लावा,झाडे जगवा' मोहीम राबवित होते. नातेवाईक,शेजारीपाजारी, मित्र मंडळी,लहानथोर अशा सर्व लोकांना ते मदत करत होते. त्यांचे सर्वांशी आपुलकीचे नाते तयार झाले होते. लोकांमध्ये देव पाहणे व कर्म हीच देवपूजा. या तत्त्वाने ते वागत होते. एवढा सारा व्याप सांभाळूनही ते कधी थकत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहत होते. मित्रमंडळीत विनोद, थट्टामस्करी करायला, त्यांना आवडत होते.
ते लोकांमध्ये देवाला पाहायचे आणि लोक त्यांच्यात देव पाहायचे.लोकांच्या मनात त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
ते लोकांमध्ये देवाला पाहायचे आणि लोक त्यांच्यात देव पाहायचे.लोकांच्या मनात त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांना पत्नीही खूप चांगली मिळाली होती.प्रकाशरावांना कधी कधी घरच्या जबाबदारीसाठी जमत नव्हते; पण त्यांच्या पत्नीने कधी तशी तक्रार केली नाही. उलट त्यांच्या प्रत्येक कार्यात त्या साथ देत होत्या. आपल्या पत्नीच्या अशा छान स्वभावामुळे,आधारामुळे प्रकाशराव खूप खूश होते आणि अजून कार्य करण्यास त्यांना उत्साह मिळत होता.
प्रकाशराव पत्नी व मुलगी यांच्यामुळे आनंदी होते,समाधानी होते. पत्नी संसार व्यवस्थित सांभाळणारी व त्यांच्या कार्यात साथ देणारी होती व मुलगी हुशार, अभ्यासू, जिद्दी होती. तिची प्रगती पाहून त्यांना तिची काळजी वाटत नव्हती. आणि आपल्या गुणी मुलीला तिच्या योग्य जोडीदार व सासर मिळाले म्हणून समाधानी होते. पण मुलगा अजय ..याची त्यांना खूप काळजी वाटायची. त्याला अभ्यासात विशेष आवड नाही. हे त्यांना समजले होते. ते त्याच्या कलेनेच घेत होते. गोड बोलून,समजावून सांगत अभ्यास करायला सांगत होते. कारण शिक्षण,अभ्यास याचे महत्त्व त्यांना माहित होते. नोकरी असो की व्यवसाय असो किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असले तरी..तसे शिक्षण, अभ्यास,मेहनत, जिद्द असावीच लागते. तरच यश मिळते. असे त्यांचे मत होते.
पण अजय आयुष्याकडे फक्त मौजमजा म्हणून पाहत होता. याचेच त्यांना वाईट वाटत होते.
पण अजय आयुष्याकडे फक्त मौजमजा म्हणून पाहत होता. याचेच त्यांना वाईट वाटत होते.
'बारावीनंतर एखादी डिग्री कर. नोकरी कर नाहीतर आपला व्यवसाय सांभाळ. आणि हेही नसेल करायचे तर तुला काही वेगळे करायचे असेल तर ते कर. पण मार्ग चांगलाच पाहिजे.' असे ते नेहमी अजयला सांगायचे.
अजयला त्यांचे असे सांगणेही आवडायचे नाही व त्यांचे सामाजिक कार्य करणेही आवडायचे नाही.
'तुम्ही लोकांसाठी एवढे करतात...लोक येतील का तुमच्या मदतीला? काही नसते असे काही...सर्वीकडे फक्त स्वार्थीपणा असतो.
'गरज सरो व वैद्य मरो' असे वागतात लोक.
तुम्ही स्वतःसाठी जगा, मस्त जीवनाचा आनंद घ्या. लोकांचे टेंशन घेऊ नका.'
'गरज सरो व वैद्य मरो' असे वागतात लोक.
तुम्ही स्वतःसाठी जगा, मस्त जीवनाचा आनंद घ्या. लोकांचे टेंशन घेऊ नका.'
असे तो प्रकाशरावांना म्हणायचा.
क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा